देवशयनी आषाढी एकादशीचा शुभमुहूर्त साधत अखंड विठ्ठलमय वातावरणात रसिक भक्तांना भक्तिरसात न्हालवणारा एक आगळावेगळा संगीत सोहळा 'अवघे गर्जे पंढरपूर' रंगणार आहे रविवार, ६ जुलै २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता, शिवाजी मंदिर, दादर येथे आयोजित करण्यात आला आहे.
Read More
तन्वी फिल्म्स प्रस्तुत 'गाडी नंबर १७६०' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यातील रहस्य, ट्विस्ट्स आणि टर्न्समुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ट्रेलरमध्ये वेधक दृश्यांबरोबरच एक खास गोष्ट लक्ष वेधून घेते, ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचे ॲक्शन सीन्स. ७७ वर्षीय सुहास जोशी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून विशेष म्हणजे काही ॲक्शन सीन्स त्यांनी स्वतः साकारले आहेत.
मराठी रंगभूमीवर सातत्यपूर्ण प्रयोगशीलतेने नवनवीन मानदंड निर्माण करणारे नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांना 'फेमस पुरस्कार २०२५' या मान्यताप्राप्त पुरस्काराने नागपूर येथे सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महावितरणच्या कोंकण प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत भांडुप परिमंडलाचे ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकाने द्वितीय स्थान पटकाविले आहे. तर रत्नागिरी चे नाटक आवर्त; हे नाटक विजेते ठरले आहे. २० जून २०२५ रोजी छत्रपति संभाजी राजे नाट्यमंदिर येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली. महावितरणचे संचालक (मा सं) श्री. राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते नाट्य स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ, जळगावचे मुख्य अभियंता श्री. इब्राहीम मुलाणी, महाव्यवस्थापक (मा सं) श्री. राजेंद्र पांडे, यां
मैत्री ... ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. अमर, अकबर आणि अँथनी यांच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. मनोरंजन आणि मस्तीचे जबरदस्त पॅकेज असलेल्या 'ऑल इज वेल' चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे. बेळगावकर असलेल्या निर्माते अमोद मुचंडीकर,वाणी हालप्पनवर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहनिर्मा
मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर, रहस्य आणि विनोदी यांचा मिलाफ असणाऱ्या काही निवडक चित्रपटांमध्ये लवकरच आणखी एका दमदार चित्रपटाची भर पडणार आहे, ती म्हणजे ‘गाडी नंबर १७६०’ची. तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, रहस्य आणि विनोदाने भरलेला हा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आमिर खान निर्मित आणि अभिनीत ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाकडून काही महत्त्वाचे बदल सुचवण्यात आले असून, आता या चित्रपटाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक विधान दाखवणं बंधनकारक केलं आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाला कुठलाही कट न करता CBFC ने मंजुरी दिली होती. मात्र, नव्या वृत्तानुसार, ही मंजुरी काही अटींसहच देण्यात आली आहे.
मराठी प्रेक्षकांची आवड दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत चालली आहे, आणि त्यांना काहीतरी वेगळं, विचार करायला लावणारं पाहायला मिळालं की, ते डोक्यावर घेतात, हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय ‘जारण’ या सिनेमाने. पारंपरिक चौकटीतून बाहेर पडत, सामाजिक भावनांचा आणि भयपटाच्या शैलीचा अनोखा मेळ साधणाऱ्या या सिनेमाने केवळ समीक्षकांचीच नव्हे, तर सर्वसामान्य प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत.
प्रेमाच्या गंधाने सुरू झालेली एक सुंदर गोष्ट, जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सुड! मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येत आहे "सजना" चित्रपटाचा हा ट्रेलर. जो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ट्रेलर हा केवळ एक साधा रिलीज नसून, तो एक खास प्रसंग ठरला आहे. या ट्रेलरचे थेट प्रक्षेपण मराठीतील विविध मनोरंजनशी संबंधित चॅनेलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीम करण्यात आला. म्हणजेच सजना चित्रपटाचा ट्रेलर मराठी एंटरटेनमेंट डिजिटल मीडिया नेटवर्कवर
लोकप्रिय अभिनेते आणि रंगभूमीवरील दमदार हजेरी लावणारे अमोल बावडेकर यांना रविवारी सकाळी अस्वस्थ वाटल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हृदयविकाराचा झटका आल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तातडीनं अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांच्या या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र, सुदैवानं आता त्यांच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा होत असून, हॉस्पिटलमधूनच एक सकारात्मक आणि दिलासादायक अपडेट समोर आलं आहे.
सध्या जुने चित्रपट पुनः प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. एक वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा एस.एम.पी प्रोडक्शनचा 'अल्याड पल्याड' हा चित्रपट ही वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. एक पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. कॅप्शनमध्ये वर्षपूर्तीनंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला 'अल्याड पल्याड' २७ जूनपासून असं म्हटलं आहे.
मराठी प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसलेला विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ आता पुन्हा नव्या रूपात परतणार आहे. काही काळासाठी विश्रांती घेतलेला हा शो आता नवीन जोशात आणि थोड्या बदलांसह पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. मात्र, यावेळी काही जुन्या चेहऱ्यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या जनहितकारी योजनांपैकी विशेष चर्चेत आलेली ‘लाडकी बहीण योजना’ आता रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लाडकी बहीण’ या शीर्षकाने मराठी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या विषयावर आधारित हा पहिलाच सिनेमा असल्याने सर्वसामान्यांमध्ये याविषयी उत्सुकता वाढली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन व संकल्पना गणेश शिंदे यांनी मांडली असून, निर्मितीची धुरा शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील व अनिल वणवे या निर्मात्यांनी ओम साई सि
दक्षिणातला सुपरस्टार आणि पॅन इंडिया अभिनेता प्रभास पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना वेड लावण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपट ‘द राजा साब’ चा दमदार टीझर नुकताच भव्य सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर याने धुमाकूळ घातला आहे.
लोकप्रिय अभिनेते आणि गायक अमोल बावडेकर यांच्या प्रकृतीबाबत एक गंभीर बातमी समोर आली आहे. रविवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून तातडीने त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेता आमिर खानने जवळपास आठवड्यानंतर प्रतिक्रिया दिली. भारत पाकिस्तान सीझफायरनंतर आणि भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकच्या दहशतवादी तळांवर प्रत्युत्तर देणाऱ्या कारवाईनंतरच त्याचं वक्तव्य समोर आलं. मात्र, या वक्तव्याच्या काही तासांनंतरच 'सितारे जमीन पर' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे नेटिझन्सकडून त्याच्यावर टीकेची झोड उठली.
विशाल बजेटचा पॅन-इंडिया चित्रपट 'कणप्पा'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शनिवारी प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरमध्ये बॉलिवूड स्टार अक्षय कुमार भगवान शंकराच्या भूमिकेत झळकतो आहे, तर प्रभास रुद्राच्या रूपात दिसतो. ट्रेलर पाहताच सोशल मीडियावर अक्षयच्या या दिव्य अवतारावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या अकस्मात निधनाला आज पाच वर्षे पूर्ण झाली. १४ जून २०२० रोजी मुंबईतील आपल्या घरात सुशांत मृत अवस्थेत आढळला होता. या प्रकरणावरून संपूर्ण देश हादरला होता. आज त्याच्या पाचव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्याची बहिण श्वेता सिंह कीर्ती हिने एक भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या आठवणी जागविल्या.
'दंगल' हे २०१६ मध्ये प्रदर्शित झालेलं आमिर खानचं सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरलं. भारतातच नव्हे तर जगभर या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र, हा चित्रपट पाकिस्तानमध्ये कधीच प्रदर्शित झाला नाही. अनेकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं होतं. अखेर, वर्षांनंतर आमिर खानने यामागचं कारण ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात उघड केलं आहे.
'द काश्मीर फाइल्स' आणि 'द ताश्केंत फाइल्स' सारख्या गाजलेल्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री त्यांच्या 'फाइल्स ट्रिलॉजी' तील शेवटच्या चित्रपटासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपट ' द बंगाल फाइल्स' चा टीझर गुरुवारी १२ जूनला अधिकृतपणे प्रदर्शित झाला. या टीझरने काही तासांतच प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली असून, सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे.
अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील सर्वाधिक लोकप्रिय वेबसिरीजपैकी एक असलेली ‘पंचायत’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाली आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेच्या चौथ्या सिझनचा ट्रेलर आज ११ जून रोजी प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मराठी मालिका, नाटक व चित्रपट क्षेत्रातील लेखकांच्या व्यावसायिक व सामाजिक हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ‘मानाचि’ लेखक संघटनेने राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट घेऊन लेखकांच्या समस्या व मागण्या मांडल्या. संघटनेचे अध्यक्ष विवेक आपटे, प्रसिद्ध लेखक पुरुषोत्तम बेर्डे, राजीव जोशी, आशिष पाथरे, डॉ. अलका नाईक यांनी मंत्रीमहोदयांसमोर सविस्तर निवेदन सादर केले.
मराठी नाट्यसृष्टीच्या विकासासाठी आणि नाट्य निर्मात्यांच्या रास्त मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार आशिष शेलार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. "मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा"च्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी नाट्य निर्मात्यांच्या विविध मागण्या समजून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
आठवणींच्या पाऊलखुणा माणूस आयुष्यभर शिदोरी जपून ठेवावी तशा हृदयात जपून ठेवतो. १९५३ साली आलेला आचार्य अत्रे लिखित-दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपट आणि त्या चित्रपटातील 'श्याम' आजही आपल्या स्मरणरंजनात आहे. या चित्रपटात श्यामची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे नुकतेच निधन झाले. २७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या 'ऑल इज वेल' या मराठी चित्रपटात माधव वझे यांची खास भूमिका आहे. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. माधव वझे यांच्या पश्चात प्रदर्शित होणारा 'ऑल इज वेल' हा च
दीर्घ आजार, हॉस्पिटलायझेशन आणि शरीरातला थकवा या सगळ्यांनी काही काळ रंगभूमीपासून दूर गेलेले ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी म्हणजेच बाप्पा जोशी आता पुन्हा एकदा नाटकाच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले आहेत. पु.ल. देशपांडे यांच्या 'सुंदर मी होणार' या नाटकाच्या नव्या सादरीकरणातून ते रंगभूमीवर येत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासच प्रेक्षकांसाठी मोठी आश्वासक गोष्ट आहे.
कमल हसन आणि मणिरत्नम या दोन दिग्गजांची जोडी एकत्र आली, तेव्हा चाहत्यांच्या अपेक्षांना गगन ठेंगणे झालं होतं. थग लाइफ या बहुचर्चित गँगस्टर ड्रामाने थेट मोठ्या पडद्यावर धमाका करेल, असा विश्वास होता. मात्र प्रत्यक्षात या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल’ फ्रँचायझीचा पाचवा भाग ‘हाऊसफुल 5’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या दुसऱ्या दिवशीच या चित्रपटाने एकूण ५० कोटींपेक्षा अधिकची कमाई करत यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. विनोद, रहस्य आणि मोठ्या स्टारकास्टचा अफलातून मेळ असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं असून, थिएटरमध्ये गर्दीचा जोर कमालीचा आहे.
लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई : नेटफ्लिक्सवर जागतिक पातळीवर टॉप १० नॉन-इंग्रजी कंटेंटच्या यादीत यंदा भारताच्या चार कलाकृतींनी स्थान पटकावले आहे. यात एक हिंदी सिरीज, एक हिंदी चित्रपट, एक तेलुगू आणि एक तमिळ चित्रपट यांचा समावेश आहे. यामधील द रॉयल्स ही वेब सिरीज सलग चौथ्या आठवड्यात ग्लोबल टॉप १० यादीत झळकली आहे. तर सलमान खानचा सिकंदर, कार्तिक सुब्बाराज दिग्दर्शित रेट्रो आणि तेलुगू हिट सिरीजचा पुढील भाग हीट : द थर्ड केस या तिघांनी यादीत नवीन एन्ट्री केली आहे.
"कन्नड भाषा तमिळमधून जन्मली" या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता कमल हसन यांनी मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयात स्पष्ट केलं की, त्यांच्या आगामी थग लाईफ या चित्रपटाचा कर्नाटकमधील प्रदर्शन सध्या स्थगित करण्यात आला असून, त्यांनी कोणतेही क्षमापत्र देण्याची आवश्यकता नाही असं त्यांचं मत आहे. या वक्तव्यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं की, "तुम्ही कितीही मोठे कलाकार असलात, तरी जनतेच्या भावना दुखावण्याचा तुम्हाला अधिकार नाही." एका साध्या क्षमापत्रामुळे हा वाद मिटू शकला असत
अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित कॉमेडीपट हाउसफुल ५ ची प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता दिसून येतेय. येत्या ६ जूनला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार असून, सध्या त्याची अॅडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे.
'पंचायत'च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे! 'पंचायत' या लोकप्रिय वेब सिरीजचा चौथा हंगाम आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. या आधीचे तीनही हंगाम प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरले होते. फुलेरा गावातील साध्या पण खुमासदार जीवनात प्रेम, मैत्री आणि राजकारणाची चव मिसळत ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. तर, जाणून घेऊया की 'पंचायत ४' कधी आणि कुठे पाहायला मिळणार आहे.
माध्यमांच्या आजच्या जडणघडणीचा अविभाज्य घटक असलेल्या आणि या वर्षी विशेष प्रभावशाली ठरलेल्या कला, सामाजिक, राजकारण अशा विविध विभागांमध्ये आपला जोरदार ठसा उमटवणाऱ्या मान्यवर दिग्गज व्यक्तींच्या कार्याचा गौरव 'मीडिया एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५' देऊन करण्यात आला. 'माई मीडिया २४' प्रस्तुत मीडिया असोशिएशन ऑफ इंडियाच्या वतीने व प्लँनेट मराठी अक्षय बर्दापूरकर यांच्या सहकार्याने पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर प्रतीक शाह याच्याविरोधात त्याच्या माजी प्रेयसीने लैंगिक आणि शारीरिक अत्याचाराचे गंभीर आरोप पुन्हा एकदा उघड केले आहेत. एका भावनिक आणि ज्वलंत ब्लॉग पोस्टद्वारे तिने आपल्या नात्यातील त्रासदायक अनुभव कथन करत अनेक धक्कादायक बाबी सामोरी आणल्या आहेत.
तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम सुगुमारन यांचे सोमवारी (2 जून 2025) वयाच्या 47व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'मधा यानाई कूट्टम' या त्यांच्या पहिल्याच चित्रपटामुळे त्यांनी रसिकांच्या आणि समीक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं.
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी आपल्या करिअरमधील कदाचित शेवटच्या चित्रपटाचा संकेत दिला आहे. 'महाभारत' हे भव्य दिव्य सिनेमा त्यांचं अंतिम आणि सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असू शकतं, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. “माझं स्वप्न आहे की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहावं…,” असं ते म्हणाले.
अभिनेते ते राजकारणी झालेल्या कमल हसन यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे कर्नाटकात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यांनी म्हटले की, “कन्नड ही भाषा तमिळ भाषेपासून निर्माण झाली आहे.” त्यांच्या या विधानामुळे प्रखर कन्नड समर्थकांनी संताप व्यक्त केला असून, कर्नाटकातील अनेक राजकीय नेत्यांनी देखील या वक्तव्याचा निषेध केला आहे.
प्रसारमाध्यमे ही समाजाचा महत्त्वाचा भाग बनली आहेत. ती फक्त माहितीचा स्रोत नसून समाजाचे प्रतिबिंब, आणि दिशादर्शक आहेत. योग्य व जबाबदारीने त्यांचा वापर केला गेला, तर ती लोकशाहीच्या हितासाठी मोलाची ठरू शकतात. माध्यमांच्या बहरलेल्या वटवृक्षाच्या जडणघडणीत आजवर असंख्य सुवर्णहातांचं योगदान लाभलं आहे. पडद्यावर आणि पडद्यामागं राहूनही काही चेहऱ्यांनी केलेली कामगिरी ही सुवर्णमोलाची आहे. माध्यमांना वेगळा आयाम देण्यात या व्यक्तींचा खूप मोलाचा वाटा आहे. या परीसरूपी हातांचं कौतुक होणं आज गरजेचं आहे. माध्यमांच्या आजच्या जड
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याला अमृता सुभाष, सिंधुजा श्रीनिवासन, मनीषा पांडरांकी, लक्ष्मी मेघना यांचा आवाज लाभला असून वैभव देशमुख यांच्या शब्दांनी या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. तर
मराठी आणि हिंदी रंगभूमी, चित्रपट तसेच मालिकांमधील आपल्या बहुआयामी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशोक सराफ यांना अखेर राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या या सन्मानाने केवळ सराफ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानाची आणि आनंदाची भावना अनुभवायला मिळाली आहे.
चेन्नईमध्ये झालेल्या त्यांच्या आगामी चित्रपट Thug Life च्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमात दिलेल्या विधानामुळे दिग्गज अभिनेते आणि राजकारणी कमल हसन सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. “तमिळ भाषेने कन्नड भाषेला जन्म दिला” असे विधान करत त्यांनी जे बोलले, त्याचा अर्थ सांस्कृतिक ऐक्य निर्माण करण्याच्या हेतूने घेतला गेला असावा, मात्र ते विधान कर्नाटकमध्ये प्रचंड रोषाला सामोरे गेले आहे.
'अर्जुन रेड्डी' आणि 'अॅनिमल' या चित्रपटांचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा सध्या प्रभाससोबतच्या 'स्पिरिट' या आगामी चित्रपटावर काम करत आहेत. या दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर एक तीव्र आणि अप्रत्यक्ष पोस्ट शेअर करत, एका अभिनेत्रीच्या 'डर्टी पीआर' (खराब प्रसिद्धी मोहिमेवर) जोरदार टीका केली. या पोस्टमध्ये त्यांनी कोणाचेही थेट नाव घेतले नसले तरी, काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोणने या चित्रपटातून बाहेर पडल्याच्या चर्चांनंतर ही प्रतिक्रिया आल्याने लक्ष वेधले आहे.
सिनेविश्वातील मानाच्या समजल्या जाणार्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नानाविध चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळत असते. विविध राष्ट्रीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या वेरा फिल्म्सच्या 'ऊत' या मराठी चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच कान्स महोत्सवात संपन्न झाले.
संस्कार भारती कोकण प्रांत चित्रपट विधा यांच्या वतीने आयोजित 'सिनेटॉकीज' हा विशेष कार्यक्रम ३१ मे रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत अंधेरीतील एम ए ए, वर्सोवा येथे पार पडणार आहे. या वेळी 'प्रारब्ध' हा भावस्पर्शी लघुपट प्रेक्षकांसमोर सादर होणार असून, त्यानंतर त्या लघुपटाच्या निर्मात्यांसोबत विचारमंथनात्मक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी ‘हेरा फेरी’चा तिसरा भाग अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. विशेषतः ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी या चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. यामुळे संबंधित पक्षांमध्ये कायदेशीर वाद उभा राहिला असून, मीडिया व चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र या साऱ्या गोंधळात अभिनेता अक्षय कुमार यांनी आपल्या दीर्घकालीन मित्र आणि सहकलाकार परेश रावल यांच्यावर टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावले असून, त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला आहे.
पारंपरिक चित्रपट निर्मिती, रिअल टाइम सीजीआय आणि गेमिंग टेक्नॉलॉजी यांचा मेळ घालत सध्या चित्रपट व मनोरंजन सृष्टीत एक नवे क्रांतिकारी पर्व सुरू झाले आहे. व्हर्च्युअल प्रॉडक्शन. या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आज कलाकार, दिग्दर्शक आणि वीएफएक्स तज्ज्ञ अधिक वास्तवदर्शी, भव्य आणि दृष्यदृष्ट्या प्रभावी कथा साकारत आहेत. या क्षेत्रातील वाढती मागणी ओळखून आघाडीची तंत्रशिक्षण संस्था अपटेकने ‘व्हर्च्युअल प्रॉडक्शन अकॅडमी’ सुरू केली असून, त्याअंतर्गत व्हर्च्युअल प्रॉडक्शन स्पेशालिस्ट हा विशेष अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसा
नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) तर्फे दरवर्षी आयोजित केला जाणारा प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव यंदा २२ मे (गुरुवार) ते २५ मे (रविवार) या कालावधीत पार पडणार आहे. मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचा जागर करणारा हा उत्सव यंदा अधिक व्यापक आणि आशयघन स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. एनसीपीएने या महोत्सवाची संकल्पना तयार केली आहे ती स्थानिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी, नव्या लेखनाला चालना देण्यासाठी आणि मराठी नाट्यविश्वातील गुणी कलाकारांना एक भक्कम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी. ‘प्रतिबिंब’ हा केवळ ना
'द काश्मीर फाईल्स' आणि 'द ताश्केंट फाईल्स' यांसारख्या वादग्रस्त चित्रपटांचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडवर थेट टीका केली आहे. मोठ्या बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शक हे सुपरस्टार्सच्या वागणुकीला कंटाळले असूनही त्यांच्या विरोधात उघडपणे बोलण्याची कोणाचीच हिंमत नसल्याचं अग्निहोत्रींनी स्पष्टपणे सांगितलं. त्यांचा रोख विशेषतः अभिनेता रणबीर कपूरकडे होता, ज्याच्यावर ‘अॅनिमल’ या वादग्रस्त चित्रपटामुळे मोठ्या प्रमाणात टीका झाली, मात्र तरीही त्याचं संरक्षण केलं गेलं.
भारतीय चित्रपटसृष्टीतील दमदार आणि अभ्यासू अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी आपल्या अभिनयाने अनेकवर्षे रसिकांची मनं जिंकली आहेत. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या या अभिनेत्रीने आता आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. २०२५ सालच्या कान्स चित्रपट महोत्सवात ‘टान्वी द ग्रेट’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्या आपल्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला सुरुवात करत आहेत.
बालमनावर राज्य करणारं 'अलबत्या गलबत्या' ह्या नाटकाचा रंगभुमीवर पहिला प्रयोग १२ मे २०१८ रोजी पार पडला आणि प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. ‘अलबत्या गलबत्या’ हे बालनाटक आज सात वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे. याच उत्सवी क्षणात आणखी एक महत्त्वाचा टप्पा या नाटकाने गाठला असून, लवकरच 'अलबत्या गलबत्या' चा १००० वा प्रयोग सादर होणार आहे.