मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या आधीच मनसैनिकांना पत्र लिहीत शुभेच्छा देण्याकरिता शिवतीर्थावर येऊ नका असे आवाहन केले आहे. बुधवार, ११ जून रोजी त्यांनी मनसैनिकाना पत्र लिहिले असून माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली भेट होणे शक्य नाही, असे म्हटले आहे.
Read More
मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून मंगळवार, १० जून रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर धडक मोर्चा काढला आहे. गावदेवी मैदानापासून ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.
उबाठा-मनसे यूतीचं घोडं नेमकं कुठे अडलंय?
राज्यभरात उबाठा गट आणि मनसेच्या यूतीच्या चर्चा सुरु असून आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. आमच्या सरकारने जनतेला दिलेला संकल्पनामा पूर्ण करण्यासाठी आम्ही लढतो आहोत. आम्हाला इतर गोष्टीत रस नाही, असे ते म्हणाले.
राज्यभरात सध्या मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीबाबत चर्चा सुरु असताना आता उद्धव ठाकरेंनीदेखील आपले मौन सोडले आहे. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंसोबतच्या यूतीबाबत संकेत दिले आहेत.
एकत्र येण्याबाबत राजसाहेब आणि उद्धवजी बोलले तरच काहीतरी होईल. त्यामुळे आता त्यांची इच्छा असल्यास त्यांनी फोन करावा, अशी प्रतिक्रिया मनसे नेते आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी दिली आहे. उबाठा गट आणि मनसेच्या यूतीबाबात आदित्य ठाकरेंनी केलेल्या विधानानंतर त्यांनी गुरुवार, ५ जून रोजी माध्यमांशी संवाद साधत ही प्रतिक्रिया दिली.
आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहे. महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत, असे विधान उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीबाबत त्यांनी गुरुवार, ५ जून रोजी ही प्रतिक्रिया दिली.
ठाकरे बंधू एकत्र यावे ही आमची प्रामाणिक ईच्छा आहे, असे म्हणत उबाठा गटाकडून पुन्हा एकदा यूतीकरिता मनसेला साद घालण्यात आली आहे. सोमवार, २ मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर असताना उबाठा गटाचे नेते सुनील प्रभू यांनी ही प्रतिक्रिया दिली.
केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत प्रतिपालिका सभागृह हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आदित्य ठाकरेंना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. यासोबतच कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनादेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यभरात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, मनसेतील दुसऱ्या फळीतील काही नेत्यांचा या यूतीला विरोध असल्याचे दिसते. या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत न जाण्यासाठी पक्षनेतृत्वाला विनवणी केल्याचीही चर्चा आहे.
राज्यभरात सध्या मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत जाण्याची तयारी दाखवत एक अटदेखील ठेवली आहे. महाराष्ट्राचे हित ही एकच माझी शर्त असल्याचे ते म्हणाले.
मुंबई 'मेट्रो- ३'च्या टप्पा २अ मधील कामे प्रगतीपथावर आहेत. या टप्प्यातील मेट्रो स्थानकांवर सध्या नामफलक लावण्याचे काम सुरू असून, लवकरच सर्व स्थानकांची नावे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ठळकपणे लावली जातील याची हमी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने दिली आहे. यापूर्वी आरे ते बीकेसी दरम्यानचा मेट्रो-३ चा टप्पा सुरू झाला असून, त्या मार्गावरील सर्व स्थानकांवर मराठी आणि इंग्रजीत नामफलके आहेत.
मनसे नेते संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून फोन करून शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच घरी येऊन मारण्याची धमकीही या अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, संदीप देशपांडे यांनी या अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
(MNS News) मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी याचिका उत्तर भारतीय विकाससेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे. मनसैनिक आणि त्यांचे नेते राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप करणारी ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय देणार, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभरात सध्या वाद सुरु असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचे एक बॅनर झळकले आहे. एकीकडे औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होतीये तर दुसरीकडे, औरंगजेब इथे गाडला गेला, अशा आशयाचे बॅनर मनसेकडून लावण्यात आले आहे.
(Raj Thackeray on Aurangzeb Tomb Controversy) दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क येथे रविवार दि. ३० मार्च रोजी पार पडला. यावेळी राज्यभरातून आलेल्या मनसैनिकांना मार्गदर्शन करताना मनसेअध्यक्ष राज ठाकरे विविध विषयांवर भाष्य केले. सध्या राज्यात सुरु असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या वादावर त्यांनी परखड मत मांडून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले असून संदीप देशपांडेंवर मुंबई शहराध्यक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रविवार, २३ मार्च रोजी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मनसेच्या बैठकीत विविध नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
मनसेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, राज ठाकरेंनी मार्गदर्शन कमी आणि कुंभमेळ्याची टिंगलटवाळीच जास्त केली. “बाळा नांदगावकरांनी महाकुंभातून गंगेचे पाणी कमंडलूमधून आणले, तेव्हा मी हड ते पाणी कोण पिणार म्हणून नाकारले,” असे ठाकरे म्हणाले. “तिथे स्नान करताना अनेक जण अंग खाजवतात,” असेही राज म्हणाले. थोडक्यात, गंगेचे पाणी अशुद्ध असून ते पाणी कोण पिणार, असा त्यांचा आक्षेप होता. ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व अनुसंधान संस्थान’च्या शास्त्रज्ञांनी गंगेवर संशोधनही केले आहे ते जरी वाचले असते, तरी राज यांना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाकुंभातील गंगा मातेच्या केलेल्या वक्तव्यावरून त्यांना अनेक टीकांना सामोरे जावं लागत आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राज ठाकरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जगभरातील ६० कोटींहून अधिक हिंदूंनी गंगेत डुबकी लावली. त्यावर आता राज ठाकरे यांनी गंगेत मिसळलेल्या हाडांचे पाणी मी पिणार नसल्याचे त्यांनी वक्तव्य केले आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये उपस्थितांना संबोधित करत म्हणाले आहेत.
Thane Municipal Corporation यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी ठाणे महापालिकेने आरक्षित केलेला भूखंड शिक्षणाच्या उद्देशाने वापरण्याऐवजी अन्य व्यावसायिक उपक्रमांसाठी वापरला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभाग ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे. या भूखंडावर व्यावसायिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याने, हा भूखंडाच्या उद्देशाविरुद्ध गैरवापर असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
Marathi Bhasha Gaurav Din मराठी विषयात एम.ए. करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवहेलना केल्याची धक्कादायक बाब उघड झाली. पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच एम.ए मराठी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी थेट पालिका मुख्यालयात जाऊन याबाबत पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. तर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी थेट पालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र देऊन हे परिपत्रक त
(Uday Samant Meet Raj Thackeray) राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी शनिवारी दि. २२ फेब्रुवारीला सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. ही भेट नेमकी कशासंदर्भात होती, याविषय़ी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र मंत्री उदय सामंत यांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना याविषयी माहिती दिली आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शिवाजी पार्क मैदानावर भव्य अभिजात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार असून अनेक दिग्गज मंडळी कविता वाचन करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली.
(MNS) मुंबईतील हॉटस्टारच्या कार्यालयात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. हॉटस्टारकडून मराठीत समालोचन करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आलेले आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या नेतृत्वात मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी क्रिकेट सामन्यांचे मराठीत समालोचन झाले पाहिजे, अशी भूमिका घेत डिज्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कार्यालयात जाऊन ठिय्या मांडला. चॅम्पियन्स ट्रॉफीपासून मराठी समालोचन होणार, अशी ग्वाही देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणूकीत अपयश आल्यानंतर आता मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. रविवार, २९ डिसेंबर रोजी चिपळूण येथील मनसेचे शहराध्यक्ष अभिनव भुरण यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील अंतर्गत राजकारणाचा ठपका ठेवत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
(Ustad Zakir Hussain) जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या अनेक वर्षांपासून ते अमेरिकेतच वास्तव्यास होते. त्यांच्या निधनानंतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही समाजमाध्यमांवर एक खास पोस्ट लिहून झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. "त्यांच्या
(Avinash Jadhav) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे दिला. परंतु, राज ठाकरे यांनी तो स्वीकारलेला नाही. तसेच अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंची भेट घेत राजीनामा मागे घेतला आहे. या भेटीची सविस्तर माहिती अविनाश जाधव यांनी दिली.
Avinash Jadhav महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. याप्रकरणाच्या माहितीचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे मनसे पक्षासाठी ही धक्कादायक घटना आहे. १ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. अविनाश जाधव हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सच्चे साथीदार आहेत. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ठाणे : विधानसभा निवडणुकीत ठाणे गडात उबाठा आणि मनसेला मिळालेल्या एकत्रित मतांपेक्षा भाजपचा टक्का सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. ठाणे मतदारसंघात भाजप ( BJP In Thane ) महायुतीच्या अथक प्रयत्नांमुळे आमदार संजय केळकर यांनी प्रतिस्पर्धी दोन्ही उमेदवारांवर लिलया मात केली आहे. उबाठाच्या राजन विचारे यांना ६२ हजार तर, मनसेच्या अविनाश जाधव यांना ४२ हजार, ८०७ आणि आमदार संजय केळकर यांना १ लाख, २० हजाराहून अधिक मते मिळाली आहेत.
नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीला स्वबळावर सामोरे गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांच्या झंझावातापुढे महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांचा धुव्वा उडाला आहे. मनसेच्या पक्ष मान्यतेबरोबरच कायमस्वरुपी मिळालेले रेल्वे इंजिनही यार्डात जमा करण्याची वेळ राज ठाकरेंवर येण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray Tweet महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीला बहुमत मिळाले आहे. २८८ पैकी २३० जागांवर महायुतीने दमदार विजय मिळवला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाल्याचे चित्र आहे. याचपार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन शब्दातच आपल्या भावना ट्विट करत व्यक्त केल्या आहेत.
(Eknath Shinde) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आता फक्त २ दिवस उरले आहेत. राज्यात २० नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पुढील काही तासात प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. या सगळ्या रणसंग्रामात काही गौप्यस्फोट होताना दिसत आहेत. राज ठाकरेंसोबतचे संबंध चांगले असताना बिनसलं कुठे, या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मौन सोडले आहे.
(MNS Manifesto) राज्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यातील पक्ष प्रचारसभा, दौरे, जाहीरनामे प्रसिध्दी या सगळ्यांमध्ये व्यस्त आहेत. आजमितीस महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले जाहीरनामे प्रसिध्द केले आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. यावेळी त्यांनी 'आम्ही हे करू' या शीर्षकाने हा जाहीरनामा प्रकाशित करत आपली भूमिका मांडली आहे. मुंबईमधील वांद्रे येथील MIG क्लब येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत
(Raj Thackeray) विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून आपला विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित करत आपली भूमिका मांडली आहे. मुंबईमधील वांद्रे येथील MIG क्लब येथे हा कार्यक्रम पार पडला.
(Devendra Fadnavis)अमित ठाकरेंना पाठिंबा देणे, आता शक्य नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केले आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर, उबाठाचे महेश सावंत तर मनसेकडून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने माहीममध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.
(Sharmila Thackeray) ठाणे विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अविनाश जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अविनाश जाधव यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि. १२ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील गोकुळनगर भागात आयोजित केलेल्या प्रचारसभेला मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. यावेळी शर्मिला ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला .
( Raj Thackeray ) दिंडोशी विधानसभा मतदारसंघामध्ये दि. ११ नोव्हेंबर रोजी उमेदवार भास्कर परब यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रचारसभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना निवडणूक चिन्हासकट शिंदेंकडे गेली. आज उद्धव ठाकरेंचा बाण निघून गेलाय आणि फक्त खान उरले आहेत", अशा शब्दात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. तसेच वर्सोव्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार हारून खान यांच्या उमेदवारीवरही त्यांनी टीका केली आहे.
( Raj Thackeray )राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु असतानाच टीसचा एक धक्कादायक अहवाल सध्या खूप चर्चेत आहे. या अहवालाची राजकीय वर्तुळातही बरीच चर्चा झाली. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागाठाणे मतदारसंघातील प्रचारसभेत बोलताना या अहवालावर भाष्य केले.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय राजन शिरोडकर ( Rajan Shirodkar ) यांचे मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी निधन झाले. गेल्या काही काळापासून ते राजकारणापासून दूर होते.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच भांडूपमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच मतदारसंघात कोणी दादागिरी केल्यास दुप्पट दादागिरी करेन, असा इशारा देखील त्यांनी दिला होता. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या टीकेवर संजय राऊत यांनी आपल्या नियमित पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलणार, असा जोरदार पलटवार केला आहे.
ठाणे : ( Mahayuti ) ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात मविआ आघाडीत बंडाळी कायम आहे. विधानसभा निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातून काँग्रेसच्या मनोज शिंदे आणि सुरेश पाटील खेडे या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने मविआमधील उबाठा गटाच्या उमेदवाराच्या अडचणी वाढल्या आहेत.
ठाणे : ( MNS ) विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी प्रचारासाठी दंड थोपटले असुन नेतेमंडळीनीही आता कंबर कसली आहे. यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची विधानसभेसाठी पहिली जाहिर प्रचार सभा सोमवारी (ता. ०४ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी ५ वा. ठाण्यातील ब्रम्हांड सर्कल येथे होत आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय्यत तयारी केली असून मनसे नेते अभिजीत पानसे, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सैनिक सज्ज झाले आहेत.
Amit Thackeray महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची धामधूम आहे. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मनसेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. अमित ठाकरेविरोधात शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत हे मैदानाच उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे गटाचे महेश सावंत हे मैदानात उतरले आहेत. काही दिवसांआधी अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ते आता प्राचारासाठी लोकांच्या घरोघरी जात प्
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढाकाराने दादर शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी सिंघम अगेन चित्रपटाची टीम उपस्थित होती. दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता अजय देवगण आणि अगेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, आता अखेर अर्जुननेच ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केलं आहे.
Belapur Vidhansabha : नवी मुंबईतील बहुचर्चित बेलापूर विधानसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल. पाहूया काय आहे या मतदारसंघाचा इतिहास आजच्या व्हिडिओतून.
नवी मुंबईतील बहुचर्चित बेलापूर विधानसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल. पाहूया काय आहे या मतदारसंघाचा इतिहास
ठाणे आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी मनसेकडून दोन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या यांच्या निवडणूक मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी पार पडले. यावेळी राज ठाकरेंनी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिची निर्मिती आणि अभिनय असणाऱ्या फुलवंती या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांद प्राजक्ता निर्माती आणि स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शिकेच्या भूमिकेत समोर आल्या आहेत. दरम्यान, प्राजक्ता आजवर सुत्रसंचालक, अभिनेत्री, निर्माती या रुपात तर दिसलीच पण आता लवकरच ती राजकारणात देखील प्रवेश करणार अशी चिन्ह दिसत असून त्याबद्दल तिने स्वत: माहिती दिली आहे.