रविवारी पार पडलेल्या पुणे शहर जिल्हा काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाने आगामी पुणे महापालिका निवडणुक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत
Read More
शीव मतदारसंघातील प्रतीक्षानगर भागातील रहिवाशांनी प्रभागात केल्या जाणार्या नालेसफाईच्या कामावरून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे महापालिका आरक्षण सोडत जाहीर झाली असून एकूण ५८ प्रभागात महिलांचे आरक्षण निश्चित करण्यात आल्याने आगामी सार्वत्रिक निवडणुकीत आता इच्छुक उमेदवार रणनीती आखायला मोकळे झाले आहेत. येथील गणेश कला क्रीडा मंडळात आधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.
ठाणे महानगरपालिकेच्या रॉ वॉटर पाईपलाईनची कल्याण फाटा भिवंडी येथे गळती काढणे, पावसाळ्यापूर्वी टेमघर येथे २२ केव्ही सबस्टेशनमध्ये अत्यावश्यक कामे करावयाची आहेत.
ठाणे पालिका क्षेत्रातील माजिवडा येथील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या आरक्षण क्र. ७ सेक्टर ४ या भूखंडाचा अक्षरश: उकिरडा झाला आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या टनेल लाँड्री कंत्राटातील अनियमिततेवरून भाजपचे आमदार आणि मुंबई भाजपचे सरचिटणीस अमित साटम यांनी पुन्हा एकदा महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहिले असून कंत्राटातील अनियमिततेवर भाष्य केले आहे.
कोरोना दक्षतेसाठी सज्ज झालेल्या ठाणे महानगरपालिकेला यंदा पावसाळ्यात पूरस्थितीशी लढा द्यावा लागणार आहे. तेव्हा, पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती, दरड कोसळणे, भूस्खलन होण्याची दाट शक्यता असल्याने डोंगर उतारावर आणि खाडी, नाल्यालगत वास्तव्य करणार्या रहिवाशांनी घरे रिकामी करून सुरक्षित निवासाचा पर्याय शोधावा, अशी सावधानतेची नोटीस ठाणे महानगरपालिकेने बजावण्यास सुरुवात केली आहे; अन्यथा, पावसाळ्यामध्ये एखादी दुर्घटना घडून जीवित वा वित्तहानी झाल्यास महापालिका जबाबदार राहणार नसल्याचे सूचित करण्यात आले आहे ठाणे महा
भारतीय राज्यघटनेतील ‘कलम २१’ मधील तरतुदीनुसार प्रत्येक नागरिकाला पिण्याचे स्वच्छ, शुद्ध पाणी मिळणे, हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीची ७० वर्षे उलटूनही देशाच्या आर्थिक राजधानीत अनेक नागरिकांना आपल्या हक्काचे,असे शुद्ध पाणी मिळालेले नाही. नुकतेच मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक मुंबईकराला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळण्याच्या हेतूने धोरणाची आखणी केली आहे. साधारणपणे महिनाभरापूर्वीच महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती सोपवण्यात आला आहे आणि नुकताच ‘सर्वांना पाणी’ हा नि
“मुंबई पालिकेने बांधलेल्या देवनार रस्त्याचे उद्घाटन सहा महिन्यांपूर्वी झाले असताना या कामाच्या खर्चात तब्बल १३० कोटी रुपयांचा फेरफार कशासाठी झाला आहे,” असा प्रश्न भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी बुधवार, दि. २ मार्च रोजी स्थायी समितीच्या सभेत केला. तिसर्यांदा फेरफार झाला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मॅनहोलमध्ये उतरून काम करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना योग्य साधने देण्याची आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी हि पालिकेचीच असते. परंतु पालिकेवर सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला हि साधी जबाबदारी पार पाडणं जड जात असल्याचं चित्र विलेपार्लेमध्ये पाहायला मिळालं.
घाटकोपर निलयोग मॉल ते घाटकोपर लिंक रोडला जोडणारा जवाहर रस्ता सध्या वादाच्या भोवर्यात अडकला आहे. कारण, या रस्त्यावरील वस्तीचे पुनर्वसन ‘एसआरए’ योजनेअंतर्गत विकासकाने केले. त्यावेळी हा रस्ता बनवण्यासाठी अनेक समस्या उभ्या राहिल्या. विकासकाने बांधायचा हा रस्ता २०२० साली महानगरपालिकेनेच कोट्यवधी रुपये खर्च करून बांधला. त्यामुळे या रस्त्याच्या हस्तांतराबाबत स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
१२ मेपासून २२ मेपर्यंत नाशिकमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली
कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्सच्या कार्यालयावर मनपाची कारवाई
गेल्यावर्षी मुंबईतील दाटीवाटीच्या डोंगरी परिसरातील शंभर वर्षं जुनी केसरबाई इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षीही अशाच काही मोडकळीस आलेल्या इमारती कोसळण्याचा धोका कायम आहे. तेव्हा, या धोकादायक इमारतींच्या सद्यस्थितीचा घेतलेला हा आढावा...
मुंबई महापालिकेतर्फे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना मॉल अथवा अन्य ठिकाणी सहलीसाठी नेण्यात येते.
शहराला पाणीपुरवठा करणार्या गिरणा धरणावरून आलेल्या नगरपरिषदेची मुख्य जलवाहिनीला मोठा लिकेज झाल्याने पाण्याचे पाट वाहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा या पाईपलाईनच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पालिकेची सर्वसाधारण सभा हिरापूर रोडवरील नगरपरिषद नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी अकरा वाजता झाली, नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.
जळगाव महानगर पालिकेच्या मतदान प्रक्रियेत दारु व पैसे वाटपाचा प्रकार होऊ नये म्हणून शहराबाहेरील मुख्य रस्त्यावरील पाच चेक पोस्टवर पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे़ या पथकात महसूल, पोलीस व टॅक्स विभागातील अधिकारी, कर्मचार्यांचा सहभाग राहणार असून त्यांच्यासोबत एक व्हिडीओग्राफरदेखील नियुक्त राहणार आहे़ या पथकामार्फत शहरात येणार्या जाणार्या वाहनांची तपासणी करण्यात येणार असून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितले़
जळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकिचा बिगुल वाजला असून 1 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. 75 उमेदवारांचे भवितव्य 1 ऑगस्टरोजी मतपेटीत बंद होईल व 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.