पहलगाम हल्ल्या नंतर भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना जबरदस्त उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण केले. दि. ७ मे रोजी रात्री १ वाजून ४ मिनिटांनी ते दीड वाजताच्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले. भारतीय दलांनी पाकिस्तानमध्ये बहावलपूर आणि मुरीदके येथे हल्ले केले आणि जैश आणि लष्करचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. कित्येक वर्षांपासून या दोन्ही दहशतवादी संघटना सातत्याने भारताविरोधात कारवाया करत आहेत. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद प्रमूख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर जो जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल प्रमुख आणि आयसी-८१४ अपहरणाचा मास्टरमाइ
Read More
दहशतवादावर दुटप्पी भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानला भारताने चांगलेच खडे बोल सुनावले आहे. शुक्रवार दिनांक ७ डिसेंबर रोजी भारताने पाकिस्तानला कुख्यात दहशतवादी मसूद अझहर याच्याविरोधात कारवाई करण्यास सांगितले आहे. बहवालपुर येथील एका सभेत अझहरने भाषण केल्याची बातमी नुकतीच समोर आली. याच पार्श्र्वभूमीवर पाकिस्तानच्या दु्प्पटी वागण्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
पाकिस्तानातील कराचीमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले आहे. मौलाना तारिक रहिमुल्ला तारिक असे मृत दहशतवाद्याचे नाव असून तो जैशचा संस्थापक मसूद अझहरच्या जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
दहशतवादावर चीनचा नवा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्तावाला चीनने आडकाठी आणली आहे. भारत आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. चीनने यापूर्वी साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्तावही रोखला आहे.
तालिबानी जिहादींनी अमेरिकेची अवस्था शेपटी तुटलेल्या कोल्ह्यासारखी केली, असे जहाल वक्तव्य केलेल्या जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला पाकिस्तानने बहावलपूर येथून रावळपिंडीला हलवले आहे. अमेरिकेच्या विरोधात केलेले हे वक्तव्य अंगलट येण्याची शक्यता असल्यानेच त्याच्या सुरक्षेसाठी ही काळजी घेण्यात आली, असा निष्कर्ष यातून काढण्यात येत आहे.
मोस्ट वाँटेड दहशतवादी मौलाना मसूद अझहर पाकिस्तानमध्ये सर्वोच्च सुरक्षा व्यवस्थेमध्ये एका बॉम्बप्रूफ घरामध्ये सुरक्षित असल्याची भारतीय गुप्तचर यंत्रणांची पुष्टी
संयुक्त राष्ट्रात 'आंतरराष्ट्रीय दहशतवादी' म्हणून घोषित केलेल्या मसूद अझहरची पाकिस्तानने कैदेतून सुटका केली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थाननजीक सीमावर्ती भागातील सैनिकांना दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारताविरोधात एका मोठ्या षड्यंत्राची तयारी पाकिस्तान करत असून यासाठीच मसूद अझहरची सुटका करण्यात आल्याचे म्हटले आहे. ही माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पाकिस्तानने मसूद अझहरला सोडण्याची, फवाद चौधरीच्या कबुलीनाम्याच्या व्हायरल होण्याची वेळही मोठी विचित्र आहे. येत्या महिन्याभरात 'फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स'ची (एपीजी विभाग) बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. तसे झाले तर आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला बसलेला तो मोठा दणका असेल.
मसूद अझहरप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
आता फक्त मसूदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ ठरवण्याचे पडसाद नेमके कसे उमटतात व मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर भारत त्याला पाकिस्तानात घुसून ठोकतो का, एवढेच पाहायचे!
जैशचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्यासाठी पुलवामा येथील भीषण आत्मघाती हल्लाच कारणीभूत ठरला,” अशी प्रतिक्रिया भारत सरकारने आज गुरुवारी दिली. “मसूदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्यासाठी आम्हीच पुढाकार घेतला,” असा दावा आता पाकिस्तान करीत आहे, पण, “ही घडामोड पाकिस्तानला मोठा हादरा देणारी ठरली असून, आपला राजनयिक पराभव लपविण्यासाठीच हा देश अशा प्रकारचा दावा करीत आहे,” असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
पाकिस्तानी दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी सैय्यद अकबरूद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मसूद अजहरचे नाव आता आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत जोडले गेलेले आहे.
३० वर्षांपूर्वी सोव्हियत युनियन खंडित झाल्यावर जागतिक राजकारणातील एक ध्रुव कोसळला व सारे राजकारण अमेरिकेभोवती फिरू लागले. जगावर अमेरिकेचा एकछत्री अंमल प्रस्थापित झाला होता. तो आता कमी होत असून जगात पुन्हा एकदा दोन महाशक्ती तयार होत असल्याचे दिसत आहे. सोव्हियत युनियनजवळ जी ताकद होती, ती रशियाजवळ नव्हती. रशिया आपल्या अंतर्गत आर्थिक संकटात सापडला होता.
पुलवामा हल्ल्यानंतर जैशच्या मुसक्या आवळण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तब्बल ४३ दिवसांनी पाक सरकार आंतरराष्ट्रीय माध्यमाचे सदस्य आणि परदेशी पत्रकारांना बालकोट भागात घेऊन गेले. मात्र पत्रकारांसोबत यावेळी पाकिस्तान लष्कराचे सैन्यही त्यांच्यासोबत होते. ज्या वेळेला यावेळी सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलेल्या प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पाक सैन्याने केला आहे.
आपण जर चिनी निर्यातीवर ‘डम्पिंग ड्युटी’ किंवा कर लावले तर नुकसान हे चीनचे होणार आहे, आपले फारच कमी! मात्र, काही वस्तूंची किंमत वाढू शकते. त्याकरिता भारतीयांनी तयार राहायला पाहिजे. कारण, चीनला जर धडा शिकवायचा असेल, तर या दीर्घ लढाईकरिता आपण तयार झाले पाहिजे, तरच चीनला वठणीवर आणता येईल.
दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताने आणखी एक विजय मिळवला आहे. त्यामुळे चीनच्या मदतीने मसूद अजहरला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच दणका मिळाला आहे. दीर्घ कालावधीनंतर भारताला दहशतवाद्यांना पुरवल्या जाणारी आर्थिक रसद रोखण्यासाठीचा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्रात मांडला आहे. यावरून भारताने पाकिस्तानला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
संयुक्त राष्ट्रात मसूद अझहरला दहशतवादी ठरविण्यात खोडा घालणार्या चीनला अमेरिकेने दणका देत बुधवारी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव ठेवला. फ्रान्सनेही याला संमती दर्शवल्याने आता पाकिस्तानसह चीनसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न करणार्या चीनसमोर आता अमेरिकेचे आव्हान निर्माण झाले आहे.
चीनची अर्थव्यवस्था प्रामुख्याने निर्यातीवर अवलंबून आहे. प्रचंड अनुदानांच्या माध्यमातून चीनने जगभरातील बाजारपेठांवर आपली हुकूमत प्रस्थापित केली. चीनच्या या कृतीने मात्र जगातील अन्यत्रच्या उत्पादन क्षेत्राला मोठा तोटा झाला, ज्याचा प्रभाव भारतीय उद्योग-व्यवसायांवरही पडला.
इतर मित्र देशांचा वापर करून चीनविरोधात नवी आघाडी उघडली पाहिजे. गरजेच्या वेळी चीन जसा पाकिस्तानच्या मदतीला धावून येतो तसेच दक्षिण पूर्व आशियातील देश म्हणजे व्हिएतनाम, इंडोनेशिया या देशांचा वापर चीनविरोधात आघाडी तयार करण्यासाठी केला पाहिजे.
एकटा पाकिस्तानच नाही, तर भारताचा दुसरा मोठा शेजारी चीनच्याही कुरापती दुर्लक्षित करण्यासारखा नाहीत. २०१७ सालीही डोकलामवरून भारत-चीन एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पण, अखेरीस ड्रॅगनच्या गुरगुरण्याला सिंह भीकच घालत नाही म्हटल्यावर ड्रॅगननेही शेपूट घातली. त्यावेळीही भारतात चिनी उत्पादनांवर बंदी घालण्याच्या मागणीने एकाएकी जोर धरला होता. पण, तेव्हाही केवळ सोशल मीडियावरील बंदीच्या चर्चांच्या पलीकडे हाती काहीच आले नाही.
भारताला शह देण्यासाठी प्यादे म्हणून पाकिस्तानचा वापर करण्याची चीनची भूमिका आहे. भारताचे अर्धे सैन्य काश्मीर खोरे-पाक सीमेवर अडकून पडावे, असे चीनला वाटते. त्यामुळे चीन कधीही भारत-पाक यांच्यात सलोखा निर्माण होऊ देणार नाही. भारत आपल्या समस्यांमध्ये अडकून राहावा, असे चीनला वाटत आले आहे. सीमेवर पाकिस्तानचा दहशतवाद आणि सीमेच्या आत नक्षलवाद ही चीनची दुहेरी योजना आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधींना करून दिली आठवण
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासंबंधितील संयुक्त राष्ट्रात अखेर फेटाळण्यात आला. फ्रान्सने याबाबतचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात आणला होता मात्र, चीनने आपल्या व्हिटोचा वापर करत हा प्रस्ताव फेटाळत पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे मदत केली.
'दहशतवादाविरोधात पाकने कठोर पावले उचलावीत. जोपर्यंत पाकिस्तानदहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाणार नाही',
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार पाकच्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकार दर्शवला आहे. गेल्या दहा वर्षातील हा चौथा प्रस्ताव चीनने अमान्य केला आहे.
“अमेरिकेने ज्याप्रमाणे ओसामा बिन लादेनचा खात्मा केला, तसेच मसूद अझहरलाही आम्ही घरात घुसून मारू,” असा संकेत जेटली यांनी दिला होता. चीनच्या नकाराधिकाराने भारताला आता हाच इशारा प्रत्यक्षात उतरविण्याची संधी मिळाल्याचे त्यामुळेच वाटते. आता भारत या संधीचे सोने कसे, कधी करतो, तेच पाहायचे. तसेही मोदींच्या परराष्ट्रधोरणामुळे आज जग भारताच्याबरोबरच आहे. होऊन जाऊ द्या!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही द्वेषाची विचारधारा असून काँग्रेसची विचारधारा ही प्रेमाची विचारधारा असल्याची भूमिका काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात मांडली. याआधीही गेली अनेक वर्षं राहुल गांधी याप्रकारची भूमिका सातत्याने मांडत आहेत.
रविवारी पाकिस्तानी माध्यमांमध्ये मसूद अझहरच्या मृत्यूची बातमी देण्यात अली परंतु आता ती अफवाच असल्याचे पाकीस्तानी माध्यमे करत आहे.
मौलाना मसूद अजहरचा मृत्यू झाला असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मौलाना मसूद अजहर हा भारताचा मोठा शत्रू आहे.
भारतने पुरावे दिल्यास कारवाई करू पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशींचे वक्तव्य
मसूद अझहर सध्या आजारी असून घराबाहेर पडणंही त्याला शक्य होत नसल्याची माहिती शाह मेहमूद कुरेशी यांनी दिलेली आहे. आता मसूद अझहर आजारी आहे, असा शोकसंदेश देणारे शाह मेहमूद कुरेशी हे मसूद अझहरचे सचिवही नाहीत की प्रवक्तेही नाहीत तर ते आहेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री.
सुरुवात होण्याआधीच संपण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू करण्याचा काहींचा स्वभाव असतो. काहीही चांगलं करणं बहुधा या मंडळींना जमतच नसावं.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव
भारताविरोधात पाकिस्तान, श्रीलंका वा बांगलादेशने आघाडी उघडली तर काय? असा प्रश्न एकदा एका मुलाखतकर्त्यांना के. सुंदर यांना विचारला, तेव्हा सुंदर यांनी दिलेले उत्तर आताही लागू पडेल असेच आहे.
पुलवामा हल्ल्याबाबत भारताकडे पुरावे मागणाऱ्या इमरान खान यांना पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मसूद अझहरच्या, “बाबरी मशीद आम्हाला बोलावतेय,” या वक्तव्यामुळे देशातल्या अजून एका मोठ्या गटाला उकळ्या फुटल्या आहेत. हा गट म्हणजेच छद्मपुरोगाम्यांचा. बाबरी मशीद पाडल्यामुळे भारतात बॉम्बस्फोटांची मालिका घडली, असा एक विचित्र दावा पेश करणारे विचारवंत ल्युटन्ट दिल्लीत आजही शिल्लक आहेत. पण, सर्वसामान्य माणसाचा बुद्धीभेद करणार्या या दाव्याला कुठलाही आधार नाही.