१४ विद्या, ६४ कलांमधील ‘भाषाज्ञान’ ही एक महत्त्वपूर्ण कला अवगत असलेल्या, ‘अॅक्मी एज्युकेशन’च्या सर्वेसर्वा आणि भाषाविषयक महत्त्वपूर्ण कार्य करणार्या दीप्ती गोरे यांच्याविषयी...
Read More
आज घटकेला महाराष्ट्र कोणी नि कुठे नेऊन ठेवलाय, ते आपण रोज पाहतोच आहोत. पण, आजच्या 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आपण वेध घेऊया, हा महाराष्ट्र आला कुठून त्याचा....
यापूर्वीच्या लेखांमध्ये आपण 'Linguistics' अर्थात ‘भाषाशास्त्र’ या ज्ञानशाखेच्या दृष्टिकोनातून आर्यांचे स्थलांतर किंवा आक्रमणाच्या संदर्भात विचार केला. पण, त्यातही आर्य स्थलांतराच्या बाजूने निर्विवादपणे कुठलाच पुरावा सापडलेला नाही. या ज्ञानशाखेद्वारे जी वैचारिक मांडणी यात करण्यात आली, त्याच्याच जोडीने अजून एक शब्द युरोपीय विद्वानांनी अतिशय यशस्वीपणे पेरून दिला, तो म्हणजे ‘आर्यवंश.’ दोन अमेरिकन विद्यापीठांच्या पुरस्काराने चालवण्यात आलेल्या, परंतु मूळ भारतीयच असलेल्या एका संस्कृत-इंग्रजी शब्दकोशात ‘आर्य’ शब्दा
मागच्या चार लेखांमध्ये आपण "Linguistics' अर्थात भाषाशास्त्र या ज्ञानशाखेची ओळख करून घेतली. एक ज्ञानशाखा म्हणून हे शास्त्र जरी आपल्या जागी ठीक असले, तरी इतिहासाच्या पुनर्रचनेचे साधन म्हणून ते कितपत उपयुक्त आहे, याची शंकाच वाटत राहते. तसे पाहिले तर अशा इतरही अनेक ज्ञानशाखा इतिहासाच्या पुनर्रचनेला उपयुक्त ठरल्या आहेत. पण खास करून भाषाशास्त्राच्या बाबतीत मात्र याची शाश्वती निर्मळ मनाच्या अभ्यासकांना वाटत नाही. त्याला कारण युरोपीय भाषाशास्त्रज्ञ (Philologists) त्यातून जे निष्कर्ष काढतात, त्याच्यात आहे. पुरावे व
मागच्या काही लेखांपासून आपण ‘Linguistics’ अर्थात ‘भाषाशास्त्र’ या ज्ञानशाखेची ओळख करून घेत आहोत. तिच्या आधारे पाश्चात्त्य संशोधकांनी भाषांचे विविध गट बनवून दक्षिण आणि उत्तर भारतातल्या भाषा कशा वेगळ्या आहेत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. अशा भाषिक वैशिष्ट्यांवरून ‘आर्य’ नावाचे लोक युरोप आणि मध्य आशियाच्या परिसरातून भारतात आले, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. या भाषागटांचीही थोडक्यात ओळख आपण करून घेतली. त्यातून या मांडणीतील फोलपणासुद्धा आपण मागच्या लेखांमध्ये पाहिला. परंतु, हे पाश्चात्त्य संशोधक फक्त एवढ्
मागच्या काही लेखांपासून आपण ‘Linguistics’ अर्थात ‘भाषाशास्त्र’ या ज्ञानशाखेची ओळख करून घेत आहोत. तिच्या आधारे पाश्चात्त्य संशोधकांनी भाषांचे विविध गट बनविले. यात दक्षिण आणि उत्तर भारतातल्या भाषांचे पूर्णपणे वेगवेगळे गट बनविले. असे वेगळे गट दाखवून त्यांच्या द्वारे ‘आर्य’ नावाचे लोक भारताच्या बाहेरून भारतात आले आणि इथल्या मूलनिवासी लोकांवर कुरघोडी करून स्थायिक झाले, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. याचे फलस्वरूप म्हणून त्यांनी भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अवकाशात दुफळी माजवून दिली. परंतु, अशा पद्ध
मागच्या लेखात आपण 'Linguistics' अर्थात भाषाशास्त्राची ओझरती तोंडओळख करून घेतली. या शास्त्राने भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे केवढे नुकसान करून ठेवले आहे, याची जरा पुसटशी कल्पनाही करवून घेतली. तिथेच म्हटल्यानुसार, भाषांचा अभ्यास करणार्या काही युरोपियन अभ्यासकांनी जगभरातल्या असंख्य भाषा आणि त्यातल्या अनेक वैशिष्ट्यांचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यावरून ‘जगात जिथे जसे सोयीचे, तिथे तसा निष्कर्ष’ या तत्त्वावर आपली ‘संशोधने’ प्रसिद्ध केली. त्या अभ्यासात त्यांनी जगभरातल्या सर्व उपलब्ध आणि प्राचीन भाषांचे गट बनवले. त्
‘आर्यांच्या आक्रमणाचा/स्थलांतराचा सिद्धांत’ नावाचे पितळ उघडे करण्याच्या या उपक्रमात अजून एक पाऊल पुढे टाकताना, आपण यातला पुढचा एक पदर समजावून घेऊ. हा पदर आहे ‘Linguistics’ अर्थात भाषाशास्त्राचा. भाषांचा अभ्यास करणार्या काही युरोपियन अभ्यासकांनी जगभरातल्या असंख्य भाषा आणि त्यातल्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला. त्यावरून भाषांचा विकास आणि प्रवास यांच्याबद्दल काही आडाखे बांधले. हे आडाखे ‘जगात जिथे जसे सोयीचे, तिथे तसा तर्क’ या तत्त्वावर बांधले गेले. अशा आडाख्यांनाच ‘संशोधन’ असे नाव दिले. भारतावर राज्य करताना इथल