शुक्रवारी मॅक्वेरी अहवालात खळबळजनक दावा करण्यात आला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या काही दिवसांत 'मिशन फिनटेक ऑपरेशन' सुरू केले आहे. पेटीएम पेमेंट बँकेवरील कारवाईनंतर सगळ्या फिनटेक (फायनांशियल टेक्नॉलॉजी) कंपन्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. पेटीएमने आपल्या जाहीरनाम्यात आपल्याला व्यापारी, जनतेचा पाठिंबा असल्याचा जाहीरनाम्यात दावा केला होता. किंबहुना गेले काही दिवस पेटीएम पेमेंट बँक वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. पेटीएम संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी आरबीआय अधिकारांच्या व अर्थमंत्री निर्मला सीतारा
Read More
द रिझर्व्ह बँक (आरबीआय)ने सर्व पेमेंट कार्ड नेटवर्कला कंपनीच्या नावाशिवाय पैशाची देवाणघेवाण (ट्रान्स्फर) करण्यास मनाई केली आहे. म्हणजेच बिझनेस टू बिझनेस (बी टू बी) साठी व्यवसायिक विनाओळख पैसे यापुढे पाठवू शकत नाही.आरबीआयच्या माहितीनुसार काही आर्थिक संस्था तिसऱ्या संस्थेकडून पैशांची ' सेटलमेंट ' करत असल्याचे आरबीआयच्या निरिक्षणात आले होते. यामुळे आरबीआयच्या पैसे व्यवहार व ओळखपत्र नियमाचे उलंघन होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
विकसनशील देश अशीच ओळख असणारा भारत आता विकासाच्या विविध आयामांकडे वेगाने मार्गक्रमण करत आहे. मात्र, देशाच्या सर्वांगीण विकासाचा राजमार्ग असलेला आर्थिक विकासदेखील त्याच गतीने होणे आवश्यक असते. याही बाबतीत भारत वेगाने पुढे सरकत असल्याचे दिसून येते. नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा न्यूयॉर्क दौरा संपन्न झाला.
केंद्र सरकार अमेरिकेला एक झटका देण्याच्या तयारीत आहे. मंगळवारी स्थानिक स्तरावरील डाटा स्टोरेजशी निगडीत नियमावलीं संदर्भात परदेशी कंपन्यांना असलेल्या समस्यांवर विचार केला जाऊ शकतो.
सोशल मीडियावरील लोकप्रिय अॅप अशी ओळख असलेल्या फेसबुकने आभासी चलन 'लिब्रा'ची घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात हे चलन बाजारात आणले जाणार आहे. ही घोषणा केल्यानंतर बिटकॉईन किंवा इतर आभासी चलनांसारखे कमी अधिक मुल्य असणारे हे चलन नसेल, असेही अधोरेखित केले आहे. जगभरातील फेसबुक युझर्स यापूर्वीच गोपनियतेच्या मुद्द्यावरून चिंतेत आहेत. त्यानंतर फेसबुकतर्फे यासाठी उपाययोजनाही आणण्यात आल्या होत्या. आता आभासी चलनामुळे फेसबुककडे पुन्हा एकदा त्याच नजरेने पाहीले जाऊ शकते, त्यामुळे फेसबुकतर्फे आधीच हे स्पष्टीकरण देण्यात आले आ