पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे 46,000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. शूर वीर जोरावर सिंग यांच्या भूमीला अभिवादन करताना ते म्हणाले की आजचा कार्यक्रम हा भारताची एकता आणि दृढनिश्चयाचा भव्य उत्सव आहे. माता वैष्णो देवीच्या आशीर्वादाने, काश्मीर खोरे आता भारताच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडले गेले आहे, असे मोदी म्हणाले. “आपण नेहमीच काश्मीर ते कन्याकुमारी, असे भारत मातेचे वर्णन केले आहे, आपल्या रेल्वे नेटवर्कमध्येही हे वास्तव
Read More
गेल्या ११ वर्षांत भारताने साधलेली सर्वांगीण प्रगती पाहिली की अक्षरश: थक्क व्हायला होते. २०१४ साली जागतिक अर्थव्यवस्थेत जो देश दहाव्या स्थानी होता, तो आज जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे. ज्या ‘मॉर्गन स्टॅनली’ने भारताचा उल्लेख २०१३ साली ‘असुरक्षित अर्थव्यवस्था’ असा केला होता, तीच ‘मॉर्गन स्टॅनली’ आज भारताच्या वाढीबाबत नवनवे अंदाज व्यक्त करत आहे. त्यानिमित्ताने विकासाच्या आणि सुशासनाच्या मोदी सरकारच्या मागील ११ वर्षांतील दमदार कामगिरीचा मागोवा घेणारा हा लेख...
(PM Modi inaugurates Chenab Bridge) जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर तयार करण्यात आला आहे. या पूलामुळे काश्मीरचे खोरे देशाच्या इतर भागांशी जोडले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच असलेल्या या चिनाब पुलाचे शुक्रवारी ६ जून रोजी उद्घाटन केले आहे. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते. तसेच कटरा रेल्वे स्थानकावरून कटरा आणि श्रीनगरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी हिर
(Chenab Bridge) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार दि. ६ जून रोजी सकाळी ११ वाजता जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल अर्थात अंजी पुलाचेही उद्घाटन केले. तसेच कटरा रेल्वे स्थानकावरून कटरा आणि श्रीनगरला जोडणाऱ्या उधमपूर-कटरा-श्रीनगर-बारामुल्ला या रेल्वे मार्गिकेचे लोकार्पण केले. याच पार्श्वभूमीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाची वैशिष्ट्ये काय आहेत, हे जाणून घेऊया...
पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरला भेट दिली. यावेळी त्यांनी रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिजचे तिरंगा फडकावून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी अंजी ब्रिज आणि कटरा येथे काश्मीरची पहिली ट्रेन कटरा-श्रीनगर वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला.
पायाभूत सुविधांसाठी केलेली भरीव गुंतवणूक ही देशाच्या अर्थचक्राला सर्वस्वी गतिमान करण्याबरोबरच, रोजगारनिर्मितीसह अर्थव्यवस्थेलाही चालना देते. एकीकडे जगभरातील देश आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत असताना, आशियाई विकास बँकेने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘विकसित भारता’च्या संकल्पावर विश्वास दर्शवत, देशभरात गुंतवणुकीचा घेतलेला निर्णय हे नवभारताच्या पायाभरणीचे द्योतक म्हणावे लागेल.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत भारताच्या शूर लेकींनी असामान्य पराक्रम दाखवला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांचे कौतुक केले. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्य आयोजित 'लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलना'स संबोधित करताना ते बोलत होते.
विशेष प्रतिनिधी ऑपरेशन सिंदूरमध्ये संपूर्ण जगाने भारताच्या स्वदेशी शस्त्रास्त्रांची आणि मेक इन इंडियाची शक्ती पाहिली आहे. त्याचवेळी शत्रू कोठेही असला तरी त्यास उध्वस्त करण्याची भारताची क्षमताही सिद्ध झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे शुक्रवारी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत आणि जलद गतीने व्हावी, यासाठी भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली. यामध्ये रतलाम- नागदा तिसरा व चौथा मार्ग आणि महाराष्ट्रातील वर्धा-बल्लारशाह चौथ्या मार्गिकेचाही समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. २९ आणि ३० मे रोजी चार राज्यांचा दौरा करणार आहेत. परंतू, त्यांचा सिक्कीम दौरा हा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला आहे. या पाश्वभूमीवर मोदी सिक्कीमच्या जनतेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. तसेच उर्वरीत दौऱ्यातील राज्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे ते जाणार असून या राज्यातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत
पंतप्रधानांनी पाकिस्तानला कडक शब्दांत फटकारले. ते ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. पाकिस्तानने हे समजून घ्यावे की आम्ही तीन वेळा घुसून हल्ला केला आहे. पाकने पुन्हा दहशतवादी हल्ला घडविल्यास आणखी जोरदार प्रहार करण्यात येईल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथून पाकिस्तानला इशारा दिला.
आज जगाची नजर भारतावर आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरचे जे धाडसी पाऊल उचलले ते सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. मात्र दहशतवाद पाकिस्तानच्या डीएनए मध्ये खोलवर रुजलेला आहे, काही तुरळक कारवायांनी तो संपवता येणार नाही, असे मत मानवाधिकार संरक्षक, पत्रकार आणि बलुच देशभक्त मीर यार बलुच यांनी व्यक्त केले. बुधवारी त्यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले, त्यातून त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याविषयी आवाहन केले आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाठवण्यात आलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळावर उबाठा गटाचे एक नेते टीका करतात. पण आज बाळासाहेब असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उबाठा गटाला खडेबोल सुनावले. सोमवार, २६ मे रोजी नांदेड येथे आयोजित शंखनाद सभेत ते बोलत होते.
(PM Narendra Modi Holds Roadshow in Vadodara) ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी (२६ मे) दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. वडोदरा येथे झालेल्या रोड शोमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या वडोदरा रोड शोमध्ये भारतीय लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही भाग घेतला. पंतप्रधानांचे स्वागत करताना कुरेशी कुटुंबियांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.
“आम्ही जातीचे राजकारण करत नाही, तर वंचित, पीडित, शोषित आणि वगळण्यात आलेल्यांना मुख्य प्रवाहात जोडण्याचे काम करतो. ही समाजाची गरज आहे. आम्ही हे जातीनिहाय जनगणनेतून ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ साधणार आहोत. या बैठकीत जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे,” असे केंद्रीय मंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सांगितले.
(PM Narendra Modi inaugurated a locomotive plant in Dahod) पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. सोमवारी दि. २६ मे रोजी वडोदऱ्यातील रोड शोने दौऱ्याची सुरुवात केल्यानंतर दाहोद येथे पहिल्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशातील पहिल्या लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवत प्रकल्पाचा शुभारंभ केला. लोकोमोटिव्ह प्लांटच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी स्वतः इंजिनात बसून त्याची माहिती घेतली. या वेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आण
'ऑपरेशन सिंदूर' ही केवळ लष्करी कारवाई नाही, तर ती आपल्या भारतीयांच्या मूल्यांची आणि भावनांची अभिव्यक्ती आहे. याद्वारे भारताने पाकिस्तानला धडा शिकवून प्रमुख दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातमधील दाहोद येथे केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी वडोदरा येथे भव्य रोड शोमध्ये सहभागी झाले. यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचे कुटुंबियदेखील सहभागी झाले होते.
“पाकिस्तान बहुधा विसरला असावा, की भारतात आता काँग्रेस नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार आहे. उरी हल्ल्याला आम्ही सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिले, पुलवामा हल्ल्याला एअर स्ट्राईकने प्रत्युत्तर दिले आणि आता पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन’ सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळांना जमिनीत गाडून टाकले. या मोहिमेमुळे जगभरात संदेश पोहोचला आहे, की भारत आणि या देशाच्या सीमांशी छेडछाड केल्यास अत्यंत वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. आम्ही गोळीचे उत्तर गोळ्यांनीच (मिसाईल) देऊ”, असा गर्भित इशारा के
ईशान्य भारत अष्टलक्ष्मीचे मूर्त स्वरूप आहे, जे समृद्धी आणि संधी आणते. याच सामर्थ्यासह ईशान्येकडील प्रत्येक राज्य गुंतवणूक आणि नेतृत्वासाठी सज्ज असून ऊर्जा व सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी हा प्रदेश केंद्रस्थान बनत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
(PM Narendra Modi On Operation Sindoor at Bikaner) पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी २२ मे रोजी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. भाषणापूर्वी त्यांना बिकानेर जिल्ह्यातील करणी माता मंदिरात देवीचे दर्शन घेतले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी झालेला भ्याड दहशतवादी हल्ला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल देखील महत्त्वाचे विधान केले आहे.
(PM Narendra Modi's stern warning to Pakistan) पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी २२ मे रोजी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे. यावेळी बोलताना 'आता चर्चा जर चर्चा झालीच तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच होईल' असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच २२ एप्रिल रोजी झालेला भ्याड दहशतवादी हल्ला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'बाबतही त्यांनी भाष्य केले आहे.
(PM Narendra Modi On Operation Sindoor) राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना गुरूवारी दि. २२ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. यावेळी भारताने पाकविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना "हा केवळ प्रतिशोध नव्हे, ही नव्या न्यायाची भावना आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे रागातून नाही, तर न्यायासाठी राबवले गेले. हा फक्त आक्रोश नाही, हे समर्थ भारताचे रौद्र रूप आहे.", असे प्रतिपादन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ आणि २७ मे रोजी गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाहोद येथे स्थापन झालेल्या रेल्वे उत्पादन युनिटमध्ये उत्पादित केलेल्या पहिल्या ९ हजार अश्वशक्तीच्या लोकोमोटिव्ह इंजिनचे उद्घाटन करतील. पीपीपी मॉडेल अंतर्गत स्थापन झालेला दाहोद येथील रेल्वे कारखाना पुढील १० वर्षांत १,२०० इंजिन तयार करणार आहे, ज्याची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करण्याची योजना आहे. १०० टक्के मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत लवकरच ही लोकोमोटिव्ह इंजिने पूर्णपणे तयार केली जातील.
( Prime Minister Modi inaugurated Amrut Bharat stations on Thursday ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘अमृत भारत स्थानक पुनर्विकास योजने’तून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. आधुनिक, एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशाने भारतातील 1 हजार, 300 हून अधिक स्थानकांचा पुनर्विकास हाती घेतला
पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या मुद्द्यावर जग भारताच्या बाजूने आहे, असा आभास निर्माण झाला. परंतु, ‘ऑपरेशन सिंदूर’ला सुरुवात झाल्यावर जेव्हा युद्धाचा प्रसंग आला, तेव्हा भारत-पाकिस्तानला एकाच तराजूतून मोजणारी परिस्थिती फारशी बदललेली नाही, असे आपल्या लक्षात आले. भारताच्या दृष्टीने हा पहिलाच अनुभव नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांत भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढत आहे, असे आपण समजत होतो. तो आपला भ्रम होता व भारत आहे त्या स्थितीवरच पुन्हा परतला आहे, असे एखाद्याला वाटू शकते. परंतु ही वस्तुस्थ
संघर्षग्रस्त भागांमध्ये ‘विकास’ ही केवळ आर्थिक संकल्पना नसते, तर ती राजकीय एकात्मतेचीदेखील प्रक्रिया असते. विकास व्यापक, समावेशक आणि न्यायपूर्ण असतो, तेव्हाच अशांत भागांमध्ये स्थैर्य निर्माण करणे शक्य होते आणि तीच शांतता प्रस्थापित करण्याची पहिली पायरी असते. 2019 साली ‘कलम 370’ रद्द झाल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये केवळ प्रशासकीय नव्हे, तर विकासात्मक आणि लोकशाहीदृष्ट्या सर्वंकष धोरण राबवले. सात दशके धगधगत असलेला काश्मीर ‘प्रश्न’ आता ‘उत्तरां’च्या वळणावर आला आहे. त्यानिमित्ताने जम्मू-काश्मीरमधील
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर एकाएकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मध्यस्थ म्हणून काम करत असून, भारत-पाक यांच्यातील युद्धबंदी आपणच घडवून आणली, असा दावा केला. भारतातल्या विरोधकांनीही लगेचच उन्मादी होत, भारतीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. मात्र, आता त्याच ट्रम्प यांनी आपण केवळ तणाव निवळण्यासाठी मदत केली, असे म्हटल्याने, भारताची कूटनीतिक शक्ती अधोरेखित होण्याबरोबरच विरोधकही तोंडावर आपटले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचा पराक्रमी इतिहास पुनर्जागृत करणारे राजनेता ठरले आहेत. शांततेच्या काळात नेतृत्व करणार्या मोदींनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेलीच आहे. त्याचवेळी युद्धजन्य परिस्थितीत नेतृत्व करण्याची शक्तीही त्यांनी प्रगट केली आहे.
( PM Modi on war ) भारताच्या आदमपूर हवाईतळावर हल्ला केल्याची ‘फेकन्यूज’ पाकिस्ताने पसरविली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आदमपूर हवाईतळावर जाऊन आणि तेथील वायुयोद्धांशी संवाद साधून खोट्या बातमीचा सणसणीत ‘फॅक्टचेक’ केला.
काश्मीरला मुळात ‘प्रश्ना’चे स्वरुप प्राप्त करुन दिले ते पाकिस्तानने. त्यात संयुक्त राष्ट्रासह अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षागणिक गुंतागुतीचा झाला. पण, 2019 साली मोदी सरकारने ‘कलम 370’ रद्द करुन काश्मीरप्रश्नाच्या मुळावरच घाव घातला. त्यामुळे पाकने आता अमेरिकेसमोर लोटांगण घालत काश्मीरवरुन कितीही कांगावा केला, तरी आता भारताकडून चर्चा होणार ती केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच!
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात राबबिलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे उरी, पुलवामानंतर केलेल्या सर्जिकल आणि एअर स्ट्राईकच्याही एक पाऊल पुढे होते. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ दहशतवादविरोधी तात्कालिक कारवाई नसून, भारताच्या संरक्षण धोरणाला सर्वांगीण कलाटणी देणारा हा ऐतिहासिक टप्पा म्हणावा लागेल.
(PM Narendra Modi at Adampur Air Base) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ९ तळ उद्धवस्त करुन पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, दि. १३ मे रोजी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट देऊन थेट हवाई दलाच्या जवानांसोबत संवाद साधला.
ऑपरेशन सिंदूरवरील पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या जागतिक माध्यमांच्या कव्हरेजमध्ये भारताचा ठाम सूर, विशेषतः अणुब्लॅकमेलविरुद्धचे इशारे आणि भारताच्या दहशतवादविरोधी दृष्टिकोनात "न्यू नॉर्मल" जाहीर करणे, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान देशभक्तीपर युद्धातील विजयाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पूतिन यांना अभिनंदन केले. संवादा, दरम्यान पारंपारिक वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना भारत भेट देण्याचे आमंत्रण दिले. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केली शोक व्यक्त, रशियन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत वेबसाइट वरुन समजले.
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री (सोमवार, १२ मे) ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच अधिकृतरित्या बोलणार असल्याने ते नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दहशतवादाविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ हेच भारताचे धोरण असेल. ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही, जेथे जेथे दहशतवाद असेल; तेथे तेथे त्याच्या मुळावर असाच घाव घातला जाईल. पाकिस्तानसोबच चर्चा केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच होईल असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रास संबोधित करून ‘ऑपरेशन सिंदूर’चा पराक्रम देशातील माता – भगिनींना समर्पित केला.
पहलागाम हल्ल्यानंतर भारताने मोठ्याप्रमाणात मात्र, मर्यादित कारवाई पाकिस्तानावर करत त्यातील दहशतवादी तळांवर आक्रमण केले. यावर पाकिस्तानाने भारतातील नागरी आणि लष्करी इमारतींना लक्ष्य करण्याची आगळीक केली. यामुळे, मोठ्या प्रमाणात संघर्ष चिघळला. त्यात पाकिस्तानचे अतोनात नुकसान झाले. मात्र, या सगळ्यात भारताचा संयम, भारताची स्पष्ट धोरणे निर्णयक्षमता, सैन्यशक्ती यांचे दर्शन जगाला घडले. यासंर्घषाचा हा घेतलेला आढावा....
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू – काश्मीरमधील (पीओजेके) जवळपास १०० दहशतवादी ठार मारले आहेत. भारताच्या प्रत्युत्तरात जवळपास ३५ ते ४० पाक सैनिकांचाही खात्मा झाला आहे. भारतीय शस्त्रास्त्रांनी थेट इस्लामाबादपर्यंत धडक मारली होती. त्याचवेळी भारतीय नौदलाने आपल्या कराचीस आपल्या लक्ष्यावर ठेवले होते. पुढेही पाकच्या कोणत्याही कृत्यास याहून भयानक उत्तर दिले जाईल, अशी ग्वाही भारतीय सैन्यदलांनी रविवारी सायंकाळी पत्रकारपरिषदेत दिले आहे
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (खचऋ) एप्रिल 2025च्या ताज्या अहवालाने प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची आणि आत्मविश्वासाची एक नवी ज्योत प्रज्वलित केली आहे. या अहवालानुसार, भारताने 4.187 ट्रिलियन डॉलर्सच्या सकल राष्ट्रीय उत्पादनासह (ॠऊझ) जपानसारख्या विकसित अर्थव्यवस्थेला मागे टाकत, आज जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले नाव कोरले आहे. हे ऐतिहासिक यश म्हणजे, केवळ आकड्यांचा खेळ नसून, ते एका दूरदर्शी नेतृत्वाने, दृढ राजकीय इच्छाशक्तीने आणि सव्वाशे कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांनी गेल्या दशकात घड
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या तिसऱ्या दणक्यात भारतीय शहरांवर पाकिस्तानतर्फे डागण्यात आलेले तुर्की बनावटीचे जवळपास ३०० ते ४०० ड्रोन आपल्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्र प्रणालीने नष्ट केले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पत्रकारपरिषदेत दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संरक्षण मंत्र्यांसह सैन्यदलप्रमुखांनी भारताच्या कारवाईची सविस्तर माहिती दिली आहे.
महाभारतात ऐन रणभूमीवर हातपाय गाळणार्या अर्जुनाला भगवंतांनी उपदेश करत, त्याला युद्धास उद्युक्त केले. यानंतर अर्जुनानेही शत्रूचा निःपात केला. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाला खीळ घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनाही लष्करी कारवाईचा उपाय निरुपायानेच योजावा लागला. दुर्दैवाने राजकीय मजबुरीपोटी त्यावरही टीका करणारे बरेच ‘राज’कीय नेते आज दिसत आहेत.
दहशतवाद्यांच्या विरोधात भारताने सुरु केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाक पुरस्कृत दहशतवादाचा खात्मा करण्याचा चंग भारताने बांधला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवायचा निर्णय घेतला आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारी पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. इंग्रजी भाषेमध्ये सावरकरांचे द्विखंडात्मक चरित्र लिहीणारे तरुण लेखक विक्रम संपथ यांनी या पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांपूर्वी झालेल्या भेटीचा उल्लेख केला
भारतावर भयानक दहशतवादी हल्ले होऊनही केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याविरोधात पाकिस्तानवर कारवाईचे धाडस दाखवले नाही. भारतावर जागतिक महासत्तांचा दबाव असल्याची सबब मनमोहन सिंग यांनी पुढे केली. पण, काँग्रेस सरकारवर जागतिक महासत्तांचा नव्हे, तर देशातील मुस्लीम मतपेढीचा दबाव होता, हे आज स्पष्ट झाले, अन्यथा मोदी सरकारने तीन-तीनदा पाकिस्तानवर लष्करी कारवाई करूनही कोणत्याच देशाने किंवा अमेरिकेनेही भारतावर दबावापोटी निर्बंध कसे लादले नाहीत?
दहशतवादाविरोधात आम्ही ‘झिरो टोलरन्स’, हेच धोरण अवलंबवले आहे. जगानेही तसेच दाखवावे, अशी पोस्ट एक्सवर केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी केली आहे. “दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी जगाने पुढे यावे, या आशयाची एक्स पोस्ट परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी केली आहे. जयशंकर यांचे हे वक्तव्य 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर आले आहे.
भारतभूमीत येऊन धर्माशी नडलेल्या इस्लामिक कट्टरपंथींना #OperationSindoor च्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर #OperationSindoor #India #Bharat #Pakistan #NarendraModi #AjitDoval #Breaking #MockDrill #ऑपरेशनसिंदूर #News #MahaMTB
(Operation Sindoor) पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत उद्धवस्त केले आहेत. या हल्ल्यात भारतीय लष्कराकडून ५ महत्त्वाच्या दहशतवादी कमांडरचा खात्मा केला आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी कॅबिनेट बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रतिक्रिया दिली आहे.
ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला करीत दहशतवाद्यांचा खात्मा केला. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आता कोणाला पुरावा मागण्याकरता जागा राहिलेली नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
'ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार! नागरिकांसाठी गृहमंत्र्यांनी जारी केले महत्वाचे निर्देश
विविध प्रांतांतील असंतोष आणि बंडाळी आटोक्यात न ठेवू शकणार्या पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाने भारताची कुरापत काढण्याचे त्याला न पेलणारे वजन उचलल्यावर त्याचे तोंड फोडणारा ठोसा भारताने लगावला. वारंवार मार खाऊनही दहशतवादाला पोसण्याची पाकिस्तानची खुमखुमी कमी होत नसेल, तर त्या देशाचा सर्वनाश अटळ आहे. कारण, भारताचे नेतृत्व मोदींच्या हाती आहे, जे अशा देशविरोधी गोष्टी कदापि विसरणार नाहीत. काल ‘चुटकीभर सिंदूर’ची खरी किंमत काय, ती पाकिस्तानला भारताने दाखवून दिली!
‘पाकिस्तानी दहशतवादी आम्हाला मारत आहेत, तुम्ही काही तरी करा,’ असे जागतिक व्यासपीठावर रडगाणे गाणारे आपले नेतृत्व होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले की, तो आता इतिहास झालेला आहे आणि आता चिमूटभर लाल सिंदूरचा वचपा असंख्य दहशतवाद्यांची मुंडकी छाटून घेतला जाईल, हे न बोलता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले.