मुंबई : “मुंबईत विशेषतः मालवणी परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या लोकसंख्येमध्ये महाविकास सरकारच्या काळात मोठी वाढ झाली. त्याबद्दल ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’चा अहवाल आहे. त्यामुळे केंद्र सरकारवर त्याचे खापर फोडू नका. तुमच्यात हिंमत असेल, तर कृपया या जिहादी प्रवृत्तीबाबत भूमिका स्पष्ट करा,” असे आवाहन मुंबई भाजपचे सचिव प्रतिक कर्पे ( Pratik Karpe ) यांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे यांना दिले.
Read More
हिंदू समाज, हिंदू देवदेवता, हिंदूंची श्रद्धास्थाने यांच्यावर आघात करण्याचे जे प्रयत्न जिहादी तत्त्वांकडून सुरु आहेत ते थांबणार कधी? हे असेच किती काळ चालू राहायचे?
महासत्तांच्या विद्यापीठातून ‘समाजशास्त्रविषयक अभ्यासाची शिष्यवृत्ती’ नावाखाली प्रवेश देण्यात येतो. तेथून ते बाहेर पडतात, ते त्यांच्या त्यांच्या मूळच्या देशातील राज्यव्यवस्था उलथवून टाकण्याच्याच कामाला लागतात. भारतातील अनेक साम्यवादी नेते आणि जिहादी नेते याप्रमाणे अमेरिकी विद्यापीठातूनच शिक्षण घेऊन आले आहेत.
नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक विद्यार्थी नेत्यांपासून माध्यम क्षेत्रातील एकाहून एक विचारवंत-संपादक आठवडाभर आधी ‘कलम ३७०’ रद्द होण्याची साधी बातमी देऊ शकणार नसतील, तर त्यांच्यासाठी परिषदा, मेजवान्या किंवा चर्चासत्रांचे पंचतारांकित समारंभ योजण्यावर पाकने पैसे कशाला खर्चावेत? इमरानपासून जनरल बाजवा यांच्यापर्यंत सगळे पाकिस्तानी नेते, आपली पुरोगामी गुंतवणूक बुडित गेल्यामुळे मात करीत आहेत. मणिशंकर अय्यर उगाच नाही, मल्ल्यासारखे बेपत्ता झाले.