वायएसआर पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिनांक २ डिसेंबर रोजी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि सक्तवसुली संचालनालय (ED) यांनी YSRCP अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्याविरुद्धच्या बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणांचा सर्वंकष तपशील सादर करण्याचे निर्देश दिले गेले आहे.
Read More
राज्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडलेले असतानाच एक आश्चर्यकारक घटना आंध्र प्रदेशात घडली आहे. आजवरच्या सर्वाधिक उच्च दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटो उत्पादकांना आर्थिक दिलासा देत असतानाच आंध्र प्रदेशातील टोमॅटो शेतकऱ्याचा नकळतपणे मृत्यू झाला आहे. दरम्यान, चढ्या दरामुळे दोन पैसे जास्त मिळण्याची आशा असताना एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. नरेम राजशेखर रेड्डी असे ६२ वर्षीय शेतकऱ्याची पाळत ठेवत काही लोकांनी ह्त्या केली.
माजी खासदार वायएस विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने दि.१६ एप्रिल रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांचे काका वायएस भास्कर रेड्डी यांना अटक केली आहे. विवेकानंद रेड्डी हे आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे भाऊ आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचे काका होते.
विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केली. आंध्र प्रदेशच्या राजधानीबाबत मोठा निर्णय जगन मोहन रेड्डी सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल. रेड्डी हे मंगळवारी विशाखापट्टणम येथे होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या पूर्वतयारी बैठकीत बोलत होते.
नितीन गडकरी महाराष्ट्रासाठी 'करोना वॉरियर' ठरत आहेत
चालू महिन्यातच हिंदू मंदिरांवरील हल्ल्याची आणि हिंदू देवी-देवतांच्या मूर्तिभंजनाची-तोडफोडीची अनेक प्रकरणे उघडकीस आली. तरीही सत्ताधार्यांनी त्यावर तोंड उघडले नाही. यावरूनच हिंदूंवरील अन्याय-अत्याचाराचा मुद्दा आला की, ठोस उपाययोजना करण्याऐवजी मुख्यमंत्री झोपा काढण्याचेच काम करत असल्याचे दिसते.
जगन मोहन रेड्डी यांचे सरकार हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेत असल्याची चर्चा होत होतीच. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अंतरवेदी येथे रथ जाळण्याची जी घटना घडली, त्यामुळे या घटनेस पुष्टी मिळत असल्याचेच दिसून येत आहे.
आंध्र प्रदेशमधील जगनमोहन सरकारने खासगी क्षेत्रात ७५ टक्के आरक्षण जाहीर करुन भारतीय राजकारणात आणि समाजकारणात एक नवीन पायंडा घातला. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून याच धर्तीवर सत्तेत आल्यास आरक्षण देण्याची गोष्ट पुढे केली. परंतु, ही मागणी नवीन नसून जुनीच आहे.
मे २०१९ मध्ये झालेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकांत भाजपने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाच्या झगमटात लोकसभेबरोबर आंध्र प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांची तितकीशी चर्चा झाली नाही. आंध्र प्रदेशातील जनतेने एका बाजूला चंद्राबाबू नायडू, भाजप व कॉंग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांनासुद्धा नाकारले आणि तेथील जनतेने जगनमोहन रेड्डी या तरुण नेत्याच्या पक्षाला भरभरून यश दिले.
आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेस पक्षाने नायडूंच्या तेलगू देशम पक्षाला धोबीपछाड दिला आहे.
वायएसआर काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी आणि टीआरएसचे अध्यक्ष तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाळीव कुत्रे असल्याचे चंद्राबाबू यांनी म्हटले