काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या बेताल वक्तव्याने काँग्रेसची पाकिस्तानी मानसिकता पुन्हा उघड झाली आहे. ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे, असे ते म्हणाले. यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.
Read More
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कालच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बरीच फटकेबाजी केली. पण, त्यात प्रामुख्याने चर्चा रंगली ती त्यांच्या ‘नवीन चेहर्यांना संधी द्या’ या मागणीची आणि त्यांनी केलेल्या राजीनाम्याच्या सूतोवाचाची. नंतर आपण राजीनामा दिलेला नाही वगैरेही माध्यमांशी बोलताना त्यांनी सारवासारव केली खरी.
माजी मंत्री तथा कॉग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे तथा चिमूर काॅग्रेस समितीचे अध्यक्ष प्रशांत पिसे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
“राहुल गांधी हे सातत्याने लोकशाही प्रक्रिया आणि जनादेशाचा सातत्याने अपमान करतात. जनतेने त्यांना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार आहे,” अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, एकदा पराभव स्वीकारून आपण कुठे चुकतो आहोत, जनतेशी कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार केला, तर ते अधिक संयुक्तिक ठरेल,” असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिला. त्याचप्रमाणे, “बिहारसह आगामी विधानस
‘भारत निवडणूक आयोगा’ने काँग्रेस पक्षाला दि. 24 डिसेंबर 2024 रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून त्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. या अधिकृत पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका आणि आरोप मांडल्याने आयोगाने याबाबत खेद व्यक्त केला आहे.
‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु’च्या संघाने ‘आयपीएल’ स्पर्धेत मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा करताना एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला. याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने काँग्रेस सरकारला पत्र लिहून गर्दीच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि विधान सौधा येथे साजरा केल्या जाणार्या विजयाच्या उत्सवावर आक्षेप घेतल्याचे समोर आले आहे.
(US Congressman Brad Sherman Slams Pakistan Delegation) पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरअंतर्गत झालेल्या लष्करी कारवाईनंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवली. त्यानुसार या शिष्टमंडळांनी विविध देशांना भेटी दिल्या. दरम्यान, भारताच्या या निर्णयाचे अनुकरण करत पाकिस्ताननेही वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या खासदारांच्या शिष्टमंडळांना पाठवल्याचे पाहायला मिळाले.
घराणेशाहीच्या मस्तीत असलेला हा शहजादा जनतेची ताकत विसरला आहे, असा हल्लाबोल भाजपने राहुल गांधींवर केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीसंदर्भात लिहिलेल्या लेखानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.
काँग्रेस नेत्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग असलेले त्यांचेच आणखी एक नेते सलमान खुर्शीद यांच्यावर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड केल्याबद्दल आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चे समर्थन केल्याबद्दल नुकताच हल्ला चढवला. थरूर यांनी ज्याप्रमाणे अशा नेत्यांना त्यांचे नाव न घेता उत्तर दिले, त्याचप्रमाणे खुर्शीद यांनीही तेच केले. यासोबतच त्यांनी आपली वेदना व्यक्त करताना असा प्रश्नही विचारला की, “देशभक्त असणे इतके कठीण आहे का?” हा फक्त एक प्रश्नच नाही, तर एक वेदना असल्याचे दिसते. अर्थात, काँग्रेसमध्ये हे नवीन नाही. यापूर्वी गांध
माजी मंत्री तथा काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरुवार, ६ जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि त्याचे ९३ हजार सैनिक यांना भारताने पाकिस्तानला परत केले. त्याला ‘शरणागती’ म्हणतात. चिनी कम्युनिस्ट पार्टीबरोबर केलेला गुप्त समझोता, हे काँग्रेसच्या आणखी एका शरणागतीचे ताजे उदाहरण. त्यामुळे मोदींनी पाकिस्तानलाच नव्हे, तर अमेरिकेलाच शरणागती पत्करायला लावली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'नरेंदर - सरेंडर ' या विधानावर भाजप आता आक्रमक झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाच्या सरकारांनी इतिहासात शरणागती पत्करली आहे.
विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर मागे थेट हल्लाबोल केला. एवढेच नव्हे, तर तांबे यांनी थेट काँग्रेस नेत्यांनाही आव्हान दिले. "मी छातीठोकपणे सांगतो, राहुल गांधी काँग्रेस नेत्यांना भेटत नाही. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने अगदी प्रदेशाध्यक्षांसह एक तासाच्या आत वेळ घेऊन राहुल गांधींची भेट घेऊन दाखवावी. ते नाही तर फोनवर बोलून दाखवावे. राहुल गांधी कधीच भेटीसाठी उपलब्ध नसतात. पंजाबमध्ये ‘भारत जोडो’ यात्रा सुरू असताना मी संपर्क केला असता त
संसदेत जनहिताच्या अथवा राष्ट्रहिताच्या प्रश्नांबाबत विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारणे, हे आदर्श लोकशाहीचे लक्षण आहे. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर केलेले विधान जर दिशाभूल करणारे असेल, तर त्याचे पडसाद देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवरही उमटतात हे लक्षात घेणे आवश्यक ठरते. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी नुकतेच ‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भात केलेले विधान याचेच उदाहरण ठरावे. “एकीकडे पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी फिरत आहेत आणि दुसरीकडे आमचे खासदार परदेशात फिरत आहेत,” असे उपरोधिक म्हणत त्यांनी भारत सरका
(Colombia Withdraws Statement On Pak Casualties After India's Objections) भारत - पाकिस्तान संघर्ष सुरु असताना 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यातील मृतांविषयी कोलंबियाने संवेदना व्यक्त केल्या होत्या. मात्र कोलंबियाने आता यासंदर्भातील आपले विधान मागे घेतले आहे. शशी थरुर यांच्या नेतृत्वाखाली असणारे सर्वपक्षीय शिष्टमंडळ तेथे गेल्यानंतर कोलंबियाला उपरती झाल्याचे समजते आहे.
(Shashi Tharoor warns Pakistan) 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेले शशी थरूर यांनी महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करत पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. "आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले. इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,"असे थरूर यांनी पनामा
आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळविल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. गुरुवार, २९ मे रोजी त्यांनी परभणी येथे माध्यमांशी संवाद साधला.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्त्वात परदेशात भारत सरकारचे एका शिष्टमंडळ भूमिका मांडण्यासाठी दौऱ्यावर आहे. मात्र, काँग्रेसला याचा पोटशूळ उठल्याने सातत्याने थरूर यांच्यावर टीका केली जात आहे. जागतिक व्यासपीठावर स्वपक्षीय खासदार देशाची बाजू मांडत असताना अशाप्रकारे त्यांच्यावर टीका करण्याचे नीच कृत्य काँग्रेस सरकारकडून सुरू आहे.
सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर पाकिस्तानचा बुरखा फाडत आहेत, त्याचवेळी काँग्रेस पक्षाने थरूर यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे.
‘डरो मत...’ अशी डायलॉगबाजी काँग्रेस नेते राहुल गांधी टी-शर्ट घालून आणि दंड फुगवून नेहमी करत असतात. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर धादांत खोटे आरोप करणार्या राहुल गांधींनाच आपल्या डायलॉगचा विसर पडला असावा. त्यामुळेच न्यायालयीन कारवाईद्वारे राहुल गांधींना जेरीस आणणार्या सात्यकी सावरकर यांना लक्ष्य करण्यासाठी त्यांना अखेर नथुरामचा आधार घ्यावा लागणे, हा गांधी विचारांचा पराभवच आहे.
Opposition to the amendments in the Waqf Act was just an excuse Muslim League Trinamool Congress पश्चिम बंगालमधील धर्मांध मुस्लिमांचे ते राज्य बांगलादेशात विलीन करून विशाल बांगलादेश निर्माण करण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाही. त्यासाठी सीमावर्ती जिल्ह्यांमधील हिंदूंना हद्दपार करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुर्शिदाबादमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. ‘वक्फ’ कायद्यातील सुधारणांना विरोध हे केवळ निमित्त होते. स्वातंत्र्यपूर्व काळात बंगालमध्येच मुस्लीम लीगच्या हुसेन सुर्हावर्दींनी ‘डायरेक्ट अॅक्शन डे’चा
Congress leaders have spread many rumours about Operation Sindoor every question they had was answered by security forces press conference
धारावी पुनर्वसनासाठी मिठागर जमिनीचा वापर करण्यास काँग्रेसने केलेला विरोध हा निव्वळ राजकीय दुटप्पीपणाचा सर्वोत्तम नमुना आहे. सत्ता असताना हा पर्याय काँग्रेसनेच मांडला होता मात्र आज सत्तेपासून दूर असल्यामुळे काँग्रेस हा पर्याय नाकारत आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार ज्योती गायकवाड यांनी अलीकडे धारावीकरांसाठी "फक्त इन-सिटू पुनर्वसनच हवे" अशी मागणी केली आहे. मात्र या मागणीच्या विरोधात तथ्य आणि इतिहास हा स्वतः काँग्रेसच्या कारकिर्दीतच सापडतो.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील नेते राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची सून वैष्णवी हगवणे हिने मानसिक छळातून आत्महत्या केल्याने राज्यभरात त्यांच्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने कौतूकास्पद कामगिरी केल्याने देशभरात त्यांचा गौरव होत असताना काँग्रेसकडून मात्र, वारंवार त्यांचा अवमान करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवार, २१ मे रोजी असेच एक वादग्रस्त विधान केले आहे.
पुण्यातील महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी पुणे शहराध्यक्षांवर गंभीर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महापालिका निवडणूकांचा तोंडावर पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतली असून शपथविधीनंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी आजपर्यंत अनेक खाती सांभाळली आहे. आता जे काही खाते मिळेल त्याप्रमाणे निश्चितपणे काम करेन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक दीपक मानकर यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आपला राजीनामा पाठवला असून अजितदादांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
(Prithviraj Chavan criticized Operation Sindoor) 'सिंदूर' या अनेक शब्दाशी भावना जोडल्या गेल्या आहेत. परंतु भावनांनी युद्ध जिंकता येत नाही. ते शस्त्रास्त्रं आणि दारूगोळ्यांनी जिंकले जाते. 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव सरकारने भावनिक फायदे मिळवण्यासाठी निवडले होते; परंतु याचा काहीही फायदा होणार नाही, अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
पाहलगाम येथील क्रुर हल्ल्यानंतर केंद्र सरकारने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या निर्णायक कारवाईला देशातील सर्वच पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. विरोधी पक्षांपैकी काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.), शिवसेना (उ.बा.ठा), आम आदमी पार्टी आणि इतर प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारतीय लष्कर आणि वायुदलाने एकत्रित पाकिस्तानातील बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मद आणि मुरिदके येथील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांच्या तळांवर हल्ले केले.
Maharashtra new sarcastic emperor Sapkal statements can be said to be a guide to the future course of the Congress at present एका सामान्य कार्यकर्त्याला थेट महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी बसविल्याचा टेंभा काँग्रेसने मिरवला खरा. पण, हा टेंभा फार काळ टिकला नाही. काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष सध्या माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाच कित्ता गिरवताना दिसतात. दररोजची बेताल वक्तव्ये, सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका, यापलीकडे सध्या तरी सपकाळ यांची कामगिरी समोर आलेली
उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी राफेलवर दिलेल्या विधानावरून भाजपने काँग्रेसवर टिका केली आहे. पाकिस्तानी सैन्य सीमेपलीकडून गोळीबार करत आहे, तर सीमेच्या या बाजूने इंडी आघाडीचे नेते सैन्याला लक्ष्य करत आहेत, अशी टिका भाजपने केली आहे.
राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका र्यक्रमामध्ये काँग्रेसने 80 च्या दशकात केलेल्या चुकां कबुल केल्या आहेत. यामध्ये ऑपरेशन ब्ल्यु स्टारपासून, शीख दंगलीचा देखील समावेश आहे. राहुल गांधींचा बदलेला हा पवित्रा, भारत सरकारच्या जातीनिहाय जनगणनेच्या घोषणेचा परिपाक आहे, हे नक्की...
जातीनिहाय जनगणनेबाबत काँग्रेसने कायम जनतेला गाजरच दाखवलं. स्वातंत्र्यानंतर जवळपास सात दशकं उलटली, पण दुर्दैवाने जातनिहाय जनगणना देशात कधीच संपूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने झाली नाही, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत मोदी सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.
जळगावमधील दोन माजी मंत्री आणि तीन माजी आमदारांनी शनिवार, दि. ३ मे रोजी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या असंख्य पदाधिकार्यांनी के. सी. कॉलेज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर मुद्द्यावर काँग्रेसचा दृष्टिकोन देशविरोधी शक्तींना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे काँग्रेस वर्किंग कमिटीऐवजी त्यांना पाकिस्तान वर्किंग कमिटी म्हणायला हवे, असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार डॉ. संबित पात्रा यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत लगावला आहे.
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा दावा केल्याने सध्या चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये जातीय जनगणनेला कुणाचा आक्षेप?
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जातनिहाय जनगणनेला मान्यता दिल्याने देशात सामाजिक न्यायाचे नवीन पर्व सुरु झाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत या निर्णयासाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
(Congress deletes Gayab post targeting PM Modi) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. यादरम्यान राजकीय वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकावरील काँग्रेस पक्ष यांच्यामध्येही या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाद पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत एक पोस्ट करण्यात आली होती. मात्र त्यावरून चांगलाच वाद पेटल्यानंतर आता ती पोस्ट हटवण्यात आली आहे. पक्षाच्या अंतर्गत
वक्फ कायद्याविरोधात नव्याने याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी याबद्दल झालेल्या सुनावणीत वक्फ सुधारणा कायद्याविरुद्धात कॉपी-पेस्ट याचिका नको, अशा शब्दांत कानउघडणी केली आहे. वक्फ सुधारणा कायदा २०२५ ला आव्हान देणारी कोणतीही नवीन रीट याचिका दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
काँग्रेसी मानसिकता ही पाकिस्तानशी अगदी मिळती जुळती आहे, असा हल्लाबोल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून येत असलेल्या विविध प्रतिक्रियांचा त्यांनी मंगळवार, २९ एप्रिल रोजी जोरदार समाचार घेतला.
देशावरील भयाण संकटावेळी देशातील नागरिकांच्या पाठीशी उभे न राहता पाकिस्तानी दहशतवाद्यांना खुश करण्यासाठी काँग्रेसचा छुपा अजेंडा दिसतो, असा घणाघात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, २९ एप्रिल रोजी केला.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणारे पोस्टर शेअर केले आहे. भाजपने यावर प्रत्युत्तर देत काँग्रेसला लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस असे म्हणून ‘सर तन से जुदा’ हेच काँग्रेसचे धोरण असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस आणि विजय वड्डेट्टीवार आतंकवाद्यांना क्लीन चीट देत आहेत, असा हल्लाबोल भाजपकडून करण्यात आला आहे. जात विचारण्यासाठी दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. यावर भाजपने त्यांना खडेबोल सुनावले आहे.
ज्यांचे पाकिस्तानवर प्रेम आहे, त्यांनी पाकिस्तानात निघून जावे. हिंदू नावे वापरून कुणी पाकिस्तानी भारतात राहिला, तर त्याच्या तंगड्या तोडून पाकिस्तानात पाठवू. पाकिस्तानप्रेमींना भारतात रहाण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र आणि देशात पाकिस्तानप्रेमींसाठी एक इंचही जागा नाही, अशी चेतावणी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी दिली.
दहशतवाद्यांना पाठीशी घालून तुम्हाला काय साध्य करायचे आहे हे जनतेला चांगलेच समजले आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केली आहे. वडेट्टीवारांनी पहलगाम हल्ल्याबाबत केलेल्या विधानाला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
morale of Congress workers वरील मथळा एखाद्या दाक्षिणात्य सिनेमाला साजेसा असला, तरी प्राप्त परिस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसमधल्या घडामोडींना तंतोतंत लागू पडतो. विधानसभा निवडणुकीतील मानहानिकारक पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचे पुरते मनोबल खचले. त्यातून सावरण्याची ताकद मिळते ना मिळते तोच ‘हायकमांड’ने हर्षवर्धन सपकाळ यांना कार्यकर्त्यांच्या माथी मारले. भलेभले इच्छुकांच्या रांगेत असताना, केवळ राहुल गांधींचे लाडके म्हणून सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद सोपवण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला ६५ वर्ष पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण राज्यात महाराष्ट्र महोत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.