न्यायालयाचा अवमान करणे व शिक्षेच्या नावाने तमाशा करणे, हे पुन्हा एकदा सुरू झाले आहे. प्रश्न एवढाच राहतो की, मरणपंथाला लागलेल्या काँग्रेसला यामुळे संजीवनी तर मिळणार नाही ना?
Read More
'कलम ३५२'चा वापर करून इंदिरा गांधींनी 'अंतर्गत आणीबाणी' लागू केली आणि सर्व महत्त्वाच्या राजकीय विरोधकांना अटक केली होती. हे सर्व प्रकरण दि. १२ जून, १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सुरू झाले. म्हणूनच आज सुमारे ४६ वर्षांनीसुद्धा मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा यांना 'त्या' खटल्याची आणि त्या निर्णयाची आठवण काढावीशी वाटली. आज यानिमित्ताने त्या खटल्याची उजळणी करणे गरजेचे आहे.