ठाण्यात दि. २२ मार्च रोजी सकाळी ठीक ६:४५ वाजता शिवाजी महाराजच्या पुतळ्याला वंदन करून श्री. कौपिनेश्वर मंदिरातून स्वागतयात्रेस प्रारंभ झाला. पारंपारिक वेशभूषा घालून सर्व ठाणेकर शोभा यात्रेत सामील झाले होते. श्री कौपिनेश्वर आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने या शोभायात्रेचे आयोजन केले होते. वेगवेगळ्या स्पर्धा आणि पारितोषिक वितरण सोहळे यावेळी पार पडले. १९ मार्च रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती, शोभायात्रेत छायाचित्र स्पर्धा तसेच सेल्फी विथ शोभा यात्रा अशाही नव्या पिढीला, तरुणाईला आकर्षून घेणाऱ्या
Read More
पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरं उघडण्यात येणार
दिवा, दीपक, पणती यातला भावार्थ म्हणजे अमावस्येला म्हणजेच जीवनात कितीही काळोख अर्थात खडतर परिस्थिती असेल, तरीही प्रकाशपुंज म्हणजेच सकारात्मकता असावी असे सूचित होते. जीव, माया आणि ब्रह्मतत्त्वाचे पूजन म्हणजे दिवाळी.
चैत्र मासारंभ म्हणजे नववर्षारंभ! आम्रतरूवर मोहोरलेला गंध आणि पर्णसंभारातून तानावर तान घेणारी कोकिळा! कोकिळा गाऊ लागली की जाणवतं ते सर्वत्र पसरलेलं सुगंधाचं वातावरण... कोवळ्या पालवीचं पालवणं! लालसर, तांबूस, कोवळ्या पर्णांनी आशा पल्लवीत करणारा निसर्ग. नववर्ष हे नवे संकल्प घेऊन येणारे असतं. श्रीरामाची विजयपताका अंबरात झळकावणारी गुढी! सर्वत्र उत्साह, उल्हास ओसंडून वाहतो. प्रभू श्रीरामाच्या जयघोषात, नामघोषात आसमंत दुमदुमतो. विजयाची यशोगाथा स्वपराक्रमाने साकारणारे प्रभू श्रीराम! चैत्र मास व प्रभू श्रीराम मरगळलेल्
सामान्य माणसांमधूनच राजकारणी पुढे येतात. त्यामुळे सामान्यांचे गुणदोष राजकारण्यांमध्ये असतातच. मनस्वी, लहरी, हेकेखोर, हट्टी, माजोरडेपणा हे अवगुण कमीअधिक प्रमाणात सर्व माणसांमध्ये आढळतात. पण, या अवगुणांचा अतिरेक झाल्यास ते कोणासाठीही हानिकारकच असते.
राष्ट्रीय विकास मंडळ संचालित नववर्ष यात्रा स्वागत समितीच्या माध्यमातून येथील गोदाघाटावरील पाडवा पटांगण येथे महारांगोळी साकारण्यात आली. ‘आपले सण, आपली संस्कृती’ या विषयावर रेखाटण्यात आलेल्या या रांगोळीच्या रेखाटनकामी सुमारे १० टन रंग व रांगोळी यांचा वापर करण्यात आला. ही महारांगोळी रेखाटण्याकरिता सुमारे ५०० महिलांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला.
नववर्ष यात्रा स्वागत समितीचा पुढाकार
बेडकाप्रमाणे केवळ फुगून, ओरडून, गर्जना करण्याचा प्रयत्न हा स्वत: सहित पक्षाच्या अस्तित्वासाठी घातक ठरू शकतो, यावर नक्कीच विचार करण्याची आवश्यकता आहे.