उल्हासनगर : विधानसभा मतदारसंघ १४१ मध्ये भाजप आणि महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी ( Kumar Ailani ) हे ८२ हजार, २३१ मते मिळवून विजयी झाले आहेत. निकाल आल्यापासून आमदार आयलानी यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांची आमदार कार्यालयात रीघ लागली आहे. या विजयाचे श्रेय शहरातील जनता, भाजप व मित्रपक्षांचे कार्यकर्ते आणि विशेषत: लाडक्या भगिनी व तरुण मतदारांना त्यांनी दिले आहे.
Read More
उल्हासनगर : उल्हासनगर १४१ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कुमार आयलानी ( Kumar Ailani ) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार ओमी कलानी यांचा दणदणीत पराभूत करून ३० हजार, ७५४ मताधिक्याने विजय संपादन केला. मतमोजणी सुरू झाल्यापासून कुमार आयलानी आघाडीवर होते. त्यांना एकूण ८२ हजार, २३१ मते तर राष्ट्रवादी तुतारीचे उमेदवार ओमी कलानी यांना ५१ हजार, ४७७ मते मिळाली. मनसे ४ हजार, ९६९ वंचित ७ हजार, ४७३ तर नोटाला १ हजार, ७५९ मते मिळाली.
Kumar Ailani : स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला निवडून द्या! : उल्हासनगर मतदारसंघ हा बहुभाषिक मतदारसंघ आहे. या शहराचा विकास करण्यासाठी पुन्हा एकदा विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना महायुतीने संधी दिली आहे. आयलानी यांचा निवडणूक अजेंडा काय आहे, याबद्दल मुंबई तरुण भारत ने त्यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी शहराच्या विकासासाठी स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
उल्हासनगर : उल्हासनगर मतदारसंघ हा बहुभाषिक मतदारसंघ आहे. या शहराचा विकास करण्यासाठी पुन्हा एकदा विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना महायुतीने संधी दिली आहे. आयलानी यांचा निवडणूक अजेंडा काय आहे, याबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्यांच्याशी बातचीत केली. शहराच्या विकासासाठी यावेळी ‘स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला निवडून द्या’, अशी भूमिका आमदार कुमार आयलानी ( Kumar Ailani ) यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ सोबत बोलताना व्यक्त केली.
उल्हासनगर : उल्हासनगरच्या स्थानिक राजकारणात वेगळी ओळख असलेले साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कुमार आयलानी Kumar Ailani यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
उल्हासनगरमध्ये लवकरच मेट्रो धावणार असून शहरवासीयांना मेट्रोमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. नुकतीच भाजप आ. कुमार आयलानी यांनी यासंदर्भात माहिती दिली. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस आले होते. तेव्हा त्यांनी शहरवासीयांना उल्हासनगरपर्यंत मेट्रो आणणार असल्याचा शब्द दिला होता. हा शब्द त्यांनी खरा करून दाखवला आहे. मेट्रोला मान्यता मिळाल्याने आ. कुमार आयलानी यांनी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
सातत्याने लोकांमध्ये राहणार व लोकोपयोगी कामे करणारा नेता म्हणून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे पाहिले जाते. मतदारसंघातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचला पाहिजे ही तळमळ घेऊन ते काम करतात. त्यामुळे त्यांची वाटचाल ही नेते पदापासून लोकनेते पदाकडे चालली आहे. लोकनेता कोणाला होता येत नाही, कारण जनता लोकनेता करत असते, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. यावेळी आयोजीत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करून फडणवीस यांनी जोरदार बॅटींग केली.
उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. महापालिका आणि शासन मिळून उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरमधील सेंच्युरी मैदानात आयोजित या कार्यक्रमात दिली .उल्हासनगर महानगरपालिकेच्या खडे गोळवली येथील मलशुद्धीकरण केंद्र, ग्रीन उल्हास ई चार्जिंग केंद्र, श्वान निर्बिजीकरण केंद्र, दिव्यांगासाठी संगणक प्रणाली, प्लॅस्टिक क्रशिंग मशीन या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोह