आसाम सरकारच्या वतीने गठित केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या कथित पाकिस्तान कनेक्शनबाबतची चौकशी पूर्ण करून ९६ पानी अहवाल बुधवारी (१० सप्टेंबर) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांना सादर केला. लोक सेवा भवन येथे एसआयटी सदस्य मुन्ना प्रसाद गुप्ता, रोजी कलिता, प्रणबज्योति गोस्वामी आणि मैत्रेयी देका यांच्या उपस्थितीत हा अहवाल सुपूर्द करण्यात आला.
Read More
(Mahadev Munde Case) बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणाचा तपास अखेर आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एसआयटीमार्फत सुरु करण्यात आला आहे. याकरिता पंकज कुमावत परळीत दाखल झाले आहेत. २१ महिने उलटूनही या प्रकरणात अद्याप एकही आरोपी पोलिसांना सापडलेला नाही. याशिवाय तब्बल ९ वेळा या प्रकरणातील तपास अधिकारी बदलण्यात आले. यामुळे तपासाला विलंब होत असून आरोपी मोकाट असल्याची तक्रार करत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अनेकवेळा आंदोलनं केली आहेत.
(Pune False Rape Allegation) पुण्याच्या कोंढव्यातील कथित बलात्कार प्रकरणात खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणीविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. कोंढव्यातील एका हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या तरुणीने २ जुलैला कुरियर बॉयने घरात घुसून बलात्कार केल्याची फिर्याद दिली होती.
गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई होण्यासाठी राज्य शासन स्वतंत्र तपास यंत्रणा उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
(Air India Plane Crash AAIB Report) गुजरातमधील अहमदाबाद विमान दुर्घटनेला एक महिना उलटून गेला आहे. याप्रकरणी प्राथमिक तपास अहवाल एएआयबीने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला १२ जुलै रोजी सादर केला आहे. या अहवालातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणांनी इंजिनाच्या इंधन नियंत्रित करणाऱ्या स्विचकडे विशेष लक्ष दिल्याची माहिती आहे. तसेच अहमदाबाद विमान दुर्घटनेपूर्वी, एअर इंडियाने विमानाचे फ्युएल कंट्रोल स्विच आणि थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल (TCM) दोन वेळा बदलले होते, असे अहवालात म्हटले आहे.
(Ahmedabad Plane Crash 2025 Report) अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या बरोबर एक महिन्यानंतर, या अपघाताचा प्राथामिक अहवाल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही पायलट्समध्ये काय संवाद झाला, याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्हीं इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे फ्युयल स्विचेस बंद झाल्यानंतर
उदयपूर फाइल्स कन्हैया लाल टेलर मर्डर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत कन्हैया लाल हत्या प्रकरणातील एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात याचिका बुधवार, दि. ९ जुलै रोजी दाखल केली गेली. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मोहम्मद जावेद या आरोपीने असा दावा केला आहे की, या हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशावेळी जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याचा प्रभाव खटल्यावर होऊ शकतो आणि परिणामी निष्पक्ष न्यायदानाच्या प्रक्रियेत बाधा आणू शकतो.
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेप्रकरणी त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला हक्कभंग प्रस्ताव महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मंजूर केला आहे. हा प्रस्ताव आता विधान परिषदेच्या हक्कभंग समितीकडे पुढील चौकशीसाठी पाठवण्यात आला आहे.
दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला असून या प्रकरणात कोणताही लैंगिक अत्याचार किंवा हत्या झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत. अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केले होते. या प्रकरणात दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेत त्यांच्या मुलीच्या मृत्यूला गूढ व अमानवी स्वरूप असल्याचे नमूद करत, सीबीआय आणि उबाठाचे वरळीतील आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
मुंब्रा येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या प्रकरणात त्वरित न्याय मिळावा, यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोलकाता येथील साउथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये २५ जून रोजी विद्यार्थिनीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे. पीडित विद्यार्थिनी पहिल्या वर्षात शिकत असल्याची माहिती आहे.
बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेने ९७२ लोकांची ‘हिटलिस्ट’ तयार केली होती, ज्यामध्ये केरळच्या माजी जिल्हा न्यायाधीशाचे नाव देखील समाविष्ट होते. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कोची येथील न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमधून हे उघड झाले आहे.
काश्मीरी फुटीरतावादी नेता शबीर अहमद शाहचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. २०१९ पासून दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या प्रकरणात तो तुरुंगात होता. गेली ३५ वर्षे आपण विविध तुरुंगात आहोत, असा दावा त्याने केला आहे. “कुठल्याही प्रकारचा आरोप नसताना मला तुरुंगात किंवा नजरकैदेत ठेवण्यात आले,” असा आरोपही त्याने केला आहे. या संदर्भात शाह याने जामीनासाठी याचिका केली होती. गुरुवार, दि.१२ जून रोजी न्यायालयाने याचिका अर्ज फेटाळला.
(Biological Smuggling) अमेरिकेत जैविक सुरक्षा व्यवस्थेवर धोका निर्माण करणाऱ्या आणखी एका प्रकाराने खळबळ उडवली आहे. चीनमधील वुहान येथील हुआझोंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करत असलेल्या चेंग्झुआन हॅन या महिला संशोधकाला अमेरिकेत जैविक पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एफबीआयने ८ जून रोजी डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन विमानतळावर ही कारवाई केली.
दहशतवादी तहव्वूर राणाच्या ‘एनआयए’ कोठडीत वाढ
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक जण जखमी झालेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. हल्ल्यात सहभागी असणाऱ्या दहशतवाद्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी सर्वच स्तरातून होतेय. या पार्श्वभूमीवर तपासाच्या दिशेने देशातील सुरक्षा यंत्रणांच्या हालचाली वाढल्या आहेत. हल्ल्यानंतर बैसरनमधील स्थानिकांचे, पर्यटकांचे जबाब नोंदवले जातायत. तपासादरम्यान हल्ल्याच्या ठिकाणी असणाऱ्या मोबाईल्स कॅमेऱ्यांमध्ये असणाऱ्या व्
Pahalgam जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २८ पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा पहिला स्केच आणि ग्रुप फोटो समोर आला आहे. आता संबंधित दहशतवाद्यांची स्केचद्वारे ओळख पटली असून त्यांची नावे आसिफ फौजी, सुलेमन शाह आणि अबू तल्हा अशी नावे आहेत. हे दहशतवादी द रेझिस्टंस फ्रंटचे असल्याचे सांगितले जात आहे. ही दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाचा सहयोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शीची चौकशी करण्यात आल्यानंतर हे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. सूत्रानुसार, केंद्रीय तपास संस्था, एनआयए आत
Durgesh Pathak आप नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री दुर्गेश पाठक यांच्या निवासस्थानी सकाळी केंद्रीय अन्वेषण विभाग(CBI)छापा टाकल्याचा दावा पक्षाने केला आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस संदीप पाठक यांनी सोशल मीडियावरील एक्स वर घोषणा केली. हा छापा राजकीयदृष्ट्या एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
झाकीर नाईकला भारताच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी भारत सरकार प्रयत्न करीत असले, तरी त्यास अद्याप यश आलेले नाही. झाकीर नाईकविरुद्ध ठोस पुरावे देण्याची मलेशिया सरकारची मागणी आहे. ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने झाकीर नाईकविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले असून, त्याला भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेतच.
उबाठा गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्याभोवती सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीचा फेरा सुरु आहे. मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी ते पत्नीसह चौकशीसाठी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत.
देशात दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका ( Delhi Elections ) जवळ येऊन ठेपल्या असून, उद्या यासाठी मतदान होणार आहे. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. हा उत्सव नीट साजरा व्हावा यासाठी अनेक यंत्रणांनी कंबर कसली असून, त्यांनी निवडणूक काळामध्ये रेवडी वाटपांना चाप लावण्याचे कार्य उत्तमपणे पार पाडले आहे.
ISIS राष्ट्रीय तपास यंत्रनेने अधिकृत निर्देशनानुसार तरुणांना भारतात हिंसाचार पसरवण्यासाठी निधी उभारला आहे. हा निधी उभारण्यासाठी जागतिक दहशतवादी संघटना ISIS च्या एका दहशतवाद्यावर आरोप दाखल करण्यात आले आहेत. हा आरोप मंगळवारी एका अधिकृत निवेदनासुसार दाखल करण्यात आले आहेत.
(CM Devendra Fadnavis) बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता एसआयटी (Special Investigation Team) चौकशी करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत माहिती दिली आहे. भाजप आमदार सुरेश धस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याबाबत मागणी केली होती.
(Jalgaon) जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या जुन्या पाईपलाईनची चोरी झाली होती. या प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली. परंतु या प्रकरणाचा खरा सूत्रधार असल्याचा आरोप असणारे महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन मात्र अद्यापही फरार आहे. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी पोलीस उपअधिक्षक संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.
National Investigation Agency राज्यात दहशतवादी संघटनांशी संपर्कात असणारे तिघेजण राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या कचाट्यात सापडले आहेत. राज्यातील अमरावती येथून मोहम्मद मुसेब शेख, छत्रपती संभाजीनगरसह इतर १७ राज्यांमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणाने छापे टाकले आहेत. ताब्यात आलेले तिघेजण पाकिस्तानातील असल्याचा दावा करण्यात आला असल्याची माहिती समोर आली असून हे प्रकरण १२ डिसेंबर २०२४ रोजी घडले आहे.
मुंबई : ८०च्या दशकात ‘बोफोर्स’ घोटाळ्यामुळे देशातील राजकारण ढवळून निघाले होते. १९८०च्या दशकात भारतीय लष्करासाठी खरेदी केलेल्या ‘बोफोर्स’ तोफांच्या व्यवहारामध्ये १ हजार, ४३७ कोटींच्या एकूण व्यवहारात ६४ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप काँग्रेस ( Congress ) पक्षावर आहे. आता या घोटाळ्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेतील गुप्तहेर मायकल हर्शमन याची चौकशी करण्याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या माध्यमातून कायदेशीर सूचना पाठविण्यात येणार आहे.
जम्मू काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात रविवारी रात्री एका बोगद्याजवळ बांधकाम सुरु असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला असून, यात एक डॉक्टर आणि सहा स्थलांतरित मजूरांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी खासगी कंपनीच्या कॅम्प हाउसिंग कामगारांवर गोळीबार केला.
खतरनाक ! सायबर क्राईम व टेलिकॉम क्षेत्रातील ऑनलाईन घोटाळे, अथवा गैरवापर रोखण्यासाठी टेलिकॉम बँक ऑपरेटरने १.८ दशलक्ष सिमकार्ड ब्लॉक करण्याचे ठरवले आहे. तसा रिपोर्ट प्रसारमाध्यमांनी दिला असून घोटाळेबाजांसाठी हा मोठा धक्का ठरणार आहे. यावर नियामक मंडळाने कडक कारवाई करण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. गेले काही दिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नियामक मंडळांनी या सिमकार्डवर लक्ष ठेवले होते.
तृणमुल काँग्रेसचे नेता शाहजान याच्या घरी बुधवारी २४ जानेवारीला ईडीने छापा टाकला. पश्चिम बंगाल रेशन घोटा्ळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यापुर्वीही त्यांच्या घरी छापेमारी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याने ती छापेमारी यशस्वी झाली नाही. त्यामुळे यावेळी पुर्ण तयारीने छापेमारी करण्यात आली.
राष्ट्रविघातक कारवायांमध्ये गुंतत असलेल्या मुसलमान युवकांचे प्रबोधन करण्याऐवजी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अशा आरोपींना ‘वॉरंट’ न देता अटक झाली म्हणून विधानसभेत चक्क आरडाओरड केली. सोमवार, दि. ११ डिसेंबर रोजी पॉईंट ऑफ इनफॉर्मेशनच्या आयुधाचा वापर करीत त्यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दहा राज्यांमध्ये मानव तस्करीविरोधात छापेमारी केली. यावेळी जम्मू काश्मीरमध्ये एका रोहिंग्यास ताब्यात घेतले आहे.
गंभीर फसवणूक तपास कार्यालयांतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. गंभीर फसवणूक तपास कार्यालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांना मिळणार आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मणिपूर पोलिसांच्या मदतीने मोहम्मद इस्लाउद्दीन खानला अटक केली. २१ जून २०२३ रोजी मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील क्वाक्ता भागात कार बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
पाकिस्तानमध्ये काल(११/१०/२०२३) भारताच्या २ मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची हत्या झाली. पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेला दहशतवादी शाहिद लतीफ आणि आयएसआय एजंट मुल्ला बहूर उर्फ होर्मुझ याची पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. यामुळे परदेशात राहून भारताविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा, एनआयएने देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या ४३ गुन्हेगारांची नावे आणि त्यांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे अशी कोणतीही व्यक्ती दिसल्यास त्याची माहिती त्वरित पोलिस नियंत्रण कक्षाकडे देण्याचे आवाहन नांदेडचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.
देशाची 'नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी' (NIA) भारताच्या दक्षिण भागात 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' (ISIS) च्या प्रशिक्षण केंद्रांचा पर्दाफाश करण्यात व्यस्त आहे. या अंतर्गत, NIA ने दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी तामिळनाडूमधील कोईम्बतूर, चेन्नई आणि तेलंगणासह सुमारे ६० संशयित ISIS केंद्रांवर छापे टाकण्यास सुरुवात केली.
' टाईम्स ऑफ इंडिया ' ला सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अदानी यांच्यावरील 'Stock Manipulation' वर आधारित गुप्त अहवाल ईडीने सेबीकडे सुपूर्त केला आहे. त्यातील माहितीनुसार, फॉरेन पोर्टफोलिओ इनव्हेसटर्स (FPI's) सगट खाजगी क्षेत्रातील भारतीय बँकांच्या संशयास्पद व्यवहाराप्रकरणी हा रिपोर्ट असल्याचे समजते आहे. टाईम्स ऑफ इंडियाचा बातमीनुसार या १५ ते १६ संस्थांशी निगडित व्यवहारांचा लेखाजोखा सेबीकडे पाठवण्यात आला. ईडीकडे PMLA ( Prevention of Money Laundering) या गुन्ह्याखाली कारवाई करण्याचा अधिकार नसला तरी अनैतिक
जरी केंद्र सरकारच्या स्तरावर भ्रष्टाचार संपवला गेला असला तरी, राज्य आणि स्थानिक सरकारी नेते आणि प्रशासकांनी अजूनही गाव, शहर आणि राज्य स्तरावर कारवाई करणे आवश्यक आहे. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा लोक सर्वच पातळ्यांवर भ्रष्टाचार संपवण्याचा निर्धार करतील. भ्रष्टाचाराला तोंड देण्यासाठी प्रत्येक व्यवस्थेत वेगवेगळ्या पद्धती राबवत असूनही केवळ केंद्रातील मोदी सरकार सर्वच स्तरावरील भ्रष्टाचार संपवू शकत नाही. त्यासाठी सामान्य जनतेनेही पुढाकार घेणे तितकेच गरजेचे आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय तपास संस्थांच्या कथित गैरवापराबाबत विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ १४ विरोधी पक्षांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.
मुंबई : छत्रपती संभाजी नगरमध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर गृहविभागाने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. गृहविभागाकडून या प्रकरणी एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली त्यांना ४ ददिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच ४०० पेक्षा अधिक जणांवर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या या हिंसाचारानंतर शुक्रवारी रात्री उशिरा शहरातील जनजीवन सुरळीत करण्यास प्रशासनाला यश आले आहे. या घटनेच्या तपासासाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाची (एसआयटी) घोषणा करण्यात आली आहे.
सरकारी मालकीची हवाई वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या खासगीकारणानंतर आता तिच्या दोन उपकंपन्यांचेही खासगीकरण केले जाणार आहे. एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड आणि एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अशी या दोन उपकंपन्यांची नावे आहेत. यांच्या खासगीकारणानंतर एअर इंडियाच्या खासगीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. भारत सरकारकडून ही खासगीकरणाची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात टाटा समूहाने एअर इंडिया कंपनी १८ हजार कोटींना विकत घेतली होती
रणवीर सिंगने एका मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट केले होते. जबर वादग्रस्त ठरलेल्या त्या फोटोशूटमुळे त्याला समाजमाध्यमांवर जबरदस्त टीकेचा सामना करावा लागला होता
आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांची ड्रोन पुरवणी करण्याच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने जम्मू आणि काश्मीरमधील पाच जिल्ह्यांमध्ये आठ वेगवेगळ्या ठिकाणी तपास सुरू केला आहे. जम्मू, श्रीनगर, कठुआ, सांबा आणि डोडा जिल्ह्यांमध्ये 'रेझिस्टन्स फ्रंट'च्या प्रमुख मॉड्यूलद्वारे शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांच्या खेपेसाठी वापरल्या जाणार्या ड्रोनला रोखल्याच्या प्रकरणात शोध घेण्यात आला. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चे एक शाखा, एनआयएने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात सध्या महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रा सुरु आहेत. शिवसैनिकांना ठाकरेंद्वारे मार्गदर्शन केलं जात आहे. मात्र या वेळी आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर आरोप, अपमान करत आहेत. अशा प्रकारे नेत्यांना अपमानित करून जनतेची दिशाभूल करू नका, असा इशारा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिंदे गटातील आमदारांनी पत्रकार परिषदेत उपस्थिती दर्शविली होती.
दाऊदशी संबंधीत असल्याने माहीम दर्ग्याचे ट्रस्टी सुहेल खंडवानी यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सोमवारी चौकशी करण्यात आली आहे. भाजपचे आमदार मोहित कंबोज यांनी सुहेल खंडवानी यांच्याबरोबरची छायाचित्रे ट्विट करून ये रिश्ता क्या कहलाता है ? असा सवाल कंबोज यांनी विचारला आहे
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA )ने कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमशी निगडित मुंबईतील २० ठिकाणांवर सोमवारी छापासत्र सुरु केले आहे
दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मालमत्ता व्यवहारांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर गुरुवारी ईडी कडून आरोप पत्र दाखल केले गेले
दिल्लीमधील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारासह अन्य सात राज्यांमध्ये श्रीराम नवमीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) करण्यात यावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात सोमवारी दाखल करण्यात आली आहे.
“एक पत्रकार असूनही शिवसेना नेते संजय राऊत यांनी अल्पावधीत कोट्यवधींची संपत्ती कमविली. त्यामुळे, माझी राऊत यांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या यशाचे गमक इतर पत्रकारांनाही सांगावे. जेणेकरून महाराष्ट्रातील पत्रकारही आपल्यासारखी चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती करू शकतात,” असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला.
उत्तर बंगालमधील जलपाईगुडी येथून तीन कांगारूंची सुटका करण्यात आली आहे . वन्यजीव तस्करांकडून तस्करी करण्याआधीच वन अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची सुटका केली. शुक्रवारी (१ एप्रिल रोजी) स्थानिकांना सिलीगुडीजवळ एका कांगारूचा मृतदेह सापडला. शनिवारी सकाळी स्थानिकांनी दुसऱ्या कांगारूचा मृतदेह पाहून वनविभागाला कळवले.