‘समरसता साहित्य परिषद’ पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे दि. 5 मे रोजी स्व. विजयराव कापरे स्मृती काव्य करंडक मैफिल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या आगळ्या वेगळ्या काव्यस्पर्धेचा या लेखात घेतलेला मागोवा...
Read More
माझे आणि राजेश्रीचे गेल्या काही वर्षांचे स्वप्न म्हणजे ‘त्रिवेणी.’ स्वा. सावरकरांच्या घराण्यातील स्त्रियांच्या आयुष्यावर आधारित, स्वा. सावरकरांच्या साहित्यावर बेतलेला नृत्य, नाट्य, काव्य व निवेदनात्मक प्रयोग. खरेतर किती प्रयोग करायचे, कोठे करायचे, असे काहीच ठरलेले नव्हते, पण प्रयोग होत गेले. छत्रपती संभाजीनगरामध्ये आणि इतर ठिकाणीसुद्धा...
दिल्ली दारु घोटाळ्याप्रकरणी ईडीने के. कविता ( K. Kavita Delhi liquor scam ) यांना अटक केली होती. त्यांना सध्या तिहार तुरुंगात ठेवणयात आले आहे. गुरुवारी सीबीआयने त्यांना अटक करुन दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले. यापुर्वी त्यांची तुरुंगातच चौकशी करण्यात आली होती. के. कविता तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आहेत.
मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊझ अव्हेन्यू न्यायालयाने सहा दिवसांची म्हणजेच २८ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.राऊझ अव्हेन्यू न्यायालयात जवळपास ५ तास झालेल्या सुनावणीमध्ये ईडीने केजरीवाल यांचा मद्य घोटाळ्यामध्ये असलेला सहभाग सविस्तरपणा मांडला. यावेळी ईडीतर्फे २८ पानांचा अहवालदेखील सादर करण्यात आला. अतिरिक्त सॉलिसीटर जनरल सूर्यप्रकाश व्ही. राजू यांनी युक्तीवाद केला. त्यांनी अरविंद केजरीवाल हे मद्य घोटाळ्याचे प्रमुख असल्याचा दावा केला. अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील म
नुकताच काँग्रेसचे युवराज खा. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात झाला. ‘इंडी’ आघाडीचे जवळपास सगळेच नेते या राजकीय रंगमंचावर उपस्थित होते. या न्याय यात्रेत राहुल गांधी यांनी काँग्रेसचे घोषणापत्रही जाहीर करून आश्वासनांचा अक्षरश: पाऊस पाडला. पण, बारकाईने गांधींच्या जाहीरनाम्यावर नजर टाकली असता, त्यामधील बहुतांश आश्वासनांची मोदी सरकारने आधीच पूर्तता केलेली दिसते. जसे की, राहुल गांधींनी असंघटित कामगारांसाठी ‘जीवन विमा योजना’ सुरू करण्याची घोषणा केली.
सुप्रसिद्ध उर्दू कवी, शायर, गीतकार गुलजार यांना नुकत्याच जाहीर झालेल्या ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारानिमित्ताने त्यांच्या काव्याविष्काराचे हे रसग्रहण...
गायकांनी आपल्या सुमधूर गायकीने एकाहून एक सरस गाणी गाऊन डोंबिवलीकरांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते ते डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित अमृतोत्सव या सहा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या श्रृंखलेतील तिसरे पुष्प “गुलजार… द लिजंड” या कार्यक्रमाचे सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात हा कार्यक्रम पार पडला.
हिंदी चित्रपट गीतकार तथा उर्दू कवी गुलजार (संपूरण सिंह कालरा) यांना साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार ज्ञानपीठ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर, जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी गोस्वामी तुलसीदासांच्या लेखनावरही विपुल संशोधन केले आहे. या कार्याची दखल घेत त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, संस्कृत भाषेतील योगदानाबद्दल जगद्गुरू रामभद्राचार्य यांना हा सन्मान देऊन गौरविण्यात येत आहे.
अखिल भारतीय साहित्य संमेलनातून संपूर्ण तीन दिवस चालणारा गझल कट्टा यावर्षीपासून केवळ तीन तास असेल, असा निर्णय नुकताच साहित्य महामंडळाने घेतला. त्यानंतर गझलकारांनी गझल सादरीकरणासाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करायचे ठरवले. याच धर्तीवर ‘पहिले एल्गार गझल संमेलन’ अमळनेर येथे दि. २७ आणि २८ जानेवारी रोजी आता आयोजित करण्यात आले आहे. संमेलनादरम्यान गझल कट्टा स्वतंत्र सभागृहात साजरा होतो. तेव्हा तिथे रसिकांची गर्दी होते. मात्र, मुख्य मंडपात रसिकांची उपस्थिती अत्यल्प असते. तसेच गझल म्हणजे मराठीवर झालेले आक्रमण आहे, असे
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित अनेक बाबींवर चर्चा होते. परंतु, त्यांनी समाजाला दिलेली काव्याची देणही तितकीच कालातीत आहे. कोणत्याही काळात समाजप्रबोधन करणारी आहे. काळाच्या पुढचे पाहणारी आहे. म्हणून त्यांच्या १८९८ पासून ते १९२९ पर्यंत लिहिलेल्या कवितेतील काही निवडक, भावगर्भित कवितांच्या ओळींचे रसग्रहण करण्याचा केलेला हा प्रयत्न...
मनोरंजन क्षेत्रात, मालिका, नाटक आणि चित्रपटासाठी लेखन करणार्या लेखकांचा सन्मान ‘मानाचि पुरस्कारां’नी केला जातो. यावर्षी ‘मानाचि’चे आठवे वर्ष. यावर्षीच्या पुरस्कारांत गुरु ठाकूर यांना ‘चंद्रमुखी’ या चित्रपटासाठी गीतकार म्हणून ‘मानाचि पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. त्यानिमित्त बदलत्या काव्यप्रवाहांना जाणून घेताना त्यांच्याशी केलेली बातचीत..
कलेच्या प्रांतात मुशाफिरी करत आपल्या अभिनयाचा यशस्वी ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री शमा निनावे आता काव्यसंग्रहाच्या माध्यमातून एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या भेटीला आल्या आहेत. नुकताच त्यांचा 'शमा...साठी’ हा मनमोहक काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला आला आहे. मनाच्या पटलावर उमटलेल्या विविध भावभावनांचे तरंग या काव्यसंग्रहातून शमा यांनी मांडले आहेत.
आदित्य प्रवीण दवणे, संकेत अरुण म्हात्रे, प्रथमेश किशोर पाठक आणि स्पृहा जोशी हे सादरकर्ते आपल्या कविता, गझल, गप्पांमधून प्रेक्षकांना काही नवं देण्याचा प्रयत्न केला
बालपणी घरातच भातुकलीऐवजी शिक्षिका बनून खेळणारी मुलगी भविष्यात साहित्यप्रेमी प्राध्यापिका बनते. त्या दीपा ठाणेकर यांच्याविषयी...
बाल कवितांपासून ते प्रेम कवितांपर्यंत आणि चित्रपटगीतांपासून ते भावगीतांपर्यंत आपल्या आशयघन, तरल आणि भावमधूर कवितांनी मराठी रसिकांना मोहित करणारं नाव म्हणजे 'शांता शेळके'
कवितेच्या क्षेत्रात कवितेची शैली, आशय, प्रतिमा आणि प्रतीके तसेच कवितेतून हाताळलेले विषय याबाबत अनेक कवींनी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. विविध विषयांवरील कवितांचे एकत्रित संग्रह, प्रातिनिधिक कवितासंग्रह, एकाच विषयावरील कविता आणि एकाच आशयाच्या विविध कविता असलेले कवितासंग्रह व दीर्घकविता यांची निर्मिती आजवर मोठ्या प्रमाणात झाली.
'मराठी शाळा बंद पडल्या तर सर्वात मोठा घात होईल तो खेड्यातील मुलींचा! खेड्यातील मराठी शाळांची अवस्था ही अतिशय दयनीय झाली आहे आणि शाळांच्या खाजगीकरणाने तर गोरगरिबांचे शिक्षण बंद करण्याची पुरती सोय केली आहे'
आपल्या हिंदू संस्कृतीचे, मराठी महिन्यांचे वेगळेपण काही निराळेच. घड्याळातील १२ आकड्यांप्रमाणे,हे १२ महिने एका मागे एक अगदी तोर्यात येतात आणि आपले अस्तित्व रातराणीच्या सुगंधाप्रमाणे सर्वत्र उधळून जातात.
माँसाहेब जिजाऊंचा आदर्श प्रमाण मानून प्रत्येक सुख-दुःखात संकटात स्वत्त्व आणि मानवी मूल्य जपत जीवनक्रमण करणार्या साहित्यिक आणि समाजसेविका राखी रासकर यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा.
कोरोना उपचार घेणाऱ्या बिग बींनी व्यक्त केली कृतज्ञता!
बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी बालकांच्या अंतरंगाचा शोध घेत बालकवितांचे लेखन केले असून यशाचे उंच उंच शिखर गाठण्यासाठी बालकांना गगनभरारी घेता यावी म्हणून प्रतिभेचे पंख मुलांना देऊ केले आहेत, असे त्यांची कविता वाचल्यानंतर मला वाटते. एकनाथ आव्हाड यांचे बालसाहित्यात मोठे योगदान असून त्यांचे बालकविता संग्रह, काव्यकोडी संग्रह प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र शासनाच्या बालसाहित्य पुरस्कारासह इतरही साहित्य संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
समर्थ रामदासांनी लिहिलेले ‘आनंदवनभुवनी’ हे ५९ कडव्यांचे ‘अनुष्टुप’ एक अप्रतिम काव्य आहे. त्यातील शब्दयोजना, भावनांचा आवेश, विचारांचे अर्थसौंदर्य यांचा आस्वाद घ्यायचा, तर ते काव्य मुळातूनच वाचले पाहिजे. तसेच त्यातील गेयतेची गोडी विचाराबरोबर कळेल.
नाशिकसह राज्यातील साहित्य विश्वात आपल्या काव्यांद्वारे एक वेगळा ठसा उमटवलेले कुसुमाग्रजांचे मानसपुत्र ज्येष्ठ कवी आणि सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष किशोर पाठक यांचे शनिवारी दि. २१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले
कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस आपण मोठ्या उत्साहात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. ग्रामीण भागात आपल्या मातृभाषेची विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण करणाऱ्या ऋजुता तायडे यांच्याविषयी...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने येत्या माघ पौर्णिमेला ‘यक्षरात्र’ या काव्यसुरांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
'कुटुंब रंगलय काव्यात' या एकपात्री काव्यनाट्यानुभवाचा ३००० वा महोत्सवी कार्यक्रम होणार आहे.
बहिणाबाई हा चमत्कारच असून काळालादेखील बहिणाबाई पुन्हा घडवता येणार नाही. जात-धर्म-प्रांत आणि भाषेच्या सीमा ओलांडलेल्या या कवयित्रीचा प्रभाव अनेक पिढ्यांवर कायम राहिला आणि भविष्यातही राहील, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.