मागील काही दशकांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय आखाड्यात जेवढा संवेदनशील झाला आहे तेवढाच तो न्यायालयीन दृष्टीने किचकट बनला आहे. २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांआधारे आरक्षण दिले होते, परंतु ते मे २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक ठरवले. याबाबत महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, जी एप्रिल २०२३ मध्ये फेटाळण्यात आली. त्यानंतर, एक उपचारात्मक याचिका (Curative Petition) दाखल करण्यात आली, जी सध्
Read More
7 जून रोजी ईद निमित्त नमाज अदा करण्यासाठी ऑगस्ट क्रांती मैदान या ऐतिहासिक स्थळी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक असलेल्या या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना सदर मागणी फेटाळण्याची विनंती केली आहे.
तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व इतर अधिकारी उपस्थित होते.
(Hearing on petitions challenging the Waqf Act on May 15) सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ‘वक्फ (सुधारणा) कायदा, 2025’ला आव्हान देणार्या याचिकांची सुनावणी गुरुवार, दि. 15 मे रोजी भारताचे नियुक्त सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ठेवली आहे.
राज्यात मृत पाळीव प्राण्यांना इतरत्र टाकले जाते. परिणामी दुर्गंधी आणि आजार फैलावतात. यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने सर्व मृत पाळीव प्राण्यांना अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
( 11 petitions filed in Supreme Court challenging Waqf Act ) केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा कायद्याविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डासह (एआयएमपीएलबी) ११ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी वक्फ सुधारणा कायद्यास राज्यांनी विरोध करणे हा भारतीय राज्यघटनेसोबत द्रोह आहे, असे भाजप खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सुनावले आहे.
( court verdict on Kunal Kamras prearrest petition ) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मुंबईत दाखल झालेल्या एफआयआर संदर्भात कुणाल कामरा यास देण्यात आलेले अंतरिम संरक्षण मद्रास उच्च न्यायालयाने १७ एप्रिलपर्यंत वाढवले आहे.
(Kunal Kamra) स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शोदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यातून केलेल्या टिप्पणीमुळे कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. याच प्रकरणी शनिवारी ५ एप्रिल रोजी त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्याच्याविरुद्ध केलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. त्याच्या याचिकेवर मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी तातडीची सुनावणी होणार आहे. मात्र, अंतरिम संरक्षणासाठी कामरा याने संबंधित
दिशा सालियानच्या वडीलांच्या याचिकेत नेमकं काय?
( Disha Salian was murdered after being gang-raped Reinvestigate again Father Satish Salian files petition in High Court ) दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
( Supreme Court on Anand Legal Aid Forum Trust ) नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर दि. 15 फेब्रुवारी रोजी 200 जण दगावल्याचा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, दि. 28 फेब्रुवारी रोजी फेटाळून लावली आहे. तसेच, या दुर्घटनेत 200 जण दगावल्याचे पुरावे देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
कतारचे अमिर शेख तमिम बिन हमाद अल थानी यांचा दोनदिवसीय भारत दौरा नुकताच पार पडला. २०१५ सालानंतर ते पहिल्यांदाच भारतात आले. त्यांचे स्वागत करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी राजनयिक शिष्टाचार दूर सारून स्वतः विमानतळावर गेले होते. त्यानिमित्ताने भारत-कतार परराष्ट्र संबंधांचा ऊहापोह करणारा हा लेख...
मृत्यू हा कायमच मानवासाठी कुतुहलाचा विषय राहिला आहे. माणूस मरतो म्हणजे नेमके काय होते? हा विज्ञानालाही पडलेला प्रश्न आहे. वैज्ञानिक भौतिक जगतात याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा शरीरातील क्रियांमधील बदलापर्यंत ते पोहोचतात देखील. मात्र, त्याच्यापलीकडील अनुभवांवर डॉ. पीटर फेनविक यांनी बाबत संशोधन केले त्याविषयी...
(Same-Sex Marriage Verdict) समलैंगिक जोडप्यांना लग्न करण्याचा किंवा नागरी संघटना स्थापन करण्याचा अधिकार मान्य करण्यास नकार देणाऱ्या ऑक्टोबर २०२३ च्या निकालाला आव्हान देणाऱ्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावल्या आहेत.
मुंबई : घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग ( Ghatkopar Hording Accident ) कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर तब्बल सात महिन्यांनी सहआरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेने सोमवार, दि. ३० डिसेंबर रोजी लखनऊ येथून व्यावसायिक अरशद खान याला अटक केली.
मुंबई : मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास ( Dharavi Redevelopment ) प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडला दिलेली निविदा मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी कायम ठेवली आहे.
पुण्याच्या कसबा पेठेतील ( Kasaba Peth ) विधानसभेची पोटनिवडणूक राज्यभरात गाजली होती. भाजपचा गड काबीज केल्याने काँग्रेस आणि रवींद्र धंगेकर आता पुणेकर आपल्याच पाठीशी या अभिर्भावात होते. मात्र त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणूक आणि आता विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी धंगेकरांना सपशेल नाकारलं. आणि हेमंत रासने यांच्या रूपात भाजपने आपला बालेकिल्ला या विधानसभा निवडणुकीत कायम राखला. यानिमित्ताने जाणून घेऊया की पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या धंगेकरांना पुणेकरांनी का नाकारलं
( Jammu - Kashmir Assembly ) जम्मू - काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाने नायब राज्यपालांद्वारे जम्मू आणि काश्मीर विधानसभेसाठी पाच सदस्यांच्या नामनिर्देशनाच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका स्वीकारली आहे. त्याचवेळी न्यायालयाने नामनिर्देशनाला स्थगिती देऊन अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे.
केंद्र सरकारने देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेल्यावरील विंडफॉल करात मोठी कपात केली आहे. कच्च्या तेलावरील विंडफॉल कर ४,६०० रुपये प्रति टनावरून २,१०० रुपये प्रतिटन केला आहे.
पाकिस्तान सरकारने इंधनदरात मोठी कपात करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पेट्रोलच्या किमतीत ८.४७ रुपयांनी तर हाय स्पीड डिझेलच्या(एचएसडी) किमतीत ६.७ रुपयांनी कपात करण्यास मंजुरी दिली आहे.
मराठी रंगभूमीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. काही नवी नाटकं तर काही जुनी नाटकं पुर्नजिवित्त करुन त्याचे सादर केले जाणारे प्रयोग प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. अशा अनेक अजरामर नाटकांपैकी एक नाटक म्हणजे १९९० ते २००० पर्यंत दबदबा राखणारं नाटक चारचौघी. आणि ३१ वर्षांनंतर नव्या कलाकारांसह दमदार कमबॅक करणारं 'चारचौघी' हे नाटक आता पुन्हा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, डिसेंबर,२०२३ अखेरीस राज्यात ३ लाख ९४ हजार ३३७ बॅटरी इलेक्ट्रोनिक वाहनांची नोंदणी झाली आहे.
कवयित्री व साहित्याच्या अभ्यासिका डॉ. अरूणा ढेरे यांना 'लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव सन्मान' जाहीर करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार ढेरे राजारामबापू पाटील ललित कला अकादमीच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अकादमीचे निमंत्रक आणि राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य कवी प्रा. प्रदीप पाटील यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
अभिनेता कार्तिक आर्यन याची पर्मुख भूमिका असणारा चंदु चॅम्पियन हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. भारताला पॅरालॉम्पिकमध्ये पहिले सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांचे जीवन या चित्रपटात दाखवले आहे. सर्वच स्तरांतून या चित्रपटाचे कौतुक होत असताना आता माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. कपिल देव अनेकदा स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या चित्रपटांना पाठिंबा देत असतातच. या वेळेस तर चित्रपट पाहून त्यांचे अश्रू अनावर झाले होते.
काँग्रेसशासित कर्नाटकात राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर अवाजवी कर लावला आहे. यासोबतच पेट्रोलचा दरही १०२.८५ रुपये प्रतिलिटर झाला आहे. वृत्तानुसार, कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील विक्री कर अनुक्रमे ३ रुपये आणि ३.२० रुपयांनी वाढवला आहे. या आदेशानुसार पेट्रोलवरील विक्रीकर २५.९२% वरून २९.८४% आणि डिझेलवर १४.३४% वरून १८.४४% करण्यात आला आहे.
सौदी अरेबियाने अमेरिकेसोबतचा ५० वर्षांपासून सुरू असलेला करार रद्द करत, अमेरिकेला चांगलाच दणका दिला आहे. ‘पेट्रोडॉलर करार’ असे त्याचे नाव असून, यामुळे सौदी अरेबिया कोणत्याही चलनात तेल विकू शकतो.
सरकारने पेट्रोलियम व कच्च्या तेलाच्या उत्पादनावरील विंडफॉल कर (Windfall Tax) मध्ये मोठ्या प्रमाणात घट केली आहे. सरकारने शुक्रवारी या संदर्भात आपले निवेदन स्पष्ट केले आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की करात कपात करत ५२०० प्रति मेट्रिक टनावरून किंमत कमी करत ३१५० रुपयांवर कमी करण्यात आली आहे.
अभिनेता कार्तिक आर्यन याची प्रमुख भूमिका असणारा ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट १४ जूनला प्रदर्शित झाला. भारताला पॅरालॉम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांच्या खऱ्या आयुष्यावर या चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता आरोह वेलणकर, अभिनेत्री हेमांगी कवी अशा काही मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. यात आणखी एका मराठी कलाकाराने भूमिका साकारली असून त्याने आपल्या भावना सोशल मिडियावर व्यक्त केल्या आहेत.
अभिनेता कार्तिक आर्यन अभिनित पहिला बायोपिक 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला ९ जूनपासूनच सुरुवात झाली आहे. परंतु, दोन दिवसात अपेक्षित तिकिट खरेदी न झाल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवार संध्याकाळ पर्यंत केवळ ७६२४ तिकिटांची विक्री झाली होती.
दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्यात जामीनावर सुटलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दि. २८ मे २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या आरोग्य तपासणीसाठी अंतरिम जामीन सात दिवसांनी वाढवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार, दि. २१ मे २०२४ कलम ३७० वरील निर्णयाबाबत दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकांमध्ये दिलेला युक्तिवाद स्वीकारण्यास नकार देत त्या फेटाळून लावल्या. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या पाच सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. खंडपीठाने म्हटले की, याचिकांची तपासणी केल्यानंतर, यापूर्वीच्या निर्णयात कोणतीही त्रुटी आढळत नाही. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांच्या आधारे याचिका फेटाळली जाते.
भारताच्या इतिहासात अनेक अनसीन हिरो आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुरलीकांत पेटकर. अभिनेता कार्तिक आर्यनचा आगामी चंदु चॅम्पियन हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भारताचे पहिले पॅराऑलम्पिक विजेता मुरलीकांत पेटकर यांचा जीवनपट उलगडला जाणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात दोन मराठमोळे कलाकार झळकणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता आरोह वेलणकर आणि दुसरी अभिनेत्री हेमांगी कवी.
अकराव्या वर्षी खेळाडू म्हणून लष्कराच्या तालमीत सामील झालेले मुरलीकांत सुरुवातीला बॉक्सिंग खेळायचे. मात्र १९६५ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात पेटकर यांना अपंगत्व आले. मात्र मुळातच लढवय्या स्वभावाचे असलेल्या पेटकर यांनी कधीच हार मानली नाही. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यावरुन पेटकर यांनी बॉक्सिंगला रामराम करत जलतरणाकडे आपला मोर्चा वळवला आणि आपल्या प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर मुरलीकांत पेटकर यांनी पॅरालिम्पिक प्रकारात भारताला जलतरण स्पर्धेत पहिलं सुवर्णपदकही मिळवून दिलं.. पेटकर यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवास
मंगळवार, दि. ९ एप्रिल रोजी जेव्हा आपण गुढीपाडवा साजरा करत होतो, तेव्हा विज्ञानजगतात एक दुःखद बातमी पसरली. युनायटेड किंग्डममधील एडिनबर्ग शहरातील विद्यापीठाने त्या दिवशी असे जाहीर केले की, त्यांच्या विद्यापीठातील एमिरेट्स प्रोफेसर पीटर हिग्ज यांनी वयाच्या ९४व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. पीटर हिग्ज हे एक नामवंत भौतिक शास्त्रज्ञ होते. विशेषतः सैद्धांतिक भौतिकशास्त्रात त्यांना फार वरचे स्थान होते. त्यांच्या निधनाने विज्ञानजगताची मोठी हानी झाली आहे. अनेक देशांतील वैज्ञानिकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त क
महाराष्ट्र बाजार पेठ परिवार तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा २०२४ आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा सोमवार, दि. ११ मार्च २०२४ रोजी माटुंगा कलचरल हॉल आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान स्त्रियांना स्त्री सन्मान पुरस्कार देण्यात आला. ट्रॉफी, सन्मान पत्र, पैठणी साडी, पुष्प गुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप होते. हा पुरस्कार ३५ महिलांना देण्यात आला.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने विदेशी पाळीव वन्यजीवांचा ताबा आणि त्यांच्या प्रजननासंबंधीचे नियम अधिसूचित केले आहेत (exotic pet). 'वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२'च्या कलम ४९ एम अंतर्गत हे नियम तयार करण्यात आले आहेत (exotic pet). त्यानुसार 'वन्यजीव संरक्षण कायद्या'च्या क्षेणी ४ मध्ये 'सायटीस'अंतर्गत संरक्षित करण्यात आलेले प्राणी जर तुम्ही पाळत असाल, तर त्यांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. (exotic pet)
हल्दवानी येथे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिका आणि पोलिसांच्या पथकावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. पोलिस सातत्याने दंगलखोरांना अटक करत आहेत. हल्दवानी हिंसाचाराच्या वेळी दंगलखोरांना बॉम्ब बनवण्यासाठी पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पेट्रोलही जप्त केले आहे. पेट्रोल बॉम्ब बनवणाऱ्यांनाही पोलिसांनी पकडले आहे.
महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ने सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी ३इव्ही इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीमध्ये ९६ कोटींचे समभाग ओतण्यासाठी त्या कंपनीबरोबर शेअर सबस्क्रिप्शन करारावर (एसएसए) सह्या केल्या. ही गुंतवणूक जी साखळ्यांमध्ये केली जाणार आहे, सामान्य क्लोजिंग तरतूदींच्या अधीन आहे. पहिली साखळी या महिन्याच्या अखेरीला गुंतवली जाणे अपेक्षित आहे.
काहींचे विचार मुळातच इतके विखारी का असतात? इतरांबद्दलची पराकोटीची नकारात्मकता आणि द्वेषभावना याने साध्य काय होते? अशा विषपेरणी करणार्या माणसांना नेमके कसे ओळखावे? त्यांच्यापासून दूर कसे राहावे? त्याचेच हे मनोविश्लेषण...
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. यातच आता एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंबंधी दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका स्विकारली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणप्रश्नी खुप मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील सरकार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या क्युरेटिव्ह पिटीशन ऐकण्याच्या संधींचा नक्की फायदा घेईल, असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. राज्य सरकारकडून दाखल करण्यात आलेली मराठा आरक्षणासंबंधी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकारली आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण प्रकरणी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २४ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
तांब्या-पितळेच्या जुन्या वस्तू जतन करण्याच्या, लोकांपुढे आणण्याच्या प्रयत्नांतून पुण्यातील संग्राहक गिरीश पोटफोडे यांनी त्यांचा संग्रह पाहण्यासाठी उपलब्ध केला आहे. त्यांच्याविषयी...
"काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी १.४१ लाख कोटी रुपयांचे तेल रोखे जारी करण्यात आले होते, ज्यासाठी मोदी सरकारने ३.५ लाख कोटी रुपये दिले आहेत." अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना दिली.
क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. या सुनावणीचा तपशील सादर झाला नसला, तरी आज संध्याकाळपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय कळवला जाण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना सिक्युरिटीज अपिलेट ट्रिब्युनल (एसएटी) कडून मोठा दिलासा मिळाला आहे. एसएटीने रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडच्या शेअर्समध्ये कथित फेरफार संबंधित प्रकरणात मुकेश अंबानी, नवी मुंबई एसईझेड आणि मुंबई एसईझेडने बाजार नियामक सेबीचा २०२१ चा आदेश रद्द केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लाभलेल्या कर्मयोगी पू. सरसंघचालकांच्या प्रेरणादायी नेतृत्वाच्या आणि अगणित कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा हिंदू राष्ट्र एकसंघ ठेवण्यामध्ये अमूल्य वाटा आहे.पू. डॉक्टरजी म्हणायचे की, “शरीर बलवान होण्यासाठी प्रतिदिन नियमितपणे व्यायाम करावा लागतो, त्याचप्रमाणे देशव्यापी प्रचंड शक्ती निर्माण होण्यासाठी राष्ट्रदेवतेची व्यापक प्रमाणावर ‘दैनंदिन उपासना’ करावी लागते.”याच दैनंदिन उपासनेसाठी, संघाची दोन ठिकाणं आहेत पहिलं म्हणजे दैनंदिन शाखा आणि दुसरे ठिकाण म्हणजे आपल्या सर्व कार्यकर्त्यांची मोत
वर्षांपूर्वी मोतीबागेत समोर दिसणारी, ती शेडही आम्हाला भारलेली जागा वाटायची. कारण, तेथेच आम्ही राष्ट्रीय पदाधिकार्यांची, श्रद्धेय मोरोपंत, बाबाराव भिडे, डॉ. वि. रा. करंदीकर यांची बौद्धिके ऐकली आहेत. प्रत्येक बौद्धिकात नवीन काही तरी मिळे. बाबांचे बौद्धिक दर शुक्रवारी असे. त्यांचे प्रत्येक स्वयंसेवकावर बारीक लक्ष असे. काही प्रश्नोत्तरेही होत. त्याकाळी मोतीबागेत विनायक महाराज, श्रीकृष्ण भिडे, दामुअण्णा, पहिल्याच खोलीत बसणारे आबा अभ्यंकर यांच्या भेटी होत.
देशातील एकंदर निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ७२ अब्ज डॉलर इतका. भविष्यात तो वाढण्यासाठी निर्यातीला चालना देणारे धोरण नुकतेच राज्य सरकारतर्फे मंजूर करण्यात आले. उद्योगधंद्यांना त्याचा थेट फायदा तर होईलच, त्याशिवाय रोजगार निर्मितीलाही बळ मिळेल. म्हणूनच निर्यातक्षम महाराष्ट्राला आकार देणारे हे धोरण महत्त्वाचे ठरावे.
समलिंगी जोडप्यांना विवाह करण्याचा किंवा नागरी संघटना स्थापन करण्याचा अधिकार मान्य करण्यास नकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या १७ ऑक्टोबरच्या निकालाला आव्हान देणारी पुनर्विलोकन याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालास आव्हान देणारी पुनर्विलोकन याचिका मूळ याचिकाकर्ते उदित सूद यांनी दाखल केली आहे.