देशातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाने केंद्र सरकारला पत्र लिहून देशातील माओवादी आणि नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम थांबविण्याची नुकतीच मागणी केली. एवढेच नाही तर सरकारने या नक्षलवाद्यांना ठार मारण्याचा ‘घटनाबाह्य कार्यक्रम’ थांबवावा, असेही या पक्षाने पत्रात म्हटले. या पत्रामुळे नक्षलवाद आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यातील माय-लेकरांचे नातेच सिद्ध होते.
Read More
(Bengaluru Stampede) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर येत आहे. डीसीपी एमएन करिबासवन गौडा यांनी कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला पत्र लिहून लोकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. विधानसौधा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरही आक्षेप घेतला होता.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित नवी दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे. तसेच या पत्रातून त्यांनी पंतप्रधान मोदींकडे एक मागणीदेखील केली.
नेहरू आणि एडविना यांच्या पत्रांमध्ये लपवण्यासारखं काय आहे? काँग्रेस नेत्या सोनिया गांधी सोरोसच्या संस्थेवर सदस्य का आहेत? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांच्याकडून
जगाच्या पाठीवर रोजच काही ना काही अनोख्या घटना घडत असतात. पण, त्यातल्या काही घटना जागतिक बातमीचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी जर्मनीत घडलेल्या अशाच एका घटनेने जगाचे आणि खास करून, भारतीयांचे लक्ष वेधून घेतले आहे.
( Atul Parchure ) मराठी आणि हिंदी चित्रपट तथा नाट्यसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचे दि.१४ ॲाक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. वयाच्या ५७व्या वर्षी अनपेक्षितपणे अतुल यांनी जगाचा निरोप घेतल्यामुळे संपूर्ण मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. केवळ कलाकारांनीच नव्हे तर, अनेक राजकीय मंडळींनी देखील दुःख व्यक्त केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवत अतुल परचुरे यांच्या पत्नी सोनिया परचुरे यांचे सांत्वन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र काढणाऱ्या आकांक्षाचे कौतूक करण्यासाठी त्यांनी तिला पत्र लिहिले आहे. कांकेरमधील सभेत आकांक्षाला दिलेले वचन त्यांनी पुर्ण केले आहे. तसेच तिला पत्र लिहून त्यांनी तिचे आभार मानले आहे.
सरकारने पारंपारिक तसेच रिन्यूएबल एनर्जी, डिफेन्स,ऑटोमेशन अश्या उभरत्या क्षेत्रात रोजगारनिर्मिती केली असल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ५१००० तरूणांना सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र प्रदान केल्यावर पंतप्रधान मोदी यांनी यावेळी हे उद्गार काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीमार्फत रोजगार मेळ्यांतर्गत नवनियुक्त उमेदवारांना सुमारे ५१,००० नियुक्ती पत्रांचे वितरण केले. देशभरातून निवडले गेलेले कर्मचारी टपाल विभाग, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये/विभागांमध्ये सरकारी सेवेत रुजू होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे ८ व्या रोजगार मेळाव्याचे सादरीकरण आज पार पडले. पीएम मोदी यांच्या दृकश्राव्य उपस्थितीत ही नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. आज भारतात विकासाचे सामर्थ्य असून यावेळी देशात तरुणांचे भविष्य उज्ज्वल आहे. या विकासयात्रेत प्रत्येक औद्योगिक सेक्टरमधील प्रगती ही देशाला पुढे नेणार आहे. असे पंतप्रधान मोदींनी नवनियुक्तांना याप्रसंगी बोलताना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ५१,००० हून अधिक नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. ही नियुक्तीपत्रे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली गेली आहेत.
तीव्र हवामान बदलामुळे आफ्रिकेत रोगांचे प्रमाण वाढत असल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. आफ्रिका खंडातील मलावी या देशामध्ये १९९८ पासून ‘कॉलरा’ची साथ कायम आहे. ‘कॉलरा’ म्हणजे ‘व्हिब्रिओ कोलेरी’ या जीवाणूने दूषित अन्नपाण्याने होणारा तीव्र अतिसाराचा आजार. या रोगाचा पहिला उद्रेक १९९८ साली नोंदवण्यात आला होता. ‘कॉलरा’चा संसर्ग मालावीतील दक्षिणेकडील पूरग्रस्त जिल्ह्यांपुरता मर्यादित असला तरी सध्या देशाची राजधानी लिलोंगवे ही ‘कॉलरा हॉटस्पॉट’ बनली आहे. गंभीर बाब अशी २०२१ मध्ये दोन वर आलेली रुग्ण संख्या गेल्या
रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी, तरुणांच्या सक्षमीकरण तसेच राष्ट्रीय विकासात थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करण्याकरता रोजगार मेळावा उत्प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या 75,000 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.
खासदार संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर आता शिवसेनेतील विविध नेत्यांच्या प्रतिक्रीया येत आहेत. खासदार राऊतांच्या सुटकेवर टायगर इज बॅक, अशी सूचक प्रतिक्रीया सुषमा अंधारे यांनी केली आहे. खासदार संजय राऊत हे १०२ दिवस तुरुंगात राहिले हा आमच्यासाठी मोठा आदर्शपाठ आहे, असे कौतुगोद्गारही त्यांनी काढले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांच्या सुनावणीला सुरूवात झाल्यानंतर ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी संजय राऊतांवर युक्तीवादादरम्यान गंभीर आरोप केले आहेत.
माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या पत्रात त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर आपल्याला कोणतीही कोणतीही किंमत राहिली नाही. माझा मुलगा व मला वेळोवेळी अपमानित करण्यात आल आहे. मीडिया समोर कधीच जाऊ नका अस सांगण्यात आलं. असे आरोप रामदास कदम यांनी पत्रातून केला आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. आ. बालाजी किणीकर यांच्या कार्यालयात हे पत्र मिळाल्याची माहिती त्यांच्या स्वीय सचिवांनी बुधवार, दि. 29 रोजी दिली.
कल्याण ग्रामीण मतदार संघातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला ह. भ. प. बुधाजी वझे चौक या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये या कामास मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्यात आला होता
एका महिला वन परिक्षेत्र अधिकार्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी उपवनसंरक्षक यांच्यावर दि. २८ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही, अशा आशयाचे पत्र या महिला अधिकार्याने राज्याच्या मुख्यमंत्री तथा वनमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एनएचआरसी)ने बुधवारी दि.१८ रोजी केंद्र आणि राज्य सरकारांना पर्यावरणीय प्रदूषण आणि निसर्गाच्या ऱ्हासाचे परिणाम रोखण्याबाबत पत्रक जरी जेले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, सोलापूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली या मुदत संपलेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागांच्या सीमा निश्चित करण्याबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची उभारणी करण्यात आली. त्याला दि. ३० एप्रिल रोजी १२ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आ. नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहित आपण या कलादालनाकडे हेतुपुरस्परपणे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले आहे. दि. १ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर संयुक्त महाराष्ट्र कलादालनावर विद्युत रोषणाई करावी, दालन पर्यटकांना खुले करावे, अशी मागणी आ. नितेश राणे यांनी पत्रातून केली आहे.
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अभिजात मराठी भाषा दालनाला रसिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे .केंद्र सरकारने २००४ साली भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळामुळे आपली अडचण होत असल्याची तक्रारवजा विनंती करणारे पत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे धाडण्यात आल्याचे वृत्त बुधवारी सर्वत्र प्रसारमाध्यमांमध्ये झळकले. परंतु, हा माध्यमांचा खोडसाळपणा असून वास्तविकता काही वेगळीच आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परळ विभाग धर्मजागरण संयोजक नितीन म्हात्रे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला सांगितले.
राज्यातले सरकारी कर्मचारी पेंशन योजने संदर्भात २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी राज्यसरकार विरोधात संप पुकारणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात पत्र लिहिले आहे. निवृत्तीचं वय ६० वर्षे आणि जुनी पेंशन योजना लागू करण्याबाबत कर्मचाऱ्यांकडून मागणी करण्यात आली आहे. कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून रखडलेल्या मागण्या मार्गी लावाव्यात यासाठी हा संप करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयावर सध्या जोरदार टीका होत आहेत. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सुध्दा या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
राज्यातील ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे उघड झाले आहे. वेतन मिळत नसल्याने एसटी कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरती अल्पवनीय बलात्कार पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख उघड केल्याने ट्विटरनंतर आता त्यांच्यावर इन्स्टाग्राम आणि फेसबुकने पोस्ट हटवली आहे.
नगर जिल्हातील तहसिलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी स्थानिक लोकप्रतिनीधी आणि वरिष्ठ अधिकार्यांवर गंभीर आरोप केलेले आहेत. कोरोनाच्या काळात राज्य सरकारच्या नियमांप्रमाणे काम करुन स्थानिक लोकप्रतिनीधी तहसिलदार यांच्यावर दबाव आणून अपशब्दचाही वापर केला असा त्यांचा आरोप आहे
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर झालेल्या भष्ट्राचाराच्या आरोपांची चौकशी करण्यास राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी असमर्थता दर्शवली आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी गृह विभागाला पाठवले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला परमबीर सिंह यांच्या चौकशीसाठी दुसरा अधिकारी नेमावा लागणार आहे.
सचिन वाझे यांचा मनसुख हिरन हत्येतील सहभाग, त्यानंतर परमवीर सिंह यांचे राज्याच्या गृहमंत्र्यांवरच थेट वसुलीचे आरोप करणारा ‘लेटरबॉम्ब’ आणि पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचार यांसारख्या गेल्या काही दिवसांतील घटनांनी पोलीस व्यवस्थेतील राजकीय हस्तक्षेप आणि गुन्हेगारीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. तेव्हा, पोलिसांची प्रतिमा मलीन करणार्या अशा घटना टाळण्यासाठी पोलीस दलामध्ये एकूणच पारदर्शकता कशी आणता येईल, त्यासाठी सरकारी पातळीवर नेमक्या काय उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, त्याचा सविस्तर आढावा घेण
सचिन वाझेला झालेली अटक झाल्यांनतर त्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तांची झालेली उचलबांगडी, त्यानंतरचा लेटरबॉम्ब या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस दलात एकाच दिवशी तब्बल ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आणि विशेष बाब म्हणजे, त्यात ६५ अधिकारी हे क्राईम ब्रँचचे आहेत.
परमवीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राष्ट्रवादी आणि सरकारच्या पातळीवर डॅमेज कंट्रोलसाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते सरकारची बाजू लावून धरताना दिसत आहेत; मात्र काँग्रेस हवे तसे सक्रिय दिसत नाही. संबंधित प्रकरणात काँग्रेसमध्ये कुठेतरी नाराजी असल्याचे दिसते.
‘अंधाराचं बेट’, ‘परवाना’, ‘न मिळालेली पत्रे’ अशा प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकांतून स्वत:चा ठसा उमटवून विविध कलाप्रकारांमध्ये नवीन प्रयोग करणारा अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार श्रीकांत प्रभाकर भिडे यांच्याविषयी...
पत्रीपुलाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीविरोधात भाजपाच्या स्थानिक नगरसेविका रेखा राजन चौधरी यांनी स्थानिक नागरिकांसह पत्रीपूल परिसरात आंदोलन केले. हातात प्रशासन विरोधी मजकूराचे काळे फलक घेऊन त्यांनी प्रशासकीय यंत्रणांचा निषेध केला. कधी होणार पत्रीपूल यासह अन्य काही मागण्याचे निवेदन ही त्यांनी आज केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सरूयवंशी यांना दिले.
निषेध करण्याचा मार्डचा इशारा!
अजित पवार, राजेश टोपेंना पत्र; राज्यपालांची भेट घेणार अमित ठाकरे
विद्यार्थ्यांचा विचार करताना कोणत्याही राजकारणाला थारा देण्यात येऊ नये अशी राज ठाकरेंची विनंती
अजब-गजब बिचुकलेंचे पंतप्रधान मोदींना अजब-गजब सल्ले
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पत्रलेखनाची जुनी संस्कृती जपून भविष्याकडे वाटचाल करणे काळाची गरज असल्याची भावना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज व्यक्त केली.
बॉलिवूडचा बादशहा, प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता शाहरुख खान डेव्हिड लेटरमन्स शोमध्ये झळकणार हे ऐकल्यावर सगळया चाहत्यांच्या उत्साहाला पारावारच राहिले नव्हते. आज त्याच शोच्या शूटिंगदरम्यानची एक छोटीशी झलक प्रदर्शित करण्यात आली आहे.
मणिरत्नम, अनुराग कश्यप, अपर्णा सेन यांच्यासह ५० प्रसिद्धीप्राप्त व्यक्तींवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मॉब लिंचिंग प्रकरणी या लोकांनी पंतप्रधानांना उद्देशून काही महिन्यांपूर्वी ओपन लेटर लिहिले होते.
भारतातून अधिकाधिक वस्तू आणि सेवांची निर्यात व्हावी, या उद्देशाने वस्तू आणि सेवाकर प्रणालीमध्ये निर्यातदारांच्या निर्यातीवर शून्य करदर ठेवून उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारण्यात आल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
भारतीय सिने सृष्टीचा बादशाह किंग खान आणि हॉलिवूडमधील दिग्गज कलाकार डेव्हिड लेटरमन यांच्या भेटीविषयी बऱ्याच चर्चा रंगात असताना नेटफ्लिक्स इंडियाने अखेर त्यांच्या पहिल्या भेटीची क्षणचित्रे सोशल मीडियावर शेअर केली.
शिक्षण म्हणजे भविष्याचा पासपोर्टच. एकदा का माणूस शिकला की, आपसूकच त्याला स्वहिताबरोबरच समाजहिताचीही जाणीव होते.
आपल्या सैनिकांकडे सुधारित शस्त्रं आली म्हणजेच देश सुरक्षित झाला, असे होत नाही. कोणत्याही देशाची सुरक्षा ही जेवढी देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर अवलंबून असते, तेवढीच ती त्या देशातील नागरिकांवरही अवलंबून असते.
शहरात काही ठिकाणी पुर्वी पासुन पत्रव्यवहार करण्यासाठी टपाल पेट्या लावण्यात आल्या होत्या.
दिनांक १जुलै २०१८ रोजी राईनपाडा तालुका साक्री येथे भटक्या विमुक्त जाती- जमाती तील नाथ पंथी डवरी गोसावी जातीच्या पाच भिक्षेकरींना मुलं पळविणारी टोळी समजून गावकर्यांनी दगड काठ्यांनी ठेचून अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या केली.
भारतीय लष्कराच्या अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीच्या (ओटीए) इतिहासात शनिवारचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला.