एकीकडे आज आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे, एक राष्ट्र म्हणून भारत आपल्या ‘स्व’च्याॉजोरावर एक नवी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे या परिश्रमाचा विरोध होतोय. विरोधकांचा नेमका हेतू शोधून काढण्यासाठी विचारमंथन व्हायला हवे.
Read More
“एकीकडे उच्च शिक्षित आणि कुशल लोक कोरोनासारख्या महामारीविरोधात लढा देऊन सर्वसामान्यांचे जीवन वाचविण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरीकडे जगात दहशत आणि हिंसा पसरविण्याचे काम करण्यातही उच्च शिक्षित लोक आघाडीवर आहेत. त्यामुळे अशा विचारसरणींविषयी आता गंभीर विचार करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, दि. १९ फेबु्रवारी रोजी केले. पश्चिम बंगालमधील विश्वभारती विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात ते बोलत होते.