आगरी समाजाला पूर्वी जी वागणूक मिळत होती त्याबद्दल दुःख होत असे. त्यातुनच काहीतरी प्रगती करण्यासाठी समाज शैक्षणिक दृष्टया प्रगत झाला पाहिजे यासाठी आमचा अट्टाहास होता. तो आमचा उद्देश सफल झाला. आता समाज शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झाला असून, डॉक्टर, वकील, इंजिनिअर असे मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात समाजातील मुले मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आगरी समाजातील युवक मानाने समाजाचे नाव मोठे करीत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार आगरी युथ फोरम डोंबिवलीचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी काढले.
Read More
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी. यासह २७ गावातील नागरिकांना दहा पट मालमत्ता कर आकारला जात आहे. कोणत्याही सोयी सुविधा दिल्या जात नसताना हा कर भरणे नागरीकांना अशक्य आहे. त्यामुळे तो रद्द करण्यात यावा. २७ गावे महापालिकेतून वगळल्यास कराचा हा प्रश्न संपुष्टात येईल या मागणीसाठी सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी सुभाष मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले.
कल्याण-डोंबिवलीत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांसह वाहनचालक त्रस्त आहे. पावसाळ्याआधी खड्डेमुक्त रस्त्यांची आश्वासने पावसाळा संपल्यानंतरही अद्याप अपूर्ण आहेत. रस्त्यांची झालेली चाळण आणि खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था सामान्य नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. ‘कल्याण-डोंबिवलीत रस्ते खड्ड्यात’ या विशेष वृत्तमालिकेद्वारे आजपासून प्रकाशझोत टाकणार आहोत कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुरवस्थेवर...
समाजहितासाठीच्या संघर्षात अग्रेसर आणि साहित्य, संस्कृतीच्या संवर्धनासाठी सर्वस्वी झटणारे ‘संघर्ष समिती’चे पदाधिकारी आणि ‘आगरी युथ फोरम’चे अध्यक्ष गुलाब वझे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवार, दि. १३ ऑगस्ट रोजी भेट घेतली. या भेटीदरम्यान, विमानतळाचे काम अद्याप पूर्ण होण्यास अवकाश असल्याने ‘सिडको’ नामकरणाची घाई का करत आहे, असा सवाल ज्योतिरादित्य शिंदे यांनी बैठकीमध्ये उपस्थित केला.