रशिया-युक्रेन युद्धाने शांतिप्रिय मानले जाणारे देशही संरक्षणाला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. दुसर्या महायुद्धानंतर जगातील सर्वात शांतिप्रिय देश म्हणून जपानकडे पाहिले जाते. जपानी संविधानात युद्धापासून दूर राहण्याबरोबरच कधीही सैन्यदल ठेवू नये, असे नमूद केले आहे. या गोष्टीला तेथील सरकार आणि नागरिकांनीही सुरुवातीपासूनच महत्त्व दिले.
Read More
उगवत्या सूर्याचा देश अर्थात जपानचा येत्या काही वर्षांत अस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जगातील सर्वात विकसित देशांच्या यादीमध्ये जपान अग्रक्रमावर. दुसर्या महायुद्धादरम्यान जपानला नामोहरण करण्यासाठी बलाढ्य अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर केला. यात हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे बेचिराख झाली. देशाची राखरांगोळी होऊनही जपानने राखेतून भरारी घेत जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण केला. सध्या जपानकडे जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पाहिले जाते. परंतु, जपान दिवसेंदिवस कमजोर होत चालला आहे.
आझाद हिंद सैन्याला माघारी यावं लागलं. त्यातच हिरोशिमा आणि नागासाकीचा प्रकार घडल्यामुळे जपान शरण आला आणि ‘आझाद हिंद सेने’नेही शरणागती पत्करली. ‘आझाद हिंद सेने’च्यावरचा राजद्रोहाचा खटला हा लाल किल्ल्यावर सुरू झाला. हे वाचून वाचकाला वाटतं ‘आझाद हिंद सेना’ हरली; पण या क्षणापासूनच आझाद हिंद सैन्याचं खरं युद्ध सुरू होतं. तेव्हा, आज याच ‘आझाद हिंद सेने’चे संस्थापक आणि भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त या शौर्यभास्कराचे केलेले हे वीरस्मरण...