मुंबईत पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारत हवामान विभागाने वर्तवला आहे. गेले काही दिवस शहरात पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी २८मे रोजी पावसाचे प्रमाण कमी झाले. सांताक्रूझ वेधशाळेत १ मिमी आणि कुलाबा वेधशाळेत १७ मिमी पावसाची नोंद झाली.
Read More
यावर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्यामुळे तो दि. 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा दहा दिवस आधीच आहे. मात्र, मंगळवार, दि. 27 मे रोजीपासून मान्सूनच्या प्रवासाची वेग कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
(Gadchiroli Unseasonal Rain) राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीपार गेलेला आहे. तर दुसरीकडे काही शहरांना अवकाळीचा फटका बसला आहे. अशातच आता गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात गारांसह अवकाळी पाऊस झाला आहे.
चार वर्षांनंतर पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे संभाळली आहेत. सूत्रे हाती घेताच त्यांनी असंख्य निर्णयांचा धडाकाच लावला. हे निर्णय म्हणजे अमेरिकेतील यंत्रणाच समूळ बदलण्याचा पाया आहे.
हज यात्रेत उष्णतेच्या लाटेमध्ये आतापर्यंत 645 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तसेच, सौदी अरेबियातील एका अधिकार्याने सांगितले की, “यावर्षी हज यात्रेदरम्यान उष्णतेच्या लाटेमध्ये 68 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. ‘आम्ही सुमारे 68 मृतांची पुष्टी केली आहे. यातील अनेक वृद्ध यात्रेकरू होते. त्यामुळे यातील काही नैसर्गिक कारणांमुळे, तर काही हवामानाच्या परिस्थितीमुळे मरण पावले आहेत, असे आम्ही गृहीत धरतो,” असे अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एएफपीला सांगितले.
हज हा मुस्लिम धर्मीयांच्या पाच मोठ्या धार्मिक कार्यांपैकी एक आहे. आयुष्यात एकदा तरी सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना दरम्यान धार्मिक तीर्थयात्रा करणे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे. मात्र यंदा सौदी अरेबियात हज यात्रा पूर्ण करण्याच्या नादात लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कडक उन्हामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत २२ हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तर उष्माघातामुळे २७०० हून अधिक लोकांची अवस्था गंभीर आहे.
अभिनेता शाहरुख खान याने नुकतेच २० मे रोजी लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान कुटुंबासह केले होते. त्यानंतर अहमदाबाद येथे आयपीएलच्या मॅचसाठी गेला असता उष्माघातामुळे एकाएकी तब्येत बिघडल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात काल दिनांक २२ मे २०२४ रोजी दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती सुधारत असल्याचे त्याची मैत्रिण अभिनेत्री जुही चावला हिने सांगितले आहे.
राज्यासह देशभरात उसळलेल्या उष्णतेच्या लाटेने जागतिक तापमानवाढ आणि त्याच्या दुष्परिणामांची झळ यंदा अधिक तीव्रतेने प्रत्येकालाच बसलेली दिसते. तेव्हा, उष्णतेची लाट, त्यामागील तापमानवाढ, त्याचे परिणाम आणि उपाययोजना यांविषयी उहापोह करणारा हा लेख...
राज्यातील रेकॉर्डब्रेक उन्हाच्या झळांनी केवळ तापमानातच लक्षणीय वाढ झालेली नाही, तर उष्माघाताच्या बळींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. तेव्हा, ऋतुनुसार जीवनशैलीतील बदलांचा विचार करता, उन्हाळ्यात केवळ द्रवपदार्थांचे सेवन वाढवण्याबरोबरच अन्य पथ्येही पाळणे तितकेच गरजेचे. तेव्हा एकूणच उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाल्यापासून उन्हाच्या झळांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. यावर्षी ऑक्टोबर अधिक उष्ण असल्याचा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवले होते. तरी, संपूर्ण ऑक्टोबरच्या सरतेशेवटी २१ तारखेला मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशापर्यंत पोहोचले होते. हे या मोसमातील सर्वाधिक तापमान ठरले आहे.
सप्टेंबर महिन्यात धुवाँधार बरसात केल्यानंतर परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यात दडी मारली. परिणामी, उन्हाचा पारा चढला असुन हवेत आद्रता असल्याने ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढताच राहिला असुन गेले काही दिवस तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यत पोहचले आहे. सोमवारी ठाण्यात ३५.०६ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. तेव्हा, कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघाताचा (हीटस्ट्रोक) धोका वाढला आहे.
एखादी खोटी गोष्ट १०० वेळा सांगितल्यावरही ज्या प्रकारे खरी ठरत नाही, तशीच काहीशी गत सोशल मीडियावरील भ्रामक बातम्या आणि खोट्या मजकुराची! सोशल मीडियावर कितीही गरळ ओकली तरीही भ्रामक बातम्यांद्वारे जनमत बदलणार नाही, हे आता २० कोटी युझर्सच्या नुकत्याच केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झाले आहे. त्याचे आकलन...
खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला गालबोट लागलं. या सोहळ्यादरम्यान काही जणांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. त्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली.
राज्यात मे महिन्याच्या मध्यामध्ये जाणवणारा उन्हाचा चटका आता एप्रिलमध्येच जाणवू लागला आहे. एप्रिलमध्येच वातावरणातील आर्द्रता वाढल्याने बहुतांश शहरांतील तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडल्याने महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. याच पार्श्वभुमीवर शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याची सुट्टी आता दि.२१ एप्रिलपासूनच दिली जाणार आहे.
पाश्चात्य देश म्हंटले की, मस्त थंडी, बर्फ असे समीकरण. तसेच पाश्चात्य देशात म्हणजे अमेरिका-युरोप खंडाला निसर्गाने भरभरून दिले आणि तिथल्या लोकांनीही भौतिक विकास भरपूर केला. त्यामुळे पाणी, वीज मुबलक, त्या अनुषंगाने कसली ददातच नाही, असेही कित्येकांना वाटत असते. पण, हे असणे वाटणे म्हणजे कवीकल्पना म्हणू शकतो. कोरोनाची महामारी थोडी कमी होत असतानाच आता या दोन्ही खंडांवर निसर्गाची अवकृपा सुरू आहे. पूर, वादळ भूकंपासोबतच अवर्षण अर्थात दुष्काळाची गंभीर समस्या या खंडांना उद्ध्वस्त करत आहे.
धर्मांध मुस्लिमांकडे एखाद्या व्यक्तीची हत्या करण्याची धार्मिक ग्रंथांत सांगितलेली शेकडो कारणे असतात. त्यांची मानसिकताच ‘गुस्ताख-ए-रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा,’ या नार्याभोवती फिरत असते. विशेष म्हणजे, इस्लामी कट्टरपंथीयांकडून खुदा वा पैगंबराच्या अपमानाच्या नावाखाली जीवंत माणसाला मारून टाकण्याचे प्रकार आजचे नाहीत, तर त्याचा इतिहास इस्लामच्या जन्मापासूनचा आहे.
जागतिक पर्यावरण व्यवस्थेत महासागरांची भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे. जलचक्राचे होणारे व्यवस्थापन हे केवळ अन् केवळ महासागरांवर अवलंबून आहे. विविध उद्योग, दळणवळण, पर्यटन यात सागर व सागर किनारे यांचे महत्त्व वेगळे विशद करण्याची नक्कीच आवश्यकता नाही.
मुंबई(प्रतिनिधी): रविवार दि. ०५ जून हा गोंदिया आणि ब्रम्हपुरी शहरांसाठी या हंगामातील सर्वात उष्ण दिवस होता. या शहरांमध्ये कमाल तापमान ४६.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. तर नागपूर आणि वर्ध्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस इतके होते. या उलट दक्षिण कोकण, कोल्हापूर, सांगली, आणि सातारा येथे पूर्वमौसमी पावसाने हजेरी लावली आहे.
अतिउष्ण तापमान आणि सतत भासणारे पाण्याचे दुर्भीक्ष्य यामुळे पश्चिम भारतातील जनतेला अतोनात हाल सहन करावे लागत असे. रोजच्या वापरासाठी मैलोन्मैल चालत जाऊन हंडाभर पाणी आणावे लागत असे. अशावेळी तेथील स्थानिक राज्यकर्त्यांनी लोकहितार्थ अनेक ‘पुष्करणी’ निर्मित केल्या. या पुष्करणींचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न...
हवामान खात्याने राजधानी दिल्लीत गडगडाटासह वादळाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज सकाळी दिल्लीवर ढगाळ आकाश आहे. ज्यामुळे तापमानाचा पारा काही अंशांनी खाली येऊ शकणार आहे. यामुळे दिल्ली वासियांना उष्णतेपासून तात्पुरता आराम मिळेल.
आपले शरीर हे जगातील सर्वात सुंदर, बरेचसे किचकट आणि छान अचूकता असलेले यंत्र आहे. शरीरातील असंख्य पेशी आपले कार्य पार पाडत असतात.
यावर्षी मार्च महिना खूपच उष्ण होता आणि एप्रिल महिना देखील असाच गेला. 2022 ने उष्णतेचा जणू कहरच केला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून भारताने चार उष्णतेच्या लाटा सहन केल्या आहेत. यावर्षी उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताने 122 वर्षांतील सर्वात उष्ण एप्रिल महिना अनुभवला. त्यानिमित्ताने भारतातील उष्णतेच्या लाटांचा आढावा घेणारा हा लेख..
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यात मुंबईचे तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. तसेच मुंबई आणि उपनगरात पुढील महिन्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वायव्य तसेच मध्य भारत आणि ईशान्येकडील काही भागांमध्ये या महिन्यात कमाल तापमान नेहेमीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
येत्या 24 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा
३० जून पर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश
मुंबईसह राज्यातील तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. राज्यातल्या बऱ्याच भागांतील कमाल तापमानात १९ मे पासून वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक काळ घराबाहेर राहिल्यामुळे हिट एक्झॉर्शन आणि सनबर्नचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच या दोन्ही संदर्भात प्रथमोपचाराची माहिती करुन घेणे आवश्यक आहे.
ऑक्टोबर महिना सुरू झाला की उकाडा जाणवू लागतो. उन्हाळा वर्षात दुसऱ्यांदा सुरू झाला की काय असे वाटू लागते. या हीटचा सामना करण्यासाठी करा हे उपाय....
गेल्या तीन दिवसांमध्ये वाढलेल्या तापमानामुळे काल जिल्ह्यातील एका महिलेचा सरपंचाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून सावध करण्याची गरज निर्माण झाली आहे.