हैदराबाद संस्थान नवनिर्मित पाकिस्तानला मिळावे, असा प्रयत्न तेव्हा होता. कारण, निजामाचे राज्य. उपपंतप्रधान असणार्या पोलादी नेतृत्व वल्लभभाई पटेलांनी ही बाब अंतर्गत समस्या म्हणून हिंदुस्थानी सैन्यास आदेश दिला आणि ‘ऑपरेशन पोलो’ ही मोहीम सैन्याने राबवून रझाकारांना नमवून मराठवाडा मुक्तिसंग्रामाची सांगता झाली. या मोहिमेत सर्व हिंदू संघटनांनी हिरिरीने भाग घेतला होता, हा इतिहास आहे. ‘ऑपरेशन पोलो’ दि. १३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत कार्यान्वित होऊन मराठावाडा रझाकारीतून मुक्त झाला. तेव्हा आजच्या मराठवाडा मुक
Read More
दि. १८ सप्टेंबर १९४८ रोजी भारतीय सैन्याने निजामाचा पराभव केला. हैदराबाद संस्थानाचे भारतामध्ये विलीनीकरणाला आता ७५ वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून हे विलीनीकरण नेमके कसे झाले, हे सगळ्या भारतीयांना समजणे गरजेचे आहे. त्यासाठी हा लेखप्रपंच...
दि. 17 सप्टेंबर, 1948 दिवशी हैदराबादचे भारतामध्ये विलिनीकरण झाले म्हणून हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती संग्राम दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्याने जे ‘ऑपरेशन पोलो’ राबविले, त्याचे या लढ्यात मोठे योगदान होते. तेव्हा, नुकत्याच संपन्न झालेल्या या दिनानिमित्त भारतीय सैन्याची शौर्यगाथा मांडणारा हा लेख....
भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखर भूमिकेमुळे हैदराबाद भारतात विलीन झाले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावरील भारतमाता मंदिराच्या प्रांगणात, मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने...
सामान्यांचा असामान्य लढा, चर्चां-वाटाघाटींचे अनेक फड आणि शेवटी ‘ऑपरेशन पोलो’ या नावाने करण्यात आलेली पोलीस कारवाई, या सर्वांचा परिपाक म्हणजे १७ सप्टेंबर, १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. एकसंध भारताच्या निर्मितीतील एक टप्पा पूर्ण झाला.