राज्यभरात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Read More
राज्यभरात सध्या पावसाचे थैमान सुरु असून शेती आणि घरात पाणी शिरल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, ज्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले त्यांना १० हजार रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकरी आणि नागरिकांना नुकसान भरपाई द्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने काही तास विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून लोकल सेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे.
राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने बारामती तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
मान्सूनच्या आगमनाला कोसळलेल्या जोरदार पावसामुळे सोमवार, दि. २६ मे रोजी मुंबईची ‘तुंबई’ झाली. मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांना फटका सहन करावा लागला.
अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने यंत्रणेसाठी हाय अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीसह पावसाळ्यातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आपत्कालिन नियोजन करण्यात आले आहे.
शेतकरीसुद्धा लाडका आहे हे सरकारने दाखवून द्यावं, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसंदर्भात राज ठाकरेंनी एक पोस्ट लिहिली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे. तसेच नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
आठवडाभरापासून सतत कोसळणार्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या कोसळधारांनी संपूर्ण जिल्हा झोडपून काढला असून विविध धरणांमधील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जात आहे. दारणा, गंगापूर धरणांच्या पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नाशिकला पाणीपुरवठा करणार्या गंगापूर धरणातील जलसाठा 80 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
ठाण्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी पहाटेपासुन चांगलेच धुमशान मारले. तलावांचे शहर असलेल्या ठाणे शहरातील तलाव भरले असुन अनेक सखल भागात पाण्याचे तळे साचल्याने जनजीवन विस्कळित झाले.
ठाण्यात बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी पहाटेपासुन चांगलेच धुमशान मारले. तलावांचे शहर असलेल्या ठाणे शहरातील तलाव भरले असुन अनेक सखल भागात पाण्याचे तळे साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मुंबईतील नरिमन पॅाइंट परिसरात जोरदार पाऊस पडत आहे.तर हवामान विभागाकडून मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई उपनगरात पावसाचा ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे.
राज्य सरकारचे मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच ठाण्यातही पावसाचे धुवाँधार 'अधिवेशन' सुरु आहे. सोमवारी पहाटेपासुनच मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने ठाणे शहरात पाणी तुंबण्यासोबतच वाहतुकीचा बोजवारा उडाला.शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतुक मंदावली होती. सोमवारी दुपारी १२ वाजे पर्यंत ठामपा आपत्कालीन कक्षाकडे १४० मि. मीटर पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प झाल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्याना फटका बसला.
रविवारी रात्रीपासून मुंबईसह महानगर प्रदेशात सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात घोषणा केली.
मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आजूबाजूचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांत मुंबईसह अनेक भागांत संततधार पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या आज ८ जुलै रोजी होणाऱ्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहे.
सकाळपासूनच मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. शहरातल्या बऱ्याच भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याचे पाहायला मिळाले आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे या मुसळधार पावसात विमानसेवादेखील विस्कळीत झाली आहे.
अतिवृष्टीमुळे ठाणे ते मुंबई दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले असून या ठिकाणची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे सकाळच्या सुमारास चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. सकाळी ११.३० च्या सुमारास पुन्हा रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली होती. मात्र रेल्वे रुळावर उशीराने धावत होती. सायंकाळी देखील दोन्ही मार्गावरील वरील रेल्वे उशीराने धावत होती. त्याचा परिणाम कर्जत ते ठाणे, कसारा ते ठाणे या दरम्यानच्या रेल्वे वाहतूकीवर झाला. ठप्प झालेली रेल्वे वाहतूक पाहता प्रवाशांनी बस आणि रिक्षाकडे आपला मोर्चा वळवला. मात्र
मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर सुखावले. पण सकाळी पावसाचा रुद्रावतार, अनेक भागात साचलेले पाणी आणि वाहतूककोंडी, लोकलसेवा ठप्प झालेली पाहून चाकरमान्यांना मात्र पावसामुळे आवड्याच्या पहिल्याच दिवशी हाल सोसावे लागले.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात सर्वाधिक प्रभावित लोकलसेवा होते. हे पाहता पावसाळा काही आठवड्यांवरच आला असताना आता मध्य रेल्वेचा मुंबई विभाग विस्तृत नेटवर्कवर अखंड सेवा आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबवित आहे. पावसाळ्यात रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि मान्सूनसाठी संचलन सुरळीत ठेवण्यासाठी पूर्वतयारीसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
नागपुरात शुक्रवारी रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. एका रात्रीत ११० मिलीमीटर पाऊस झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे नागपूरकरांची दाणादाण उडाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शनिवारी सकाळी या पूर परिस्थितीची पाहणी केली असुन संध्याकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल, असे ते म्हणाले.
युक्रेन युद्धामुळे जगभर अन्नधान्यांचे संकट निर्माण झाले. त्यामुळे दुसर्या देशातून अन्नधान्य आयात करण्याची किंमत खूप जास्त असू शकेल. देशात अनेक भागांमध्ये भाववाढ होत आहे. किमतीवरती नियंत्रण ठेवण्याकरिता सरकारने काही पिकांची निर्यात थांबवली आहे. याचे मुख्य कारण आम जनतेकरिता अन्नसुरक्षा व महागाईवर नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे.
देशात गेल्या दोन महिन्यांपासून टमाटरचे भाव प्रचंड वाढले आहेत. अतिवृष्टीमुळे पीकांचे नुकसान होऊन टमाटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातूनच टमाटरचे भाव २०० रुपये किलोपर्यंत जावून पोहोचले आहे.
महाराष्ट्राच्या अनेक भागात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात अतिमुसळधार पावसाने थैमान घातले असताना, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा शिंदेंनी घेतला असून कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुंबई : राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ते विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. तसेच, नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन त्यांनी केले.
राज्य सरकारचे मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच ठाण्यातही पावसाचे धुवाँधार 'अधिवेशन' सुरु आहे.बुधवारी सकाळपासुनच सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरु झालेल्या पावसाने ठाणे शहरात पाणी तुंबण्यासोबतच वृक्षांची पडझड होऊन वाहनांची वाताहत उडाली. शहरात आठ ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतुक मंदावली होती. बुधवारी दिवसभरात ठामपा आपत्कालीन कक्षाकडे १४० मि. मीटर पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाल्याने गुरुवारी शाळा - महाविद्यालयाना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे मुंबईकर ‘नेमेचि होते मुंबईची तुंबई’ असे म्हणत कसेबसे पावसाळ्यांत अक्षरश: ‘जीवाची मुंबई’ करतात. पालिकेचेही दरवर्षीप्रमाणे १०० टक्के नालेसफाईचे दावे पहिल्या पावसात धुवून निघतात. यंदाही मुंबईची परिस्थिती काही वेगळी नाहीच. त्याचाच या लेखातून घेतलेला हा आढावा...
आफ्रिकेतील कांगोमध्ये २ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. या महापुरात आतापर्यंत १७६ जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण किव्हू प्रांतात कालेहे भागात एका नदीची पाणी पातळी वाढल्याने पूर आला. या महापुरात अनेकजण बेपत्ता आहेत.
मुंबई : "सततचा पाऊस" ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे ९१९२ शेतकऱ्यांच्या २२४७ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. शेतीपिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी तीन कोटी १८ लाख रुपये, शेतजमीन नुकसानीसाठी १५ लाख रुपये, मृत जनावरांसाठी ७४ लाख रुपये, पूर्णतः नष्ट, पडझड, कच्ची-पक्की घरे, झोपड्या आणि गोठ्यांसाठी एक कोटी २० लाख रुपये अशा एकूण पाच कोटी २८ लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यापैकी तीन कोटी १८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे वाटप स
पाकिस्तानातील नैसर्गिक आपत्ती आणि त्यावरील सरकारची हतबलता, यावरून या देशाची कार्यक्षमताच दिसून येते. परंतु, दरवेळेप्रमाणे यंदाही या देशाअंतर्गत भीषण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात, जनतेला मदतीचा हात देण्यात पाकिस्तान सरकार मात्र सपशेल अपयशीच ठरले आहे.
२२ कोटींच्या लोकसंख्येच्या या देशातील तब्बल ३.३ कोटी जनतेला, म्हणजेच १५ टक्के लोकसंख्येला या पुराने आपल्या कवेत घेतल्याने पाकिस्तानमध्ये आपात्कालीन आणीबाणीची घोषणा सरकारला करावी लागली
हिमाचलप्रदेशमधील धर्मशाला येथे १२ तासांत ३३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा ६४ वर्षांतील सर्वाधिक असल्याची माहिती हिमाचल प्रदेश राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने सोमवारी दि. २२ ऑगस्ट रोजी दिली. "शुक्रवारी रात्री ९:०० ते शनिवारी सकाळी ९ :०० वाजेपर्यंत ३३३ मिमी पावसाची नोंद झाली," असे प्राधिकरणाने ट्विटमध्ये म्हटले आहे. या आधी ऑगस्ट १९५८ मध्ये धर्मशाला येथे ३१६ मिमी पावसाची नोंद झाली होती.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) येत्या २४ तासात मुंबईसाठी 'यलो' अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सूचित केले आहे. मुंबईत मंगळवारी दि. १६ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसह मध्य रेल्वेच्या सेवेवरही परिणाम झाला आहे. तसेच शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.
महाराष्ट्रात तयार झालेले सरकार हे लोकशाही परंपरा बाजूला सारून तयार झाले आहे, विश्वासघाताच्या पायावरच हे सरकार उभे राहिले आहे असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केला आहे
हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दि. ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाची नदी असलेली पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला आहे
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी १०० कोटी मंजुर
चीनमध्ये अनपेक्षित अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वत्र पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. चीन मधील प्रमुख शहरांना या पुराचा फटका बसला आहे. यात आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे.समोर येणारे फोटो हे भीतीदायक आहेत.गेल्या हजार वर्षात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा काही दिवसात झाल्यामुळे चीनची फार मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झालेली आपल्याला दिसून येत आहे. आतापर्यंत १० ते २० अब्ज रुपयांचे नुकसान झालेले वृत्तानुसार समजत आहे.
मुख्यमंत्री गाडी चालविण्यात व्यस्त असल्याचा टोला
अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचा फटका शहरातील पाणीपुरवठ्यावरदेखील होत आहे. पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये पुराच्या पाण्यामुळे अडकलेला कचरा काढण्यासाठी शनिवार दि.२४ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा दोन टप्यात सुरु राहणार आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडी सरकारवर टीका
वरळीतील घरांमध्ये गुडघाभर पाणी
राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ तुकड्या तैनात
मुंबईसह उपनगरात मागील १० तासांत २३० मिमी पावसाची नोंद!
आश्लेषा नक्षत्रात ऊन-पावसाचा खेळ चालतो, पण आज पुनर्वसू (तरणा) नक्षत्रातच ऊन-पावसाचा खेळ अनुभवायला मिळाला.
मुंबई महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा
नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु १८ ऑक्टोबरपासून परत एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
येत्या २४ तासात कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र - गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.