क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' चित्रपटातील काही दृश्यांना सेन्सॉर बोर्डाकडून कात्री लावण्यात आली आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून शुक्रवार, ११ एप्रिल रोजी पुण्यातील फुले वाड्यासमोर आंदोलन करण्यात आले.
Read More
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागले असून महायुतीच्या पारड्यात बहुमताचे दान जनतेने दिले आहे. भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तम कामगिरी करत महाराष्ट्राचे सत्तासोपान महायुतीच चढेल, हे निश्चित केले. असे असले तरी, या निवडणुकीत अनेक मातब्बरांना पराभवाची चवही चाखावी लागली आहे, तर अनेक पक्षांना स्वतःचे खातेही उघडता आलेले नाही. वंचित बहुजन आघाडीलादेखील ( VBA ) या विधानसभा निवडणुकीत फार करिष्मा दाखवता आलेला नाही. या विधानसभेसाठी २०० जागी उमेदवार उभे करूनदेखील वंचितच्या पारड्यात
Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे येथे राज्य होते. आपण संभाजी महाराजांचा आदर करत पुणे शहराला छत्रपती संभाजीनगर असे नाव द्या, औरंगाबाद शहराचे नाव औरंगाबादच असू द्या अशी मागणी आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केली. ते वाशिमच्या रिसोड शहरात विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत गोळे यांच्या प्रचारार्थ सभेसाठी आले असता त्यांनी प्रतिपादन केले.
राज्याचे ज्येष्ठ मंत्री शरद पवार यांचे अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला. मात्र आता हाच दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यांनी १८ ऑक्टोबर रोजी प्रसारमाध्यमाशी संवाद साधत असताना प्रतिक्रिया केली आहे. ते म्हणाले की, शरद पवार १९८८-९१ मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी दुबई येथे जाऊन दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती, असे सांगण्यात आले.
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी होण्याची चर्चा सुरु आहे. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, छत्रपती संभाजीराजेंची स्वराज्य संघटना आणि बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष मिळून ही तिसरी आघाडी निर्माण होऊ शकते. दरम्यान, या आघाडीत प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगेंना घेण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे राजू शेट्टींनी म्हटले आहे. त्यांनाटीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
५५ लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा, अशा आशयाचे बॅनर वंचित बहुजन आघाडीकडून लावण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा सुरु केली असून ते राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जात आहेत.
मराठा आणि कुणबी हे दरोडेखोर आहेत का? असा सवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना केला आहे. मराठा आणि कुणब्यांपासून सावध रहा, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. यावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खलनायक करुन त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
महाविकास आघाडीतील सांगली लोकसभेच्या जागेचा प्रश्न सुटला असला तरी काँग्रेसमधील अंतर्गत वाद अजूनही कायम असल्याचे बोलले जात आहे. यातच काँग्रेस नेते विशाल पाटील सांगलीतून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशाल पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याची माहितीही पुढे आली आहे.
काँग्रेस पक्ष नेहमीच आंबेडकर परिवारावर अन्याय करतो, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरही भाष्य केले. त्यांनी रविवारी पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( nana patole ) यांनी पुन्हा प्रकाश आंबेडकरांना युती करण्याची साद घातली आहे. अजुनही वेळ गेलेली नाही. आपल्याकडे अर्ज मागे घेण्यापर्यत वेळ आहे अस त्यांनी प्रकाश आंबेडकरांना उद्देशुन म्हटलं आहे. अकोल्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असताना नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलं.
ओबीसी बहुजन पार्टीने लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, ९ उमेदवारांच्या नावांची घोषणा शुक्रवार, दि. २९ मार्च रोजी केली. अकोल्यातून प्रकाश आंबेडकर आणि कोल्हापुरातून शाहु महाराजांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली असून लोकसभेत अपक्ष उमेदवार न देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, सगे-सोयरे याला विरोध करणाऱ्यांना पाडा, असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे. तसेच, मी माझी जात राजकारणाच्यासमोर आणू शकत नाही, त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जरांगेंनी स्पष्ट केले आहे.
मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांच्याकडून उमेदवारी मिळविण्याकरिता विविध पक्षांच्या गाठीभेटी घेण्यात येत आहेत. आता वसंत मोरे यांच्याकडून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यात आली आहे. दादर येथील राजगृह येथे वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात पुणे लोकसभा उमेदवारीबाबत खलबतं सुरू आहेत.
वंचित बहुजन आघाडी अधिकृतरित्या महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या घराणेशाहीवर टीका केली ते म्हणाले की, "ठाकरे-पवारांना 'वंचित'चा वापर घराणेशाही वाचवण्यासाठी करायचा होता, त्यांची घराणेशाही वाचवण्यास आम्ही नकार दिला आहे"
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन राजकीय समिकरण उदयास येत आहे. वंचित बहुजन आघाडी अधिकृतरित्या महाविकास आघाडीतून बाहेर पडून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी महासंघासोबत आघाडी करण्याच्या तयारीत आहे. याविषयीची शक्यता खुद्द वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीच बोलून दाखवली आहे.
उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी वंतिच बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना चार जागांचा ( 4 seats to Vanchit in MVA ) प्रस्ताव कायम आहे. असं म्हटलं आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा आजही कायम आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला १२ जागांची मागणी केली होती. महाविकास आघाडीतील चारही पक्ष १२ १२ जागा लढवतील अशी त्यांची इच्छा होती.
प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरी आम्ही जिंकू, असा विश्वास उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. सध्या वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. यातच आता संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊतांनी वंचित बहुजन आघाडीसोबतच्या चर्चेची सर्व दारे बंद केली आहेत, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उबाठासोबतची युती तुटल्याचे जाहीर केले. यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीसोबत सूर जुळत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचे जवळपास निश्चित केले आहे. २८ मार्च रोजी प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मविआने त्यांना पाठविलेला चार जागांचा प्रस्ताव त्यांनी धुडकावला आहे.
लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांची भेट घेतली. वंचित बहुजन आघाडीला आगामी निवडणुकीत चिन्ह काय असावे, यासंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडीकडुन गॅस सिलेंडर, शिट्टी आणि रोड रोलर या चिन्हांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी आमचा प्रस्ताव मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहूजन आघाडीमध्ये बिनसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महाविकास आघाडीचा प्रमुख घटकपक्ष असलेली काँग्रेस राज्यातील १६ जागा लढवण्याची तयारी करीत असताना, वंचित बहुजन आघाडीने मात्र त्यांना केवळ ७ जागांवर पाठींबा देण्याची तयारी दर्शवली आहे.
महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जागावटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर मविआमध्ये वंचित राहणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शनिवारी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली असून जागावाटप निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्वांच्याच मनासारखं होत नसतं. प्रकाश आंबेडकरांनी हट्ट सोडावा, असा सल्ला उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना दिला आहे. बुधवारी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक पार पडली. मात्र, अजूनही जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना राऊतांनी हे वक्तव्य केले.
महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात बैठक सुरु असून यात काँग्रेसला दुय्यम स्थान दिले असल्याचे समोर आले आहे. काही जागांवर महाविकास आघाडीत मतभेद असून या बैठकीत हा तिढा सोडवणार आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हेदेखील या बैठकीत सहभागी झाले आहेत.
संजय राजाराम राऊतांनी जिथे जिथे पाऊल ठेवेलेलं आहे एकतर ते घर तुटलंय किंवा पक्ष फुटला आहे. उद्धवजी, पवार साहेब आणि काँग्रेस संपल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीकडे संजय राऊतांनी आपलं लक्ष वळवलेलं आहे, असा टोला भाजप आमदार नितेश राणेंनी लगावला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाविकास आघाडीची दि.२ फेब्रुवारी २०२४ रोजी ट्रायंडट हॉटेलमध्ये जागावाटपासंदर्भात बैठक होणार आहे. ही बैठक जागावाटपाच्या बाबतीत महत्त्वाची ठरणार आहे. कारण ह्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर ही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान काही दिवसापुर्वी आपण महाविकास आघाडीत सामील झालो आहोत, असे विधान केले होते.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागवाटपावरून महाविकास आघाडीमध्ये वाद असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एक सुचक वक्तव्य केले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना मविआत घेण्याबाबतही त्यांनी भाष्य केले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा अजूनही इंडिया आघाडीत समावेश झालेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या 48 जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काहीच होत नसेल तर आम्ही लोकसभेच्या ४८ जागा मोठ्या ताकदीने लढवू, असं प्रकाश आंबेडकर यांनी दि. २४ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर सर्वत्र प्रकाश आंबेडकरांच्या या निर्णयाची चर्चा होऊ लागली. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा राजकीय प्रवास? त्यांच्या वंचितचं आताचं राजकारण? भारिप ते वंचित हा प्रवास? शरद पवार विरुद्ध प्रकाश आंबेडकर असा
'पुराणातील वांगी पुराणात’ याप्रमाणे ‘पूर्वजांची पुण्याई ही पूर्वजांचीच’ असे म्हणण्याची वेळ उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिका, वक्तव्ये ऐकली की यावी. या दोघांची आडनावं आणि त्यांच्या धमन्यांतील रक्त त्यांच्या थोर पूर्वजांचं जरी असलं, तरी विचारांची मात्र कमालीची तफावत!
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत असून मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद सुरु आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये असे म्हटले आहे. छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांचे नाव घेता त्यांनी हा इशारा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. ४४ जागांची बोलणी जवळपास पुर्ण झालेली आहे. तसेच मात्र चार जागांवर चर्चेतून निर्णय होणार आहे. दरम्यान अकोला , हातकणंगले जागा महाविकास आघाडीने राखीव ठेवली. त्यात जर वंचित बहुजन आघाडी मविआसोबत आली तर अकोला जागा वंचितला दिली जाऊ शकते. अन्यथा ही जागा काँग्रेसला दिली जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेम्स् ऑफ रुपी प्रबंधाला १०० वर्ष पूर्ण झाल्यामुळे यशवंतराव चव्हाण सेंटरला २१ ऑक्टोबरला एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. दरम्यान त्यांच्यात कार्यक्रमानिमित्त भेट झाली.
"मोदींना हिमालयात आताच पाठवा,” असे प्रकाशबापू म्हणजे प्रकाश आंबेडकर म्हणाले. दुर्देव हेच की प्रकाश यांची ही इच्छा देशातली कोट्यवधी जनता पूर्ण करू इच्छित नाही. कारण, ‘मोदी हैं तो मुमकीन है!’ पंतप्रधानपदी मोदी आहेत, म्हणून देश आणि समाज सुरक्षित आहे, असे कोट्यवधी भारतीयांना वाटते.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व ४८ लोकसभा जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केले आहे.
इंडी आघाडीत सहभागी होण्यासाठी काँग्रेसला पत्र दिलं होतं पण उत्तर आलं नाही, असा दावा वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याआधी उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटासोबत युती करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यजमान असलेल्या इंडी आघाडीच्या मुंबई बैठकीत प्रकाश आंबेडकर यांना बोलवतील, असा अंदाज होता. पण उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकर यांना बोलावलं नाही.
मुंबईत I.N.D.I.A आघाडीची बैठक होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी दोन दिवसांची बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीचे शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांवर भाष्य केलं. इंडिया आघाडीत येता का आंबेडकरांना विचारावं लागेल. असं ठाकरे म्हणाले आहेत.
प्रकाश आबंडेकर यांनी 'INDIA' आघाडीत यावं, ही मनोमन इच्छा असल्याचे माजी मुख्यमंत्री, अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. या आघाडीत देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष आहेत. या आघाडीत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सामील व्हावं. इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर यावे ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. पण याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. पण आंबडेकर इंडियासोबत आले तर त्यांचा आघाडीला फायदा होईल, असं अशोक चव्हाण म्हणालेत.
वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी, असा अल्टीमेटम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. लवकर निर्णय झाला नाही तर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे. असा इशाराही त्यांनी दिला आहे. ते अकोल्यात बोलत होते. आंबेडकरांचं भारत राष्ट्रीय समितीसोबत संभाव्य तिसऱ्या आघाडीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांचं हे विधान महत्त्वाचं मानलं जातंय.
दलित आणि मुस्लीम समाजाची एकी व्हावी आणि त्यातून सत्ता प्राप्त करावी, असे बेरकी राजकारण अनेक नेते करत आहेत. त्यातही नवबौद्ध समाज आणि मुस्लीम समाज यांची युती करून पदरात मत पाडून घ्यायचा विचारही काही नेते करत आहेत. राजकारण बाजूला ठेवले तरीसुद्धा सामाजिक दृष्टीने दलित आणि मुस्लीम समाजाची एकी याबद्दल वास्तव काय आहे? बौद्ध आणि मुस्लीम या दोन्हींचा इतिहास आणि त्या इतिहासासचे परिणाम यातून समाजासमोर काय वास्तव आहे? याचा मागोवा घेणारा हा लेख...
सर्व अनधिकृत बांधकामाना उद्धव ठाकरेचा आशीर्वाद होता, ज्यांनी ज्यांनी अधिकाऱ्यांवर हात उचलला त्यांच्यावर कारवाई होणारच आहे, असा घणाघात आमदार नितेश राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट व्हावी, अशी मागणी ही राणेंनी केली आहे. जे जे उद्धव ठाकरेंशी निगडित आहेत त्यांना दंगली घडवायचा प्रयत्न आहे. असं ही त्यांनी म्हटलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायगडावर जायचे, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकायला गेले. अशी टीका माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. संभाजी राजे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यांच्या भेटीगाठीही सुरु होत्या. मात्र, संभाजी राजे यांना प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्याबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी संताप व्यक्त केला.
औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवली म्हणून होणारी दंगल थांबली. असं खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. नवी दिल्ली येथे प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले की, मी कबरीवर फुल चढवली, माझ्या निर्णयामुळे जी दंगल झाली असती ती थांबली. अनेकजण कबरीवर गेले आहेत. तसेच त्यांची यादीही माझ्याकडे आहे, असं आंबेडकर म्हणाले.
माहीम परिसरात उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो असलेले बॅनर्स लागले आहेत. मध्यरात्री अज्ञात इसमाने हे बॅनर्स लावले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पण, आता हे बॅनर्स ठाकरे गटाकडुन उतरवण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादच्या खुलताबाद येथे जाऊन औरंजेबाच्या कबरीवर लोटांगण घातले होते.
शिवसेना ठाकरे गटाला वर्धापन दीनाआधीच गळती लागली आहे. यावरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहू शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची विचारधारा काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवल्याने शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची कास धरतील किंवा भाजपाचा झेंडा हाती घेतील, अशी घणाघाती टीका आ. प्रविण दरेकर यांनी केली.
मी 'द केरला स्टोरी' सारखे चित्रपट कधीच बघत नाही. या चित्रपटातुन घेण्यासारखे काहीच नाही. असं वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. शिवाय या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी राजकीय वाद निर्माण केला जात आहे. अशीही टीका त्यांनी केली.
मुंबई : उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत निवडणूक लढण्याचा चंग बांधला आहे. याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र, विरोध केला आहे. उद्धव ठाकरेंनी कितीही प्रयत्न केला तरीही प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी पवार उत्सुक नाहीत. 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची संयुक्त बैठक बुधवारी ८ मार्च रोजी विधान भवनात झाली. त्यात एप्रिल ते मे या कालावधीत ‘मविआ’च्या संयुक्त सभा घेण्याची रणनीती आखली गेली. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभांचा कार्यक्रम आणि नियोजनासंदर्भात १५ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची बैठक होणार आहे.
जे उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या हातचे शिवबंधन टिकवू शकले नाहीत, ते आता मोदीविरोधकांच्या महागठबंधनाची गाठ घट्ट करण्याची भाषा करू लागले. याकुब मेमनचे समर्थन ते आता खलिस्तानवाद्यांना पाठीशी घालणार्या केजरीवालांच्या ‘मातोश्री’वारीने, ठाकरेंची चुकलेली राजकीय दिशा आणि दशाच पुनश्र्च अधोरेखित होते.