धर्मांतराच्या जाळ्यात नुकताच ऋतुजा राजगेसारख्या गर्भवती, सुशिक्षित युवतीचा दुर्दैवी अंत झाला. तिच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा छळ करण्यात आला. या घटनेनंतर आता तरी आरक्षणाचा लाभ घेणार्या समाजाला जागं होणं अत्यावश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आरक्षण व्यवस्था धर्मांतरासाठी नव्हे, तर सामाजिक न्यायासाठी होती. शतकानुशतके शोषित राहिलेल्या घटकांना सन्मानाने उभं राहता यावं म्हणून होती. मात्र, आज जिहादी आणि ख्रिस्ती मिशनरी वृत्तीने प्रेरित झालेल्या धर्मांतरितांकडून, या व्यवस्थेचा दुरुपयोग हो
Read More
(Kolkata Law College Gang-Rape Case) कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाला एक वर्षही पूर्ण होत नाही तोवर कोलकात्याच्याच विधी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २५ जूनच्या संध्याकाळी घडली असून, या प्रकरणी पोलिसांकडून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
ग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली एका पुरूषाला जामीन मंजूर करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरूवार दि. २६ जून रोजी लिव्ह-इन रिलेशनशिपवर ताशेरे ओढत याचिकाकर्त्याला फटकारले आहे. उच्च न्यायालय भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पॉक्सो) च्या तरतुदींखाली आरोपी असलेला शान आलमच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु होती.
(Kolkata Rape Case) दक्षिण कोलकाता येथील कसबा परिसरात असणाऱ्या साऊथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर कॉलेज कॅम्पसमध्येच सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची. पीडितेच्या तक्रारीवरुन कसबा पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. कोलकाता येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेची राष्ट्रीय महिला आयोगा (NCW)ने स्वतःहून दखल घेत तीन दिवसांत कारवाई अहवाल मागवला आहे.
" आपल्या संवैधनिक खंडपीठाने पर्यावरणीय न्यायाला उच्च स्थान दिले आहे आणि ते सामाजिक आणि आर्थिक न्यायापासून वेगळे करता येणार नाही असे वारवांर म्हटले आहे. पर्यावरणीय न्याय हा सामाजिक न्यायाचा भाग आहे." असे प्रतिपादन न्यायाधिश अभय ओक यांनी केले. शनिवार दि. ७ जुन रोजी सोसायटी ऑफ इंडियन लॉ फर्म्स (SILF) ने आयोजित केलेल्या हवामान बदल परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
(US Congressman Brad Sherman Slams Pakistan Delegation) पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरअंतर्गत झालेल्या लष्करी कारवाईनंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवली. त्यानुसार या शिष्टमंडळांनी विविध देशांना भेटी दिल्या. दरम्यान, भारताच्या या निर्णयाचे अनुकरण करत पाकिस्ताननेही वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या खासदारांच्या शिष्टमंडळांना पाठवल्याचे पाहायला मिळाले.
आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि अन्य दोघांवर सामूहिक हत्या करण्याव्यतिरिक्त अन्य काही आरोप ठेवले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातल्या हिंसाचारप्रकरणी हे आरोप ठेवण्यात आले आहेत. हसीना यांच्या अनुपस्थितीतच त्यांच्याविरोधातल्या खटल्याच्या सुनावणीला रविवार, दि. 1 जून रोजीपासून सुरुवात करण्यात आली.
(Kolkata police arrested Sharmistha Panoli) सोशल मीडियावर इस्लामिक दहशतवादाचा निषेध करताना केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आलेली हिंदू सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली हिला कोलकाता पोलिसांनी गुरुग्रामहून अटक केली आहे. याप्रकरणी तिच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असून, कोलकात्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.
"भारतीय तरुणांमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला प्रज्वलित करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची 'बीए' आणि 'बॅरिस्टर' ही पदवी ब्रिटिशांनी काढून घेतली. त्यापैकी 'बीए'ची पदवी मुंबई विद्यापीठाने परत केली. मात्र, वीर सावरकरांचा सन्मान असलेली 'बॅरिस्टर' ही पदवी अद्याप परत मिळालेली नाही. ती परत मिळवून सावरकरांना मरणोत्तर 'बॅरिस्टर' हा मान मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू", अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. २७ एप्रिल रोजी दिली.
maths on giving and tax by law ‘दाता भवती वा न वा’ असला, तरी देणगी देणे ही भारतीय संस्कृती. स्वार्थात परमार्थ यानुसार तुम्हाला सार्वजनिक संस्था, समाजोपयोगी कामे करणार्या संस्थांना, तसेच धर्मादाय संस्था किंवा एखाद्या राजकीय पक्षाला तुमच्या उत्पन्नातून देणगी द्यायची असेल, तर तुम्ही दिलेल्या देणगीसाठी वार्षिक करपात्र उत्पन्नातून वजावट मिळू शकते. देणगी दिल्यामुळे करात वजावट ही प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम 80जी’, ‘80 जीजीए’, ‘80 जीजीबी’ व ‘80 जीसीसी’ या कलमांद्वारे मिळू शकते. त्याविषयी सविस्तर...
( Bharati Vidyapeeth New Law College pune ) भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी बीए एलएलबी,बीबीए एलएलबी,एलएलबी,एलएलएम या अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे.
किस्तान पुरस्कृत दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने मंगळवार, दि. ६ मे रोजी चालविलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे संपूर्ण जगाने पाहिले. ‘सिंदूर’ या शब्दातच त्याग आणि शौर्याच्या पारंपारिक भारतीय संकल्पना दिसून येतात. ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाचा वापर ट्रेडमार्कसाठी करण्याची परवानगी द्यावी, असे अर्ज ट्रेडमार्क कायदा, १९९९च्या अंतर्गत रिलायन्स सहित अन्य तीन जणांनी ट्रेडमार्क रजिस्ट्रीकडे सादर केले आहेत.
pm modi congratulates Lawrence Wong on election victory
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, याबाबत इतिहास, कायदा आणि तात्त्विकदृष्ट्या कोणताही वाद नाही. ‘राजतरंगिणी’ या संस्कृत महाकाव्यात कल्हणने काश्मीरच्या राजांचा सुमारे 3 हजार, 600 वर्षांचा सातत्यपूर्ण व ऐतिहासिक आलेख मांडला आहे. मात्र, गेल्या 75 वर्षांत अपप्रचार, विकृत राजकारण आणि दहशतवादी समर्थक गटांनी ‘कलम 370’च्या आड धुरळा निर्माण करून वादग्रस्ततेचा कृत्रिम आभास पसरवला. ही वास्तविकता आणि नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘कलम 370’ हटवले गेल्याचे अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.
पहलगाम दहशतवादी हल्लानंतर केंद्र सरकारने अनेक निर्देश जारी केले आहेत. ज्यात व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी २७ एप्रिलपर्यंत देश सोडावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे निर्देश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडे काही याचिकाकर्त्यांनी दावा केला की, त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड आहेत. यासंदर्भात शुक्रवार, दि.२ मे रोजी न्यायालयाने एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या भारतीय नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले.
(Lawrence Bishnoi Gang Threatens Pakistan) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई टोळीने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली. या गँगच्या धमकीशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहलगामच्या बैसरन खोर्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’ने (युएनएससी) तीव्र निषेध केला आहे. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणार्या, कृत्य करणार्या आणि वित्तपुरवठा करणार्यांची जबाबदारी घेण्याची मागणी परिषदेच्या सदस्यांनी केली आहे.
The justice न्यायदानाच्या संदर्भात असे म्हणतात की, ‘केवळ न्याय करून उपयोग नसतो; केलेला न्याय दिसलाही पाहिजे!’ न्यायदानाचे दुसरे एक तत्त्व म्हणजे न्याय त्वरित मिळाला पाहिजे. तसेच तिसरे तत्त्व म्हणजे, ‘100 गुन्हेगार सुटले तरी चालेल. पण, एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये.’ त्याच अनुषंगाने सध्याच्या भारतीय न्यायव्यवस्थेचे केलेले हे चिंतन...
Muslim Personal Law Board ने रमजान महिन्याच्या अंतिम शुक्रवारी हाताला काळ्या पट्ट्या बांधून नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. वक्फ विधेयकाचा निषेध करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि त्यात सर्वांनी वक्फ विधेयकाचा निषेध म्हणून हाताला काळी पट्टी बांधावी, असा दावा केला आहे.
( Chief Minister Devendra Fadnavis on license of restaurant runs hookah parlor will be permanently revoked & law for strict action ) “वर्ष २०१८ मध्ये अवैध हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. त्यासाठी कायदा तयार केला आहे. त्यात अत्यावश्यक सुधारणा करण्यात येतील. यापुढे अवैध हुक्का पार्लर चालू करताना दुसर्यांदा सापडल्यास सहा महिन्यांसाठी उपाहारगृहाचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच तिसर्यांदा सापडला, तर परवाना कायमचा रद्द करण्यात येईल. तसेच संबंधित दोषी मालकांवर अजामीनपात्र गुन्हा नोंद केला जाईल,” असा इशारा गृहम
(Disha Salian Case) दिशा सालियनचे वडील सतीश सालियन (Satish Salian)आणि त्यांचे वकील निलेश ओझा (Nilesh Ojha) यांनी मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली आहे.सतीश सालियन यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांनी दिशा सालियन हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. दरम्यान, सतीश सालियन आणि वकील निलेश ओझा यांनी ही तक्रार केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
दि. १२ सप्टेंबर २००४ रोजी ‘माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर’ आणि ‘सीपीआय’ (एमएल, पिपल्स वॉर) या दोन संघटनांचे विलीनीकरण झाले आणि ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ (माओवादी)चा जन्म झाला. ‘अर्बन नक्षल’ संकल्पनेविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण, हा गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम माओवादी साहित्याचा अभ्यास गरजेचा आहे, जेणेकरून याबद्दलचे सर्व गैरसमज आणि मनातील शंका सहज दूर होतील आणि जनसुरक्षा कायद्याचे महत्त्वही अधोरेखित होईल. यात विरोधी विचारांचा आवाज दडपण्याचा हेतू नाही, तर राष्ट्रविरोधी शक्तींच्या देशविघातक कृतींपासून देशाला
( Hijab law gets more stricter in Iran ) इराणमध्ये हिजाब कायदा कठोरपणे लागू करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. याबाबत संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. इराण ड्रोन आणि ‘फेशियल रिकॉग्निशन’सारख्या प्रगत पाळत तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांना हिजाब घालण्यास भाग पाडत आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
Anti-Conversion Law अरुणाचल प्रदेशात धर्मांतर कायद्याविरोधात आता राज्यात ख्रिश्चन धर्मातील लोकांनी ६ मार्च रोजी ईटानगरमधील बोरम मैदानावर निदर्शने दर्शवली आहेत. त्यांनी अरुणाचल प्रदेश धर्म स्वातंत्र्य अधिनियम १९७८ ला संबंधित कायदा हा क्रूरपद्धत असल्याने हा तो रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी दावा केला की, ख्रिश्चन समुदायाला टार्गेट करण्यात आले. त्यांनी असा दावा केला की, चीनच्या सीमेला लागून असलेल्या राज्यात हिंसाचाराचे अधिक प्रमाण वाढले आहे.
( Love Jihad law in Maharashtra ) बहुप्रतिक्षित लव्ह जिहाद कायदा आता महाराष्ट्रातही लागू केला जाणार आहे. त्याचे प्रारुप तयार झाले असून, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यभारत अंमलबजावणी केली जाणार आहे. या कायद्यानुसार सक्तीच्या धर्मांतरासाठी तीन ते पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
Mohammed Shami पाकिस्तान पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी दुबईस्थित आहे. यासोबतच इस्लाम धर्मात रमजाननिमित्त रोजा म्हणजेच उपवास पकडला जात आहे. दरम्यान, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी रोजादरम्यान, शितप्येय प्राशन करताना दिसला होता. त्यावरून त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावरून काहीजण त्याला आधी देश आणि नंतर धर्म असे कौतुक करत आहेत. तर काहीजण त्याला ट्रोल करत आहेत. अशातच आता एका मैलवीने मोहम्मद शमीला गुन्हेगार असल्याचे वक्तव्य केले
स्वारगेट प्रकरणातील आरोपीला अटक झाली असून लवकरच या घटनेचा पर्दाफाश होणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी दिली.
Lawrence Bishnoi उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) टोळीतील जीतू नावाच्या एका गुन्हेगाराचा एनकाउंटक करण्यात आला आहे. जीतूला पकडल्यास १ लाखांचे बक्षीस देण्यात येईल, अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली होती. जीतू हा पेरॉलवर बाहेर आल्यानंतर तो फरार झाला. त्यानंतर त्याचा एनकाउंटर करण्यात आला आहे.
लेकीबाळींचे बालपण म्हणजे निरागस, निष्पाप कळीसारखेच! पण, या कळीला अवेळीच कुस्करण्याचा कायदा ( Iraq Politics for Women Rights ) मुस्लीम राष्ट्र इराकमध्ये पारित झाला आहे. त्यानुसार शिया मुस्लीम मुलीचे लग्न वयाच्या नवव्या वर्षी करण्याला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. काही कळण्याआधीच या बालिकांसाठी ‘निकाह’च्या नावाने लैंगिक आणि मानसिक शोषणाचा पिंजरा कायदेशीररित्या तयार असणार आहे. हा कायदा पारित करण्याचे कारण काय, तर बालवयात निकाह केल्याने मुली-महिला अनैतिक लैंगिक संबंधापासून वाचतील. भयंकर आणि तितकेच घृणास्पद!
डमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. एसआयटीकडून याप्रकरणाचा तपास होत असून सर्व आरोपींवर मोक्का लावण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ ( Marium Nawaz ) यांनी युएईचे राष्ट्रप्रमुख शेख मोहम्मद बिन जायद यांच्याशी नुकतेच हस्तांदोलन केले. पण, परपुरुषाशी हस्तांदोलन करून मरियमने ‘शरिया’ कायद्याचे उल्लंघन केले आहे, म्हणत पाकिस्तानी उलेमांनी, मुल्ला-मौलवींनी मरियम विरोधात फतवा काढावा, यासाठी तेथील कट्टर मुस्लीम नागरिक आणि राजकारणीदेखील आग्रही आहेत. या हस्तांदोलनावरून पाकिस्तानमध्ये वातावरण तापले. पाकिस्तान वेगळा झालाच, तोच मुळी मुसलमान राष्ट्र व्हावे म्हणून! पाकिस्तान स्वत:ला इस्लामचा कट्टर देश
ठाणे : केंद्र शासनाने दि. २४ डिसेंबर, १९९६ रोजी पंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे) अधिनियम,१९९६ अर्थात पेसा कायदा पारित केला आहे. पेसा कायद्याच्या निर्मितीला दि. २४ डिसेंबर, रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पंचायती राज मंत्रालयाच्या निर्देशाने हा दिवस "पेसा दिन" ( PESA Day ) म्हणून मुरबाड, भिवंडी, शहापूर तालुक्यातील महसूली गावांमध्ये साजरा करण्यात येणार आहे.
नागपूर : आम्ही राज्यात एक सक्षम आणि मजबूत धर्मांतरविरोधी कायदा आणणार आहे, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री नितेश राणेंनी ( Nitesh Rane ) दिले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सोमवार, १६ डिसेंबर रोजी ते पहिल्यांदाच विधान भवनात दाखल झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Jama Masque उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशीद येथे हरिहर मंदिर वादाप्रकरणी हिंदूंचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. एका निधी झा नावाच्या या सोशल मीडिया हँडलने वकिलाचे छायाचित्र पोस्ट केले आणि लिहिले की, मुस्लिमांनो त्याचा चेहरा नीट ओळखा...” अॅडव्होकेट जैन यांनी संभल जिल्ह्यातील सायबर पोलीस ठाण्यात हँडलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जगात सध्या कोणत्याही देशात शांतता आहे असे चित्र नाही. देशातील काही देश युद्धरत आहेत, तर काही देशांना अस्थिर करण्यासाठी बाह्य शक्ती सर्वस्व पणाला लावत आहेत, तर काही देशांतील राज्यकर्ते स्वतःच्या पायावरच कुर्हाड मारून घेत आहेत. दक्षिण कोरियाचे राजकीय नेते याचेच उत्तम उदाहरण होय! दक्षिण कोरियामधील विरोधी पक्ष राष्ट्रविरोधी कृती करण्याचा कट आखत आहे, असा संशय आल्याने, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओले यांनी अचानक मध्यरात्री देशामध्ये ‘मार्शल लॉ’ची घोषणा केली. त्यामुळे दक्षिण कोरियामध्ये एकच वादळ उठले
sambhal violence : उत्तर प्रदेशातील संभळ येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचाराने सर्वांनाच हैराण करून सोडलंय. अशातच आता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला एका पत्राद्वारे चेतावणी दिल्याचे पाहायला मिळतंय. नेमकं प्रकरण काय? पाहा संपूर्ण व्हिडिओ... #jamamasjid #sambhal #sambhalviolence #uttarpradesh #vishnushankarjain #jamamosque #AllIndiaMuslimPersonalBoardLaw #asisurvey #news #mahamtb
: कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरीकेत अटक करण्यात आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी अमेरीकेतल्या कॅलिफोरनीया परिसरात अनमोलच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून अमेरीकेच्या पोलीस कस्टडीत त्याला ठेवण्यात आले आहे. अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा छोटा भाऊ असून आपल्या भावाप्रमाणेच तो सुद्धा ' मोस्ट वॉनटेड क्रिमीनल ' आहे. काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांचा खून झाला होता. या प्रकरणामध्ये अनमोल बिश्नोईचं नाव मुख्य आरोपी म्हणून समोर आले होते.
मुंबई : ‘विवेक पार्क फाऊंडेशन’द्वारा संचालित ‘पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ (पार्क) तर्फे नुकताच तयार करण्यात आलेला पॉक्सो कायदा, २०१२च्या ( POCSO Act ) सद्यस्थिती आणि आवश्यक जनजागृतीविषयीचा सविस्तर अहवाल ‘पद्मश्री’ अॅड. उज्ज्वल निकम यांना आज पार्कचे संस्थापक-संचालक किरण शेलार यांनी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सादर केला. यावेळी पार्कच्या मुग्धा महाबळ-वहाळकर, अॅड. नियती शेंडगे आदी उपस्थित होत्या. ‘लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२’ अर्थात पॉक्सो कायद्याबाबत आज समाजात असलेल्या जागृतीबाब
पीएफआय आणि आयएसआयसारख्या अतिरेकी संघटनांप्रमाणेच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवर बंदी आणा आणि सज्जाद नोमानीला अटक करा, अशी मागणी भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. तसेच हमारा निशाना महाराष्ट्र नही, तो दिल्ली है,' असे वक्तव्य केले. यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली.
अभिनेता सलमान खान याला गेले अनेक दिवस बिश्नोई गॅंगकडून धमक्यांचं सत्र सुरुच आहे. यातल्या काही धमक्या तपासाअंती फक्त खोडसाळपणा असल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी काही बाबतीत मुंबई पोलीस तपास करून धमकी देणाऱ्यांच्या मागावरही आहेत. आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आल्यामुळे मुंबई पोलिसांची चिंता आणखी वाढली आहे. यासंदर्भात पुन्हा एकदा वरळी पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून सलमान खानला गेले अनेक महिने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. काळवीट शिकार प्रकरणी या दोघांमध्ये हे वाद जवळपास २० वर्षांपासून सुरु आहेत. दरम्यान, सलमान खाननंतर आता शाहरुख खानला देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्याबद्दल बांद्रा पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. आणि त्याबद्दल पोलिसांना अधिक माहिती मिळाली असून तो आरोपी छत्तीसगढमधील रायपूरचा असल्याचा पोलिसांना संशय आहे. सदर प्रकरणाच्या पुढील कारवाईसाठी पोलिस रायपूरला रवाना झाले आहेत.
मुंबई पोलिसांना ४ नोव्हेंबरच्या रात्री एक धमकीचा मेसेज आला आहे. यात सलमान खानला जर जीवंत राहायचे असेल तर त्याने मंदिरात येऊन माफी तरी मागावी किंवा ५ कोटी रूपयांची खंडणी द्यावी असे म्हटले आहे. या आठवड्यात सलमानला आलेली ही दुसरी धमकी आहे. माध्यामांना मिळलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला काल रात्री व्हॉट्सॲपवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचा हा संदेश आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई गॅंगकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच प्रकरणामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. आणि त्यांच्या हत्येनंचर वारंवार मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर सलमान खानला मारण्याच्या धमक्यांचे मेसेज येत आहेत. काही दिवसांपूर्वीच एक धमकी आली होती त्याविरोधात वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा दुसरी धमकी आली असून धमक
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई गॅंगकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता पुन्हा एकदा दुसरी धमकी आली होती आणि यात धमकी देणारा स्वत:ला बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे म्हणाला होता. या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सलमान खानच्या नावाने ट्रॅफिक पोलिसांना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून, तो कर्नाटकचा आहे. विक्रम असं या व्यक्तीचं नाव असून कर्नाटक पोलिसांनी विक्रमला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांचं पथक ६ नोव्हेंबर २०२
अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देत दोन कोटींची मागणी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून एकदा तसा प्रयत्न करण्यात देखील आला होता. दरम्यान, नुकतीच त्याला ज्या इसमाने धमकी दिली होती त्याने २ कोटींची मागणी केली होती. तो आरोपी आझम मोहम्मद मुस्तफा वांद्र्याचा रहिवासी असून त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
अभिनेता सलमान खानच्या जीवाला धोका असून वारंवार त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच प्रकरणामुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती आणि त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत अधिक वाढ देखील करण्यात आली. मात्र, आता पुन्हा एकदा सलमानला धमकी आली असून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने २ कोटींची मागणी केली आहे.
Salman Khan बॉलिवूडचा दबंग खान अभिनेता सलमान याला काही दिवसांआधी लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्याचा जीव वाचवायचा असेल तर लवकरात लवकर २ कोटी रुपय द्यावी असा मेसेज सध्या मुंबई पोलीसांना पाठवण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबा सिद्दीकींवर झालेल्या गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर आता लॉरेन्स बिश्नोईबाबत न माहिती असलेल्या घटना आता समोर येत आहेत. लॉरेन्स बिश्नोई यांने तुरूंगात असताना दिलेल्या मुलाखतीप्रकरणी पंजाब सरकारने मोठी कारवाई केली आहे. याप्रकऱणात दोन उपअधीक्षकांसह एकूण सात पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या ड्युटीवेळी केलेल्या कामगिरीत केलेला हलगर्जीपणा तपास पथरकाच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची गँग देशभर चर्चेत आली आहे. बाबा सिद्दीकीने सलमान खानशी मैत्री असल्यामुळे त्याला याचे परिणाम भोगावे लागले असे बिश्नोई गँगने सांगितले आहे. अशातच, आता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मारण्याची धमकी दिली आहे.
सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या वादामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. आणि त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदत क्रमांकावर पुन्हा सलमान खानला जीवे मारण्याचा संदेश आला होता. दरम्यान, आता धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीतील वाद मिटवण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी झारखंडमधील एका २४ वर्षीय तरूणाला वरळी पोलिसांनी अटक केली आहे.