(CM Devendra Fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नागपूर दौऱ्यादरम्यान वेळ काढून पद्मश्री बहुमानाने सन्मानित डॉ. विलास डांगरे (Dr. Vilas Dangre) यांच्या तपोवन येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देत त्यांचे अभिनंदन केले.
Read More
ज्येष्ठ अभिनेत्री पद्मविभूषण वैजयंती माला यांनी अयोध्या राम मंदिर आवारात वयाच्या ९० व्या वर्षी केलेल्या नृत्याची प्रशंसा आणि चर्चा चांगलीच रंगली होती. वैजयंतीमाला (Padmavibhushan Vaijayantimala) यांना भरतनाट्यम नृत्य सादर करत उपस्थितींना थक्क करणारा नृत्याविष्कार सादर केला होता. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी वैजयंती माला (Padmashri Vaijayantimala) यांची सदिच्छा भेट चेन्नईत घेतली. निमित्त होते ते नुकतेच त्यांना जाहिर झालेल्या पद्मविभूषण पुरस्काराचे.
“चिठ्ठी आई है आई है चिठ्ठी आई है...”, हे गाणं आजही कानावर पडलं की पद्मश्री पंकज उधास यांचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो. गझल विश्वात आपले अढळ स्थान निर्माण करणारे पद्मश्री पंकज उधास यांचे आज २६ फेब्रुवारीला मुंबईत निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे संगीत विश्वात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आठवणीत एक खास किस्सा जाणून घेऊयात.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2024 साठी पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. देशातील पहिल्या महिला माहुत पार्वती बरुआ, जशपूरचे वनवासी कार्यकर्ते जागेश्वर यादव आणि सरायकेला खरसावनचे आदिवासी पर्यावरणवादी चामी मुर्मू यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांनाही पद्मश्री जाहिर झाला आहे.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा, त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा, या हेतूने ‘सेवा विवेक’ या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. या ‘सेवा विवेक’चे मार्गदर्शक म्हणून धुरा सांभाळणारे ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत रमेश पतंगे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर पालघर जिल्ह्यात विशेषतः आदिवासी महिलांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे.
प्रभुणे यांना २०२१ साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेव्हा तो या निरलस कृतिशीलतेचाच गौरव होता. प्रभुणे यांनी आयुष्यभर केलेल्या वाटचालीचा धांडोळा अरुण करमरकर यांनी ’अलौकिकाचा वाटसरू’ या पुस्तकात घेतला आहे.
‘सेवा विवेक’ सामाजिक संस्थेमार्फत पालघर जिल्हातील दुकटन गावातील बांबूपासून हस्तकला प्रावीण्य मिळवलेल्या आदिवासी महिलांना संविधान साक्षरता मोहिमेंतर्गत संविधानाचे महत्त्व व फायदे याचे मार्गदर्शन ‘सेवा विवेक’चे मार्गदर्शक, जेष्ठ विचारवंत, लेखक आणि राष्ट्रीय स्वयम् सेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते ‘पद्मश्री’ रमेश पतंगे यांनी दिले. या उपक्रमात ‘पद्मश्री’ पतंगे यांच्या धर्मपत्नी मधुरा पतंगेही उपस्थित होत्या.
यंदाच्या प्रजासत्ताकदिनी ज्या दहा सेवाव्रती डॉक्टरांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला,त्यांपैकीच एक आहेत डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे. त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
शिक्षण आणि सहकार चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नाशिकमधील प्रख्यात ‘के. के. वाघ शिक्षण संस्थे’चे अध्यक्ष बाळासाहेब देवराम वाघ यांचे नुकतेच निधन झाले.
पद्मश्री डॉ. गणेश देवी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ, विचारवंत आणि सांस्कृतिक नेते म्हणून प्रसिध्द आहेत. राष्ट्रीय किंवा राजभाषा म्हणून मान्यता नसलेल्या ४० भाषांना त्यांनी नवी ओळख मिळवून दिली
१०८ वर्षांच्या सालूमरदा थिमाक्का यांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना राष्ट्रपतींच्या डोक्याला हात लावून त्यांना आशिर्वाद दिला.
प्रथितयश नाट्यदिग्दर्शक प्रा. वामन केंद्रे यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मानल्या जाणाऱ्या ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख..
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असा आग्रह बंगारू आदिगलर यांनी आपल्या अनुयायांकडे धरला. ‘किमान वाचायला-लिहायला तरी सर्वांना यायला हवे.
फ्रेडरिक या जर्मन नागरिक असल्या तरी, त्यांनी गोसंरक्षणासाठी मोठे काम केले आहे. याच कामाची दखल घेत भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
वनसंरक्षणासाठी झटणाऱ्या समाजसेविका जमुना टुडू यांचा यथोचित गौरव करत यंदा केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर केला. त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख...
एकीकडे गोहत्येवरुन देशात दंगली भडकविण्याचे भीषण प्रयत्न होत असताना यंदांच्या ‘पद्मश्री’ पुरस्कारांच्या यादीतील महाराष्ट्रातील गोरक्षक शब्बीर मामूंचे नाव अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारेच आहे.
ओडिशामधील कटकच्या बख्शी बाजारात एक छोटेखानी चहाचे दुकान चालवणारे प्रकाश राव आज ‘पद्मश्री’पर्यंत पोहोचले. पण पद्मश्री किताब मिळेपर्यंतची त्यांची ही वाटचाल सोपी नव्हती. त्यांना खडतर रस्त्यावरून संघर्षाचा मार्ग स्वीकारावा लागला.