श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके हे सध्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान सायबर सुरक्षेसह चार महत्वाच्या विषयांवर श्रीलंका करार करणार असल्याचे बोलले जात आहे. परराष्ट्रमंत्रालयाचे सचिव रणधीर जयस्वाल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर अध्यक्ष दिसानायके यांची ही पहिलीच भारत भेट आहे. या भेटी दरम्यान ते पंतप्रधान मोदी यांची भेट घेत द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा कर
Read More
संयुक्त राष्ट्र संघटनेत जम्मू – काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारताने पुन्हा एकदा चांगलेच सुनावले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.
कुवैतमधील मंगफ येथे एका इमारतीला लागलेल्या आगीत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये भारतीय लोकांचा समावेश असून ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दक्षिण मंगफमधील आग दुर्घटनेत मृत पावलेले भारतीय केरळचे असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका न्यायाधीशाचा कुत्रा बेपत्ता झाला. उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका न्यायाधीशाने शेजारी राहणारा डंपी अहमद आणि १४ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. या एफआयआरमध्ये पीडित न्यायाधीशाच्या मुलींसोबत मारहाण आणि गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला आहे. न्यायाधीश हे लखनऊला राहतात पण त्यांचे कुटुंबिय बरेलीला राहते.
लहान तोंडी मोठा घास घेतला की, तो घशात अडकणारच! मालदीवनेही आपल्या लहान तोंडात भारताला दुखावण्याचा असाच मोठा घास घेतला असून, त्यामुळे त्याच्या श्वासाला घरघर लागली आहे. केवळ पर्यटकांवर अवलंबून असलेल्या, या बेटसमूहाची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप भेटीनंतर डबघाईला येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शत्रूला केवळ लष्करी हल्ल्यांनीच नामोहरम केले जाते असे नव्हे; कारण मोदी हे तर राजनैतिक डावपेचांनीही एखाद्या देशाला गुडघ्यावर आणू शकतात.
इस्त्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू असून भारताने इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन अजय' हाती घेतले आहे. भारत सरकारने सुरू केलेले हे लष्करी ऑपरेशन असून ही मोहीम दि. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झाली. या मोहिमेद्वारे होणारा सर्व खर्च मोदी सरकार उचलत आहे.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेला संबोधित केले. जगाला भेडसावणार्या समस्यांचा परामर्श त्यांनी घेतला. त्याचवेळी दहशतवादाचा मुद्दाही त्यांनी प्रभावीपणे मांडला. राजकीय सोयीनुसार दहशतवाद आणि अतिरेक्यांना प्रतिसाद असे धोरण असू नये, असे त्यांनी ठणकावून सांगितले. कॅनडाला दिलेले हे सणसणीत प्रत्युत्तरच!
भारताबाहेर फिरायला जायचं झाल्यास आधी कुठे जायचं? असा प्रश्न पडणे साहजिकच. मग अनेकजण आपल्याला निरनिराळ्या देशांची नावे सूचवतात. त्यापैकी एक आणि सर्वांचं आवडतं ठिकाण म्हणजे थायलंड.थायलंडला फिरायला जायचं म्हणजे विमान प्रवास आलाच. मात्र, आता थायलंडला फक्त विमानानेच नाही, तर स्वतःची गाडी घेऊन अगदी रस्त्यानेसुद्धा (बाय रोड) जाता येणार आहे.
भारतही अमेरिकेतील मानवाधिकारांविषयी चिंतीत - सुब्रह्मण्यम जयशंकर, परराष्ट्र मंत्री