भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सुरक्षा मुद्द्यांवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या १३ व्या आंतरराष्ट्रीय बैठकीत सहभागी होण्यासाठी मॉस्कोला भेट देण्याची शक्यता आहे. ही परिषद २७ ते २९ मे दरम्यान रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये होणार आहे.
Read More
विशेष प्रतिनिधी परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी सोमवारी हेग येथे नेदरलँड्सचे संरक्षण मंत्री रुबेन ब्रेकेलमन्स यांच्याशी भेट घेतली आणि त्यांच्या संबंधित सुरक्षा दृष्टिकोन आणि आव्हानांवर चर्चा केली.
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असतानाच ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर केला. त्यावर टीका होत असतानाच, आता मदतीचा दुसरा हप्ताही पाकच्या पदरात टाकला. बांगलादेशालाही कर्जरुपी खैरात वाटण्याचा निर्णय झाला. म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो की, हे ‘नाणेनिधी’ आहे की ‘टेरर फंडर्स’?
( Vikrant Masye new Lead role in international film based on the life of Sri Sri Ravi Shankar )
राज्यातील शिक्षण क्षेत्राला मोठा हातभार लावत, दोन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विद्यापीठे — द युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (यूके) आणि द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) यांनी नवी मुंबई एज्युसिटीमध्ये कॅम्पसेस स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (MoUs) केले आहेत. हा स्वाक्षरी समारंभ दिनांक २ मे २०२५ रोजी वेव्ह्ज २०२५ समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला.
पहलगामच्या बैसरन खोर्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’ने (युएनएससी) तीव्र निषेध केला आहे. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणार्या, कृत्य करणार्या आणि वित्तपुरवठा करणार्यांची जबाबदारी घेण्याची मागणी परिषदेच्या सदस्यांनी केली आहे.
iconic Mumbai International Cruise Terminal भारताचा सागरी दरवाजा म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबई बंदर येथे, देशातील सर्वांत मोठे आणि आयकॉनिक क्रूझ टर्मिनल सोमवार, दि. 21 रोजी संपूर्ण जगासाठी खुले झाले. हे भारतातील सर्वांत मोठे क्रूझ टर्मिनल आहे. यामध्ये एकाचवेळी दोन मोठी जहाजे उभी राहू शकतात. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच खुल्या झालेल्या जगातील सर्वांत मोठ्या आणि अत्याधुनिक पोर्ट मियामी येथील क्रूझ टर्मिनलचा आढावा घेऊया.
राज्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी आता ‘झोनल मास्टर प्लॅन’ तयार केला जाणार आहे. विकासात्मक प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना केली आहे. सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी त्यांनी वॉररूम बैठकीमध्ये मागील बैठकांमधील १८ प्रकल्प आणि नवीन १५ महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून, दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचे काम व्हावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
मी कठोर परिश्रम, इमानदारी आणि समर्पण यावरच सतत विश्वास ठेवत, काम करत गेलो असे म्हणत दिल्ली न्यायालयाचा स्वत:च्या बाजूने लागलेला निकाल विनम्रपणे स्वीकारणारे आणि एकाचवेळी भारतीय हॉकी आणि आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये विविधपदे सांभाळत हॉकीमध्ये आधुनिकता आणणार्या नरिंदर बत्रा यांच्याविषयी...
भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा देशाने यशस्वीपणे सामना केल्याचे कौतुकोद्गार ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने काढले. तसेच, पुनश्च भारताच्या आर्थिक वृद्धीवर ‘नाणेनिधी’नेच विश्वास दर्शविल्यामुळे विरोधकांच्या अर्थअप्रचाराला सणसणीत चपराक बसली आहे.
तुर्कस्तानच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून घडणार्या घडामोडींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. इस्तंबूलचे महापौर एकरेम इमामोग्लू यांना तुर्कीच्या सरकारने अटक केली. या घटनेमुळे तुर्कस्तानच्या अंतर्गत सत्तासंघर्षाचे स्वरूप आणि राष्ट्राध्यक्ष रसीप तैय्यब एर्दोगान यांची राजकीय दिशा, याबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. इमामोग्लू यांना सरकारी निधीच्या कथित गैरवापराच्या आरोपावरून अटक करण्यात आली. इस्तंबूल महानगरपालिकेच्या काही विकासकामांमध्ये नियमभंग आणि अपारदर्शकता आढळून आल्याचा, तप
दुसर्या महायुद्धानंतर डॉलरच्या मागे पेट्रोल उभे राहिल्याने, जगात डॉलरची शक्ती असीमित वाढली आणि त्याबरोबरच अमेरिकेची दादागिरीही. पण दादागिरीवर फार काळ जगरहाटी चालत नाही, हे अमेरिकेला जाणवायला लागले आहे. सद्य स्थितीतील अमेरिकेच्या परिस्थितीची जाणीव डोनाल्ड ट्रम्प यांना आहे, हे त्यांच्या आजवरच्या निर्णयांवरून स्पष्टपणे दिसून येते.
आपल्या बोटांच्या ताकदीवर आणि सूक्ष्म नियोजनाच्या मदतीने अनेक कॅरम स्पर्धांमध्ये देदीप्यमान यश मिळवणार्या आंतरराष्ट्रीय खेळाडू दिलेश खेडेकर यांच्याविषयी...
भारतीय बुद्धिबळपटू सातत्याने मिळवत असलेल्या विजयाचे प्रतिबिंब, या खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत दिसत आहे. विविध गटातील अनेक बुद्धिबळपटू सध्या पहिल्या दहा क्रमाकांत आहेत. त्यामुळे, एकूणच भारतीय खेळाडूंचा बुद्धिबळातील दबदबा वाढत आहे. याची परिणती भारतीय बुद्धिबळपटूंना जाहिरात मिळण्यात झाली आहे...
आजच्या जागतिक महिला दिनाचा संकल्प आहे, ‘अॅक्सिलरेट अॅक्शन’. याचा अर्थ आहे, महिला सुरक्षितता यासाठी एकत्रितपणे आवश्यक गतिशील कृती. या लेखात ‘अॅक्सिलरेट अॅक्शन’ या संकल्पनेचा भारताच्या परिक्षेपात घेतलेला हा आढावा...
( International Womens Day Shailaja Gaste Hirkani in the cooperative sector ) राजकीय, सामाजिक क्षेत्रासह प्रशासकीय सेवेत आपल्या कर्तबगारीची छाप पाडणार्या नारीशक्तीप्रमाणेच ‘ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन’च्या एकूण 21 संचालकांपैकी चार संचालक महिला आहेत. शैलजा गस्ते धडाडीने कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा दि. 8 मार्च या ‘जागतिक महिला दिनी’ घेतलेला आढावा...
( International Womens Day Vidya Chaudhary ) 'विद्या विनयेन शोभते’ या संस्कृत सुविचारात ‘विद्या’ हे ज्ञान आणि ‘विनय’ म्हणजे विनम्रता याप्रमाणे सुशील आणि विनम्रतेने समृद्ध असलेल्या विद्या विजय चौधरी या ‘दि ठाणे डिस्ट्रिक्ट को. ऑप. हाऊसिंग फेडरेशन’मध्ये ज्येष्ठ संचालक म्हणून कार्यरत आहेत. गेली 17 वर्षे त्या सहकार क्षेत्रात असल्याने त्यांचे आप्तस्वकीय तसेच मित्रमंडळी त्यांना ‘विद्या सहकारात शोभते’ असे गमतीने म्हणतात.
महिला या कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. चाकोरीबद्ध नोकरी न करता, वेगळ्या वाटा चोखंदळत महिलांनी स्वतःला अशाप्रकारे सिद्ध केले की, त्यांची यशोगाथा ही अनेकांसाठी प्रेरणा बनून गेली. भारतीय प्रशासकीय सेवेतील ‘महाराष्ट्र केडर’च्या अधिकारी आणि ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’च्या संचालक निधी चौधरी याही त्यांपैकीच एक. आजच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा...
( vidya kadam International Women day ) ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संचालक विद्या प्रशांत कदम यांचा जन्म पुण्यात झाला. आईवडील दोघेही महाराष्ट्र शासन आरोग्य विभागात असल्याने आणि कुटुंबात एकुलती लेक असल्याने त्यांचे बालपण खेळत-बागडत पर्यटनाचा आनंद लुटत गेले. बालपणी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये भारतभर तसेच सात ते आठ युरोपीय देश बघण्याचे भाग्य लाभले. पुण्याच्या सेंट जोसेफ हायस्कूल, कॉन्व्हेंट शाळेतून शालेय शिक्षण, फर्ग्युसन कॉलेजमधून ‘बी.एस.सी.’ झाल्यानंतर ‘टीसीआय’मध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसर या पदावर काम केले.
स्वार्थ बाजूला ठेवून दीनदुबळे, गोरगरिबांना मदतीचा हात देणारे अनेक थोर समाजसेवक आपण आतापर्यंत पाहिले. याच समाजसेवेच्या संस्कारांडे बाळकडू आज लोकप्रतिनिधी म्हणून नावारूपाला आलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मा. नगरसेविका खुशबू पद्माकर चौधरी यांना लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांकडून मिळाले. समाजकार्यात आघाडीवर असलेल्या चौधरींना माजी मंत्री आणि भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आजच्या ‘जागतिक महिला दिना’निमित्त राजकारणात असूनही, समाजकार्यातून आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविणार्या खुश
( Ashalata Kulkarni, International Womens Day ) सृष्टीतील आदिम आणि निरंतर प्रवाही घटक म्हणजे नदी, जी शांतपणे वाहत... काठावरचे प्रदेश सुजलाम् सुफलाम् करीत मार्गक्रमण करते. त्याच धर्तीवर उद्योगजगतातील ‘उद्यमी सरिता’ गणल्या गेलेल्या ‘आशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लिमिटेड’च्या सर्वेसर्वा आशालता मनोहर कुलकर्णी यांचा प्रवास आजच्या पिढीसाठी विशेषतः महिलावर्गासाठी प्रेरणादायी आहे.
आजची पिढी ही मोबाईलच्या युगात वावरणारी. तेव्हा, हिंदू धर्मातील सण, संस्कृती आणि परंपरा यांची नवीन पिढीला माहिती व्हावी आणि एक सशक्त समाज निर्माण व्हावा, यासाठी बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या हेमा नरेंद्र पवार कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी...
राजकीय प्रवास, लोकप्रतिनिधी म्हणून येणार्या अडचणी, महिला सुरक्षा, महिलांचे सक्षमीकरण अशा विविध विषयांवर ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने शिवसेनेच्या आ. डॉ. मनीषा कायंदे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला संवाद....
( Vasai Virar Municipal Corporation ) आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी पर्यावरण व हवामान बदल विभाग, राज्य शासन यांनी दिलेल्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आली होती. सर्वात जास्त स्वयंसेवकांचा सहभाग, सर्वोच्च कचरा संकलन, प्लास्टिक कचर्याचे रिसायकलींग या तीन श्रेणीमध्ये वसई-विरार महानगरपालिकेला आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मानांकन प्राप्त झाले आहे, अशी माहिती उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, जागतिक महिलादिनी त्यांच्या अभिवादनाचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडण्यात आला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी, यानिमित्ताने अहिल्यादेवींच्या आठवणी जाग्या केल्या. अहिल्यादेवींच्या माहेरचे ते नववे वंशज आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाला, आत्मीयतेची जोड होती. त्या भाषणाचा सार पुढीलप्रमाणे,
( Women and Child Development Minister Aditi Tatkare on International Womens Day ) महिला सक्षमीकरणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून, बालविवाह होऊ नये यासाठी लोकचळवळ राबविणे महत्वाचे आहे. या अनुषंगाने महिला दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्राम सभा आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
विधानपरिषदेत आज जागतिक महिला दिनाचे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे व महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत सहभाग घेत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी मुंबई बँकेतील खातेधारक महिलांसाठी विनातारण १० हजारापासून २५ हजार रूपये मुंबई बँक अत्यल्प व्याज दरात पैसे देईल आणि १५०० चे १५ हजार कसे होतील ही महिला दिनानिमित्त महिला भगिनींना मानवंदना देणार असल्याचे सांगितले.
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, तिच जगाते उद्धारी, ऐसी वर्णिली मातेची थोरी, शेकडो गुरुहुनिहि॥’ या तुकडोजी महाराजांच्या पंक्ती. पण, आजच्या स्त्रीने उद्योगजगतातही ठसा उमटविला आहे. याचा प्रत्यय नीती आयोगाच्या ‘फ्रॉम बॉरोअर्स टू बिल्डर्स : वूमन्स रोल इन इंडियाज् फायनान्शियल ग्रोथ स्टोरीज्’ अहवालातून समोर येतो. आगामी ‘जागतिक महिला दिना’च्या पार्श्वभूमीवर या अहवालाचे आकलन...
मराठी साहित्याला संत कवयित्रींचा, लेखिकांचा समृद्ध वारसा लाभला आहे. आपल्या काव्यप्रतिभेतून या कवयित्रींनी जीवनाच्या विविध पैलूंवर अगदी नेमकेपणाने भाष्य केले. यापैकी काही आशयगर्भ काव्यपंक्तींची गीतांतही गुंफण झाली. अशाच काही निवडक कवयित्रींचा अक्षरप्रवास रसिकांसमोर उलगडून दाखवत आहेत, लेखिका तपस्या वसंत नेवे. नुकत्याच संपन्न झालेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने आणि आगामी जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर ‘शब्दव्रती’ या अनोख्या संकल्पनेबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’ने तपस्या नेवे यांच्याशी साधलेला हा संवाद...
जगभरात प्रदर्शित होणारे उत्तमोत्तम आशयघन चित्रपट राज्यातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध संस्था दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करतात. अशा महोत्सवांचे आयोजन करणाऱ्या संस्थांसाठी शासन अर्थसहाय्य योजना राबवित असून या महोत्सवांना किमान १० लाखाच्या पुढे आर्थिक सहाय्य मिळत आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट, लघूपटांचे आयोजन करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य, अशा नावाची योजना सांस्कृतिक कार्य विभागाची असून या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे करण्यात येत
युएईमधील सर्वात प्रतिष्ठित यॉट शो ‘दुबई इंटरनॅशनल बोट शो २०२५’, ( International Boat Show ) दि. १९ ते दि. २३ फेब्रुवारी रोजी दरम्यान, दुबई हार्बरवर परत येत आहे. फेब्रुवारी महिन्यात पाच दिवस चालणारा ‘दुबई इंटरनॅशनल बोट शो’, याला ‘डीआयबीएस’ म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी ३० हजारांहून अधिक अभ्यागत, दुबई हार्बरच्या पोन्टूनमध्ये एकत्र येतात. जिथे त्यांना लक्झरी चार्टर मार्केटमधील काही यॉट्सना भेट देण्याची आणि काही नवीनतम नवकल्पना जाणून घेण्याची संधी मिळते. यंदाचे वर्ष हे या बोट शोचे ३१वे वर्ष. जागतिक सागरी जीवनशैल
मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो वाहतूक विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने यूके सरकारच्या वाहतूक खात्याअंतर्गत येणाऱ्या (डीएफटी) क्रॉसरेल इंटरनॅशनल (सीआय) यांच्या माध्यमातून यूके सरकारशी सामंजस्य करार केला आहे.
अहिल्यानगरच्या ग्रामीण भागातून चित्रकलेला सुरुवात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजल्या गेलेल्या चित्रकार अनुराधा ठाकूर ( Anuradha Thakur ) यांच्याविषयी.
मुंबई मेट्रो मार्ग ९ (दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर) आणि मेट्रो मार्ग ७अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल) यांसाठी नव्या मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही मेट्रो मार्गांचे कार्यादेश दि. ९ सप्टेंबर २०१९रोजी जारी करण्यात आले होते. मात्र, विविध अडचणींमुळे प्रकल्प पूर्ण होण्यात विलंब होत आहे. त्यामुळे या मार्गांवरील नागरिकांना मेट्रो सुविधेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी माहिती माहिती अधिकारात एमएमआरडीएने दिली आहे.
(ICE 3) एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई च्या विशेष शिक्षण विभागाने दि. ९ ते ११ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषद ICE 3 चे आयोजन केले. या परिषदेला भारतासह अमेरिका, इंग्लंड, इटली, मोरोक्को, जर्मनी, स्वीडन, डब्लिन, भूतान आणि दुबई अशा विविध देशांमधून प्रतिनिधींचा सहभाग मिळाला. परिषदेत एकूण ४००हून अधिक उपस्थिती नोंदवली गेली.
सीरियामध्ये शांततेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या ‘शांतीरक्षा’ कार्यात मोलाची कामगिरी करणार्या ब्रिगेडियर अमिताभ झा ( Brigadier Amitabh Jha ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले. देशाच्या दृष्टीने ही एक मोठीच हानी. भारताने, कायमच जागतिकशांततेसाठीच्या अनेक उपक्रमात योगदान दिले आहे. संयुक्त राष्ट्रांचा ‘शांतीरक्षा’ उपक्रम हा त्यापैकीच एक होय! भारताच्या सैनिकांनी जगभरातील अनेक संघर्षात्मक परिस्थितीमध्ये स्वत:ला मानवतेच्या आणि जागतिक शांततेच्या रक्षणासाठी झोकून दिले आहे. हुतात्मा ब्रिगेडियर अमिताभ झा यां
देशात क्रीडा क्षेत्र नवनवीन उंची गाठत आहे. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. मात्र, त्यामागे देशांतर्गत स्पर्धांचा वाढलेला दर्जा हे मुख्य कारण आहे. अशीच एक उत्तम दर्जा असलेली वनवासी क्रीडा महोत्सव ( Vanvasi krida mahotsav ) स्पर्धा छत्तीसगढमध्ये पार पडली. या स्पर्धेचा घेतलेला हा आढावा...
नवी दिल्ली : 'द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज' या थीमसह आशियातील सर्वात मोठा एरो शो असलेल्या एरो इंडिया २०२५ - ची ( Aero India 2025 ) १५ वी आवृत्ती १० ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कर्नाटकातील बेंगळुरू येथील येलाहंका येथील हवाईदलाच्या तळावर होणार आहे.
तब्बल १८१ जणांना सोबत घेऊन जाणारे विमान, दक्षिण कोरियाच्या मुआन विमानतळावर कोसळल्याची धक्कादायक घटना २९ डिसेंबरच्या सकाळी घडली आहे. बँगकोकवरून मुआन विमानतळाच्या धावपट्टीवर उतरणारे विमानाला पक्षाने धडक दिल्यानंतर ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. विमानाच्या लँडींग गिअरमध्ये बिघाड झाल्यानंतर कोसळतानाच धावपट्टीवर एक भला मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळेच अनेकांचा मृत्यू झाला आहे.
हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अभिनेत्री छाया कदम हे नाव चांगलच गाजतं आहे. त्यांची भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. त्याशिवाय अनेक हिंदी-मराठी चित्रपटातील त्यांच्या कामाचं कौतुक झालं आहे. आता छाया कदम 'स ला ते स ला ना ते' या आगामी ७ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.
R. Ashwin's Retired टीम इंडियाचा ऑल राऊंडर खेळाडू आणि आपल्या फिरकीच्या जादूने नावारूपाला आलेला गोलंदाज आर. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या ऑस्ट्रेलियातील गाबा येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेदरम्यान दि: १८ डिसेंबर २०२४ रोजी त्याने निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत त्याने आंतरराष्ट्रीय खेळातून बाहेर पडत असल्याची माहिती अधिकृतरित्या सांगितली.
नंदा किशोर इमानी दिग्दर्शित ३५ चिन्ना कथा काडू ( 35 Chinna Katha Kaadu ) हा तेलूगू चित्रपट ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. तिरुपतीमधील एका सामान्य ब्राम्हण कुटुंबाची कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे.
नुकताच दि. 3 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस’ म्हणून साजरा झाला. त्यानिमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिव्यांगजनांसाठी सरकारचे धोरण-उपक्रम, पॅरालिम्पिक खेळाडूंच्या कामगिरीवर कौतुकाची थाप देणारा हा लेख...
Cyclone Feigal तमिळनाडू येथे फेंगल चक्रीवादळ आल्याने दि : ३० नोव्हेंबर २०२४ रोजी शनिवारी सायंकाळी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ काही वेळांसाठी बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आली आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही सेवा बंद करण्यात येणार असल्याची माहिती चेन्नई एअरपोर्ट या ,” इंडिगोच्या X पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
नाशिक : ‘किर्लोस्कर ( Kirloskar ) वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४’ चा समारोप सोहळा नुकताच ‘मराठा विद्याप्रसारक समाजच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थे’त मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी प्रदर्शनातील सर्व स्टॉल्सला भेट देऊन करण्यात आली. विविध सामाजिक व पर्यावरणीय विषयांवर आधारित या महोत्सवाने उपस्थितांची मने जिंकली.
गोवा पणजी येथे २० ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ५५वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न झाला. गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी या महोत्सवाची सांगता झाली. तसेच, यावेळी भारतीय फिचर चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा देखील संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीचा ठसा उमटवत घरत गणपती चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदीवडेकर यांन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकिय पदार्पण हा पुरस्कार पटकावला.
१९९० साली काँग्रेसने देशातील उद्योगांना कोणतेही संरक्षण न देता, आंधळेपणाने देशाच्या सीमा आंतरराष्ट्रीय उद्योगांसाठी खुल्या केल्या. जागतिकीकरणाने उद्योगाला चालना मिळून त्यातूनच अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, अशी अपेक्षा असताना भारतात त्यासाठी कोणतेही ठोस धोरण नसल्याने केवळ आयात वाढलेली दिसून आली.
(Israel) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योव्ह गॅलंट तसेच हमासच्या लष्करी कमांड यांच्याविरोधात युद्ध आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी हेग स्थित इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट (ICC) अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने गुरुवार दि. २१ नोव्हेंबर रोजी अटक वॉरंट जारी केले आहे.
आंतरराष्ट्रीय वित्तीय रचनेत बदल घडवून आणण्याची गरज रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी नुकतीच अधोरेखित केली. ‘विकसनशील राष्ट्रांना सध्याच्या यंत्रणेत न्याय मिळत नाही,’ असे त्यांनी म्हटले. तसेच विकसित राष्ट्रेच या रचनेचा सर्वाधिक लाभ घेत असल्याने, शाश्वत विकासासाठी या रचनेत बदल घडवून आणण्याची त्यांची मागणी योग्य अशीच. त्याचे आकलन...
एका वैज्ञानिक शोधाने आपल्याला झालेले आश्चर्य कमी व्हायच्या आधीच दुसरा एखादा वैज्ञानिक शोध लागलेला असतो, इतक्या वेगाने विज्ञान सध्या प्रगती करत आहे. मानवी जीवनाचे तर प्रत्येक अंगच विज्ञानाने व्यापले आहे. विज्ञानाच्या आपल्या जीवनावरील याच प्रभावावर प्रकाश टाकण्यासाठी, काल जगभरात ‘जागतिक विज्ञान दिन’ साजरा करण्यात आला.