केंद्र सरकार स्वच्छ ऊर्जा रूपांतरणासाठी छोट्या अणुभट्ट्यांसारख्या नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. बुधवारी संसदेत ही माहिती देण्यात आली. केंद्रीय अणुऊर्जामंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, अणुऊर्जा हा वीज निर्मितीसाठी सर्वात आशादायक स्वच्छ ऊर्जा पर्यायांपैकी एक मानला जातो. आगामी काळात जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करू शकणाऱ्या अणुऊर्जेचा वापर करण्याच्या धोरणावर जगभरात भर पडत आहे.
Read More
भारतातील पहिला स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्प गुजरातमध्ये स्थापन करण्यात आला आहे. पहिल्या स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या काक्रापार अणुऊर्जा प्रकल्पाने (केएपीपी) वीज निर्मिती सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा प्रकल्प सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदनही केले आहे.
जपान सध्या त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पातील किरणोत्सारी पाणी समुद्रात सोडण्याच्या तयारीत आहे, ज्याला खुद्द जपानी नागरिकांकडून जोरदार विरोध सुरू झाला. त्यानिमित्ताने जपानकडे हे किरणोत्सारी पाणी कुठून आले आणि ते समुद्रात का सोडले जाणार आहे, हे जाणून घेऊया.
रत्नागिरीतील शिवसेना आमदार राजन साळवी यांनी या आंदोलनाला आपला पाठींबा दिला आहे. त्यामुळे सध्या परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.