सागरी सुरक्षा भक्कम करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत भाऊचा धक्का येथे नवीन गस्ती नौका तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मंगळवार, १७ जून रोजी मंत्री नितेश राणे यांनी या गस्ती नौकेची पाहणी केली. तसेच सागरी सुरक्षेला शासनाचे नेहमीच प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Read More
मच्छीमार महामंडळाचे कामकाजही तातडीने सुरु होणार
मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंच्या विभागाला सूचना
महाराष्ट्रातील बंदरे विभागाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मान्यता दिल्याची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवार, दि. २९ मे रोजी दिली. नवी दिल्ली येथे पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
( Minister Nitesh Rane on Maharashtra Maritime Board fund ) महाराष्ट्र सागरी मंडळाने त्या प्राप्त होणारा शंभर टक्के निधी खर्चंकरवा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय बंदर मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. महाराष्ट्र सागरी मंडळ येथे मंगळवार दि.१३ रोजी मंडळाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
"सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन 'प्रकरणे' दाखल करावी लागणार आहेत. त्यासाठी सहकार कायद्यात आवश्यक बदल करावे लागतील. सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. १२ मे रोजी केली
(The era of revival of Indian culture has begun Nita Ambani) “इतर देशांसाठी संस्कृती हा केवळ संवर्धनाचा विषय असतो, परंतु भारतीयांसाठी संस्कृती हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा काळ सुरू झाला आहे,” असे प्रतिपादन ‘रिलायन्स फाऊंडेशन’च्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी केले.
राज्याचे जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मजूर करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. मंगळवार, दि. २९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे धोरण मंजूर करण्यात आले. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात २०४७ पर्यंत १८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ३ लाख ३० हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचेही मंत्री राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्रालय व विधीमंडळ पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत
आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी मागणी केल्यानंतर ‘आरोग्य भवन’ येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणाविषयी बैठक पार पडली. “आंध्र प्रदेशात महाराष्ट्राच्या बरोबरीने अवयव प्रत्यारोपणाला सुरुवात झाली असून आजच्या घडीला चेन्नईत मोठ्या प्रमाणावर अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र मात्र या काहीसा मागे पडला आहे,” असे आ. प्रा. फरांदे यांनी स्पष्ट केले.
“सागरी महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक वापर करून उत्पन्नवाढीवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच या जागांवर होर्डिंगची उभारणी, त्यावरील जाहिरात आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करावे,” असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री नितेश राणे यांनी बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिले.
सागरी महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न वाढीवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच या जागांवर होर्डिंगची उभारणी, त्यावरील जाहिरात आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिले.
जगाला नवा मार्ग दाखविण्याची क्षमता भारतामध्ये आहे. त्यासाठी वसाहतवादी वैचारिक वारसा सोडून भारतीय विचारांना बळकट करण्याची गरज आहे. त्यामध्ये ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची भूमिका महत्त्वाची ठरते,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंगळवार, दि. 22 एप्रिल रोजी केले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप) प्रायोजित आंतरराज्य छात्र जीवनदर्शनच्या (एसइआयएल) नव्या वास्तूचे ‘यशवंत’चे उद्घाटन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले
( Minister Nitin Gadkari on service-education sector ) “खेड्यातील अर्थव्यवस्था जोपर्यंत सुदृढ होत नाही, तोवर भारत आत्मनिर्भर किंवा विश्वगुरू होऊ शकत नाही. त्यासाठी समाजकारण, सेवा-शिक्षण या क्षेत्रात काम करणे ही खरी आजची आवश्यकता आहे. तसे झाल्यास भारत विश्वगुरू म्हणून नावारुपास येईल,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
( Farmers become fuel providers in the future Union Minister Nitin Gadkari ) आपल्या देशात प्रदूषणाची मोठी समस्या आहे. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने जैविक इंधन तयार करण्याचा प्रकल्प पानिपत येथे सुरू केला आहे. जैविक इंधनाचे 400 प्रकल्प सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यातील 60 प्रकल्प सध्या सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही, तर ऊर्जा दाता, हवाई इंधन दाताच नव्हे, तर बिटुमेन दाताही होणार आहे. त्यामुळे येणार्या काळात आपण ऊर्जा आयात करणारे नाही, तर निर्यात करणारा
Nitish Kumar and Mamata Banerjee वारंवार पक्षबदलाच्या भूमिका घेऊन मुख्यमंत्रिपदाची खुर्ची टिकवून ठेवणार्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना अखेरीस अशा दलबदलू राजकारणाने नुकसान आपलेच असल्याची उशिरा का होईना उपरती झाली, तर दुसरीकडे ब्रिटनच्या दौर्यावर असलेल्या ममता बॅनर्जींना तिथेही हिंसाचार, भ्रष्टाचार यांसारख्या मुद्द्यांवरुन बंगाली हिंदू समाजाच्या रोषाला सामोेरे जावे लागले. तेव्हा, दोन नेत्यांच्या या दोन वेगळ्या तर्हांचे वर्तमानातील प्रतिबिंब टिपणारा हा लेख...
( Fishing will be given the status like agriculture Minister Nitesh Rane ) मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि. २४ मार्च रोजी विधानपरिषदेत दिली.
( Minister Nitesh Rane on pilot project of eco-friendly water taxi in Mumbai ) मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबविणार राबवून ही सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांना बैठकी दरम्यान केल्या.
स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणार
गेटवे ऑफ इंडिया येथील पाच नंबर जेट्टीवरील वाहतूक सुरळीत होण्याच्यादृष्टीने मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान स्पीड बोट चालविण्यासाठी इच्छुक मालकांनी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात ४९ बोटींना परवानगी देण्यात आली आहे.
Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत.
( Special Economic Zone for Fisheries Development Nitesh Rane ) राज्याला ७२० किलोमीटर सागरी किनारा लाभला आहे. सागरी किनाऱ्यालगतच्या पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय विकासासाठी एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण करण्यासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. १८ मार्च रोजी पहिले सादरीकरण करण्यात आले.
‘भारतमाला’ प्रकल्पाचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, भारताच्या विकासात या प्रकल्पाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गेल्या दहा वर्षांत म्हणूनच केंद्र सरकारने देशभरात रस्ते उभारणीवर भर दिलेला दिसून येतो. त्याची गोमटी फळे येणार्या काळात सर्व भारतीयांना मिळतील.
५० लोकांची क्षमता असलेले ॲॅम्पीथिएटर, बर्थिग जेट्टी, अप्रोज जेट्टी सोयीसुविधांसह जेटी असणार आहे. रेडिओ क्लब येथील प्रवासी जेटी टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवार, दि.१४ रोजी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शनिवार, ८ मार्च रोजी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
Nitesh Rane “राज्यातील विशेषतः मुंबई शहराला लागून असलेल्या समुद्र किनार्यावरील जागेचा जाहिराती, करमणूक आणि चित्रीकरणासाठी व्यावसायिकांनी उपयोग करून शासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात,” असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी दिले.
वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून देशाला महासत्ता बनण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे वाढवण बंदर प्रकल्प असल्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता ही नजीकच्या भविष्यात मानवी जीवनाची एका अर्थाने वाहक शक्ती ठरणार आहे. त्याच्या सर्वव्यापी क्षमतेची चुणूक वर्तमानात अनेक क्षेत्रांत स्पष्ट दिसत आहे. औद्योगिक क्षेत्रापासून ते शासकीय सेवांपर्यंत तिचा प्रभाव व्यापक राहणार आहे. अशा वेळी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेत प्रगतिशील पाऊले उचलली आहेत. प्रत्येक विभागाला ‘एआय’ तंत्रज्ञान अंगीकारण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने अनेक विभागांनी नियोजन सुरू केले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या अखत्यारीतील मत्स्यव्यवसा
मच्छिमार संस्थांच्या सभासद संख्येनुसार तलाव क्षेत्र ठरवणारे धोरण तयार करा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी दिल्या.
२०२४च्या लोकसभा निवडणूक निकालाच्या कामगिरीतून धडे घेत भारतीय जनता पक्षाने आपल्या रणनीतीमध्ये आमूलाग्र बदल केले. परिणामी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ते राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपची कामगिरी चमकदार ठरली. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीतही लालू आणि काँग्रेसवर भाजप कुरघोडी करून विजयी होईल, हे निश्चित.
कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच, असे म्हणतात. महाराष्ट्र काँग्रेसची गत त्याहून निराळी नाही. विधानसभेच्या निकालानंतर अस्थिपंजर झालेल्या पक्षाला आधार देण्याऐवजी, वरिष्ठ नेत्यांना एकमेकांच्या पायात पाय घालण्यात अधिक रस. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, नितीन राऊत अशी अनेक नावे त्यात घेता येतील. ‘एकाला झाकावा, दुसर्याला काढावा’ इतके यांचे पराक्रम महाभयंकर. बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाल्याचा आनंद जितका सत्ताधार्यांना झाला नसेल, त्याहून अधिक आनंद स्वपक्षीयांनी साजरा केला. बरे,
मराठी बिग बॉस फेम अंकिता वालावलकर आणि लोकप्रिय मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगत यांचा विवाहसोहळा कुडाळ येथे १६ फेब्रुवारी रोजी थाटामाटात पार पडला. गेल्या काही महिन्यांपासून ‘कोकण हार्टेड गर्ल’च्या लग्नाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. तिच्या या खास सोहळ्याला राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Nitesh Rane नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे असलेल्या ‘जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूट’ या मदरशामध्ये येमेनमधील नागरिकाचे बेकायदेशीर वास्तव्य होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा वैध व्हिजा नव्हता. मात्र, त्याचे भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, बँक खाते अशा प्रकारचे महत्वाचे दस्तऐवज बनवून त्याला मदरशामध्ये आश्रय देण्यात आला होता. दि. ११ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. राज्यभरातील मदरशांमध्ये असे प्रकार सुरू असल्याचा ठोस संशय व्यक्त करून मंत्री नितेश राणे यांनी
विक्रोळी आणि ट्रॉम्बे भागातील कोळी बांधवांनी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन ट्रॉम्बे जेट्टी विकसित करण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी ट्रॉम्बे येथील मच्छीमार जेट्टीची पाहणी करून विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय उपयुक्त शर्वरी रणदिवे यांच्यासह विभागाचे अधिकारी आणि सागरी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
‘अॅडव्हांटेज विदर्भ’ महोत्सवामुळे विदर्भ उद्योगाच्या केंद्रस्थानी येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी व्यक्त केला.
मराठी चित्रपटसृष्टीवरही अलीकडच्या काळात मुख्य प्रवाहातील थरारपटांचा प्रभाव दिसू लागला आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये विविध प्रयोग होत असतानाच, नितीन कांबळे दिग्दर्शित ‘जिलबी’ हा ‘सस्पेन्स-थ्रिलर’ ( Jilbi Marathi Film ) दि. १७ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रारंभी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केलीही होती. परंतु, प्रत्यक्ष चित्रपट मात्र प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात काहीसा अपयशी ठरला आहे. चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे, पर्ण पेठे आणि गणेश
मालेगावमध्ये बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. मालेगाव येथील तत्कालिन तहसीलदार आणि नायब तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
घुसखोरांना आसरा देणाऱ्यांना आसरा मिळणार नाही, अशा थेट इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिला. मालेगावमधील तहसीलदार नितीन देवरे आणि नायब तहसीलदार संदीप धरणाकर यांच्या निलंबनाच्या कारवाईवर त्यांनी 'X' अकाऊंटवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली.
Nitish Kumar यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाने मणिपूरातील एन बीरेन सिंग यांच्या नेतृत्वात मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यांचे एकमेव आमदार आता विरोधकांच्या पंक्तीत बसतील. या प्रकरणाचा कोणताही एक मणिपूर सरकारच्या विकासावर एक परिणाम होणार नाही. मात्र बिहारमध्ये जेडीयू हा केंद्र आणि मणिपूर सरकारसाठी फायदेशीर असणारा पक्ष आहे
देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्याअनुषंगाने स्थानिकांना रोजगार मिळावा याहेतूने राज्यभरात 'जिल्हा तिथे मत्स्यालय' हा अभिनव उपक्रम राज्याच्या मत्स्यविभागामार्फत हाती घेण्यात येणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी दै. मुंबई तरुण भारतला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. या मत्स्यालयाच्या उभारणीसाठी विभागामार्फत मुंबई उपनगरे आणि पुण्यातही जागांचा शोध सुरू झाला आहे.
मुंबईतील समुद्रात चीन देशाच्या माल वाहतूक जहाजाने धडक दिल्याने नुकसान झालेल्या नौका मालकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ लक्ष ५५ हजार रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
रेडिओ क्लब जेट्टीसाठी भाऊच्या धक्क्याचा पर्याय
(Nitin Gadkari) रस्ते अपघातामधील अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात नेणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारकडून ५ हजार रुपये बक्षीस स्वरुपात मिळायचे. परंतु आता बक्षिसाची रक्कम वाढवून २५ हजार रुपये करणार येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. रस्ता सुरक्षेच्या मुद्द्यावर अभिनेते अनुपम खेर यांच्या मुलाखतीदरम्यान नितीन गडकरी म्हणाले की, त्यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाला पुरस्काराची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वच विभागांनी राज्याच्या विकासासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम सादर केला. यावेळी राज्याच्या मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाने सागरी किनारपट्टी सुरक्षेसह किनारपट्टी आणि मत्स्य व्यवसायाचा विकास हे धोरण स्वीकारले. या धोरणाबाबत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला संवाद.
(Nitin Gadkari) केंद्र सरकार रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना कॅशलेस उपचार देणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा केली आहे.
दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा कर्जत येथील एन.डी. स्टुडिओ महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी ताब्यात घेतला असून नुकतेच 'फिल्मसिटी'तर्फे अनोख्या फॅम टूरचे आयोजन करण्यात आले होते. फॅम टूरमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. यात कला दिग्दर्शक, सिने-निर्माते, निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी आणि टूर ऑपरेटर अशा मंडळींचा सहभाग होता. यावेळी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाचंदेखील आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान एन.डी. स्टुडि
मुंबई महानगर क्षेत्रात 'केबल कार' प्रकल्प राबविण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. येत्या ७ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे 'विकसित भारत २०४७' या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या लक्षप्राप्तीच्या दृष्टीने नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक होणार आहे.
मुंबई : सिंधुदुर्गातील किमान ५० ते ६० टक्के जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा ठोकला आहे. सिंधुदुर्गातील एका सभेमध्ये नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी हा दावा केला. वक्फ बोर्डाच्या कायद्याअंतर्गत कोणकोणत्या जमिनींवर ताबा करण्यात आला आहे हे तपासणीदरम्यान अनेक देवस्थानांवरदेखील वक्फ बोर्डाचा दावा असल्याचे सांगण्यात आले. नितेश राणे यांनी आपल्या भाषणादरम्यान हा मुद्दा मांडला.
मुंबई : ससून डॉकमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक काम करणा-या व्यक्तीकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तसेच ससून डॉक परिसरातील पायाभूत सुविधांची कामे विहीत कालावधीत करावेत असे निर्देश ससून डॉक येथे पाहणी करताना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी दिले.
(NDA) जनता दल युनायटेड (जदयु) राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबतच (रालोआ) आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री राजीव रंजन उपाख्य ललन सिंह यांनी गुरूवारी दिले आहे.
मुंबई : जे आमचे आहे, ते आम्हाला मिळालेच पाहिजे, अशी भावना मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी व्यक्त केली. रविवार, दि. २९ डिसेंबर रोजी बालाजी मंदिर वरळी येथे आयोजित आरंभ गर्जना सोहळा धार्मिक विधीला ते उपस्थित होते.