मुंबईतील मनोरंजन उद्योगाचा सगळ्यात मोठा डोलारा सांभाळणार्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील अधिकारी आणि कर्मचार्यांसाठी खास ‘फ्रायडे मुव्हीज’ हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
Read More
भारतात परत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये एकूण ९५ कोविड-१९ रूग्णांची नोंद झाली असून सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. दरम्यान, कोरोनाची लागण झाल्याने ठाण्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
( maharashtra police head constable is investigating officer )मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेमुक्त महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून हेड कॉन्स्टेबल्सनाही (साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार दिले आहेत. यापूर्वी, केवळ पोलीस उपनिरीक्षकपदापासून वरिष्ठ अधिकार्यांकडे हा अधिकार होता.
( Navi Mumbai Municipal Corporation officers employees are taking online advantage of the knowledge from Tech Wari ) महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा अभिनव उपक्रम दि. ५ ते ९ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून शासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्वयंविकास घडवित विविध नागरी सेवा अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने सकारात्मक पा
कठोर परिश्रम, समर्पण, ईच्छाशक्ती, ध्यास आणि आत्मविश्वास या पाच गोष्टी गाठीशी असल्या की, कोणतीही गोष्ट साध्य करणं शक्य आहे. तुम्ही एखादं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी परिस्थितीवर मात करत जिद्दीने पुढे जात राहिलात तर नक्कीच यश तुमच्या पायाशी लोटांगण घालतं. याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे बिरदेव सिध्दाप्पा डोणे. घरची परिस्थिती फारच बेताची. मेंढपाळ हा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय. अशा परिस्थितीत बिरदेवने एक स्वप्न पाहिलं. ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड जिद्दीने मेहनत घेतली. यात त्याला दोनदा अपयशही आलं. मात्र, तरीसुद
मोतीलाल नगरचा पुनर्विकास करताना तेथील रहिवाशांना घराच्या बदल्यात थेट घर मिळणार आहे. त्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये न पाठवता त्यांचे थेट पुनर्वसन करण्यात येणार आहे.
(Pahalgam Terror Attack Updates) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये स्थानिकांसह पर्यटकांचाही समावेश आहे. या हल्ल्यात २६ वर्षीय नौदल अधिकारी विनय नरवाल यांचाही मृत्यू झाला आहे.
थकबाकीदारांना वठणीवर आणणारी सहकार क्षेत्रातील ‘सबला’ महिला वसुली अधिकारी उज्वला जाधव-अहिरे यांच्या वाटचालीचा आढावा...
वन आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नुकतेच वन विभागाचे सुवर्णपदक मिळालेले विभागीय वन अधिकारी डॉ. सुजित नेवसे यांच्याविषयी...
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, आपल्या स्वप्नांच्या दिशेने गरुडझेप घेणार्या सावित्रीच्या लेकीची कथा..."संघर्ष हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा भाग आहे, त्यावर फक्त बोलून उपयोग नाही. आपल्यासमोर येणार्या प्रत्येक अडचणींवर आपण विचारपूर्वक काम करायला हवे.” रेश्मा आरोटे यांचे हे वाक्य त्यांच्या संघर्षसंचितातून आलेले.
मुंबई महानगरात एसआरए योजना कशी राबवावी? याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (मुंबई क्षेत्र वगळून), ठाणे पराग सोमण यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.
मनात इच्छा असेल, तर मार्ग सापडतोच; मग ते काम कितीही कठीण का असेना! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक विडा उचलला आहे, महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याचा! मंत्रालयातील दलालांच्या कंबरड्यावर लाथ घातल्याशिवाय हे शक्य नाही, त्यामुळे देवाभाऊंनी सर्वात आधी ‘मंत्रालय सफाई’ची मोहीम हाती घेतली. वर्षानुवर्षे मंत्री कार्यालये अडवून बसलेल्या ‘फिक्सर्स’ना घरचा रस्ता त्यांनी दाखवला. मंत्र्यांचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी आणि स्वीय साहाय्यकांच्या नियुक्त्या मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होणार नाहीत, याकडे त
राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र अद्याप सुरुच आहे. दरम्यान, मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत.
मध्य प्रदेश कॅरेडरचे आयएएस अधिकारी नियाज खान यांनी म्हटले आहे की, इस्लाम धर्म हा अरब धर्म आहे. भारतातील प्रत्येकजण मूळत: हिंदू असल्याचे प्रतिपादन केले आहे. नियाज खान म्हणाले की, दुसऱ्या धर्मातर केल्याने आपली मूळ ओळख बदलत नाही. तसेच सामायिक सांस्कृतिक आणि अनुवंशिक वारसा समजावून सांगणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
वनविभागाच्या कक्षेत राहूनही वन्यजीव आणि समाजमन यांचा सारासार विचार करणारे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांच्याविषयी...
(Pooja Khedkar Case) वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता तिच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तिच्यावर फसवणूक तसेच चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप आहे.
Thane Municipal Corporation भावी सनदी अधिकाऱ्यांसाठी ठाणे महापालिका सरसावली आहे. ठामपा संचालित चिंतामणराव (सी.डी.) देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ मधील मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी २०२५ मध्ये दोन दिवसीय 'प्रतिरूप मुलाखत (मॉक इंटरव्ह्यु)' सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी २६ डिसेंबर पर्यत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
'ईव्हीएम' हॅक करणे कोणत्याही परिस्थिती शक्य नसल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. Chokkalingam यांनी दिली.
(IPS Officer Harsh Vardhan) पोलीस अकादमीमधले प्रशिक्षण संपवून आपल्या कर्तव्यावर रुजू होण्याकरिता जात असणाऱ्या तरुण आयपीएस अधिकाऱ्याचा वाहन अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची दु:खद घटना कर्नाटकातील हसन जिल्ह्यात घडली आहे. हर्ष वर्धन असे २६ वर्षीय मृत आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे. हर्ष वर्धन हे कर्नाटक केडरचे २०२३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मध्य प्रदेशचे मूळ रहिवासी होते. पहिल्या पोस्टिंगनंतर पदभार स्वीकारण्यासाठी जात असतानाच त्यांचा रविवारी १ डिसेंबर रोजी अपघाती मृत्यू झाला आहे.
दिल्लीतील बिजवासन परिसरात सायबर फसवणूक प्रकरणात, एका सीएच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या पथकावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ईडीचे अतिरिक्त संचालक किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
(Online Allowance for Polling Staff) निवडणूकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता ऑनलाईन भत्ता मिळणार आहे. पूर्वी हा भत्ता मतदान केंद्र अध्यक्षांकडून मतदान संपताच रोख स्वरूपात दिला जात होता.
मध्य रेल्वे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचारी आणि जनतेच्या हालचाली सुलभ करण्यासाठी दि. १९-२० नोव्हेंबर (मंगळवार-बुधवार रात्री) रोजी आणि दि. २०-२१ नोव्हेंबर (बुधवार-गुरुवार रात्री) रोजी विशेष उपनगरीय गाड्या चालवणार आहे. या गाड्या मेन लाइन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण) आणि हार्बर लाईन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल) वर खाली सूचीबद्ध केलेल्या सुटण्याच्या आणि आगमनाच्या वेळेसह चालतील.
विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाच्या मान्यतेने मुंबई महापालिका क्षेत्रातील ३६ विधानसभा मतदारसंघासाठी मिळून एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित केले आहेत.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना युपीएससीने कारणे दाखवा नोटिस बजावली असून त्यांची प्रशिक्षणार्थी अधिकारीपदाची निवड रद्द केली आहे. युपीएससीकडून पूजा खेडकरचा सखोल तपास करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
एक तरुणी आयएएस अधिकारी बनते, शिकाऊ अधिकारी म्हणून तिची नियुक्तीही करण्यात येते. मात्र, शिकाऊ अधिकारी असताना वरिष्ठ अधिकारी असल्यासारखा आव आणून ती अवास्तव मागण्या करते. एवढंच नाही तर मागण्या मान्य न झाल्याने मनमानी करुन वरिष्ठांची केबिनही बळकावते. ही गोष्ट आहे पुण्याच्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत असताना आता त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशिक्षण काळात त्यांनी छळ केल्याचा आरोप खेडकर यांनी केला आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत असून त्यांनी तब्बल ११ वेळा युपीएससीची परिक्षा दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांनी नाव बदलून ही परिक्षा दिल्याचेही सांगण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षण थांबवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य सरकारने मसूरीतील प्रशासकीय अकादमीला रिपोर्ट करण्याच्या सुचना राज्य सरकारने दिल्याचे सांगण्यात येत आहे.
वादग्रस्त शिकाऊ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. केंद्र सरकारने याप्रकरणाचा तपास एका अधिकाऱ्याकडे सोपवला असून खोटी वस्तुस्थिती मांडल्याच्या आरोपात तथ्य आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
आसाम सरकारचे गृह सचिव म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी आत्महत्या केली आहे. कॅन्सरग्रस्त पत्नीच्या मृत्युने दुःख झालेल्या चेतिया यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपविले आहे. दरम्यान, कॅन्सर उपचारासाठी गुवाहाटीच्या नेमकेअर हॉस्पिटलमध्ये मृत घोषित केल्यानंतर काही मिनिटांनी चेतिया यांनी स्वतःवर गोळी झाडत आपले जीवन संपविले आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. त्यांच्या १८ वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील ही २१ वी बदली आहे. ते आता असंघटित कामगार विभागात विकास आयुक्त म्हणून काम पाहतील. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत.
भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर लवकरच उलगडणार आहे. ‘बेदी’ असे किरण बेदींच्या बायोपिकचे नाव असून हा चरित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होईल असे सांगितले जात आहे. देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या जीवनावर आधारित ‘बेदी’ या चरित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये तुम्हाला किरण बेदी यांच्या कधीही न ऐकलेल्या गोष्टींचा समावेश असेल असे म्हटले आहे.
०१०च्या नागरी सेवा बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) अधिकारी विनीत अभिषेक यांनी मंगळवार, दि. १० जून रोजी पश्चिम रेल्वेचे नवीन मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. व्यवस्थापन विषयात पदवीधर असणाऱ्या विनीत यांच्याकडे शहर नियोजन आणि वाहतुक विषयक १९वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव आहे. यासोबतच, मुंबई सेंट्रल विभाग, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक पदाच्या कार्यकाळात त्यांनी तिकीट तपासणी आणि भाडे नसलेल्या महसूलाच्या क्षेत्रात अनेक उपक्रमांचे नेतृत्व केले. यामुळे विभागाला इतिहासात प
मुंबई: आता कर चुकव्यांचे वाईट दिवस सुरू होणार आहेत का असे विचारण्यास हरकत नाही कारणही तसेच आहे जीएसटी केंद्रीय व राज्याच्या अधिकारी वर्गाने एकत्र येत नवीन बैठक बोलावली आहे. या नवीन बैठकीत कर चुकवण्यासाठी हातखंडे वापरणाऱ्या कंपन्यांना तसेच बनावट कंपनीच्या नोंदणी करणाऱ्या कंपन्यांना आळा घालण्यासाठी उपाय आणण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे.
लोकसंवाद हे नागरिकांच्या प्रतिक्रियांची नोंद घेणे, त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे योग्य निराकरण करणे आदींसाठी महत्वपूर्ण आहे. कामकाजामध्ये सुकरता येण्याच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विभागांनी आपापसांत उत्तम समन्वय ठेवावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले.
वन आणि वन्यजीवांच्या संरक्षण-संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेले आणि सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेत, चोख भूमिका निभावणार्या वनअधिकारी मदन क्षीरसागर यांच्याविषयी...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज जीएसटी अंमलबजावणी अधिकारी वर्गाची कॉन्फरेन्स (परिषद) घेणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या जीएसटी (गुड्स अँड सर्विसेस टॅक्स) अंमलबजावणी अधिकाऱ्यांची बैठक निर्मला सीतारामन या घेणार असल्याचे म्हटले आहे. टॅक्सचोरी रोखण्यासाठी, जीएसटी कराची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी व तसेच 'इज ऑफ डुईंग बिझनेस ' धोरणासाठी किचकटपणा घालवून करप्रणाली चे सुलभीकरण करण्यासाठी ही परिषद अर्थमंत्र्यांकडून घेण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. दि. २३ फेब्रुवारी रोजी १२ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंगल यांची नियुक्ती सिडकोच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर करण्यात आली आहे.
राजस्थानमधील अजमेर येथे गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या केरळ आणि अजमेर पोलिसांच्या संयुक्त पथकावर हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, केरळमधून ४५ लाख रुपयांची चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अजमेरच्या दर्गा परिसरात लपलेल्या दानिश-शहजाद या दोघांना पकडण्यासाठी आलेल्या पोलिस पथकावर गोळीबार करण्यात आला.
कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या आठ भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणात परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर कतारच्या अपील न्यायालयाने हा निर्णय दिला, ज्यामध्ये शिक्षा कमी करण्यात आली आहे. कतारच्या गुप्तचर संस्थेच्या राज्य सुरक्षा ब्युरोने ३० ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यांच्यावर हेरगिरी केल्याचे आरोप करण्यात आले होते.
वैद्यकीय क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्यांसाठी पुण्यात नोकरीची नवी संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे अंतर्गत नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीकरिता पुणे शहरातील उमेदवारांना अर्ज करता येऊ शकतो. या भरतीच्या माध्यमातून एकूण १५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ठाणे महानगरपालिकामधील विविध रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली असून याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीअंतर्गत उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहे. या भरतीद्वारे विविध पदांच्या एकूण २५ जागा भरल्या जातील.
राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले असून मुख्य सचिवांमार्फत त्याबाबतचे मत शासनाला सादर करण्यात येईल. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल, या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. शासनाला प्राप्त झालेला अहवाल व त्यावरील चर्चा आणि अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल.
लेफ्टनंट कमांडर प्रेरणा देवस्थली आयएनएस चेन्नई च्या कमांडिंग ऑफिसर म्हणून निवड झाल्याबद्दल, प्रवीण नायर यांनी नियुक्ती पत्र प्रदान केले. भारतीय नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय नौदलाच्या त्या पहिल्या महिला अधिकारी असतील.
लग्नानंतर अभ्यासात अजिबात खंड न पडू देता, नोकरीसोबतच अभ्यासाचे नियोजन आखत, तब्बल सहा वर्षं मेहनत करून यश खेचून आणणार्या वंदना गायकवाड यांच्याविषयी...
राज्यातील प्राथमिक शाळांना दिवाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा संपल्यानंतर शाळांना ८ ते २१ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्या देण्यात आल्या आहेत. मात्र, ९ ते २५ नोव्हेंबरपर्यंत सुट्या मिळाव्यात, अशी मागणी शिक्षकांसह काही संघटनांकडून करण्यात येत आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे. मीरा-भाईंदर महापालिकेतील विविध रिक्त जागा भरण्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, महापालिकेतील विविध जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे मीरा-भाईंदर महापालिकेत नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
"कतारने ज्या माजी नौदल अधिकाऱ्यांना इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली फाशीची शिक्षा दिली आहे, त्यांच्याप्रती सहानुभूती नसावी. त्यांच्या बचाव करण्यापूर्वी भारत सरकारने योग्य तपास केला पाहिजे." असे धक्कादायक विधान दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष जफरुल इस्लाम खान यांनी केले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतंर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये लिफ्टमधून कुत्रा नेण्यावरुन वाद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक महिला आणि एक पुरुष यांच्यात बाचाबाची होताना दिसत आहे. एवढेच नाही तर त्या पुरुषाने महिलेला चापटही मारली आहे.