(Earthquake in Delhi NCR) देशाची राजधानी दिल्ली येथे सोमवारी सकाळी ५ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीतीलच धौलाकुवा भाग होता. यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) सोमवारी सकाळी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील धौलाकुवा हा भागातील दुर्गाबाई देशमुख कॉलेज ऑफ स्पेशल एजुकेशनच्या जवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि भूकंपाची तीव्रता ही ४.० रिश्टर स्केल एवढी होत
Read More
नवी दिल्ली : दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) शुक्रवारी धुक्याची दाट चादर ( Fog in Delhi ) पसरली होती. यामुळे दृश्यमानतेवर परिणाम होऊन रेल्वे आणि विमानसेवांवर परिणाम झाला.
देशातील टॉप १०० रिअल इस्टेट कंपन्यांच्या मूल्यांकनात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले आहे. रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये तब्बल ७० टक्के वाढ झाली असून दिल्ली लँड अँड फायनान्स(डीएलएफ) पहिल्या स्थानावर आहे. देशातील पहिल्या १०० रिअल इस्टेट कंपन्यांचे एकूण मूल्यांकन १४.२ लाख कोटी रुपये इतके झाले आहे.
देशाची राजधानी दिल्ली येथे देशातील आजपर्यंतच्या सर्वाधिक ५२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील मुंगेशपूर येथील हवामान केंद्रात दुपारी 2.30 वाजता 52.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवार हा देशातील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस ठरला.
दिल्लीतील विवेक विहार भागातील बाल संगोपन केंद्रात लागलेल्या आगीमुळे नवजात बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटल मालक व डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. मालक डॉ. नवीन खिंची यांना दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानी परिसरातून अटक केली आहे. तसेच, २५ वर्षीय डॉ. आकाश यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना मदरशांमध्ये शिकणाऱ्या हिंदू मुलांसह गैर-मुस्लिम मुलांची ओळख पटवण्याच्या निर्देशाचे पालन करण्यात विलंब केल्याबद्दल समन्स बजावण्यात आला आहे.
गुन्हेगारीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे चुकीचे चित्र विरोधकांनी रंगवण्याचा प्रयत्न केला. परंतु, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हे सर्वात सुरक्षित राज्य असल्याचे ठाम मत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोजी विधानसभेत व्यक्त केले.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागामार्फत (एनसीआरबी) दरवर्षी गुन्हेगारी संदर्भात देशपातळीवरचा वार्षिक अहवाल जाहीर केला जातो. यंदा या अहवालात पुणे शहराविषयी मात्र एक चांगली बातमी आहे. पुणे हे लोकसंख्येच्या तुलनेत दखलपात्र गुन्ह्याच्या प्रमाणानुसार देशात क्रमांक दोनचे सुरक्षित शहर ठरले आहे.
राजस्थान मध्ये गेल्या १ वर्षात महिलांविरुद्ध ४५०० अपराधाची नोंद झाली आहे. तर एकूण ३.१२ लाख गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या आकडेवारीनुसार बलात्काराच्या बाबतीत राजस्थान देशातील पहिल्या क्रमांकाच राज्य बनलंय. एनसीआरबी दरवर्षी देशात घडणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर करते. अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला होता. निवडणूक प्रचारात हा मुद्दा भाजपने मोठ्या प्रमाणात उचलून धरला होता.
राजधानी दिल्ली मागील काही दिवसांपासून गॅस चेंबर बनली आहे. दिल्लीकर धुळीने आणि धुक्याने त्रस्त झाले असून तिकडे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र प्रचारात व्यस्त दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी २०’ शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्लीचे रूपडे पालटून टाकले.
दिल्ली एनसीआरच्या रस्त्यावर कारमधून स्टंट करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान गाझियाबादमध्येही काही तरुण चालत्या कारच्या गेटवर उभे राहून रील काढत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व तरुण वाढदिवसाची पार्टी साजरी करून परतत होते.
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ५.४ रिश्टर स्केल एवढी होती. दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआर, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि चंदीगडसह अनेक ठिकाणी हे धक्के जाणवले. त्याचप्रमाणे पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर आणि आसपासच्या भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. ईएमएससीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्हा होता.
महाराष्ट्रासह कर्नाटकात येत्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस मेघगर्जनेसह होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांसह केरळ आणि तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.हवामान खात्यानुसार, पुढील काही दिवस दिल्ली-‘एनसीआर’मध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. मात्र, पावसाची फारशी शक्यता नाही. तापमानात हळूहळू वाढ होईल. शहरातील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस शनिवारी नोंदवले गेले आहे.
मोदी सरकारचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे एकविसाव्या शतकातील पहिले शैक्षणिक धोरण आहे आणि आपल्या देशाच्या वाढत्या विकासात्मक गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. भारताच्या परंपरा आणि मूल्यप्रणालींवर उभारणी करताना ‘एसडीजी ४’ सह, एकविसाव्या शतकातील शिक्षणाच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांशी संरेखित एक नवीन प्रणाली तयार करण्यासाठी, नियमन आणि प्रशासनासह शैक्षणिक संरचनेच्या सर्व पैलूंमध्ये सुधारणा करण्याचा नवीन शिक्षण धोरणाचा प्रयत्न आहे.
एरवी ‘पधारो म्हारे देश’ म्हणत जगभरातील पर्यटकांचे आतिथ्य करणार्या राजस्थानमध्ये २०२१ साली सर्वाधिक महिला अत्याचाराच्या घटना घडल्याचे ‘एनसीआरबी’च्या अहवालात नुकतेच उघड झाले. त्यामुळे काँग्रेसशासित आणि अशोक गेहलोत मुख्यमंत्री असलेल्या या राज्याच्या जनतेवरच ‘न पधारो मारे देस’ म्हणण्याची दुर्दैवी वेळ ओढवली आहे.
सत्याग्रहाचा बुरखा पांघरून शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेल्या या तमाशाची सर्वोच्च न्यायालयाने केलेली कानउघडणी स्वागतार्हच! कारण, केवळ संख्याबळ आणि अर्थबळाच्या जोरावर गेल्या दहा महिन्यांपासून दिल्लीकरांना अशाप्रकारे महामार्ग अडवून वेठीस धरण्याचा हा सत्याग्रह नव्हे, तर सर्वस्वी मन:स्ताप देणारा दुराग्रहच!
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीनुसार, महिलांवरील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे ती राजस्थानमध्ये. त्याच राजस्थानमध्ये जिथे आज अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता आहे आणि मुख्यमंत्री महोदयच खुद्द गृहमंत्री म्हणून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसाठी जबाबदारही आहेत. ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी राजस्थानमध्ये देशातील सर्वाधिक म्हणजे ५,३१० बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या.
दिल्लीतील एनसीआर येथे रविवारी सायंकाळी भूकंपाचे हादरे जाणवले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण पाच सेकंद हे धक्के जाणवले. हादरे जाणवल्यावर अनेकजण घराबाहेर पडले. दिल्लीसह नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आदी भागातही हे हादरे जाणवले होते. दरम्यान, कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे कुणालाही घराबाहेर फिरकू न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, मात्र, अशातच हे धक्के जाणवल्याने काही भागांत एकच गोंधळ उडाला होता.
प्रजासत्ताकदिनी मोठ्या घातपाताची शक्यता
उत्तर भारतात जाणवले भूकंपाचे हादरे
दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये मंगळवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र लाहोरपासून १७३ किमी अंतरावर होते.
नवी दिल्लीत अनेकांनी घराच्या बाहेर धाव घेतली, तर जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे देखील नागरिकांनी घराबाहेर त्वरित धाव घेतली आहे.