(Leadership Development Study Class at Mhalgi Prabodhini) देशाच्या सर्वंकष विकासासाठी महानगरांसोबतच छोटी शहरे व ग्रामीण भागाचाही विकास आवश्यक असतो. त्यात तरुण व महिलांची शाश्वत प्रगती हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. क्षमता विकास व प्रशिक्षण ही उद्दिष्टे समोर ठेवून गेले दोन दिवस रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने संभाजीनगरच्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळचे विश्वस्थ, पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्त्यांसाठी ‘नेतृत्व विकास अभ्यास वर्ग’ आयोजित केला होता.
Read More
(Maharashtra HSC Result 2025) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल सोमवार दि. ५ मे रोजी दुपारी १ वाजता लागणार असल्याचे जाहीर केले. याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. तर मंगळवार दि. ६ मे पासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.
(Maharashtra HSC Result 2025 Updates) महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या परिक्षेत कोकणचा निकाल ९६.७४ टक्के सर्वाधिक लागला आहे. तर लातूर ८९.४६ टक्के निकाल सर्वात कमी लागला आहे. राज्य मंडळाकडून सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाबाबतची माहिती देण्यात येणार आली आहे. आज दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
( loan available on Occupier Class 2 land Chandrashekhar Bawankule ) राज्यातील भोगवटादार वर्ग-2 म्हणून जमीन धारण करणार्या शेतकर्यांना बँकांकडून कर्ज मिळविण्यात येणार्या अडचणी दूर करून आता भोगवटादार वर्ग-2च्या जमिनीवर तारणकर्ज देता येणार आहे. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले आहे.
मुंबई आणि पुणे शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील उच्च माध्यमिक मंडळाची इयत्ता बारावीची पुनर्परीक्षा सध्या सुरु आहे. दरम्यान काही विद्यार्थांना पावसामुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला. त्यामुळे राज्यभरातील पावसाची एकूण परिस्थिती लक्षात घेता, ही अडचण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर यांना सांगितली असता जे परिक्षार्थी आजच्या पेपरसाठी पोहोचू शकणार नाहीत,
मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने संपूर्ण मुस्लिम समाजाला मागासवर्गीयांच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतल्याने आता सर्वत्र टीका होत आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानेही कर्नाटक सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे सामाजिक न्यायाची तत्त्वे कमजोर होतील, असे आयोगाने म्हटले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) या सहयोगी उप कंपनीच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी बिपीनकुमार श्रीमाळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.श्रीमाळी हे सेवानिवृत्त वरिष्ठ सनदी अधिकारी असून ते यापुर्वी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्
परिस्थितीचा बाऊ न करता, अभ्यासात सातत्य ठेवत, एकाचवेळी एक नव्हे, तर दोन-दोन पोस्ट मिळवणार्या शेतकर्याची मुलगी ते क्लास टू अधिकारीपदापर्यंत मजल मारलेल्या सोनाली पगारेविषयी...
चीनची शांग क्लास पाणबुडी ( टाईप ०-९-३ ) ही तैवान आणि यलो सी यामधील सामुद्री क्षेत्रातील आखातात बुडाल्याच्या बातम्या जगातील माध्यमात चर्चिल्या गेल्या होत्या. या अणू उर्जेवर चालणार्या पाणबुडीवरील सर्व कर्मचारी मृत्युमुखी पडले असल्याचे सांगितले गेले. ही पाणबुडी समुद्रात बुडण्याचा ‘मुहूर्तही’ लक्षवेधी होता.
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील मनोहर लाल या मागासवर्गीय समाजातील युवकाची नुकतीच निर्घृण हत्या झाली. मनोहर लाल याचे गावातील एका मुस्लीम मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यातूनच मुलीच्या परिवाराने त्याचा खून केला. प्रेमाची सजा म्हणून मनोहर लाल याच्या देहाचे सात तुकडे करून ते पोत्यात भरून नाल्यात फेकण्यात आले. काही दिवसांतच गुन्हेगाराला अटक झाली, तरीही लोकांचा आक्रोश थांबता थांबत नाही. त्यांच्या मते, गुन्हेगाराचा दहशतवादी संबंधही विचारात घ्यावा. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोहर लाल याचा खून, गुन्हेगार त्याची पार्श्वभ
जुलै महिना संपण्याची वेळ आली तरी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. सीबीएसईच्या निकालामुळे अकरावी प्रवेश रखडलेले असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे दिवस वाया जात आहेत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन सप्टेंबरअखेरपर्यंत कॉलेज सुरू झाल्यास
वैद्यकीय शिक्षण, संशोधन संचालनालयाचा हिरवा कंदील
२३ मार्च रोजी होणारा दहावीचा पेपर रद्द, नवी तारीख ३१ मार्चनंतर
दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फक्त परीक्षा फी नाही तर प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी आता माफ होणार आहे. तसेच ही प्रतिपूर्ती आरटीजीएस (RTGS) मार्फत थेट विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या खात्यात जमा करण्यात यावी, असा निर्णय शालेय शिक्षणमंत्री ॲङ आशिष शेलार यांनी घेतला असून त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थ्याची नोंदणी झाली होती. त्यातील १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले
१ मार्च ते २२ मार्चमध्ये झालेल्या १०वीच्या परीक्षेला राज्यभरातून १७ लाखांपेक्षा आधिक विद्यार्थी बसले होते
मराठा आरक्षणासाठी राज्य मागास प्रवर्ग आयोगाने तयार केलेला अहवाल ‘जशाचा तसा’ सर्व याचिकाकर्त्यांना आणि प्रतिवाद्यांना देण्यात यावा. असे निर्देश उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला देण्यात आले.
मराठा आरक्षणासदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालाची प्रत सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले. मराठा आरक्षणासंदर्भात आज न्यायालयात सुनावणी करण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने सदर आदेश दिले.
मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासाठी समाजशास्त्रज्ञ, विचारवंतांशी विचारविनिमय करून तसेच कार्यशाळेचे आयोजन करून सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाचे निकष आणि परिमाण निश्चित करून त्यांचे विश्लेषण आणि गुणांकनाची पद्धत निश्चित केली होती.
संवेदशील मन, घेतलेले काम निष्ठेने करणे आणि समतेचे मूल्य जपत समाजजागृती करण्याचा पण घेतलेल्या अशोक कांबळेंचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही सोमवारी मराठा आरक्षणाबाबात तातडीने सुनावणी घ्यावी यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांनी मागासवर्ग आयोगाचा अहवाल न्यायालयात सादर करण्याची मागणी केली आहे.
मराठा समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे काढण्यात आले होते.
संसदेत आज दोन महत्वाच्या विधेयकांवर चर्चा करण्यात येणार आहे. लोकसभेत आज एससी-एसटी अत्याचार संरक्षण विधेयकावर चर्चा करण्यात येणार असून या विधेयकासाठी मतदान होणार आहे.
आजची शिक्षणपद्धती ज्या पद्धतीने चालली आहे, ते पाहता अशा प्रकारचा ताण येणे साहजिकच आहे. या शिक्षणपद्धतीत जी जीवघेणी स्पर्धा आहे, त्यात आपला श्वास वाचवायची प्रत्येकाची धडपडच मनाला शॉक देऊन जाते.
महापालिका शाळांमधील नववीच्या विद्यार्थ्यांना शेती आणि देशसेवेमध्ये रस असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून उघड झाली आहे.
संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादित केले
येथील केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित सेवावस्ती विभागाच्या माध्यमातून आकरावी आणि बारावीच्या गरजू विद्यार्थ्यांना शनिवार, ९ रोजी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. जळगाव जनता सह. बँकेच्या सेवा कार्यालयात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष निळकंठआप्पा गायकवाड तर प्रमुख अतिथी गोसेवक नरेश खंडेलवाल उपस्थित होते.
पोस्टमन हा घरचाच सदस्य असल्याची भावना लोकांमध्ये होती. आज डाक विभागाचे कार्य तसे आक्रसले आहेत.
आयटीआयमध्ये व्यवसाय विषय घेऊन उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी आणि बारावीची समकक्षता मिळणार आहे. विद्यार्थ्यांना ही समकक्षता देण्याबाबत कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पाबाबत दै. मुंबई तरुण भारतचे प्रतिनिधी नितीन जगताप यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची मुलाखत घेतली.