हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या तब्येतीबद्दल महत्वाची बातमी समोर आली आहे. आज १६ मार्च रोजी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर (Amitabh Bachchan) अँजिओप्लास्टी झाली. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया झाली आहे.
Read More
सध्याची देशातील तसेच देशाबाहेरील कोरोना महामारीच्या संकटाची परिस्थिती आणि एकूणच अतिशय निराशेचे वातावरण असताना, चहुबाजूंनी घोर भ्रष्टाचार, अनीतीचे राजकारण आणि एकंदरच अत्यंत मानसिक खच्चीकरणाची परिस्थिती असताना, मनात स्वातंत्रवीर सावरकर यांच्या काळ्या पाण्याची अंदमानातील शिक्षा या घटनेला २ मे, २०२१ रोजी १०० वर्षे पूर्ण झाली. या विचारासरशी मनात आलं की, एवढी मोठी अमानवी शिक्षा ५० वर्षांची दोन जन्मठेपेची कठोर शिक्षा ऐकूनच त्यांची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाही करवत नाही.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने काही सावरकरप्रेमी युवकांनी एकत्र येऊन ‘स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था’ (अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली) या संघटनेची सन २०२०मध्ये स्थापना केली. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन धर्मातील प्रत्येक सण, परंपरा, संस्कृती यामागे असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे, त्याचप्रमाणे समाजातील गरजू लोकांना मदत करणे, हा प्रमुख उद्देश आहे. हे संघटन सामाजिक कार्य करण्यासाठी आणि सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी आहे. त
विविध पवित्र नद्यांच्या पवित्र तीर्थाचा जलकुंभ भरताना प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, थोर शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने, ज्येष्ठ कवयित्री आणि चरित्र लेखिका उर्मिलाताई कराड
‘अंदमानातील सावरकर’ १०० व्याख्यानांचा संकल्प ‘काळे पाणी मुक्ती शताब्दी’निमित्त विशेष उपक्रम
आपल्याकडे भारतात पर्यटन म्हणजे प्राचीनकाळी त्याला ‘तीर्थाटन’ असा शब्द होता. दळणवळणाची कोणतीही सुलभ साधन-व्यवस्था अस्तित्वात नसताना डोंगर-दर्या तुडवत संपूर्ण भारत पालथा घालणारा एक मोठा वर्ग अस्तित्वात होता. काश्मीर ते कन्याकुमारी आणि अटक ते कटक चारधाम यात्रा केली जात असे. या तीर्थाटनामागे ‘ज्ञानप्राप्ती’ हा सरळ शुद्ध हेतू होता. इथे ज्ञान हे फक्त पुस्तकी ज्ञान अपेक्षित नसून, प्रवासात वेगवेगळ्या ठिकाणांना दिलेल्या भेटीतून, त्यातून भेटलेल्या माणसांतून, निसर्गातून आणि जमा झालेल्या अनुभवातून ज्ञानाची गोळाबेरीज अ
पुण्यात स्थायिक असलेल्या क्रांतिकारक डावरे कुटुंबातील तीन बंधू: गोविंदराव (१८३६-१८७९), माधवराव (१८४१-१८९६) आणि बळवंतराव (१८४७-१८९६). डावरे बंधूंचे वडील नारायणराव (१८१५-१८६५) यांनी १८५७च्या प्रथम स्वातंत्र्ययुद्धाला महाराष्ट्रामधून साहाय्य केले होते. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील शौर्याची ही कहाणी...
सावरकरांचे अंदमानातील सहबंदीवान
‘जें जें आपणासि ठावें। ते ते इतरांसी सांगावें। शहाणें करूनि सोडावें। सकळ जन॥’ ही उक्ती सावरकर अंदमानातही जगून दाखवतील, याची कुणी कल्पनाही केलेली नव्हती. पण, सावरकरांनी समर्थ वचन सिद्ध करून दाखवलं. राष्ट्रकार्य केवळ शस्त्र हाती घेतल्यानंच होतं, असं नाही. एक एक माणूस घडवणं हीसुद्धा राष्ट्रभक्तीच आहे, हे त्यांनी त्यांच्या अंदमानच्या वास्तव्यात दाखवून दिलं.
सावरकरांचे अनुयायी व विरोधक त्यांच्या जीवनाची दोन ठळक भागात विभागणी करतात. अंदमानपूर्व सावरकर व अंदमानानंतरचे सावरकर यांच्यात आमुलाग्र बदल झालेला असल्यामुळे तो का व कसा झाला आणि त्याचे भारतावर कोणते दूरगामी परिणाम झाले ते समजून घ्यावे लागेल. -
अंदमानच्या काळ्याकुट्ट अंधारातून सावरकरांचे विचाररूपी तेज सर्वत्र पसरत होते. त्या तेजाला साखळदंड किंवा 50 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा बद्ध करत नव्हती. शिक्षा भोगत असताना आपल्या धाकट्या बंधूंना पाठवलेली ही पत्रे म्हणजे अष्टविनायकच. अत्यंत रसाळ आणि तळमळीचे लेखन या पत्रांमध्ये ओतप्रोत भरलेले आहे. -
सेल्युलर जेलमधला अमानुष छळ सोसणे असह्य होऊन इंदूभूषण रॉय या तरुण क्रांतिकारकाने आत्महत्या केली, तर उल्हासकर दत्त या अतिशय बुद्धिमान तरूण क्रांतिकारकाचे मानसिक संतुलन बिघडले. अशा अनेक घटनांनी बाबारावांचे मन विषण्ण होत असे. या बंदीवानांची आठवण येऊन ते भावुक होत असत. त्यांच्याही मनात आत्महत्येचे विचार आले. पण, पुन्हा मनावरची मरगळ झटकून आपला हा शिणलेला देहच एक दिवस देशभक्तीची मशाल पेटवणार आहे, असा विचार करून ते आपले मनोबल वाढवत असत.
भारतातील बर्याच देशभक्तांना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्याची नावे आपल्याला मिळतात. परंतु, ती शिक्षा कशा प्रकारे दिली जायची, किती भयाण प्रकारे दिली जायची, याचे वर्णन असणारे पुस्तक म्हणजे ‘माझी जन्मठेप.’ असं म्हणतात की, ज्या विद्यार्थ्याला आत्महत्या करावीशी वाटत आहे, त्याने एकदा ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक जरूर वाचावे, ती व्यक्ती आयुष्यात परत कधीही ‘आत्महत्या’ हा विचारसुद्धा करणार नाही. असे काय आहे या पुस्तकात? पाहूया...
‘कमला’ हे सावरकररचित नितांत सुंदर असं खंडकाव्य आहे. अत्यंत नाट्यमय घटनायुक्त असलेल्या या काव्याच्या रचनेचा इतिहासही नाट्यमयच आहे. ५० वर्षांची अंदमानची काळ्या पाण्याची शिक्षा, बंद कोठडी, सोबतीला केवळ चार भिंती! अशा वेळी काट्याने त्या भिंतीवर सावरकरांनी रचलेले हे काव्य! खरं म्हणजे हे काव्य प्रतिकूलतेच्या पाषाणावर कोरलेलं शिल्पच म्हणावं लागेल. जो कोणी हे काव्य वाचतो, त्याच्याही हृदयावर हे काव्य नक्कीच कोरलं जातं.
काळे पाणी : स्वातंत्र्यवीरांची उत्कट अभिव्यक्ती
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्राचा अभ्यास करताना अंदमान बेट आणि सेल्युलर कारागृह हे घटक अविभाज्यपणे प्रभाव पाडतात. याचा प्रचलित भाषेत ‘काळे पाणी’ हा उल्लेख केला जातो. काळ्या पाण्याच्या जीवघेण्या यातनांना पुरून उरणारी जबरदस्त इच्छाशक्ती आणि ठळकपणे उठून दिसणारा त्यांचा आत्मविश्वास याला इतिहासात तोड नाही. ज्या अंदमानाच्या काळ्या पाण्यावर कणखर मनाने परिस्थितीशी झुंजतानासुद्धा त्यांना ‘कमला’सारखे महाकाव्य सुचले होते, त्या अंदमान आणि सेल्युलर जेलचा हा संक्षिप्त इतिहास...
दि. ८ एप्रिल, १९११ रोजी सावरकरांना जन्मठेपेची अर्थात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली व त्यांची प्रत्यक्ष यमसदन असलेल्या अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये रवानगी करण्यात आली. तेथील तिसर्या माळ्यावरील छोट्याशा खोलीमध्ये त्यांना जवळजवळ ११ वर्षं नरकयातना देण्यात आल्या. सर्व नरकयातना सहन करून तथा सर्व संकटांवर मात करून सावरकर ‘कालजयी’ ठरले आणि अनेक संकटे, वादळे पचवून देशकार्यासाठी पुन्हा उभे राहिले.
आधीच्या काळात स्वातंत्र्यलढ्यात अन्याय, अत्याचाराविरुद्ध आणि ध्येयासाठी लढण्यात प्रत्येकाचा समसमान वाटा असेल, असे तात्यारावांना वाटत असे. परंतु, अंदमानात त्यांना दिसलेले वास्तव हे त्यांना व्यथित करणारे होते, म्हणूनच त्यांनी हिंदूंना अधिक बळकट करण्यासाठीची पावले उचलायला सुरुवात केली.
ज्यांना राजकीय कूटनीती म्हणजे काय हे माहीत नाही, तेच कदाचित सावरकरांच्या या तथाकथित क्षमापत्रांना सावरकरांची शरणागती समजत असावेत किंवा सावरकरांनी तेव्हा शत्रूला फसवण्यासाठी, त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी रचलेल्या सापळ्यात सावरकरविरोधक अडकले असावेत. चाणाक्ष शत्रू म्हणजे ब्रिटिश फसले नाहीत. पण, तथाकथित बुद्धिवादी यात फसले असावेत.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील दै. ‘मुंबई तरुण भारत’चा ‘कालजयी सावरकर विशेषांक २०२१’ प्रकाशित करताना अत्यंत आनंद होत आहे. यावर्षी २ मे रोजी सावरकर बंधूंच्या अंदमान कारागृहातील सुटकेला १०० वर्षं पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून यावर्षी ‘अंदमान पर्व’ या विषयाची निवड करण्यात आली आहे.
१० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता सादर होणार असून ‘महानायक सावरकर’ या विषयावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याचे अभ्यासक, लेखक अक्षय जोग हे आपले विचार मांडणार आहेत.