11 मे रोजी इंदोरमध्ये राजा रघुवंशीचा विवाह सोनमशी झाला होता. दि. 20 मे रोजी ते दोघे मधुचंद्रासाठी मेघालयला गेलेे. दि. 23 मे पासून दोघांचे मोबाईल बंद होते. दि. 2 जून रोजी राजाचा मृतदेह वेसावडोंग धबधब्याजवळ एका खोल दरीत आढळला. राजाचा मृतदेह सापडला, मात्र सोनम जिवंत आहे की मृत, हे समजत नव्हते. मात्र, दि. 9 जून रोजी पहाटे 3 ते 4 वाजेदरम्यान सोनमच्या भावाला सोनमचा फोन आला. तिने त्याला सांगितले की, ती गाझीपूरच्या नंदगंज भागातील एका ढाब्यामध्ये होती. पोलिसांच्या मते, राज रघुवंशीची हत्या त्याच्या पत्नीने सोनमने घडव
Read More
११ मे रोजी लग्न करून आपल्या पतीला मेघालयात हनिमूनसाठी घेऊन गेलेल्या सोनम रघुवंशीने आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी भाडोत्री गुंडाच्या मदतीने राजा रघुवंशीची हत्या केली. ही हत्या विवाहबाह्य प्रेमसंबधातून झाल्याचे उघड झाले. सोनमने २३ मे रोजी तिचा पती राजा रघुवंशीची हत्या करत त्याचा मृतदेह खोल दरीत फेकून दिला. ही हत्या ९ तासांच्या कालावधीत अत्यंत नियोजनबद्धरित्या करण्यात आली.
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार राज्य सरकारने खरेदी केली आहे. यासाठी ४७.१५ लाख रुपये राज्य सरकार देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात बुधवार, २६ मार्च रोजी रघुनाथ धोंडो कर्वे स्मृती व्याख्यानमाला संपन्न झाली. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीकरिता शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेकडून संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली आहे.
रघुराम राजन! काँग्रेसने नेहमीच त्यांच्या विधानांचा आधार घेत मोदी सरकारवर टीका केली. त्यामुळे काँग्रेसला तसे ते घरचेच. पण, आता तेच रघुराम राजन काँग्रेसच्या आर्थिक दुरवस्थेचा उघडपणे पर्दाफाश करत आहेत. संपुआ सरकारच्या काळातील आर्थिक गोंधळ, भ्रष्टाचार आणि बँकांच्या कर्जवाटपातील मनमानी या सगळ्यावर त्यांनी थेट बोट ठेवले आहे. संपुआ सरकारच्या काळातील बँकिंग व्यवस्थेची अवस्था काय होती, हे राजन यांच्या विधानांतून स्पष्ट झाले आहे. त्या काळात कर्जवाटप म्हणजे राजकीय हस्तक्षेपाने चालवलेली एक नियमबाह्य व्यवस्था झाली होती.
एकीकडे गेल्या दहा वर्षांत भारत सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रात आमूलाग्र कामगिरी केली असून, ‘मेक इन इंडिया’सारखे उपक्रम लक्षणीय आहेत, अशा शब्दांत रघुराम राजन केंद्र सरकारचे कौतुक करतात. मात्र, त्याचवेळी 2047 सालामध्ये भारत विकसित राष्ट्र होईल, हा दावा ते अगदी ठामपणे नाकारतात. तसेच, भारताच्या वाढीचा वेग कायम राहणार नाही, असाही त्यांचा अंदाज. यानिमित्ताने पुन्हा एकदा रघुराम राजन यांचे पूर्वग्रहदूषित वैचारिक दारिद्य्राचेच दर्शन व्हावे.
वयाच्या अवघ्या सातव्या-आठव्या वर्षांत विश्वाची चिंता करणार्या समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित ‘रघुवीर’ हा चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. निलेश कुंजीर दिग्दर्शित आणि विक्रम गायकवाड अभिनित ‘रघुवीर’ या चित्रपटात रामदास स्वामींचे संपूर्ण आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने ‘रघुवीर’च्या संपूर्ण टीमसोबत दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला सुसंवाद.
समर्थ रामदास स्वामींचं जीवनचरीत्र रुपेरी पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. 'रघुवीर' हा आगामी चित्रपट खऱ्या अर्थाने प्रभू श्रीराम भक्त आणि समर्थ रामदास स्वामींच्या अनुयायांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. 'रघुवीर' या चित्रपटाद्वारे प्रथमच रामभक्त समर्थांचं जीवन जगासमोर येणार आहे. या चित्रपटात अभिनेते विक्रम गायकवाड यांनी समर्थांची भूमिका साकारली असून ती करताना आलेले अनुभव त्यांनी ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितला.
प्रभू रामचंद्रांचे सद्गुरु म्हणून नाम, वर्णन, भक्ती, उपासना आणि चरित्र या गोष्टींचे समर्थ रामदास स्वामी अनेक प्रकारे, अनेक ठिकाणी स्तवन करतात. त्यांनी अनेक नाममुद्रा घेऊन भक्तिरचना केलेल्या आहेत. त्यांच्या साहित्यामध्ये रामदर्शनाचे विलोभनीय इंद्रधनुष्य आहे. त्यांनी वाल्मिकी रामायणातील रामापेक्षा वेगळा, ‘देवबंधमुक्ती’ करणार्या योद्ध्या रामाचा, संत एकनाथांच्या भावार्थ रामायणातून स्वीकार केला. ‘धर्म जागो राघवाचा।’ म्हणत समर्थांनी समाजात स्वत्वाचे, सामर्थ्याचे जनजागरण केले.
राज्य सरकार सेवेतील दीड लाख रिक्त पदे लवकरच भरणार आहे, असे प्रतिपादन ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांनी केले आहे. ओडिशा सरकार शासकीय सेवेतील १.५ लाख रिक्त पदे निष्पक्ष आणि पारदर्शक पध्दतीने भरणार असून पुढील दोन वर्षांत ६५ हजार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, असे राज्यपाल दास यांनी सांगितले आहे.
नॅचरल आईस्क्रीम हे देशातील मोठा आईस्क्रीम ब्रँड! देशातील नामवंत आईस्क्रीममधून अगदी चोखंदळ व्यक्तीलाही आवडेल असे आईस्क्रीम! खूप कष्टाने कामत कुटुंबातील सदस्यांनी हा ब्रँड उभारला. आज आईस्क्रीम ब्रँडचे संस्थापक रघुनंदन कामत यांचे निधन झाले आहे. आईस्क्रीम विश्वातील एक तप आज संपले आहे. विशेषतः नैसर्गिक पद्धतीने आईस्क्रीम कसे असावे याचा झंझावात आज मावळला आहे.
देशभरात आज प्रभू श्रीरामाच्या जन्माचा (Ramnavami ) उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. भक्तिभावाने लोकं प्रभू रामाची पूजा करत आहेत. अशात आजच्या या शुभदिनी गायिका मुग्धा वैशंपायन हिने स्वत: संगीतबद्ध केलेले (Ramnavami) गाणे प्रदर्शित झाले आहे. 'राघवा रघुनंदना' असे हे गाणे असून खास रामनवमीच्या दिनानिमित्त तिने रामभक्तांना ते अर्पित केले आहे.
लोकसभा निवडणुक २०२४ ची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर देशभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये लोक तृणमूल काँग्रेसच्या बॅनरसमोर आणि ममता बॅनर्जींच्या फोटोसमोर लुंगी, नमाजी टोप्या आणि साड्यांचे वाटप करताना दिसत आहेत. भाजपच्या राज्य कमिटीने दि. ५ एप्रिल २०२४ रोजी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे.
२०४७ मध्ये भारत हा विकसित देश म्हणून पुढे येणे शक्य नसल्याचे अकलेचे तारे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी तोडले. याचाच अर्थ, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’सारख्या जागतिक संस्थेमध्ये काम केलेल्या राजन यांचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वेगावरच मुळी विश्वास नाही. पण, राजन यांनी संपुआ आणि आताच्या रालोआच्या काळातील अर्थव्यवस्थेसंबंधीच्या तथ्यांचा तुलनात्मक अभ्यास केला असता, तर कदाचित विकसित भारत हे स्वप्नरंजन नव्हे, तर स्वप्नपूर्तीचा ध्यास असल्याचे त्यांच्या लक्षात आले असते.
या लेखमालेच्या मागील चार भागात मी तुम्हाला बंगालमधील सशस्त्र चळवळीची ओझरती ओळख करून दिली. आता आपण पुन्हा महाराष्ट्राकडे वळूया...
तरूण आपल्या देशाचे भवितव्य आहेत त्यामुळे आज तरूण सुशिक्षित असणे पुरसे नाही, तर ते रोजगारक्षम असणे देखील महत्त्वाचे आहे. अधिक पुढे जात आपण आपल्या लोकशाहीचा लाभ घेत भारताला नव्या उंचीवर नेले पाहिजे, ज्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राची भूमिका, त्यांचा पाठिंबा व सहयोग महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन पद्मविभूषण विजेते डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.ते मुंबईत आयोजित मेकिंग इंडिया एम्प्लॉयेबल कॉन्फरन्स अॅण्ड अवॉर्ड्स सोहळ्यात बोलत होते.
रघुकुल शैक्षणिक ट्रस्ट डोंबिवली श्रीमती के.सी.गांधी शाळेचे चित्रकला शिक्षक अमोल पाटील यांनी पर्यावरण पूरक शाडू माती पासून गणपती बनवणे या कार्यशाळेचे विनामूल्य आयोजन केले होते. या कार्यशाळेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेश CID कडून दि. ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अटक करण्यात आली.त्यांच्यावर ३५० कोटी रुपयांचा स्किल डेव्हलपमेंट महामंडळात घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याचा मुलगा नारा लोकेश यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आंध्र प्रदेशच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ही अटक केली आहे.
माशेलकर सरांचे आत्मचरित्र म्हणजे अमृत महोत्सवी वर्षातील देशाला मिळालेला अप्रतिम आणि अनमोल असा ठेवा आहे. भारताची शताब्दीकडे वाटचाल होत असताना उपयुक्त ठरेल, अशी त्यांनी सांगितलेली ही सप्तसूत्री दिशादर्शक आहे. १) संतुलित भारत २) सुसंस्कारित भारत ३) सुविद्य भारत ४) समृद्ध भारत ५) सुशासित भारत ६) सुरक्षित भारत ७) स्वानंदी भारत. ही सप्तसूत्री आपण प्रत्येकाने अमलात आणायला हवी, असं त्यांना वाटतं. ही सप्तसूत्री सत्यात उतरवून नवा भारत घडवण्यासाठी तत्पर राहण्याची हीच योग्य वेळ आहे.
जयंतराव म्हणजे ‘योजक:स्तत्र दुर्लभ:’ या व्याख्येत बसणारे व्यक्तित्व होते. ते शोधक होते. तर्कशुद्ध मांडणी करणारे तत्वज्ञान जगणारे आणि कोणत्याही गोष्टीच्या मूलभूत उत्पत्तीकडे जाणारे ते व्यक्तिमत्व होते. जयंतराव कालिदासाने वर्णन केलेली संत ही संकल्पना जयंतरावांना तंतोतंत लागू पडते. प्रचारकी जीवनाचा ते आदर्श होते. अनुशासन, संघटन कौशल्य, शिस्त याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे गौरवोद्गार विविध मान्यवरांनी काढले.
आषाढ शुक्ल द्वितीयेला जगन्नाथ पुरी येथे पूर्णपरात्पर भगवान श्रीजगन्नाथजींची रथयात्रा सुरू होते. ही रथयात्रा पुरीचा मुख्य उत्सव आहे. त्यानिमित्ताने ही रथयात्रा आणि नागपूरचे मराठा राजे श्रीमंत रघुजी महाराज भोसले यांचे योगदान उलगडणारा हा लेख....
कोणताही विज्ञान किंवा अन्यदेखील विषय आणि त्याची सविस्तर माहिती त्यांच्याकडे नाही, असे कधीच अनुभवायला मिळाले नाही. इतक्या सुसूत्रतेत ते माहिती सांगायचे की, अगदी मंत्रमुग्ध व्हायला व्हायचं. मग स्वामी विवेकानंदांचे संगीतातले सखोल ज्ञान असेल की, ‘टेस्ला’च्या तंत्रज्ञानाची माहिती असेल.... इतका परिपूर्ण माहितीचा साठा एकावेळी कसं काय ते डोक्यात साठवून ठेवतात, याचं कौतुक असायचं.
कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. कर्नाटकात काँग्रेस नेते टी. रघूमुर्ती विजयी झालेले आहेत.चल्लाकेरे विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार टी रघुमूर्ती विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार रघुमूर्ती यांनी आपला व्यवसाय शेती आणि समाजसेवा असा उल्लेख केला आहे. ते पदवीधर असून त्याचे वय ५९ आहे.
अमेरिकेतील अर्थव्यवस्था ‘टाईम बॉम्ब’च्या तोंडावर उभी असून, तेथील बँकिंग संकट येत्या काळात आणखी तीव्र होऊ शकते, असा इशारा रघुराम राजन यांनी दिला आहे. भारतासाठी हे वर्ष आर्थिक आव्हानांचे असेल, असा इशारादेखील त्यांनी गेल्या वर्षी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाल्यानंतर दिला होता. सुदैवाने भारतावर ती वेळ आली नाही, येणारही नाही!
कर्नाटक विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून, सत्ता मिळविण्याचे स्वप्न पाहणार्या काँग्रेसला गळती लागली आहे. काँग्रेसमधून आऊटगोइंग सुरूच असून भाजप आणि जेडीएसमध्ये अनेक दिग्गज नेते प्रवेश करत असल्यामुळे काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत.
आजचा दिवस विशेष असल्याने मनाच्या श्लोकाचे विवरण तात्पुरते बाजूला ठेवून आजची तिथी लक्षून जन्मलेल्या दोन महान पुण्यपुरुषांचे स्मरण करणे उचित होईल. आज चैत्र शुद्ध नवमी. या तिथीला भगवंताच्या अवतार रूपाने जे दोन समर्थपुरूष प्रगट झाले, त्यांचा हा जन्मदिवस एक उत्तरेकडील शरयूनदीच्या तिरी वसलेल्या अयोद्धा नगरीत महापराक्रमी राजा दशरथाचा युवराज पुत्र राम म्हणून सुमारे सात सहस्र वर्षांपूर्वी जन्माला आले.
भारताचा मूळ राष्ट्रीय प्रवाह कोणता? वनवासी हिंदू आहेत की अन्य कुणी? अस्सल भारतीय परंपरा, संस्कृती, संस्कार, रितीरिवाज यांचे दर्शन कुठे होईल? निसर्ग, वनातील पशु-पक्षी यांच्यासोबतची तादात्म्यता कुठे अनुभवायला मिळेल? निसर्गाच्या सान्निध्यात राहत असताना सहजपणे निर्माण झालेली मनाची शुद्धता, निर्मळता अनुभवत असतानाच ‘सर्वेऽपि सुखिन: सन्तु’ची उदात्त अनुभूती कुठे प्राप्त होईल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी आहेत? एकच करा, ‘ऑस्कर’ विजेता अवघ्या 41 मिनिटांचा लघुपट ‘दि एलिफंट व्हिस्परर्स’ बघा. या 41 मिनिटांत त
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण गुढीपाडवा, दि. २३ मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे गेली ३३ वर्षे सातत्याने दिला जाणारा आणि देशासह परदेशातही प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०२३ या वर्षाचा पुण्यभूषण पुरस्कार मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना देण्याचे डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे निश्चित केले आहे. त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना देखील गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ’दै.मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
भारतीय बँकांची सरशी उचित राजकीय धोरणांची व त्याच्या शिस्तबद्ध अंमलबजावणीची फलश्रुती आहे. यातले महत्त्वाचे चार-पाच घटक समजून घेतले, तरी ही प्रक्रिया समजू शकते.
अर्थशास्त्रात कोणताही निष्कर्ष काढताना १२ महिन्यांचा विचार करावा लागतो. मात्र, केवळ तिमाहीच्या आकड्यांचा हा निष्कर्ष अस्सल ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’च्या भीतीबाबतचा आहे.
एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी. यामुळे शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा या गावामध्ये निळ्या दाढीवाला राघू या पक्ष्याचे दर्शन झाले आहे. स्थानिक पक्षीनिरीक्षकांनी बुधवारी दि. १४ सप्टेंबर रोजी या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. इंग्रजीत ह्या पक्ष्याला Blue-bearded Bee-eater असे म्हणतात. सदरचा पक्षी हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये व चिपळूण तालुक्यातील घाटमाथा या भागामध्ये या आधी दिसल्याची माहिती मिळाली आहे. परंतु अपुऱ्या फोटोग्राफिक रेकॉर्ड व नोंदी अभावी रत्नागिरी तालुक्यामध्ये हा प्रथमच दिसला असण्याची शक्यता पक्षी अभ्यासकांनी वर्तवली आह
दि. २३ ऑगस्ट, १९९७ रोजी भारताने अमेरिकेविरोधातील हळदीच्या ‘पेटंट’चा कायदेशीर लढा जिंकला. या घटनेला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने हळदीच्या ‘पेटंट’चा लढा आणि आज २५ वर्षांनंतर भारतीय ‘पेटंट’ संदर्भात सद्य:स्थिती, आव्हाने यावर प्रकाश टाकणारा हा माहितीपूर्ण लेख....
चीनच्या नादाला लागून श्रीलंका भिकेला लागला तीच अवस्था पाकिस्तानची होतीये त्यामुळे अर्थव्यवस्थेचे कसलेही ज्ञान नसणाऱ्या काही छद्मपुरोगाम्यांनी भारतात मंदीचे सावट येणार अशी ओरड करायला सुरुवात केली. आता खुद्द रघुराम राजन यांनीच भारतात मंदीचे सावट येण्याच्या शक्यतेला पूर्णविराम देऊन भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल चांगले शब्द उच्चारल्याने केंद्रसरकार विरोधकांची चांगलीच पंचाईत झालीये.
विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्या ज्येष्ठ भगिनी शैलजा बेडेकर या ‘मनोरंजन वाचनालय’ चार दशके यशस्वीपणे चालवणार्या म्हणून ठाणेकरांना परिचित आहेत.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (AIMIM) पक्षाच्या एका आमदाराचा मुलगा हैद्राबादच्या जुबली हिल्स येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप करण्यात येतोय. भाजप आमदार एम. रघुनंदन राव यांनी पत्रकार परिषदेत काही फोटोमध्ये एआयएमआयएमच्या आमदाराच्या मुलाचा या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा केला आहे.
“आन आणि मान ठाकूर यांचे स्मारक त्या दोन वीरांना वाहिलेली केवळ श्रद्धांजली नाही, तर हे शौर्यस्थळ येणार्या अनेक पिढ्यांना स्थानिक आगरी, कोळी बांधवांचे वैचारिक, सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत काय योगदान आहे, हे दाखवून देणारे प्रतीक असेल. पुढच्या पिढीला या स्मृतिस्थळापासून प्रेरणा मिळेल. विद्यार्थ्यांना नेपोलियन माहिती आहे, पण कान्होजी आंग्रे, आन ठाकूर किंवा मान ठाकूर हे आपल्या मातीतील वीर माहीत नसतात,” अशी खंत सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी व्यक्त केली.
देशात सध्या ज्या पद्धतीने अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जात आहे त्यामुळे देशाची प्रतिमा अल्पसंख्यांकविरोधी बनत आहे अशी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मुक्ताफळे उधळली आहेत
‘पद्मविभूषण’ डॉ. रघुनाथ माशेलकर लिखित ‘Reinventing India’ या इंग्रजी पुस्तकाचा भावानुवाद म्हणजे ‘शोध नव्या भारताचा’ हे पुस्तक आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांची ओळख वैज्ञानिक अशी आहेच. पण, ते केवळ वैज्ञानिकच नाही, तर एक विचारवंत देखील आहेत आणि भविष्याचा अचूक वेध घेणारे वैज्ञानिक विचारवंत म्हणून डॉ. माशेलकर यांचा उल्लेख करता येईल. कारण, हे पुस्तक म्हणजे नव्या भारताची जाणीव करून देणारे आहे. त्यांनी दिलेल्या व्याख्यान आणि लेखांचे एकत्रित केलेले संकलन म्हणजे हे पुस्तक. १९९६ ते २००९ यादरम्यान त्यांनी दिलेल्या व्याख्य
शिवसेनेचा नेता रघुनाथ कुचिक याने ज्या मुलीवर अत्याचार केले, ती मुलगी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. गोव्यातील कोल्वा गावातून त्या मुलीशी संपर्क झाला असल्याचे आता उघड झाले आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना पिडीत मुलीचा फोन आल्याचे त्यांनी बुधवारी सांगितले. गंभीर बाब म्हणजे यादरम्यान पिडीत मुलीला काही लोकांकडून इंजेक्शन दिले असून कागदपत्रांवर सह्यादेखील घेण्यात आल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.
"शिवसेना राज्यमंत्री रघुनाथ कुचिक या नराधमाकडून पुण्यातील एका मुलीचा बलात्कार करण्यात आला आणि नंतर गर्भपातही करण्यात आला. या सर्व गोष्टी समोर येऊन सुद्धा त्या पिडीत मुलीला न्याय मिळत नाही. यामुळे तिच्याकडून फेसबुकवर आत्महत्या करण्याबद्दल लिहिलं जातं. तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याची जबाबदारी राज्य सरकारची असेल!", असे भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ यांनी एका व्हिडीओमार्फत रविवारी ठाकरे सरकारला सुनावले.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू.गोळवलकर गुरुजी यांनी राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचवण्यार्या गोष्टींशी कधीही समझोता केला नाही. भाषावार प्रांतरचना, गोवामुक्ती, पंजाबचा प्रश्न, चीनची समस्या या प्रश्नांवर त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत,” असे विचार रा.स्व.संघाचे पूर्व सरकार्यवाह व विद्यमान कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी अलिबाग येथे व्यक्त केले
शिवसेना कामगार नेते रघुनाथ बबनराव कुचिक याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार घोषित
सरखेल कान्होजी आंग्रेंच्या वंशजांची मागणी
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जनजातीय योद्ध्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. परंतु, हा इतिहास आजही दुर्लक्षित, वंचित व अभ्यासापासून दूर आहे. इंग्रजांनी मांडणी केलेल्या इतिहासात विघटन वाद, अलगवाद, जातीयता, विभाजन, वर्गवारी, वर्णभेद करणारा असल्याने व त्याचा पगडा आणि प्रभाव समाजव्यवस्थेवर वर्षानुवर्षे पडल्यामुळे, जनजाती समाजाचा प्राचीन काळापासूनचा गौरवशाली इतिहास आजही प्रतीक्षा करतो आहे.
काही दिवसांपूर्वी झाली होती कोरोनाची लागण
आपल्या वडिलांचा मृत्यू आणि तोसुद्धा स्वराज्य रक्षणासाठी. मग काय, हा देश पुन्हा स्वतंत्र करण्यासाठी लहुजी यांनी शपथ घेतली. ‘जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी.’ लहुजींना युद्धशास्त्राचे जे ज्ञान अवगत होते, त्याने तरुणांना बलशाली व युद्धकलेत तरबेज करण्याचे महान कार्य लहुजींनी करत आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याचे ठरविले व शेवटपर्यंत ते व्रत त्यांनी निष्ठेने पाळले.
श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात सुरु होते उपचार