भाजप आमदार मंगलप्रभात लोढांचा महापालिकेवर निशाणा
Read More
मुंबईतील मालाड मालवणी इमारत दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचे मृत्यू झाले आहे. या मृतांमध्ये ६ लहान मुलांचा समावेश आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तर दुसरीकडे जखमींना मदतही केली जात आहे. याप्रकरणी आता इमारतीचा मालक आणि ठेकेदाराविरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.