जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ भारतात असून सन २०२२च्या अखेरपर्यंत देशामध्ये ३ हजार १६७ वाघ असल्याची नवीन आकडेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जाहीर केली.प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल म्हैसूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशातील वाघांची अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे. १ एप्रिल १९७३ रोजी भारताने वाघ वाचवण्यासाठी मोहीम सुरु केली होती. त्यालाच प्रोजेक्ट टायगर असं नाव देण्यात आले आहे.
Read More
वनसेवेत जंगलांच्या संरक्षणाबरोबरच लोकसंवाद महत्त्वाचा असतो. मनमोकळेपणा हा स्वभावगुण असलेले वनसंरक्षक नानासाहेब सीताराम लडकत यांच्याविषयी...