राज्याच्या आर्थिक विकास दरात ६.८ टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. ८) विधिमंडळात आर्थिक पाहणी अहवाल सादर केला त्यात उद्योगात ६.१ टक्के, तर कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात १०.२ टक्क्यांची वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून त्यात ९ मार्च रोजी राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आर्थिक पाहणी अहवाल सादर क
Read More
भारतातील वॉरन बफेट या नावाने ओळखले जाणारे अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने पूर्ववत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी २०१८ रोजी आर्थिक मदतीची मागणी केली होती. प्रदीर्घ सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आयएमएफकडून अनेक अटी व शर्थी ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मदत मिळण्यास विलंब होत होता. पाकिस्तानला मिळणारी दोन वर्षातील ७०० अब्ज रुपयांची कर सवलत परत घ्यावी लागणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पश्चिम बंगालमध्ये दूरसंचार क्षेत्रातील फोरजी कंपनी जिओच्या विस्तारासाठी १० हजार कोटींची गुंतवणूक केल्याची माहिती गुरुवारी दिली. भारताची अर्थव्यवस्था येत्या दोन दशकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल, असा अंदाज व्यक्त केला. बंगालचा जीडीपी १० लाख कोटींवर पोहोचला आहे.
जगात सर्वाधिक गतिमान विकास करणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये भारताने स्थान मिळवले आहे. ऑक्सफर्ड इकॉनोमिक्सच्या जागतिक संशोधन अहवालानुसार, भारत २०१९ ते २०३५ या वर्षापर्यंत झपाट्याने विकास करेल.