ग्रीस म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो प्राचीन इतिहास, लोकशाही, ऑलिम्पिक खेळ, पाश्चिमात्य नाट्यकला व तत्त्वज्ञान यांची जन्मभूमी. यासोबतच तेथील राज्यशास्त्र विषयातील तज्ज्ञ, गणिततज्ज्ञ, इतिहासकार, महान योद्धे, ऐतिहासिक लढाया यासाठीही हा देश प्रसिद्ध. ग्रीस हा विकसित देश म्हणून ओळखला जात असून, १९८१ सालापासून युरोपीय महासंघांचा तो प्रमुख सभासद आहे. अशा या विकसित देशातील पायाभूत सुविधा, येथील अर्थव्यवस्था गतिमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यापैकीच महत्त्वाचा आणि आकर्षक, कोरिंथ आखाताच्या पलीकडे असल
Read More
( PFI ) भारतातील प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरुद्ध ईडीच्या दोन वर्षांच्या तपासात नवे खुलासे समोर आले आहेत. पीएफआयचे सिंगापूर आणि आखाती देशांमध्ये १३ हजारांहून अधिक सक्रिय सदस्य आहेत, ज्यांच्याकडे करोडो रुपयांचा निधी उभारण्याची जबाबदारी असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.
मध्य-पूर्वेतील देशांकडून अर्थव्यवस्थेतील वृद्धीसाठी रेल्वे प्रकल्प विस्तारण्यावर भर दिला जात आहे. मध्य पूर्वेतील ‘गल्फ रेल्वे प्रकल्प’ हा त्यापैकीच एक प्रकल्प. हा जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा बांधकाम प्रकल्प. ही ‘गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल’ (GCC)च्या सदस्यांना जोडणारी प्रस्तावित रेल्वे मार्गिक असून बहारीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या आखाती देशांना रेल्वेमार्गाने जोडेल. विशेषत: कुवेत आणि सौदी अरेबियामधील नियोजित रेल्वे जोड प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
सौदी अरेबियाने अमेरिकेसोबतचा ५० वर्षांपासून सुरू असलेला करार रद्द करत, अमेरिकेला चांगलाच दणका दिला आहे. ‘पेट्रोडॉलर करार’ असे त्याचे नाव असून, यामुळे सौदी अरेबिया कोणत्याही चलनात तेल विकू शकतो.
नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर) चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी कर्नाटकातील बेंगळुरू येथील एका बेकायदेशीर अनाथाश्रमाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ते म्हणाले की, येथे राहणाऱ्या मुलींशी झालेल्या प्राथमिक संभाषणावरून असे दिसते की, आखाती देशांमध्ये लग्नाच्या नावाखाली तस्करी करण्यासाठी येथे ग्रूमिंगचे काम केले जाते. Grooming Jihad
गेल्याच आठवड्यात भारत सरकारने कतारशी झालेल्या २५ वर्ष मुदतीच्या वायू खरेदी कराराची मुदत आणखीन २० वर्षांनी वाढवली. सुमारे ७८ अब्ज डॉलरच्या या करारामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेची सुनिश्चितता साधली असून, त्यात सुमारे सहा अब्ज डॉलरची बचतही करण्यात आली आहे. त्यानंतर नौदल अधिकार्यांना कतारमधून भारतात परत पाठवण्याची बातमी हा योगायोग असूही शकतो. पण, त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे, भारताचे आखाताशी जडलेले नाते अधिकाधिक घट्ट होत आहे.
इस्रायलवर ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यानंतर उफाळलेल्या संघर्षात तेलाचे दर कडाडले आहेत. इस्रायलने हे युद्धच असल्याचे जाहीर करत ‘हमास’चा नायनाट करण्यासाठी गाझा पट्टी अक्षरशः नेस्तनाबूत करण्याचा विडा उचलला आहे. ‘हमास’ला मदत करणार्या इराणपर्यंत या संघर्षाची व्याप्ती वाढली, तर मात्र पुरवठ्याअभावी संपूर्ण जगाला इंधनाची कमतरता जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे.
भारताला मध्य पूर्व तसेच युरोपशी जोडणार्या प्रस्तावित ‘आयएमईसी’ प्रकल्पात पश्चिमी किनारपट्टीवरील बंदरांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. म्हणूनच केंद्र सरकार या बंदरांच्या विकासासाठी विशेषत्वाने प्रयत्नशील दिसते. मालवाहतुकीला चालना देणारा हा प्रकल्प असल्याने, बंदरांची क्षमता वाढविण्यावर भर देणे हे क्रमप्राप्तच.
मक्का येथील पवित्र मशीद अल-हरम येथे आलेल्या श्रद्धाळूंच्या वस्तू चोरणे, खिसा कापणे, मौल्यवान वस्तू चोरणे अशा घटना घडत होत्या. सौदी अरेबियामध्ये चोरी करणे, हे हराम मानले जाते असे म्हणतात; तसेच भीक मागणेही हरामच. बरं मक्केच्या पवित्र मशिदीच्या इथे अल्लाला मानणारे आणि अस्मानी किताबानुसार जगणारे-मरणारे येणारच.
पाकिस्तानमध्ये जानेवारी महिन्यात निवडणुकांची घोेषणा करण्यात आली आहे. त्यातच इमरान खानमुळे अमेरिका आणि आखाती अरब देशांनी पाकिस्तानला वार्यावर सोडले असून हे बदलायचे असेल, तर नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदी बसवण्याला पर्याय नाही, हे तेथील लष्कराच्या लक्षात आले आहे. नवाझ शरीफ यांचे परत येणे भारतासाठी चांगली गोष्ट असली, तरी आज भारत पाकिस्तानवर विश्वास टाकू इच्छित नाही.
इस्रायलच्या निर्मितीनंतर आजूबाजूच्या अरब देशांनी इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर जे झाले, त्याचा संदर्भ देण्यासाठी आजचा विषय आहे. जेव्हा शेजारच्या, आजूबाजूच्या मुस्लीम राष्ट्रांनी इस्रायलवर हल्ला केला, त्यावेळी इस्रायलने त्या हल्ल्याला चोख उत्तर तर दिलेच ; उलट गाझापट्टी आणि आजूबाजूच्या प्रदेशावरही सत्ता प्रस्थापित केली. त्यातही जेरूसलेम आणि अल अक्सा, हे कायमच ज्यू, मुस्लीम आणि ख्रिश्चनांसाठी संवेदनशीलतेचा मुद्दा ठरला.
सध्या पाश्चिमात्य देशांकडून धार्मिक असहिष्णुतेच्या मुद्द्यावर भारताला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचे प्रयत्न पाहता आखाती अरब देशांकडून भारताशी साधला जाणारा संवाद आश्वासक आहे.
गरीब राष्ट्रांना कर्जाच्या विळख्यात अडकवून महासत्तेची स्वप्न पाहणार्या चीनने आता युआन अस्त्राचा उपयोग सुरू केलेला दिसतो. रशियापाठोपाठ, सौदी अरेबिया, युएई, ब्राझील यांच्या सोबतच अनेक आफ्रिकी, आशियाई देशांबरोबर व्यापारात चिनी चलन ‘युआन’चा वापर सुरू केला आहे. अमेरिकी डॉलरला हद्दपार करू पाहणार्या या चीनच्या ‘युआन’ची म्हणूनच समीक्षा करणे महत्त्वाचे ठरावे.
कच्छच्या आखातामधून प्रथमच दुर्मीळ समुद्री गायीचे (डुगाॅंग) छायाचित्र टिपण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. भारतीय वन्यजीव संस्थानच्या (डब्लूआयआय) संशोधकांनी एरियल ड्रोनच्या माध्यमातून समुद्री गायीचे छायाचित्र टिपले.
भारताबाहेरील मराठी मंडळींनी, मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे ‘जीएमबीएफ ग्लोबल!’ मराठी बांधवांना आपल्या अनुभवाचा फायदा व्हावा, त्यांचाही व्यवसाय वाढावा, त्यासाठी मराठी माणसाला माहिती देण्यासाठी, अडचणीत मदत करण्यासाठी, दुबईमधील मराठी उद्योजकांनी ‘जीएमबीएफ ग्लोबल’ संस्थेची स्थापना केली. संस्थेचे कार्य दुबई येथून नियंत्रित होते. ‘जीएमबीएफ ग्लोबल’ अर्थात ‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम’ या संस्थेविषयी थोडसं...
भारत, इस्रायल आणि आखाती अरब देशांमधील संबंध परस्परांना पूरक आहेत. इस्रायलचे तंत्रज्ञान, आखाती देशांतील तेल, भांडवल आणि मुक्त व्यापारास पोषक वातावरण आणि भारतातील उत्पादनक्षमता, मनुष्यबळ, उद्योजकता आणि बाजारपेठ यातून तिन्ही देशांचाही फायदा होऊ शकतो. इस्रायली कंपन्यांची शस्त्रास्त्रं भारतात उत्पादित होऊन आखाती देशांच्या गरजा भागवू शकतात. या त्रिवेणी संगमाला ख्रिस्तीबहुल अमेरिकेचे पाठबळ मिळाले, तर संपूर्ण जगापुढील प्रश्न सोडवण्याची शक्ती त्यातून निर्माण होते.
अरबस्तानात अनेकदा येणार्या वादळांमध्ये वाळूच्या संपूर्ण टेकड्याच्या टेकड्याच एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित होतात. कुठे वाळूच्या खाली दडलेली पाणथळ जागा उघडी पडते, तर कुठे पूर्वी सपाट असणार्या भागात नवी टेकडी उभी राहते. सध्या पश्चिम आशियाच्या राजकारणात तशाच गोष्टी घडत आहेत. आखाती देशांमधील बदलणार्या समीकरणांचे पडसाद थेट भारत, पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्कीपर्यंत जाणवत आहेत.
कोरोना काळात मनोरंजनाची व्यासपीठे बदलत असताना नव्या ऊर्मीने दुबईत रंगणाऱ्या 'गल्फ सिने फेस्ट २०२१' या मराठी चित्रपटांच्या प्रीमियर सोहळ्याच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. आखाती देशातील चित्रपटप्रेमींना आनंद देण्यासाठी तसेच मराठी चित्रपटसृष्टी नव्या ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने सज्ज व्हावी या उद्देश्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या हस्ते केले अनावरण
सुमारे १३५ किमी लांब असा हा प्रकल्प आहे. तसेच, हा कालवा थायलंडचे आखात आणि अंदमान येथील समुद्र यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणार आहे. भारत या प्रकल्पाच्या शर्यतीत सहभागी झाला असल्याने याचा मोठा सामरिक फायदा येणार्या काळात भारताला होणार आहे. तसेच, यामुळे हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रादरम्यानचे अंतरदेखील घटणार आहे.
आपल्या मूलतत्त्ववादी समजुती, प्रथा-परंपरा इतरांवर लादण्यासाठी त्यांनी त्या देशांतही धुडगूस घातला. मात्र, या सगळ्यांहून आणखी एक स्थलांतरितांचा वर्ग म्हणजे आखाती देशांत जाणारे नागरिक. जगभरातील अनेक लोक तेलसंपन्न आखाती देशांत जाऊन नोकरी, रोजगार मिळवतात, तिथेच राहतात आणि काही पैसा आपल्या मायदेशीही पाठवतात. असाच एक आखाती देश म्हणजे कुवेत.
आखाती अरब देशांनी तेलाच्या पैशांतून आपल्या नागरिकांना फारसे कष्ट न करता चैनीत जगण्याची सवय लावली. आज त्यांच्यावर अनुदानाची खिरापत वाटायला पैसा नाही आणि द्यायला काम नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक अरब देशांनी आपल्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर बदल करायला सुरुवात केली आहे.
आखाती देशातील भारतीयांना मायादेशामध्ये घेऊन येण्यासाठी नौदलाच्या १४ युद्धनौका सज्ज झाल्या आहेत
कोरोनाने जगभरात थैमान घातले असून आखाती देशातून २६ हजार भारतीयांना मुंबईत आणले जर आहे. महापालिकेतर्फे त्याची राहण्याची व्यवस्था क्वारंटाइनमध्ये करण्यात येणार आहे. देशभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असून सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिराती, कुवेत तसेच ओमानसारख्या आखाती देशात अनेक भारतीय कामानिमित्त आखाती देशांमध्ये वास्तव्यास आहेत. येथील तब्बल २६ हजार भारतीय नागरिक ३१ मार्चपर्यंत मुंबईत दाखल होणार
गुजरातमधील खाडीक्षेत्र गुन्हेगारी आणि राष्ट्रविरोधी कृत्यांमुळे असुरक्षित आहेत. उदाहरणार्थ गुजरातमध्ये, हरामी नाला प्रवाहक्षेत्र भारतात उगम पावून पाकिस्तानात प्रवेश करते. मग पुन्हा भारतात येते. त्यामुळे हे प्रवाहक्षेत्र घुसखोर व तस्करांच्या पसंतीचे झालेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणात पर्शियन आखाताकडे केवळ व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने पाहिले जात नाही. भारतीय नौदल आखातापासून हाकेच्या अंतरावर असून तेथे सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. गेल्या पाच वर्षांमध्ये आखातातील सर्व देशांशी भारताच्या सुधारलेल्या संबंधांमागचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.
मागील लेखात आपण सागराच्या उदरात डुबकी मारून सागराच्या अंतरंगाची माहिती घेतली. या लेखात आपण जगातील काही सागर व महासागरांची ओळख करून घेणार आहोत.
खाडी किनारांच्या भोवताली राज रोसपणे उभ्या राहत असलेल्या बेकायदा बांधकामांकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने अशा वसाहती मध्ये पावसाळ्यात पाणी शिरण्याचा धोका कायम राहिला आहे.