(Pahalgam Terror Attack) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकार अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपर्यंत देश सोडून जाण्याचे आदेश दिले होते. या मुदतीचा काल शेवटचा दिवस होता. २३ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत ५३७ पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले आहेत. यामध्ये नऊ सनदी अधिका-यांचा समावेश आहे. याच चार दिवसांच्या काळात ८५० भारतीय नागरिक पाकिस्ता
Read More
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दि.२२ मार्च रोजी अटारी सीमेजवळील ड्रग्ज जप्तीची मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यात एकूण १०२ किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. हे हिरॉईन एप्रिल २०२२ मध्ये लिकोरिस रूट्स (मुलेठी) च्या मालामध्ये लपवून देशात तस्करी करण्यात आले होते, परंतु सीमेवर रोखण्यात आले होते.
भारत पाकिस्तान सीमेवरून अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात घुसखोरी करत असताना सुरक्षा रक्षकांनी एक व्यक्तीला ठार केले. गेट नंबर १०३ मधून हा इसम पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होता.
भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे अटारी बॉर्डरवर दाखल झाले आहेत. कोणत्याही क्षणी पाकिस्तान त्यांना भारताकडे सोपवेल.