(Satyapal Malik former J&K governor passes away at 79) जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले, यासंदर्भात त्यांचे वैयक्तिक सचिव केएस राणा यांनी सोमवारी ५ ऑगस्ट रोजी माहिती दिली. मलिक गेल्या काही आठवड्यांपासून मूत्रपिंडाशी संबंधित आजारावर उपचार घेत होते.
Read More
(Two Terrorists Killed In Operation Shivshakti) जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न भारतीय सैन्याने उधळून लावला. सीमेपलीकडून भारतात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा बुधवारी ३० जुलैला पहाटे केलेल्या कारवाईत खात्मा करण्यात आला आहे.
पहलगाम हल्ला करणारे दहशतवादी ठार, केंद्रीय गृहमंत्र्यांची लोकसभेत माहिती , पाकिस्तानला क्लीनचिट देणाऱ्यांनी प्रश्न विचारू नये , काँग्रेसला टोला सुरक्षा दलांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन महादेव’मध्ये पहलगाम हल्ला करणारे सुलेमान, अफगान आणि जिब्रान हे तिन्ही दहशतवाद्यांना ठोकण्यात आले आहे, असे प्रतिपादन देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मंगळवारी लोकसभेत केला आहे.
(Operation Mahadev: Three terrorist killed) जम्मू-काश्मीरच्या दाराजवळील लिडवास भागात सुरक्षा दलांनी ऑपरेशन महादेव अंतर्गत मोठी कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान तीव्र गोळीबारात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिली आहे. हे दहशतवादी पहलगाम हल्ल्याशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय लष्कर आणि जम्मू – काश्मीर पोलिसांच्या संयुक्त ‘ऑपरेशन महादेव’मध्ये सोमवारी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचाही समावेश असल्याचे समजते. दरम्यान, ‘ऑपरेशन महादेव’ सुरूच असल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले आहे.
भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी इस्त्राईलच्या संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक मेजर जनरल (निवृत्त) आमीर बराम यांची गुरुवारी भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्यासह क्षेत्रातील भू-सामरिक घडामोडींवर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेद्वारे भारत-इस्त्राईल द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करण्यावर भर देण्यात आला.
जम्मूमधील सुभाष नगर विस्तार-१ कॉलनीतील रहिवाशांनी सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर संस्कृत भाषेतील नामफलक बसवले आहे. भारतातील आणि कदाचित जगातील हे पहिले उदाहरण ठरले आहे, जिथे कॉलनीतील रहिवाशांनी एकत्रितपणे हे पाऊल उचलले आहे. स्थानिक रहिवाशांनी चालवलेल्या या उपक्रमाचे आधुनिक शहरी वातावरणात भारताच्या प्राचीन भाषिक आणि सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी एक धाडसी पाऊल म्हणून कौतुक केले जात आहे.
(PM Modi inaugurates Chenab Bridge) जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर तयार करण्यात आला आहे. या पूलामुळे काश्मीरचे खोरे देशाच्या इतर भागांशी जोडले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच असलेल्या या चिनाब पुलाचे शुक्रवारी ६ जून रोजी उद्घाटन केले आहे. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते. तसेच कटरा रेल्वे स्थानकावरून कटरा आणि श्रीनगरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी हिर
(Chenab Bridge) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार दि. ६ जून रोजी सकाळी ११ वाजता जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल अर्थात अंजी पुलाचेही उद्घाटन केले. तसेच कटरा रेल्वे स्थानकावरून कटरा आणि श्रीनगरला जोडणाऱ्या उधमपूर-कटरा-श्रीनगर-बारामुल्ला या रेल्वे मार्गिकेचे लोकार्पण केले. याच पार्श्वभूमीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाची वैशिष्ट्ये काय आहेत, हे जाणून घेऊया...
पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरला भेट दिली. यावेळी त्यांनी रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिजचे तिरंगा फडकावून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी अंजी ब्रिज आणि कटरा येथे काश्मीरची पहिली ट्रेन कटरा-श्रीनगर वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला.
देशात २०२७ ची जनगणना दोन टप्प्यात आणि जातींची गणना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२७ च्या जनगणनेसाठी संदर्भ तारीख १ मार्च २०२७ रोजीची असेल.
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या चार राज्यांमध्ये - गुजरात, राजस्थान, पंजाब तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये आजपासून नागरी संरक्षण मॉक ड्रिल पुन्हा सुरू होणार आहेत.
कलम 370च्या निरस्तीकरणानंतर जम्मूकाश्मीरचा बदलेलेला चेहरा जगाने अनुभवला. फुटीरतावाद्यांच्या नादी लागलेल्या तरुणाईच्या डोळ्यात उज्ज्वल भविष्याची स्वप्ने दिसू लागली. हे सारे एका रात्रीत झाले नाही. हा बदल होण्यासाठी जम्मूकाश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि केंद्र सरकार यांची प्रचंड मेहनत आहे. त्याचा या लेखात घेतलेला आढावा....
जम्मू आणि काश्मिरच्या राजौरी भागात दि. १० मे च्या पहाटे पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये भारतीय अधिकारी राज कुमार ठाकूर हुतात्मा झालेत. त्यांना तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यु झाला. हल्ल्यादरम्यान त्यांच्यासह असलेले दोन कर्मचारी देखील जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दाखविलेल्या सैन्यसामर्थ्यामुळे माघार घेऊन पाकिस्तानने अखेर भारताकडे सैन्य कारवाई थांबविण्याची विनंती केली. भारताने ही विनंती मान्य करून सैन्य कारवाई शनिवारी सायंकाळी ५ वाजेपासून थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी सोमवारी दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी दुपारी १२ वाजता पुढील चर्चा करणार आहेत. त्याचवेळी सैन्यकारवाई थांबविण्याची विनंती करूनही जम्मू – काश्मीरमध्ये पाकने गोळीबार आणि ड्रोनहल्ले केल्याचेही समोर आले आहे. बीएसएफने त्यास चोख प्रत्युत्तर दिले आहे.
'ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार! नागरिकांसाठी गृहमंत्र्यांनी जारी केले महत्वाचे निर्देश
पहलगाम दहशतवादी हल्लानंतर केंद्र सरकारने अनेक निर्देश जारी केले आहेत. ज्यात व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी २७ एप्रिलपर्यंत देश सोडावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे निर्देश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडे काही याचिकाकर्त्यांनी दावा केला की, त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड आहेत. यासंदर्भात शुक्रवार, दि.२ मे रोजी न्यायालयाने एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींच्या भारतीय नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी बुधवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याबाबत चर्चा केली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक सदानंद दाते गुरुवारी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे पोहोचले.
आता बालाकोट नाही तर पाकिस्तानवर अशी कारवाई करा की, असे हल्ले पुन्हा कधीही होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी दिली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी यावर भाष्य केले.
पहलगाम हल्ल्यातील दोषींना सोडणार नाही
पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या नक्षलवादी हल्या नंतर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मिर मध्ये मोठ्या प्रमाणात मोहिम राबवली.या कारवायात नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ हून अधिक साथिदारांना ताब्यात घेतले आहे. त्या बरोबरच जम्मू-काश्मिर मध्ये ठिकठीकाणी नाका बंदी करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीर पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या हल्या नंतर आज खोऱ्यात पुन्हा हिंसाचार झाला. कूपवाड्या जिल्ह्यात एका दहशतवाद्यांनी घरात घूसून सामान्य नागरिकाची हत्या केली.
२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमध्ये स्थित पहलगामच्या बैसारन व्हॅलीमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला असून एकूण २६ पर्यटकांना ठार मारण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर काही पर्यटक त्यांचा दौरा सोडून त्यांच्या देशात परतले. पण काही पर्यटक असे आहेत ज्यांना काश्मीरचे सौंदर्य एक्सप्लोर करायचे आहे म्हणून ते काश्मीरला भेट देत आहेत आणि काश्मीरच्या सौंदर्याबद्दल त्यांचे मत मांडत आहेत. असे चित्र [X] च्या माध्यमातून समजले.
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयित स्थानिक दहशतवाद्यांवर मोठी कारवाई सुरू आहे. पुलवामा हल्ल्यानंतर, लष्कराने शोपियान आणि कुलगाममध्ये दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत.
दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज
जम्मू-काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वसईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात भारतीय नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचा झेंडा जाळून जाहीर निषेध नोंदवला.
जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागात शुक्रवारी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अल्ताफ लाली ठार झाला आहे. सकाळपासूनच इथे शोधमोहिम सुरू होती. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी ही मोहिम अधिक तीव्र केली होती. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाल्यानंतर चकमक आणखी तीव्र झाली. यात अल्ताफ लाली मारला गेला.
पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार, २३ एप्रिल रोजी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
(Indus Water Treaty) मंगळवारी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलत पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या संरक्षणविषयक बैठकीत १९६० च्या 'सिंधू पाणी करार'स स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी भाजपतर्फे ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुंबई अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.
उत्तर मुंबई भाजपच्या निषेध मोर्चात कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मिरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात मंगळवारी ४ दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात काहींनी आपला नवरा गमावलाय, काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेत. काहींनी आपल्या डोळ्यांसमोर वडिलांना मारताना पाहिलंय. सैरभर पळणारे लोक, मृतांचा खच, रक्ताचे पाट, मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश, किंकाळ्या आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज या सगळ्या भयावह प्रसंगाचं वर्णन बचावलेल्या पर्यटकांनी स
केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत निषेध व्यक्त केला.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात पुण्यातील दोन, डोंबिवलीतील ३ आणि पनवेलमधील एकाचा समावेश आहे.
असल्या भ्याड कुरापती करणारे अतिरेकी आणि त्यांना पोसणारा पाकिस्तानची मस्ती उतरवली जाईल, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमधीली पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
धर्म विचारून गोळीबार करणे हे अतिशय निंदनीय असून समाजाला विभाजित करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Jammu and Kashmir मधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर २ दहशतवादी ढेर, पाकिस्तानातून भारतात करत होते अवैध घुसखोरी
Pahalgam जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २८ पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा पहिला स्केच आणि ग्रुप फोटो समोर आला आहे. आता संबंधित दहशतवाद्यांची स्केचद्वारे ओळख पटली असून त्यांची नावे आसिफ फौजी, सुलेमन शाह आणि अबू तल्हा अशी नावे आहेत. हे दहशतवादी द रेझिस्टंस फ्रंटचे असल्याचे सांगितले जात आहे. ही दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाचा सहयोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शीची चौकशी करण्यात आल्यानंतर हे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. सूत्रानुसार, केंद्रीय तपास संस्था, एनआयए आत
जम्मू - काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांचे रक्त सांडणाऱ्या दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या आकांवर लवकरच जोरदार हल्ला होईल, अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिली आहे.
दशतवाद्यांनी प्रथम हिंदू आहात का असे विचारले आणि त्यानंतर अतुल मोने यांना गोळ्या घातल्या, अशी धक्कादायक माहिती मृत मोने यांचे नातेवाईक राहुल अकुल यांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने तसे वृत्त दिले आहे.
Terrorists काश्मीरच्या पहलगाममध्ये भयानक दहशतवादी घटना घडल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई तसेच उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, देशात हिंदू-मुस्लिम असं सर्वकाही सुरू आहे. दहशतवाद्यांना अस्वस्थ वाटत आहे आणि म्हणूनच दहशतवादी त्यांची ओळख विचारपूस करत हत्या करत आहेत. त्यांनी सांगितले की, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा एक संदेश असून देशात मुस्लिम आणि अल्पसंख्यांकांना मोठी समस्या निर्माण होईल.
Kalma काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात एकूण २० हिंदूंवर गोळीबार करत दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. हा हल्ला मंगळवारी २२ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी करण्यात आला होता. यावेळी काहींनी कलमा पठण करत आपले प्राण वाचवले आहेत. आसाममधील एका प्राध्यापकाने कलमा वाचून कशापद्धीने आपले प्राण वाचवले याची आठवण करून दिली आहे.
Amit Shah केंद्र सरकार प्रगत तंत्रज्ञानासह सीमा सुरक्षा वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. त्याचप्रमाणे सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफच्या पाठिशी केंद्र सरकार भक्कमपणे उभे आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिली. जम्मू – काश्मीरमधील कठुआ येथील 'विनय' सीमा चौकीवरील बीएसएफ जवानांना संबोधित ते बोलत होते.
( Union Home Minister Amit Shah to visit Jammu and Kashmir ) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढील आठवड्यात जम्मू आणि काश्मीरला भेट देऊन तेथील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
जम्मू-काश्मीरमधील वेगवान विकासकामे पाहता, तेथील फुटीरतावादी गटांनीही आता विकासाची कास धरली आहे. कोणे एकेकाळी काश्मीर पेटवून देऊ, अशी वल्गना करणार्या फुटीरतवाद्यांनी मुख्य प्रवाहात सहभागी होणे, हे मोदी सरकारच्या यशस्वी काश्मीर नीतीवर शिक्कामोर्तब करणारेच. शिवाय फुटीरतावाद्यांशिवाय काश्मीरमधील पानही हलत नाही, या काँग्रेसच्या दाढी कुरवाळणार्या पूर्वापार धोरणालाही यानिमित्ताने कायमस्वरुपी सुरुंग लावला आहे.
Vande Bharat Railway भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचण्यासाठी वंदे भारत रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे. एप्रिल २०२५ मध्ये काश्मीर खोऱ्यात रेल्वे पाठवण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. देशातील आतापर्यंतचा हा सर्वात महत्त्वाचा आणि कठीण प्रकल्प पूर्ण करण्यात आला आणि तो इतर भागांशी जोडला गेलेला आहे. जम्मू काश्मीरला जाणारी पहिली वहिली रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस असेल अशी माहिती समोर आली आहे.
( AMIT SHAH On Separatism in Jammu and Kashmir is a historical fact ) जम्मू आणि काश्मीरमधील फुटीरतावादी संघटना ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सला मोठा धक्का बसला आहे. जम्मू काश्मीर पीपल्स मूव्हमेंट आणि डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मूव्हमेंटने हुर्रियत कॉन्फरन्सशी असलेले सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून ही संघटना खोऱ्यात निष्क्रिय झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचा विजय म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे असलेल्या एका हॉटेलमध्ये मद्यसेवन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याने ओरहान अवात्रमाणी उर्फ ओरी अवात्रमाणी कायदेशीर अडचणीत सापडला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या सात मित्रांसह उपस्थित असल्याचे दिसत आहे. या प्रकरणात जम्मू-काश्मीर पोलिसांनी ओरीसह आठ जणांवर भारतीय न्याय संहिता (BNSS) च्या कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच सर्वांना चौकशीसाठी नोटीस पाठवली जाणार आहे.
Jammu and Kashmir केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील अवामी कृती समिती, जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन या दोन संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच हा निर्णय ११ मार्च २०२५ रोजी घेण्यात आला असून ज्यात त्यांना UAPA १९६७ या कलमांतर्गत त्यांना बेकायदेशीर असल्याचे घोषित करण्यात आले. एएसीचे नेते मिरवाईज उमर फारूख आहेत आणि जेकेआयएमचे नेते मसरुद अब्बास अन्सारी आहेत.