मराठी आणि हिंदी रंगभूमी, चित्रपट तसेच मालिकांमधील आपल्या बहुआयामी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशोक सराफ यांना अखेर राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या या सन्मानाने केवळ सराफ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानाची आणि आनंदाची भावना अनुभवायला मिळाली आहे.
Read More
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केलं, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी कुणाल कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याला चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलं आहे. मात्र, अद्याप त्याने हजेरी लावलेली नाही. या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी स्टँडअप कॉमेडी आणि या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून औरंगजेबाच्या इतिहासावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. संभाजी महाराजांना औरंगजेबाने दिलेल्या अत्याचारांचे चित्रण या चित्रपटात दाखवण्यात आले असून, यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वादंग सुरू असताना अभिनेता किरण माने यांनी एक ठाम भूमिका घेतली आहे. किरण माने यांनी एका पोस्टमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीचे आरोप करणाऱ्यांच्या स्मारकांबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मैत्री, प्रेम, कुटुंब या विषयांवर आजवर बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत; मात्र राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित 'अशी ही जमवा जमवी' या चित्रपटात फक्त तरुणांचीच नाही तर वृद्ध मित्र मैत्रिणींचीसुद्धा एक धमाकेदार कहाणी आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे. या दमदार आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाचं टिझर प्रदर्शित झालंय, ज्यात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोन दिग्गजांची मजेदार जुगलबंदी पहायला मिळते. चित्रपटाचं नाव आणि रिलीझ झालेल्या टिझरवरून संपूर्ण सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची उत्
एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्
ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर, हिट मराठी कॉमेडी फ्रँचायझी तिसऱ्या भागासह परतली आहे.ये रे ये रे पैसा ३ अखेर येत आहे. यावेळी, निर्माते आणखी गोंधळ आणि मनोरंजनाचे आश्वासन देत आहेत. संजय जाधव हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर त्यांनी आणि अरविंद जगताप यांनी एकत्रितपणे पटकथा लिहिली आहे. तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, आनंद इंगळे, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, वनिता खरात, नागेश भोंसले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्स या चि
'छावा' चित्रपटात रायाजीची भूमिका साकारलेला मराठी अभिनेता संतोष जुवेकरने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत, "मी अक्षय खन्नाशी बोललो नव्हतो," असं म्हटलं होतं. त्यावरून त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. अखेर या विषयावर फोकस इंडियन या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने मनोगत व्यक्त केलं आहे.
कॉफीची नजाकत काही वेगळीच! मग ती कोल्ड असो वा हॉट! कॉफीच्या शौकिनांची संख्या कमी नाही. कॉफीचा खरपूस दरवळ जसा घरभर पसरतो, तसाच आता रंगभूमीवर कॉफीचा दरवळ पसरणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी ही 'फिल्टर कॉफी’ नाट्यरसिकांसाठी आणली आहे. अद्वैत आणि अश्वमी थिएटर्स प्रकाशित महेश वामन मांजरेकर सादर करीत असलेली ही तजेलदार कॉफी ६ एप्रिलला रंगभूमीवर येणार आहे. रितीशा प्रोडक्शन्स निर्मित महेश मांजरेकर लिखित दिग्दर्शित ‘फिल्टर कॉफी’ या नाटकांचे निर्माते दिलीप माधव जगताप असून सहनिर्माते राहुल भंडारे आहेत.
चित्रपट आणि प्रेमकथा हे आपलं आवडतं समीकरण. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला लवकरच अनुभवायला मिळणार आहे. राहुल शांताराम यांच्या "राजकमल एंटरटेनमेंट" द्वारे प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित, महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनीत नवा मराठी चित्रपट "अशी ही जमवा जमवी" लवकरच आपल्या भेटीला येत आहे. त्याची दमदार घोषणा काही काळापूर्वी झाली होती, आजच या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. नव्या दमाच्या तसंच अनुभवी कलाकारांचं मिश्रण असलेल्या या चित्रपटाचं लक्षवेधी पोस्
गरजवंतांचे तारणहार होत दैवी अनुभूती देण्याचं काम अनेक महान अध्यात्मिक गुरूंनी आजवर केलं आहे. ज्यांनी आपल्या जीवनात आयुष्यभर तपसाधनेत मग्न राहून तपचर्या केली आणि भक्तांची दुःखे निवारण केले असे सद्गुरू भालचंद्र महाराज ही देवत्व प्राप्त केलेली महान अनुभूती. त्यांच्या कृपेची प्रचिती आजही असंख्य भाविकांना येते. योगियांचे योगी, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमहंस भालचंद्र महाराज यांचा जीवनप्रवास आता मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. कणकवली मध्ये नुकत्याच भालचंद्र महाराज यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त, निर
मनोरंजनसृष्टीतील कलाकार हे जितके त्यांच्या अभिनयामुळे, त्यांच्या नवीन चित्रपटांमुळे, भूमिकांमुळे चर्चेत असतात, तितकेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. अभिनेता गश्मीर महाजनी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या विविध चित्रपटांतील भूमिकांमुळे चर्चेत आहे. ‘फुलवंती’मधील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यातून गश्मीर महाजनी व अमृता खानविलकर हे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या गाण्याने धुम
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. लैंगिक सुसंगतेवर भाष्य करणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील अभिनेता पृथ्वीक प्रताप लवकरच नव्या चित्रपटात झळकणार आहे. विनोदी आणि अतरंगी भूमिकांसाठी ओळखला जाणारा पृथ्वीक आता एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे लग्नानंतरचा हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे, त्यामुळे चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
देवमाणूस मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री अंकिता राऊत हे लवकरच साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘दर्याचं पाणी’ या कोकणी गीतात एकत्र दिसणार आहेत. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर दर्याचं पाणी या गाण्याचा प्रोमो शेअर केला आहे. अलिबागच्या नयनरम्य समुद्र किनारी या गाण्याचं चित्रीकरण झालं आहे. या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणे यांनी हे गाणं गायलं असून श्रद्धा दळवी हिने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्य
स्टँड-अप कॉमेडियन समय रैना याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोच्या अलीकडच्या एपिसोडमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला. या शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील प्रश्न विचारल्याने, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणावरुन सोमवार दि. १० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली.
महाराष्ट्राचा गौरवशाली 'शिवइतिहास' घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने आणि कर्त्या व्यक्तींच्या असामान्य कर्तृत्वाने. त्यात कर्त्या स्त्रियांचादेखील महत्त्वाचा सहभाग होता. अशाच स्त्रियांपैकी एक म्हणजे महाराणी ताराराणी. ‘स्वराज्याची वीरांगना, मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी’ असे ज्यांचे वर्णन केले गेले आहे, अशा महाराणी ताराराणींची गाथा आता मराठी रंगभूमीवर पहायला मिळणार आहे. आपल्या कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या रणरागिणी ताराराणी यांचा इतिहास भव्य नाट्यरूपाने उलगडण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ
‘हिरवं कुंकू’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते योगेश महाजन यांचे रविवार, दि. १९ जानेवारी रोजी गुजारतच्या उमरगाव येथे निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. ‘शिवशक्ति - तप, त्याग, तांडव’ या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी ते उमरगाव येथे गेले असताना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. शनिवारी सायंकाळी हिंदी मालिकेचे चित्रीकरण करत असतानाच महाजन यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि औषधे घेतल्यानंतर जवळच्या हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबले