महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने घाटकोपर येथील मेसर्स खुशी ट्रेडिंग या दुकानाविरोधात एक्सपायरी झालेल्या अन्न उत्पादनांचे मोठ्या प्रमाणात पुनर्पॅकेजिंग व पुनर्विक्री केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
Read More
पाकिस्तानच्या भारताविरोधात कुरापती पुन्हा एकदा जगापुढे उघड झाल्या आहेत. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशाने आता भारतीयांच्या जीवाशी खेळण्याचा आणखी एक काळा कारनामा केल्याचे उघड झाले आहे. एका भारतीय विमानाला आपत्कालीन लँडींग करण्यासाठी हवाई मार्ग वापरण्यास स्पष्ट नकार देण्यात आला.
( renowned Astrophysicist Jayant Narlikar Passes Away at 87 ) भारताची विज्ञानाधिष्ठीत प्रतिमा उजळवणारा आणि खगोल शास्त्रातील महत्ता सिद्ध करणारा महान वैज्ञानिक सुपूत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्भविभूषण, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे.
( BJP Dinesh Tawde passes away ) भारतीय जनता पक्षाचे ‘सर्वात जुन्या आणि कट्टर कार्यकर्त्यांपैकी एक’ अशी ओळख असलेले दिनेश तावडे यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.
बेस्टला आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तिकीटाच्या दरात वाढ केली. मात्र, तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांनी बेस्टकडे पाठ फिरवल्याचे दिसते आहे. बेस्टच्या तिकीट दरवाढीनंतर प्रवाशी संख्येत मोठी घट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Nirmal Kapoor passes away प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर, निर्माते बोनी कपूर आणि अभिनेते संजय कपूर यांच्या आई निर्मल कपूर यांचे २ मे रोजी निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या.
माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन झाले आहे. शुक्रवार, २ मे रोजी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ते अरुणकाका या नावाने सर्वत्र परिचित असून त्यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्लानंतर केंद्र सरकारने अनेक निर्देश जारी केले आहेत. ज्यात व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी २७ एप्रिलपर्यंत देश सोडावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे निर्देश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडे काही याचिकाकर्त्यांनी दावा केला की, त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड आहेत. यासंदर्भात शुक्रवार, दि.२ मे रोजी न्यायालयाने एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या भारतीय नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले.
माजी आमदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक, माजी प्रदेश सरचिटणीस तसेच विदर्भ विभागाचे माजी संघटन डॉ. रामदास आंबटकर यांचे बुधवार, ३० एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाल्याची माहिती पुढे आली आहे. चेन्नई येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
A historic resolution against Hinduphobia was recently passed in the Scottish Parliament मानवजातीच्या प्रगत वाटचालीत धार्मिक सहिष्णुता, बहुविधतेचा आदर आणि सर्वसमावेशकता या मूल्यांना विशेष स्थान आहे. लोकशाही आणि मानवाधिकारांची प्रतिष्ठा ज्या जगात मानली जाते, त्यात काही विशिष्ट समुदायांविरुद्ध असहिष्णुतेचे प्रकार सातत्याने घडतात. या पार्श्वभूमीवरच स्कॉटलंडच्या संसदेमध्ये ‘हिंदूफोबिया’च्या विरोधातील एक ऐतिहासिक ठराव नुकताच संमत झाला.
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा होणार सुरू
बंगळुर : कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते बँक जनार्दन यांचे रविवारी रात्री, १३ एप्रिलला निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. बंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. जनार्दन गेल्या काही काळापासून आजारी होते आणि त्यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Mumbai passenger rickshaw तील बचत गटाच्या महिला आता प्रवासी रिक्षा चालविणार आहेत. मुंबई पालिका, ‘नारी शहर समूह-राष्ट्रीय नागरी उपजीविका’ अभियान आणि टीव्हीएस यांच्या संयुक्त विद्यमाने ५० महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रवासी रिक्षा वाटप करण्यात आल्या. मुंबई पालिकेकडून यासाठी महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण आणि सर्व प्रकारचे परवाने मोफत देण्यात आले आहेत.
(WAQF Amendment Bill Passed In Rajya Sabha) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर गुरुवार, दि. ३ एप्रिल रोजी राज्यसभेत सादर करण्यात आले. प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर मध्यरात्री हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे रुपांतर कायद्यात होईल.
हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नवी दिल्ली : (Waqf Amendment Bill Passed in Lok Sabha) केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी यांनी बुधवार दि. २ एप्रिल रोजी बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. सभगृहात या विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांचा कालावधी देण्यात आला होता. पुढे दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या दीर्घकाळ चर्चेनंतर झालेल्या मतदानामधून अखेरीस वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत पारित करण्यात आले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर, विरोधात २३२ मते पडली आहेत.
( amit shah on Immigration and Foreign Nationals Bill passed in Lok Sabha ) “भारत देश ही काही धर्मशाळा नाही. बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी ही पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारची देण आहे. त्यांच्यामुळेच देशभरात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर पसरले आहेत. मात्र, आता बंगालमध्ये २०२६ मध्ये भाजपची सत्ता येणार असून त्यानंतर घुसखोरी संपेल,” असा घणाघात केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी गुरुवार, दि. २७ मार्च रोजी लोकसभेत केला.
पाकिस्तान हा जगाच्या पाठीवरचा असा देश आहे, ज्याने भारताचे नुकसान करण्याच्या नादाने स्वतःच्या पायावरच धोंडा मारून घेतला आहे. वास्तविक पाहता, स्पर्धा ही चांगलीच; मात्र त्यातील हेतू स्वतःची प्रगती हा असावा. मात्र, स्वतःला मिळाले नाही, म्हणून भारतालादेखील मिळता कामा नये. यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले आहे. मात्र, त्यांच्या हाती काहीही आजवर लागलेले नाही. त्यांनी पेरलेला दहशतवाद आज त्यांच्यावरच उलटला आहे. दि. १० मार्च रोजी बलुचिस्तानमधील नसीराबाद येथे घडलेली प्रवासी रेल्वे अपहरणाची घटना ही पाकिस्तानच्या अंतर्गत सु
पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दादर ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाडीला पालघर स्थानकांवर अतिरिक्त थांबा देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार, आता दादरहून सुटणारी भुसावळ गाडी पालघरला थांबेल. ०९०५१/०९०५२ दादर-भुसावळ या विशेष गाडीला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा दिला आहे. मुंबई रेल प्रवासी संघाने ही मागणी केली होती.
( Vanuatu cancels Lalit Modi passport ) भारतीय अधिकाऱ्यांनी पुरेशा पुराव्याअभावी इंटरपोल अलर्टची विनंती नाकारल्याचा उल्लेख करून वानुआतुचे पंतप्रधान जोथम नापट यांनी नागरिकत्व आयोगाला इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) संस्थापक ललित मोदी याचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे ९४ व्या वर्षी निधन झाले. प्रेमाताई नावाने ओळखल्या जाणाऱ्या साखरदांडे या प्रसिद्ध संगीत कंपनी हिज मास्टर्स व्हॉइस (एचएमव्ही) चे वसंतराव कामेरकर यांची कन्या होत्या. अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबातच होता—त्यांच्या बहिणी ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे आणि आशा दंडवते याही अभिनय क्षेत्रात कार्यरत होत्या.
(Sheikh Hasina) बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पासपोर्ट रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. बांगलादेशातील विद्यमान अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे. शेख हसीना यांच्यासह आणखी ९७ जणांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत.
Meghna Kirtikar passes away शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानान कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना गजानान कीर्तीकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रविवार ५ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता मेघना गजानन कीर्तीकर यांची प्राणज्योत मालवली. वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि आयएनएलडी प्रमुख ओमप्रकाश चौटाला ( Omprakash Chautala ) यांचे शुक्रवारी निधन झाले. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मध्य रेल्वेने यंदाच्या आर्थिक वर्षात नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नात उल्लेखनीय वाढ केली आहे. मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात प्रवासी भाड्यातून ४,९६६ कोटी रुपये मिळवले आहेत,जे मागील वर्षी याच कालावधीत ४,६९९ कोटी रुपये होते. अशा प्रकारे ५.६८% ची वाढ झाली आहे.
भारतीय रेल्वेने धुक्याच्या परिस्थितीत गाड्यांना अधिक सुरळीतपणे धावण्यास मदत करण्यासाठी १९,७४२फॉग पास उपकरणे स्थापित केली आहेत. यामुळे एकूण प्रवासी सुरक्षितता वाढेल, विलंब कमी होईल आणि रेल्वे सेवा अधिक विश्वासार्ह बनतील. सोशल मीडिया साइट एक्सवरून रेल्वे मंत्रालयाने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की,“भारतीय रेल्वे देशभरात धुके सुरक्षा उपकरणांच्या अंमलबजावणीमध्ये अनेक पटींनी वाढ करून सतत सुरक्षा उपायांची हमी देते”.
राज्यातील महायुती सरकारने महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे एसटीच्या उत्पन्नात आणि प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. तब्बल ९४१ कोटी रुपये इतके उत्पन्न एसटी या महिन्यात मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक केली आहे. यातून एसटीला प्रतिदिन सुमारे ३१.३६ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त केले आहे. मागील वर्षाच्या याच काळातील
Zakir Hussain passes away उस्ताद अल्लाह राखा खान यांचे पुत्र झाकीर हुसेन यांचे रविवारी रात्री अमेरिकेत १५ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले आहे. तबलापटू झाकीर हुसेन यांचे मोठे नाव होते. झाकीर यांचा तीन ग्रॅमी पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. संगीत विश्वामध्ये तबला वादनाची एक ओळख आहे. झाकीर हुसेन यांच्यामुळे तबलावादन क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आले होते. सॅन फ्रान्सिस्को येथून रविवारी ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
दररोज ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उददेशाने एसटी महामंडळ गेली ७६ वर्ष काम करीत असून रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी चालकांचे सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचे मानसिक आरोग्य सुदढ करणे या बरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बसेंस उपलब्ध करुन देणे या त्रिसूत्रीवर यापुढे भर देण्यात येत असून, प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचे अंतिम ध्येय राहील असे प्रतिपादन एसटीचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी केले.
मुंबई : “दररोज ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उद्देशाने ‘एसटी’ महामंडळ ( ST Bus ) गेली ७६ वर्षे काम करीत असून, रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी चालकांचे सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचे मानसिक आरोग्य सुद़ृढ करणे, या बरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बसेस उपलब्ध करून देणे, या त्रिसूत्रीवर यापुढे भर देण्यात येत असून, प्रवाशांची सुरक्षितता हेच ‘एसटी’चे अंतिम ध्येय राहील,” असे प्रतिपादन ‘एसटी’चे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी केले.
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukar Pichad ) यांचे शुक्रवार, दि. ६ डिसेंबर रोजी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. आदिवासींच्या हक्कासाठी व्यापक लढा उभा करणारा नेता, अशी त्यांची ओळख होती.
Madhukarrao Pichad भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे शुक्रवार, दि. ६ डिसेंबर रोजी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. आदिवासींच्या हक्कासाठी व्यापक लढा उभा करणारा नेता, अशी त्यांची ओळख होती.
मुंबई : महावितरणचे कार्यकारी संचालक ( Executive Director ) (प्रकल्प) सुनिल रंगनाथ पावडे (वय ५४ वर्षे) यांचे सोमवारी रात्री जळगाव येथे ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुख:द निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर पारनेर (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील दरोडी या त्यांच्या मूळ गावी बुधवारी (दि. ४) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.
नाशिक : महानगर परिवहन मंडळाकडून दिव्यांगांना देण्यात येणार्या मोफत पासचे ( Free Pass ) नूतनीकरण रविवार, दि. १५ डिसेंबर रोजीपासून करावे लागणार आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीत राहणार्या दिव्यांग प्रवाशांना मोफत प्रवास करता यावा यासाठी मोफत दिव्यांग कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शाहीर मधुकर नेराळे यांचं सोमवारी निधन झालं. त्यांच्या निधनाने कलाविश्वाचं खूप मोठं नुकसान झालंय. कोण होते हे मधुकर नेराळे ( Madhukar Nerale ) आणि काय होतं त्यांचं कलाक्षेत्रातील योगदान जाणून घेऊया या व्हिडिओतून
देशात दळणवळणाच्या क्षेत्रात भारतीय रेल्वेचे योगदान अमूल्य आहे. भारतीय रेल्वेचा विस्तार संपूर्ण देशभर झाला आहे. भारतीय रेल्वेने सर्व अत्याधुनिक सोयींप्रमाणेच प्रवाशांच्या सुरक्षेला चालना दिली आहे. गेल्या दहा वर्षात तर भारतीय रेल्वेचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. रेल्वेच्या बदललेल्या चेहर्याचा घेतलेला हा आढावा...
( Nalasopara TC ) मुंबई, मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अतूट समीकरण. मात्र, नालासोपाऱ्यातील एका धक्कादायक प्रकाराने सोशल मीडियासह सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. नालासोपाऱ्यातील एका मुजोर टीसीने रेल्वेमध्ये मराठी भाषेत बोलणार नाही, अशी लेखी हमी एका मराठी दाम्पत्याकडून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घडलेला हा प्रकार समजताच मराठी एकीकरण समितीच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
‘शारदा ज्ञानपीठम्’चे संस्थापक आणि ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक, लेखक, पत्रकार पंडित वसंतराव गाडगीळ यांचे १८ ऑक्टोबर रोजी पुण्यात वयाच्या ९५व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी गाडगीळ यांनी अवघे आयुष्य समर्पित केले होते. प्राचीन संस्कृत ग्रंथांसह, वेद, उपनिषदांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृत अध्यापन, शारदा ज्ञानपीठाची स्थापना, ‘शारदा’ संस्कृत मासिक, असे संस्कृतच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण असेच. अशा या ऋषित
भारत आणि संयुक्त अरब अमिराती अर्थात, युएई या देशांमधील संबंध दृढ होण्याच्या दिशेने अजून एक पाऊल उचलण्यात आले आहे. पासपोर्ट धारक सगळे भारतीय प्रवासी युएई मध्ये व्हिसा-ऑन-अरायव्हलसाठी पात्र ठरणार आहेत.
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक नीला उपाध्ये यांचे दि. ७ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले. अफाट उत्साह, दुर्दम्य आशावाद, प्रचंड महत्त्वाकांक्षा आणि तितक्याच संवेदनशील मनाच्या नीला मॅडम... “पत्रकारितेच्या क्षेत्रात मानवी मूल्ये जपणे जितके महत्त्वाचे तितकेच आपले संस्कार शाबूत राखणेही महत्त्वाचे” अशी शिकवण देणार्या नीला मॅडम. त्यांच्या निधनानेे अक्षरश: जिवाला चटका लागला. या श्रद्धांजलीपर लेखात सारांश रूपाने त्यांच्या आणि माझ्या स्नेहबंधाचे शब्दचित्रण...
विद्या विकास एज्युकेशन सोसायटी व स्वामी शामानंद एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व संचालक श्री. प.म. राऊत यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वार्ध्यक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन पुत्र, एक कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्राथमिक शाळेतून ज्ञानदानाचे काम सुरु करून १९६२ साली पंतनगर, घाटकोपर येथे विद्या विकास एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शैक्षणिक कार्यास सुरुवात केली.
मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या विश्वस्त स्नेहलता देशमुख यांचे दि. २९ जुलै रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. स्नेहलता देशमुख यांनी गर्भसंस्कार, नवजात शिशू आणि माता यांचा आहार या विषयांमध्ये महत्त्वाचं कार्य केलं.
सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सुहास तानाजी गवते (वय 60) यांचे सोमवारी निधन झाले. त्याच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. सुहास गवते यांनी बालनाट्यचा मेकअप आणि ड्रेस डिपार्टमेंट पाहत त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला. सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांच्या हाताखाली ते तयार झाले. स्मिता तळवलकर यांच्या अस्मिता चित्रचे ते प्रमुख मेकअप मन होते.
महाराष्ट्रातील नावाजलेले उद्योगपती, मराठे इन्फोटेक प्रा. लि.चे संस्थापक विनय मराठे यांचे रविवारी सायंकाळी ठाण्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते ६२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई वसुधा मराठे, पत्नी वैशाली मराठे, मुलगी गौरी मराठे, मुलगा सुमुख मराठे, नात आणि जावई असा परिवार आहे. सोमवारी त्यांच्या पार्थीवावर जवाहर बाग स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पाकिस्तानने हजारांहून अधिक व्यावसायिकांचे पासपोर्ट निलंबित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारने परदेशात जाऊन देशाची प्रतिमा मलीन करणाऱ्या २ हजाराहून अधिक व्यावसायिकांचे पासपोर्ट निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि चीन यांच्यातील स्पर्धेत सोयीनुसार दोघांशी सलगी करून त्याची किंमत वसूल करण्याचे धोरण नेपाळने अवलंबले आहे. कधी भारताची शिडी चढायची आणि चीनच्या सापावरून घसरत खाली यायचे आणि कधी चीनची शिडी चढायची, असे केल्यामुळे सत्तेवर राहण्यात प्रचंड यांना यश मिळाले असले, तरी त्यामुळे नेपाळचे नुकसानच झाले आहे.
मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या सर्व प्रवाशांना २० मे, २०२४ रोजी प्रवासी तिकिटावर (मूळ तिकिटदरावर) १०% सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने घेतला आहे. ही सवलत मुंबई मेट्रो १ कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात येणार आहे.
विमान कंपन्यांकडून ग्राहकांना ज्या सुविधा हव्या आहेत त्या देताना त्यावर ऐच्छिक शुल्क आकारल्यास विमान तिकिटांचे दर आणखी कमी होऊ शकतात, अशी सूचना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने विमान कंपन्यांना केली आहे. डीजीसीएने विमान कंपन्यांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच, ग्राहकांचा प्रवास आनंदी आणि सुखकर होण्याच्यादृष्टीने काही सूचना जारी केल्या आहेत.
ओटीटी प्रेमींसाठी दुःखद बातमी आली आहे. डिस्नेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब आयगर यांनी नेटफ्लिक्स प्रमाणेच पासवर्ड शेअरवर बंदी आणण्याचे ठरवले असल्याचे सांगितले आहे. कंपनीच्या महसूलात व सबस्क्रिप्शनममध्ये वाढवण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय कंपनीने घेतले असल्याचे बॉब आयगर यांनी सांगितले आहे.
अयोध्येत श्रीरामललाच्या दर्शननासाठी दररोज सरासरी एक ते दीड लाख भाविक मंदिराला भेट देत आहेत. सकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश करण्याची मुभा आहे. मात्र पहाटे ४ वा. होणारी मंगला आरती, सकाळी ६.१५ वा. होणारी श्रृंगार आरती आणि रात्री १० वा. होणारी शयन आरतीचा लाभ भाविकांना घेता येत नव्हता. आता हा लाभ घेता येणार असून यासाठी विशेष प्रवेशपत्राची व्सवस्था मंदिर न्यासकडून करण्यात आली आहे. (Ramlala Aarti Entry Pass)