मंडालेहून सुटल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने ब्रिटिशांवर हल्लाबोल करायचा असेल तर काँग्रेसमध्ये जाऊनच प्रयत्न करावे लागतील, या हेतूने टिळकांनी मोर्चेबांधणी सुरु केली. लखनौच्या निमित्ताने मवाळ आणि मुसलमान दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चिन्हे त्यांना दिसत होती. त्यांच्यासोबत एकदा का जहालांची शक्ती जोडली गेली की पक्षांतर्गत भेदाभेद वरवरतरी संपला असेच चित्र दिसणार होते. साम्राज्याच्या सूर्यासमोर ही अशी एकजूट याआधी कधी झाली नव्हती. म्हणून टिळकांनी जोखीम पत्कारली, लखनौ कराराची!
Read More
लोकमान्य टिळक आणि शाहू छत्रपती यांच्या संबंधात कडवटपणा आला त्यासाठी कारणीभूत झाले ते वेदोक्त प्रकरण! वेदोक्त प्रकरणाचे विवेचन करताना या घटनांचे साक्षीदार खुद्द बाळाचार्य खुपेरकर तसेच ज्येष्ठ संशोधक य. दि. फडके यांच्या संशोधनाचा आधार घेतला आहे. या प्रकरणाची विस्तृत चर्चा ग. रं. भिडे यांनीही केली आहे. वेदोक्त प्रकरणाचा टिळकांशी संबंध कसा, बघूया.