Irshad उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न आणि नंतर हत्येप्रकरणाचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. याप्रकरणातून संपूर्ण घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणात आरोपी इर्शादला अटक करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान याप्रकरणाबाबत महत्त्वाच्या माहितीचा उलगडा करण्यात आला आहे.
Read More
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी प्रकरणात झालेल्या टीकेवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला असल्याच म्हटलं आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडी ग्रामस्थांना भेट दिली. इर्शाळवाडीमधील नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसण कंटेनरमध्ये करण्यात आले होते. या कंटेनर्समध्ये त्यांना पायाभूत सुविधा मिळत आहेत की नाही याचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला. सरकारने मदतीचा हात पुढे करत इथल्या रहिवाशांसाठी खालपूर चौक या भागात एक सुंदर गाव उभं केलं आहे. सरकारकडून इर्शाळवाडी ग्रामस्थांना अन्न वस्त्र आणि निवारा या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतून उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. इर्शाळवाडीला काही लोक व्हॅनिटी व्हॅनने आले, आणि आम्ही चिखल तुडवला. असं म्हणत त्यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर ठाकरेंनी इर्शाळवाडीला भेट दिली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला आहे.
राज्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्य सरकारकडून ठोस पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी याबाबतीत महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. त्या अनुषंगाने मंत्रालयात मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याची आढावा बैठकीत त्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे.
खालापूर मधील इर्शाळगड येथील इर्शाळवाडीवर दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली.त्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली अद्याप ५० लोक दबले असल्याची शक्यता आहे. या दुर्घटनास्थळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली. इर्शाळगड वर निमुळता रस्ता असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोल दरी आहे. पाऊस येथे सुरू असून चिखल आणि धुके असल्याने मदतकार्यात अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येथे वायरलेस संदेशवर मदतकार्याची माहिती रामदास आठवले यांनी घेतली.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेत सुरु असलेले बचावकार्य थांबविण्यात आले असून जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात दि. १९ जुलै पासुन सुरु असलेली बचाव कार्य मोहीम आज दि.२३ जुलै रोजी सायं. ५.३० पासून थांबविण्यात आल्याचे यावेळी जाहीर केले. तसेच, इर्शाळवाडी दुर्घटनेतून बचावलेल्या १४४ लोकांच्या पाठिशी शासन ताकदीने उभे असून या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात २२ जणांचा मृत्यु झाला. तर १०३ लोकांना वाचवण्यात पथकाला यश आलं आहे. अजून १०० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ईर्शाळगड दुर्घटनेत विस्थापित झालेल्या नागरिकांचे राज्य शासनाकडून पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली होती. यानंतर आता उद्धव ठाकरे हे इर्शाळवाडीत दाखल झाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिल परब, अंबादास दानवे देखील आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. मेट्रो, कारशेट, बुलेट ट्रेन तसेच मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. कोकणातील समुद्रात जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागांकडे वळवता येईल. यावर शासन गांभीर्याने काम करत आहे, ही बाब मोदींच्या कानावर घातल्याचे शिंदेंनी सांगितले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तुफान पाऊस सुरु असून काही भागात दरड कोसळल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर डोंगर कोसळला त्यात २० जणांना आपला जीव गमवावा लागला. मध्य महाराष्ट्र, चंद्रपूर , गडचिरोली भागांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला होता. दरम्यान, यवतमाळ तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून आनंदनगर ताडा भागात पुराच्या पाण्यात जवळपास ४५ लोक अडकले असून राज्य शासनाकडून बचावकार्य सुरु आहे.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडी गावावर बुधवारी दरड कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. इर्शाळवाडीत गेल्या दोन दिवसांपासून बचावकार्य सुरु आहे. अजूनही काही गावकरी ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली आहे. या दुर्घटनेबाबत अनेकांनी हळहळ व्यक्त केली. यात अनेक कलाकारांनीही त्यांच्या भावना समाज माध्यमातून व्यक्त केल्या. अभिनेत्री जुई गडकरीने सुद्धा या संदर्भात पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले होते. आता अभिनेत्रीने पुढाकार घेत येथील ग्रामस्थांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. जुईची टी
इर्शाळवाडी दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीने करण्यात आली आहे. इर्शाळवाडीतील ग्रामस्थांवर कोसळलेल्या या संकटामुळे गावातील असंख्य कुटुंब उध्वस्त झाली असून अनेकांचा आधार यामुळे हिरावून गेला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॅा.नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी पीडितांची भेट घेत शासन आपल्या पाठीशी उभा असल्याची हमी दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारल्याची माहिती दिली.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरातून पीडितांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. राज्यातील सेवाभावी संस्था , काही सेलिब्रिटी आणि इतर मान्यवरांनी बाधितांना मदत देऊ केली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील कर्मचारीही पीडितांसाठी धावून आले आहेत. फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी इर्शाळवाडी घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी फडणवीसांच्या जन्मदिनाच्या औचित्यावर एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडी गावावर मध्यरात्री मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेवरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी अशा घटना वारंवार कोकणात घडत असून एनडीएफचे कॅम्प जसे बसवता तसे कोकणातील दरडप्रवण नागोठणे, महाड, चिपळूण क्षेत्रात तात्पुरत्या स्वरूपात आपत्ती निवारण केंद्राची उभारणी करावी, अशी मागणी केली.
गुरूवारची रात्र महाराष्ट्रासाठी काळरात्र ठरली. डोंगर कोसळून इर्शाळवाडी गाव गाडले गेले. दरम्यान, या दुर्घटनेत मध्यरात्री 3 वाजल्यापासून राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन मदत कार्यात सहभागी होते. काळजाला चटका लावणार्या या दुर्घटनेचा हा थरारक अनुभव मंत्री गिरीश महाजन यांच्याच शब्दात
सांगलीच्या अवलियाने ठाण्यात विश्वविक्रम केला आहे. पंडित तुकाराम धायगुडे (४३) असे त्यांचे नाव असून ते ठाणे जिल्हा बँकेत शिपाई आहेत. त्यांनी २५७ किलो वजनाच्या सहा दुचाकी ३७७ वेळा चक्क पोटावरून नेण्याचा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वीही १२२ वेळा पोटावरून दुचाकी नेऊन धायगुडे यांनी ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ नोंदवला होता. रविवारी ठाणे पूर्वेकडील धर्मवीर क्रीडासंकुलात धायगुडे यांनी आपलाच हा विश्वविक्रम मोडून नवा विक्रम स्थापित केला आहे. या विश्वविक्रमी कामगिरीमुळे धायगुडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
केंद्रीय नोकरी मिळवण्यासाठी अनुसूचित जातीचे (एससी) खोटे जातीचे दावे केल्याबद्दल एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांना नागरी सेवांमधून बडतर्फ करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. खंडणीचे आरोप समोर येण्यापूर्वी, समीर वानखेडे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासोबत असलेल्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत होता. नंतर हे प्रकरण दिल्लीतील एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडे देण्यात आले.याचिकेनुसार, वानखेडेने तो मुस्लिम असल्याचे लपवले. तो मुस्लिम पालक दाऊद आणि जाहिदा