गतकाळातील कार्याचा आढावा घेत नवे संकल्प करण्याचा आजचा दिवस असून राज्याच्या भविष्यातील विजेची गरज पूर्ण करण्याकरता कार्यक्षमता वृद्धी आणि तंत्रकुशल होणे गरजचे आहे. मुख्यमंत्री यांचे नेतृत्वामध्ये अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प गतीने पुर्ण करण्यास महानिर्मिती प्राधान्य देत असून महानिर्मितीचे व्हिजन २०३५ द्वारे आपण शाश्वत हरित ऊर्जेच्या दिशेने प्रवास करत असल्याचे प्रतिपादन, राधाकृष्णन बी., अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती यांनी केले. ते महानिर्मितीच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त रंगशारदा सभागृहात आयोजित क
Read More
भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था ठरला आहे. अर्थव्यवस्थेत भारताने इंग्लंडलाही मागे टाकले आहे. येत्या काळात कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीतून भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
कालच्या भागात आपण विकसित राष्ट्राची परिभाषा आणि निकष याविषयीचे गणित आणि संकल्पना जाणून घेतली. परंतु, विकसित राष्ट्रासाठी केवळ आर्थिक विकास अपेक्षित नसून त्याला मानव विकासाची जोड देणेही तितकेच आवश्यक. त्यानिमित्ताने मानवी विकासाची भारतीय संकल्पना आणि ब्रिटिशपूर्व भारतातील संपन्नता यांचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबई : “युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य शिक्षण देऊन परदेशामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी राज्य शासन सातत्यपूर्ण प्रयत्न करीत असल्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर म्हणाले. तसेच, जर्मनीने सुद्धा याबाबत उत्सुकता दर्शविली असून त्यांची कुशल मनुष्यबळाची गरज महाराष्ट्र पूर्ण करू शकेल”, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
कोरोना महामारीपूर्वी ‘वर्क फ्रॉम होम’ या काहीशा मर्यादित संकल्पनेने आता सर्वच क्षेत्रात व्यापक स्वरुप धारण केलेले दिसते. परंतु, या कामकाज पद्धतीचा बर्याच क्षेत्रांमध्ये आजही अवलंब सुरु असला तरी त्याचे फायदे-तोटे लक्षात घेऊन संस्थांनी त्याअनुसार योग्य ते बदल करणे, धोरणनिश्चिती करणे क्रमप्राप्त ठरावे. त्याविषयी सविस्तर...
आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात अमूक एक क्षेत्र हे केवळ पुरुषांसाठी वगैरे चित्र तसे नगण्यच! अगदी अंतराळापासून ते अणुसंशोधनापर्यंत महिलावर्ग आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर दिसतो. पूर्वी वाहन उत्पादन क्षेत्रात पुरुषांचाच पगडा होता. परंतु, आजघडीला हे चित्र पूर्णपणे पालटलेले दिसते. तेव्हा, नवरात्रीच्या निमित्ताने वाहन उद्योगजगतातील ‘नारीशक्ती’चा आढावा घेणारा हा लेख...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. एकीकडे वाढत असलेली रूग्ण संख्या तर दुसरीकडे कमी पडत असलेली आरोग्य यंत्रणा यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या वर्षभरापासून ससूनमध्ये कोविड आणि नॉन कोविड रूग्णालयात काम करणारे निवासी डॉक्टर संपावर जाण्याची शक्यता आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही आज रात्रीपासून संपावर जाऊ, असा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला आहे.
सीबीएसई दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. मंडळाने आज दहावी आणि बारावी बोर्डाच्या प्रलंबित सीबीएसईची तारीख पत्रक जाहीर केले.
बँकांना आणि खास करून सहकारी बँकांना, व्यवसायवृद्धी आणि त्याचे नवे मार्ग, तंत्रज्ञानाचा विकास आणि योग्य वापर, मनुष्यबळाचे नियोजन, संसाधन उपलब्धता, व्यवसायातील रिस्क किंवा नवीन आव्हाने आणि त्यांचे नियोजन, कायदेशीर पूर्तता, ‘एनपीए’ची हाताळणी, प्रशिक्षण, ‘डिजिटल प्रेझेन्स’ ग्राहक सेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करत असताना खर्च कपात आणि फायदा वृद्धी यावर त्वरित काम करणे, हे प्राथमिक आणि महत्त्वाचे आहे. याला अत्यंत अग्रक्रम देणे आवश्यक आहे.
विदर्भात खनीज व वनसंपत्तीवर आधारित उद्योगांची स्थापना झाल्यास त्यांना लागणारे कुशल मनुष्यबल निर्माण होणे गरजेचे