Operation Sindoor there was hope that the opposition would not make the same mistake again However the opposition as usual continued the bad habit विरोधकांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’, ‘एअर स्ट्राईक’वरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि नंतर ते सपशेल तोंडावर आपटले. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर किमान पूर्वानुभवातून विरोधक पुन्हा तीच घोडचूक करणार नाहीत, अशी आशा होती. परंतु, विरोधकांनी प्रथेप्रमाणे केंद्र सरकार, सैन्य कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची कुप्रथाच कायम ठेवली.
Read More
पहलगाममधील घटनेनंतर देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे राजकारण करण्याचे दिवस नाही तर देशाला मजबूत करण्याचे दिवस आहेत. यात जो कुणी राजकारण करेल ते त्यांना लखलाभ आहे, असे प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना दिले आहे.
( amit shah on opposition ) “देशात अद्याप १५ ते २० वर्षे तरी विरोधी पक्षांना सत्ता मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे विविध क्षेत्रांत ज्या काही आवश्यक सुधारणा आहेत, त्या आमच्या सरकारला करायच्या आहेत,” अशी फटकेबाजी केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत केली.
‘नाकापेक्षा मोती जड’ व्हायला लागला की, तो अलगद बाजूला काढावा लागतो, अन्यथा इजा होण्याची भीती असते. उद्धव ठाकरे ते कधी करणार आहेत, देव जाणो! भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते करण्याचे गाजर काय दाखवले, ते इतके हवेत गेले की, विचारायची सोय नाही. विधिमंडळाचे कामकाज आपल्याइतके कोणालाच समजत नाही, याच अविर्भावात ते वावरताना दिसतात. कालचीच गोष्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी गोवंडी ‘आयटीआय’च्या नामांतर सोहळ्यात केलेल्या भाषणाची चर्चा विधानसभेत झाली. त्यांच्या भाषणाविषय
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी अपेक्षित संख्याबळ नसतानादेखील उबाठा गटाने या पदासाठी अर्ज दाखल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी गुहागरचे आ. भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे. मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी त्यांनी यासंदर्भातील शिफारसपत्र विधानसभा अध्यक्षांना दिले. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा १४५ आहे, तर विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी २८८ जागांच्या दहा टक्के आमदार संबंधित पक्षाकडे असणे आवश्यक आहे.
लवकरच विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. या अनुषंगाने विरोधी पक्षांकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी चाचपणी सुरु झाली आहे. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर उबाठा गट दावा सांगणार असल्याची माहिती खुद्द संजय राऊतांनी दिली आहे.
विरोधकांकडून करण्यात येणारे ईव्हीएमचे आंदोलन हे आता केवळ फोटो काढण्यापुरते राहिले आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यांनी शनिवार, २५ जानेवारी रोजी कोराडी येथे माध्यमांशी संवाद साधला.
महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण रद्द करण्यासाठी महाविकास आघाडीचे काही लोक कोर्टात गेले, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शनिवार, २५ जानेवारी रोजी त्यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला धडा शिकवला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते पददेखील त्यांना मिळू नये, अशी तजवीज केली. तरीदेखील हे पद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची विशेषतः उबाठा गटाची धडपड सुरू असल्याचे दिसते. मुळात या पदासाठी अपेक्षित संख्याबळ नसताना, असे धाडस करणे मूर्खपणाचेच. पण, देवेंद्र फडणवीस दया दाखवतील, या एकमेव आशेने उद्धव ठाकरे धडपडताना दिसतात. फडणवीसांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणार्या उद्धवरावांनी त्यासाठीच तर नागपुरात त्यांची भेट घेतली. ते देवेंद्र फडणवीस होते म्हणून
नागपूर : ‘अडीच वर्षां’चा पेटेंट कायमस्वरुपी उबाठा ( UBT ) गटाच्या नावावर होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसने त्यांच्यासमोर अडीच-अडीच वर्षांचा प्रस्ताव ठेवला असून त्यावर होकार येत नाही, तोवर गटनेता जाहीर करणार नाही, अशी भूमिका घेतल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ( Om Birla ) यांनी मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी संसद संकुलात काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या निषेधाच्या पद्धती अशोभनीय असल्याचे सांगितले. विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे वर्तन संसदीय परंपरेच्या विरुद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
(MVA) राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने विजयी बहुमत मिळवले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे. दरम्यान मविआमधील तिन्ही घटकपक्षांनी २८८ पैकी फक्त ४६ जागा जिंकल्या. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारे १० टक्क्यांचे संख्याबळ म्हणजे २९ जागांचा अपेक्षित आकडा सध्या मविआतील एकाही पक्षाकडे नाही. त्यामुळे तिन्ही पक्षांपैकी एकही पक्ष विरोधी पक्षनेता पदासाठी पात्र ठरला नाही. दरम्यान आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी महायुतीकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे विरोधीपक्षनेते पद देण्या
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधीपक्ष नेत्याची खुर्ची रिकामी राहणार आहे ( Chief Minister )
मुंबई : ईव्हीएमवर संशय व्यक्त करणाऱ्या विरोधकांना भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. विरोधकांनी आता रडीचा डाव खेळू नये.
रिपोर्ट कार्ड देण्याकरिता धाडस लागतं. त्यासाठी काम करावं लागतं, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला आहे. बुधवारी महायूती सरकारने संयुक्त पत्रकार परिषद घेत दोन वर्षांतील कामांचं रिपोर्टकार्ड सादर केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
Durga Puja बांगलादेशातील हिंदूवरूद्ध हिंसाचार आणि भेदभावाच्या होत असल्याचे चित्र आहे. दुर्गापूजेच्या या उत्सवाला निषेध करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कट्टरपंथी गट रस्त्यावर उतरत दुर्गापूजेला परवानगी देणार नाही अशा घोषणा देत आहेत.
तुम्ही खरंच गांधीजींचे अनुयायी असाल तर त्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करा, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केली आहे. बुधवारी धर्मादाय कार्यालयातील अभिलेख्याचे स्कॅनिंग व डिजिटायजेशन प्रकल्पाचे उदघाटन त्यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत. कारण तुम्ही समाजात अराजक तयार करण्याचा प्रयत्न करत आहात, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केला आहे. बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी शनिवारी काळ्या फिती बांधून आंदोलन केलं. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते यवतमाळ येथे लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
विचार करून तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधण्याची वेळ तुमच्यावर आली नसती, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर केला आहे. शनिवार, २४ ऑगस्ट रोजी यवतमाळमध्ये आयोजित लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांच्या निषेध आंदोलनावर निशाणा साधला.
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी पाण्यात दिसायचे तसं मी विरोधकांना दिसतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला हे त्यांना पचत नाही, असं टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर सोडलं आहे. तसेच लाडकी बहिण योजनेवरूनही त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच संपले, २०२४ च्या निवडणुकानंतरचे हे तसे पहिलेच अधिवेशन असल्याने विरोधकांकडून समंजसपणाची अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षाच राहील, याची काळजी विरोधकांनी घेतली.
“भाजप सत्तेकडे लोकांच्या सेवेसाठी म्हणून बघतो. मात्र विरोधक स्वार्थासाठी सत्ता मिळवू पाहात आहेत. त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीपासून विरोधकांनी खूप अपप्रचार केला. विष जसे लगेच पसरते, त्याप्रमाणे विरोधी पक्ष विषारी काम करत आहेत,” अशी घणाघाती टीका ठाण्याचे आ. संजय केळकर यांनी मंगळवार, दि. 6 ऑगस्ट रोजी केली. भाजप उत्तर रायगड जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठक शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
विरोधकांना मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही पण वडेट्टीवारांच्या घरी बसून निवडणूकीची बैठक घेण्यासाठी वेळ आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. मंगळवारी आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतू, विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे फडणवीसांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
विरोधी पक्षनेत्यांना स्वतंत्र आरक्षण हवंय की, ओबीसीतून ते त्यांनी जाहीर करावं, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. मंगळवारी मराठा आरक्षणासंबंधी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले.
हाती संविधान घेऊन खासदारकीची शपथ घेणार्या राहुल गांधींना सत्ताधार्यांनी आणीबाणीचा निषेध करणार्या मौनाद्वारे आपल्या मनसुब्यांची चुणूक दाखवून दिली आहे. आता केवळ आरोप-प्रत्यारोप करून राहुल गांधी राजकीय जाहिरातबाजी करू शकत नाही. त्यांना संपूर्ण तथ्ये आणि नियमांसह सरकारला घेरावे लागेल. यातील त्यांचे कसबच त्यांच्या भवितव्याचा फैसला करणार आहे.
यंदाच्या निवडणुकीची तुलना २०१४ सालच्या निवडणुकीशी केल्यास त्यामध्ये ‘अॅण्टी इन्कम्बन्सी’ प्रभावीपणे अस्तित्वातच नसल्याचे दिसून आले. मोदी सरकारने भरपूर बदल घडवले आहेत आणि पुढच्या पाच वर्षांत आणखी बदल घडणार याची आम्हाला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया मतदार देत आहेत. या प्रतिक्रियेद्वारेच निकालाचा नेमका अंदाजही येतो.
विरोधकांकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नाही. त्यामुळे ते संगीत खुर्चीचा खेळ खेळतील आणि संगीत खुर्चीमध्ये जो पहिला बसला तो पहिला पंतप्रधान बनेल, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. मंगळवारी पालघरमधील डहाणू येथे महायूतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इलेक्टोरल बाँड बाबत सर्व माहिती निवडणूक आयोगाला एसबीआयकडून सादर करण्यात आली. त्यानंतर अनेक कोटींच्या इलेक्टोरल बाँडची माहिती उघडकीस आली. दरम्यान, ज्या कंपन्यांवर ईडी व सीबीआयने छापे टाकले होते त्यांनी कारवाईनंतर ६२ टक्के देणग्या विरोधी पक्षांना दिल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. 'फसवणूक नको आरक्षण द्या', 'महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर' अशा घोषणा देत विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
मराठा आरक्षणासाठी मंगळवारी राज्य सरकारकडून विशेष अधिवेशन घेण्यात येत आहे. दरम्यान, याआधी विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्राद्वारे आरक्षणासंबंधी वेगवेगळ्या मुद्दांवर स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आली आहे.
'कमकुवत विरोधक आहेत म्हणून न्यायालयाने विरोधकांची भूमिका निभावणे अपेक्षित नाही', असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश संजय कौल यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. कायदा अंमलात आणण्यापूर्वी कायदेशीर परिणामांचा अभ्यास केला पाहिजे, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी कौल यांनी यावेळी केली.
“देशात विरोधक कमकुवत असले तरी न्यायालयांनी मात्र विरोधकांची भूमिका निभावू नये,” असे महत्त्वपूर्ण विधान नुकतेच निवृत्त झालेल्या न्यायाधीश संजय किशन कौल यांनी केले. न्यायपालिका तसेच संसद हे लोकशाहीचे दोन स्तंभ. दोघांनीही आपापल्या घटनात्मक जबाबदार्यांचे पालन करणेच अपेक्षित. पण, बरेचदा न्यायालये विरोधकांच्या पवित्र्यात दिसतात. म्हणूनच एकमेकांच्या अधिकारांचे उल्लंघन न करण्याचा असा हा निवृत्त न्यायाधीशांनी दिलेला सक्षम लोकशाहीचा ‘कौल’ स्वागतार्ह ठरावा.
भाजप आमदार अमित साटम यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी ड्रग्ज, गांजा, एमडी, ललित पाटील, दिशा सालियान हे सगळे मुद्दे उपस्थित करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच अंतिम आठवडा प्रस्ताव अतिशय हास्यास्पद असल्याचे म्हटले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या एकूण ३४ खासदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेतील कामकाजादरम्यान, गोंधळ घातल्याप्रकरणी ३२हून अधिक खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेसचे संसद समितीचे सदस्य अधीर रंजन चौधरी, डीएमके खा. टी. आर. बालू यांच्यासह अन्य खासदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
लोकसभा सुरक्षाभंगाचे प्रकरण अतिशय गंभीर असून त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. मात्र, काही राजकीय पक्षांकडून या घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न अतिशय दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले आहे.
भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अलीकडेच राजकारणी आणि इतरांना पाठवलेल्या 'सरकार प्रायोजित हॅकर्सपासून सावध रहा' या संदेशावर ऍपलकडून उत्तर मागितले आहे. आयटी मंत्रालयाने गुरुवारी (२ नोव्हेंबर २०२३) अॅपलला नोटीस पाठवून या दाव्याचे पुरावे सादर करण्यास सांगितले. या नोटीसवर मंत्रालयाने अॅपलकडून तत्काळ उत्तर मागितले आहे.
आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यासाठी इंडीया आघाडीच्या नावाखाली विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. यातच इंडीया आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपावरुन मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये अजूनही सर्व गोष्टींवर एकमत होताना दिसत नाही. विरोधी आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांचा आम आदमी पक्षाला विरोध कायम आहे. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी लोकसभेच्या जागावाटपाविषयी कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका, अशी विनंती हायकमांडला केली आहे.
विरोधी आघाडीतील नेत्यांचा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर विश्वास नसल्याचा दावा, लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनी केला आहे. विशेष म्हणजे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकारानेच विरोधी पक्षांची आघाडी बनवण्याची कसरत सुरु करण्यात आलेली आहे.
देशातील छुपे शत्रू ओळखा हे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. देशातील सरकार हे जनतेच्या हितासाठी, कल्याणकारी योजनांसाठी , मुलभूत सुविधा व आरोग्य, शिक्षण, रोजगार, व कायदा सुव्यवस्थेसाठी असते का लांगूलचालनासाठी असते असा प्रश्न जनतेला पडणे सहाजिकच आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आर्थिक लांगुलचालनाचे नवीन धोरण.
एनडीए आणि आयएनडीआय या दोन्ही आघाड्या भांडवलशाहांच्या फायद्याचा विचार करणाऱ्या आहेत. त्यामुळे बसपा यापैकी कोणत्याही आघाडीत सहभागी होणार नाही, असे प्रतिपादन बसपा प्रमुख मायावती यांनी केले आहे.
विरोधी पक्षांच्या 'INDIA' आघाडीच्या बंगळुरु येथील बैठकीसाठी विरोधी पक्षातील नेत्यांकडून तयारीस सुरुवात झाली आहे. त्यातच आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी भाजपकडून जोरदार जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या.
विरोधी पक्षांच्या आय.एन.डी.आय. आघाडीविरोधात सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगात जाण्याचे निर्देश याचिकाकर्त्यास दिली आहे. विरोधी पक्षांच्या आय.एन.डी.आय. या आघाडीच्या नावाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. असा मुद्दा निवडणूक आयोगाकडे मांडण्यात यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.
आज अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहे. ते म्हणाले की, ही आमची नाही, तर ही विरोधकांची फ्लोर टेस्ट आहे आणि आम्ही २०२४ मध्ये परत निवडूण येऊ. देव खूप दयाळू आहे आणि कोणत्या तरी माध्यमातून बोलतो...विरोधकांनी हा ठराव आणला हा देवाचा आशीर्वाद आहे असे मला वाटते. तसेच विरोधी पक्षांवर ताशेरे ओढत पंतप्रधान म्हणाले, "ज्यांची स्वतःची खाती खराब झाली आहेत, ते आमच्याकडे हिशेब मागत आहेत. त्यांनी (विरोधकांनी) अविश्वास प्रस्ताव आणला, म्हणजेच विरोधकांनी फिल्डिंग लावली, पण इथून (सत्ताधारी पक्षाकडून) चौकार-षटकार
विरोधी पक्षांनी आणलेला अविश्वास ठराव हा सरकारविरोधात नसून त्यांच्यातीलच अविश्वासाचे निदर्शक आहे. त्यामुळे लोकसभेत शेवटच्या चेंडूवर षटकार मारू, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत केले आहे.
हो-नाही म्हणत, अखेरीस विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेसने निर्णय घेतला. माजी मंत्री आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यांवर विरोधी पक्षनेते पदाची धुरा सोपविण्यात आल्याची घोषणा बाळासाहेब थोरात यांनी केली खरी; पण यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे दिल्लीत असणे खटकणारे होते.
बिहारमध्ये सध्या अल्पसंख्याक अर्थात मुस्लीम समुदायाचे लांगूलचालन राज्य सरकार अगदी बिनबोभाटपणे करत असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेसह हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. यामध्ये मुस्लिमांकडून दलित समुदायास लक्ष्य करण्यात येत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. अर्थात, हा आरोप राजकारणातून अथवा हवेत करण्यात आलेला नाही. बिहारमधील दरभंगा येथे काही दिवसांपूर्वीच घडलेल्या गंभीर घटनेमुळे हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला.
राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील कामकाजाचे अवघे तीन दिवस उरले आहेत. मात्र अजूनही काँग्रेसकडून विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदाच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं नाही. विरोधी पक्षनेता कोणाला करायचं हा निर्णय काँग्रेसच्या हायकमांडकडे अडकलेला असल्याची माहिती आहे.
विरोधी पक्षांच्या आघाडीच्या सदस्यांनी राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्येही जावे आणि तेथील हिंसाचाराच्या स्थितीचा आढावा घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसार मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी केले आहे.
दिल्ली प्रशासकीय सेवेसंदर्भातील विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या ऐक्याच्या नेमक्या क्षमतेचा अंदाज त्यावेळी येणार आहे.