शास्त्रांत सांगितलेल्या सर्व पारमार्थिक साधनात नामस्मरण महत्त्वाचे आहे, असे समर्थ म्हणतात. तसेच भगवंताचे नाम हे सर्व साधनांचे सार असून त्यांची तुलना दुसर्या कशाबरोबर करता येत नाही, हेही समर्थांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. समर्थांचे आराध्यदैवत राम आहे आणि त्याच्याविषयी रामदासांच्या मनात अतीव आदराची भावना आहे, हे सर्वजण जाणतात. भगवंताची अनेक नावे आहेत. असे असले तरी स्वामींनी रामनामाचे महत्त्व वारंवार सांगितले आहे. यासंदर्भात आणखी काही विचार स्वामी पुढील श्लोकात सांगतात-
Read More