पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात भारताला महाशक्ती बनण्यासाठी सर्वव्यापी भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगूलचालनाचे राजकारण या तीन दुष्प्रवृत्तींशी लढण्याचे आवाहन केले आहे. कारण, भारताच्या सार्वभौमत्वाला खरा धोका बाह्यशक्तींपेक्षा या देशांतर्गत शक्तींपासून आहे, हे ते ओळखून आहेत. उलट आपल्या हितसंबंधांना खरा धोका मोदी या व्यक्तीपासून असल्याचे या घराणेशाहीवादी नेत्यांच्याही लक्षात आल्यामुळे त्यांनीही मोदी यांनाच आपले प्रमुख लक्ष्य बनविले आहे, पण त्याचा उपयोग शून्यच!
Read More
आजपासून ७२ वर्षांपूर्वी दि. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण आपले संविधान स्वीकारले. शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यानंतर स्वतंत्र झालेल्या नवजात देशाने स्वत:साठी तयार केलेले लोकतांत्रिक, प्रजासत्ताक संविधान म्हणून या संविधानाची सर्वत्र व्यापक चर्चा झाली. अद्याप होत असते. या सात दशकांच्या काळात आपल्या संविधानात एकंदर १०४ दुरुस्त्या केल्या गेल्या. येणार्या काळात संविधानात दुरुस्ती करण्याची गरज वेळोवेळी निर्माण होऊ शकते, ही संभाव्यता घटनाकारांनी सुरुवातीलाच लक्षात घेतली होती व त्यादृष्टीने घटनादुरुस्तीची कार्यप
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जन्मदिनी दि. ३१ ऑक्टोबर, २०१८ रोजी पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते केवडिया, गुजरात येथे सरदार पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या ५०० फुटांपेक्षा अधिक उंचीच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले. आज हा जगातील सर्वाधिक उंच पुतळा आहे.