Manipur मणिपूरमधील हिंसाचाराच्या सध्याच्या स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरचा दौरे का करत नाही? असा सवाल केला आहे आहे. या प्रश्नाने काँग्रेस नेता जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. हाच प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेसला नेत्याला मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी आरसा दाखवत प्रत्युत्तर दिले. बिरेन सिंह यांनी जयराम रमेश यांना उत्तर देत असताना सांगितले की, काँग्रेसने म्यानमारमधील घुसखोरांना राज्यामध्ये स्थायिक कसे होऊ दिले आणि म्यानमारमध्ये तळ ठोकून भारतात दहशत पसरवणाऱ्
Read More
राज्यसभेचे उपसभापती हरीवंश यांनी गुरूवारी, राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावरील अविश्वसाचा प्रस्ताव फेटाळला. या बद्दलचे स्पष्टीकरण देताना उपसभापती म्हणाले की विरोधीपक्षाने जाणीवपूर्वक उपराष्ट्रपतींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांना प्रसिद्धी मिळावी या हेतुने हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याच बरोबर या प्रस्तावामध्ये अनेक तांत्रिक चुका होत्या असे सुद्धा हरीवंश यांनी नमूद केले. स्वतंत्र भारातातील ही पहिलीच घटना आहे जिथे राज्यसभेच्या अध्यक्षांना पदच्युत्त करण्याचा प्रयत्न केला ग
(Indi Alliance) संसदेत सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर आता उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती यांच्याविरोधात काँग्रेसप्रणित इंडी आघाडीने अविश्वास प्रस्ताव आणला आहे. अविश्वास प्रस्ताव राज्यसभेच्या महासचिवांकडे मंगळवारी दुपारी सादर करण्यात आला असून त्यावर ६० सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दक्षिण भारतीय आफ्रिकी तर पूर्व भारतीय चिनी दिसत असल्याची मुक्ताफळेदक्षिण भारतीय आफ्रिकन दिसतात तर पूर्व भारतीय चिनी दिसतात, या ताज्या वक्तव्याद्वारे काँग्रेसला अडचणीत आणल्यानंतर अखेर बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाला पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर देशभरातून टिका सहन करावी लागली होती. त्यानंतर अखेर बुधवारी सायंकाळी पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती काँग्रेसचे माध्यमप्रमुख जयराम रमेश यांनी दिली.
सॅम पित्रोदा हे राहुल गांधींचे सल्लागार म्हणून ओळखले जातात. या सॅम पित्रोदांनी नेहमीच देशहिताच्या विरोधात भूमिका घेतली. आताही वारशांना केवळ ४५ टक्के इतकाच हक्क देणारा, अमेरिकी वारसा हक्क भारतात लागू करण्याची आवश्यकता पित्रोदांनी व्यक्त केली. देशभरातून त्यांच्या या व्यक्तव्याचा निषेध होऊ लागल्याने, काँग्रेसने हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हणत हात झटकले असले तरी यावरुन काँग्रेसची ‘शरीया’वादी मानसिकताच स्पष्ट होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 'इंडी' आघाडी उघडणाऱ्या काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच जाहीरनामा समिती स्थापन केली. मात्र, त्यात महाराष्ट्रातील एकाही नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या राज्यातील नेत्यांवर काँग्रेसचा 'भरवसा नाय का?', अशी चर्चा प्रदेश काँग्रेसच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
इंडी आघाडीची चौथी बैठक 19 डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नवी दिल्लीत पार पडेल. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी (10 डिसेंबर) ट्विट करत ही माहिती दिली. मात्र, 17 डिसेंबरपासून बैठक का पुढे ढकलण्यात आली, याचे कोणतेही कारण त्यांनी दिले नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला लालू यादव यांनी 17 डिसेंबर रोजी विरोधी गटाची बैठक होणार असल्याचे सांगितले होते.
जी -20 परिषदेला आज नवी दिल्लीत सुरुवात झाली आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात झाली. यावेळी बोलत असताना मोदी यांच्यासमोरील नेमप्लेटवर 'इंडिया' असा उल्लेख नव्हता. तर 'भारत' असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर या नावावरून चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान मोदी सरकार इंडिया नाव वगळून 'भारत' नाव फक्त कायम ठेवणार , अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
नवी दिल्ली : भारताच्या प्राचीन संस्कृती आणि ग्रंथांसाठी गीता प्रेसचे कार्य अतुलनीय आहे. त्यामुळे गीता प्रेसला २०२१ सालचा गांधी शांती पुरस्कार प्रदान करणे हा त्यांच्या भागिरथ कार्याचा सन्मान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले आहे.
प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा व त्याच्या चार साथीदारांना निर्दोष मुक्त करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा वादग्रस्त आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला. जी. एन. साईबाबावर दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप असून, त्याला नक्षल चळवळीचा ‘मास्टर माईंड’ असेच संबोधले जाते. त्यानिमित्ताने जी. एन. साईबाबा आणि एकंदर ‘शहरी नक्षलवाद’ याचा मागोवा घेणारा हा लेख...
नवी दिल्ली : पं. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना जनाधार असल्याने त्यांना धक्के पचविता आले. मात्र, सध्याच्या काँग्रेस नेतृत्वास अजिबात जनाधार नाही, असे प्रतिपादन डेमोक्रॅटिक आझाद पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी केले आहे. एका वृत्तसंस्थेस दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
प्रणव मुखर्जी यांनी आमंत्रण स्वीकारले हे योग्यच केले. शिवाय, पक्षातर्फे आलेल्या दबावाला ते बळी पडले नाहीत याबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन. अशी वैचारिक मोकळीक लोकशाहीचा आत्मा असतो हे विसरता कामा नये.